Halloween Costume ideas 2015
Latest Post


(१०४) वस्तुस्थिती अशी आहे की जे लोक अल्लाहच्या आयतींना मानीत नाहीत अल्लाह कधीच त्यांना खर्‍यापर्यंत पोहचण्याची सद्बुद्धी देत नाही आणि अशा लोकांसाठी दु:खदायक प्रकोप आहे. 

(१०५) (पैगंबर काही खोटे रचीत नाही तर) असत्य ते लोक रचीत आहेत जे अल्लाहच्या आयतींना मानीत नाहीत.३० वास्तविक पाहता तेच खोटे आहेत. (१०६) जो माणूस ईमान धारण करूनही इन्कार करण्यावर विवश केला गेला असेल मात्र त्याच्या मनात ईमान असेल (तर काही हरकत नाही) परंतु ज्याने मनापासून कुफ्र स्वीकारले तर त्याच्यावर अल्लाहचा कोप आहे. अशा सर्व लोकांसाठी मोठा प्रकोप आहे.३१ 


३०) दुसरा अनुवाद असाही होऊ शकतो ‘असत्य तर ते लोक रचीत असतात जे अल्लाहच्या आयतींवर ईमान आणत नाहीत.’

३१) सदरहू आयत त्या मुस्लिमांसंबंधी आहे ज्यांचा त्या वेळी भयंकर छळ केला जात होता आणि असह्य यातना देऊन त्यांना कुफ्रसाठी विवश केले जात होते. त्यांना सांगितले गेले आहे की जर एखाद्या वेळी अत्याचारांपायी विवश होऊन केवळ जीव वाचविण्यासाठी तुम्ही ‘कुफ्रचे वचन तोंडाने उच्चारले, आणि तुमची मने मात्र कुफ्रच्या श्रद्धेपासून अलिप्त राहिली तर क्षमा केली जाईल. परंतु जर मनापासून तुम्ही कुफ्रचा स्वीकार केला तर जगात भले तुम्ही आपले प्राण वाचवा, अल्लाहच्या कोपापासून तुम्ही वाचू शकणार नाही


भारत हा कृषिप्रधान देश म्हणून संपूर्ण जगभरात ओळखला जातो. भारतातील शेती अत्यंत सुपीक आहे. अर्थात त्यामुळे भारतीय लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती हाच आहे. या देशात अगदी प्राचीन काळापासून कृषीसंस्कृतीला महत्त्व देण्यात आले आहे. या देशांतील सर्व सण उत्सव हे कृषीसंस्कृतीशी निगडित आहेत. अलिकडच्या काळात अत्यंत प्रगत, नियोजनबद्ध व आधुनिक पद्धतीने शेती केली जाते. शेती हा उत्तम व्यवसाय म्हणून करण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले जातात. तरीही म्हणावे तेवढे यश येत नाही, या पार्श्वभूमीवर व्यवसायात लागणारे कौशल्य, कष्ट व नियोजन तसेच दूरदृष्टीने निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

स्वतः शेतकरी, शासनाचा कृषी विभाग, जलसंपदा विभाग तसेच पाटबंधारे विभागाने परस्पर सहकार्याने योग्य व नियोजनबद्ध शेती व्यवसाय म्हणून केल्यास शेतीतून प्रचंड प्रमाणात विविध धनधान्य व फळफळावळ यांचे उत्पादन मिळू शकते.

पावसाळ्यात मृग नक्षत्र निघण्यापूर्वी शेतकऱ्यांनी अंतर्गत मशागतीची कामे पूर्ण केली पाहिजेत. मात्र ही अंतर्गत मशागतीची कामे निर्धारित वेळेत पूर्ण होत नाहीत, अंतर्गत मशागतीत नियोजनाचा अभाव दिसून येतो. त्यामुळे खरीप हंगामातील पिके व अपेक्षित उत्पन्न शेतकऱ्यांच्या पदरात पडत नाही.

निर्धारित वेळेत शेतीची नांगरणी आवश्यक

पावसाळ्याच्या तोंडावर शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करतात. पावसाळ्यात सुर्य दर्शन बहुधा कमी होत असते. त्यामुळे नांगरलेल्या शेतातील मातीला उन्हाचा स्पर्श जेवढा व्हावयास हवा, तेवढा होत नाही. त्यामुळे माती कसरहीत राहते. याकरिता शेतकऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी एक दोन महिने अगोदर संपूर्ण शेताची नांगरणी करून घ्यावी, म्हणजे खालची माती वर येऊन तीला आवश्यक तेवढा सुर्यप्रकाश मिळून संपूर्ण माती भाजून निघेल व तिच्यामध्ये कसदारपणा येईल. नांगरलेल्या किंवा वखरलेल्या मातीला पुरेशा प्रमाणात उन्हाचा तडाखा बसणे अत्यंत आवश्यक असते.

तलावातील किंवा धरणातील गाळ पसरला तर जमिनीचा पोत सुधारतो व उत्तम सुपीकता टिकून राहते.

उन्हाळ्यात तलाव व धरण क्षेत्र कोरडे पडते, अशावेळी तलावातील व धरणातील गाळ विनामूल्य काढून नेण्यासाठी आवाहन केले जाते.हा गाळ शेतात पसरला आणि तो शेतातील मातीशी एकरूप झाला तर सेंद्रिय खतांच्या अधिक लाभदायक होतो, त्यामुळे शेतातील माती अधिक कसदार होते व भरघोस उत्पादन मिळते,असा अनुभव आहे.

नांगरणी, वखरणी व कोळपणी योग्य प्रकारे होते, महत्वाचे...

नांगरणी, वखरणी व कोळपणी ही शेतीची महत्वाची कामे होत. ती योग्य प्रकारे व वेळेत होणे आवश्यक असते, या साठी शेतकरी वर्गाला दक्ष राहावे लागते.नांगरणी झाल्यावर मातीतील ढेकळे व्यवस्थित फोडून पसरली पाहिजे,  

वारंवार वाढणारे तण काढण्यासाठी वेळेवर भांगलण करायला हवी...

शेतातील उभ्या पिकांची योग्य वाढ व्हावी व दिलेल्या खतांची योग्य ती मात्रा त्यांना व्यवस्थित व प्रमाणात मिळावी, याकरिता शेतात वारंवार उगवणारे गवत व इतर वनस्पती म्हणजे तण वेळीच काढले जावे, यासाठी वेळेवर भांगलण करायला हवी. हल्ली तणनाशके ही वापरली जातात, पण त्यासाठी तज्ञांच्या सल्ल्यानेच ते वापरावे, अन्यथा शेताचा पोत खराब होतो, पुढे उत्पादन घटू शकते.

पाण्याचे नियोजन महत्त्वाचे...

जर पर्जन्यमान पुरेसे झाले नाही, किंवा पावसाने दगा दिला तर शेतकऱ्यांना उपलब्ध असलेल्या पाण्याच्या नियोजनासाठी अगोदरच प्रयत्न करावा लागतो. अन्यथा ऐनवेळी आभाळाकडे डोळे लावून बसावे लागते, शिवाय शेतकरी त्यामुळे हवालदिल होतो, म्हणून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याचे नियोजन महत्त्वाचे असते.

मशागत व पेरणीचे नियोजन महत्त्वाचे...

"जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग नासला.." असं म्हणतात, हे सुभाषित शेतकऱ्यांच्या जीवनात तंतोतंत लागू पडते,कारण शेतकऱ्यांने शेतमजूर, सालगडी, किंवा बटाईदार यांच्या भरवशावर शेतीचे उत्पादन वाढेल किंवा भरघोस उत्पादन येईल, असे समजून स्वस्थ न बसता स्वतः जाणीवपूर्वक लक्ष दिले पाहिजे, प्रसंगी स्वतः शेतमालकाने शेतीची मशागत, पेरणी, चांगले व कसदार बी बियाणे, तसेच सेंद्रिय व रासायनिक खते तसेच खतांची मात्रा याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. याकरिता सुसूत्र असे नियोजन महत्त्वाचे असते.

शासनाचे शेती अधिकारी, व शेती तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन घ्यावे...

शेतीची आंतरमशागत व बाह्य मशागत याबाबत शेतकऱ्यांने जागरूक असले पाहिजे. शासनाचे शेती अधिकारी आणि शेतीतज्ञ यांचे आवश्यक त्या वेळी मार्गदर्शन घ्यावे. शासनाचे शेती अधिकारी त्यासाठीच नेमलेले असतात, त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील रहावे...

शेती किफायतशीर व फायदेशीर झाली तरच या देशातील शेती आणि शेतकरी टिकणार आहे, तेंव्हा शासनाने सुध्दा शेतकऱ्यांना उत्कृष्ट बी बियाणे व खते उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, तसेच पीक कर्ज व खावटी कर्ज माफक व्याजाने व कमीत कमी वेळेत देणे गरजेचे असते,  शासनाने शेतकऱ्यांसाठी विविध सवलती व प्रशिक्षण याची ही तरतूद करावी. शासनाने शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत, मार्गदर्शन व सहकार्य करून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील रहावे.


- डॉ. सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२

(लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून करवीर काशी चे संपादक आहेत.)



आपल्या देशावर किंवा जागतिक पातळीवर जर आपण चिकित्सकरित्या नजर टाकली तर लक्षात येईल की गरीब लोक गरीब होत चालले आहेत आणि श्रीमंत श्रीमंत होत चालले आहेत. वर्षानुवर्षे तेच चित्र आपल्याला दिसत आहे. सरकार गोरगरीबांसाठी अनेक योजना राबवत असते. त्याच्याने त्यांना थोडाफार आधार मिळतो. तात्पुरत्या त्यांच्या समस्या सुटतात. पण काही काळातच त्यांची परिस्थिती तशीच होऊन जाते. तसेच कष्ट सुरू होतात, त्याच अपेष्टांना सामोरे जावे लागते आणि ते कर्जबाजारी होतात.

जर आपला तो समाज ज्याची आर्थिक परिस्थिती थोडी चांगली आहे त्याने अशा गोरगरिबांना, दीनदुबळ्यांना आर्थिक आधार दिला तर ही समस्या संपुष्टात येण्यास मदत होईल. तो आधार कसा द्यावा याचे उत्तर या छोटेखानी पुस्तिकेत आपल्याहा मिळेल. मुजाहिद शेख देशमुख लिखित “दीनदुबळ्यांचा कैवारी” या पुस्तिकेत प्रत्येक पानावर गोरगरिबांना कशा प्रकारे व का मदत करावी याचे स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. पवित्र कुरआन आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांचा संदेश व शिकवणी या पुस्तकात संकलित करण्यात आलेल्या आहेत. हे वाचून माणसांमध्ये दानधर्म करण्याची इच्छा जागृत होते. याचबरोबर अजून कशा प्रकारे आपण लोकांची मदत करू शकतो याचे पुरावेही या पुस्तकात आढळतात.

या पुस्तकात अशा समाजाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे की ज्यात कोणी भीक मागणारा राहणार नाही. जर आपण या शिकवणींचा विचार केला आणि त्यांची अंमलबजावण केली तर काही काळातच गरीबी कालबाल्य होईल.

इस्लामिक मराठी पब्लिकेशन ट्रस्ट, मुंबईने प्रकाशित केलेले हे पुस्तक आपल्याला नक्कीच विचार करण्यास आमंत्रित करते की आपणही दीनदुबळ्यांच्या समस्यांवर काहीतरी करावे जेणेकरून आपल्या समाजाचा हा घटक सक्षम होऊन आपल्या पायावर उभा राहील. सर्व पुस्तकप्रेमींना विनंती आहे की त्यांनी इतके चांगले व उत्तम पुस्तक अवश्य वाचावे.

- अकबर मलिक

मो.-९३२२७१९५४६



इंग्रजीतील 'द इम्मॉर्टल्स' अर्थात ‘अमर योद्धे’ (भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अमूल्य योगदान दिलेल्या मुस्लिम वीरांची संक्षिप्त गाथा) हा संक्षिप्त चरित्रसंग्रह लेखक सय्यद नसीर अहमद यांच्या पंधरा वर्षांच्या शोधाचे, संशोधनाचे आणि श्रमाचे फळ आहे. आपल्या मातृभूमीला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ब्रिटिश वसाहतवादी राज्यकर्त्यांविरुद्ध जोरदार लढा देणारे सम्राट, राजे, सरदार, सेनापती, स्वातंत्र्यप्रेमी, विविध संघटनांचे नेते आणि धाडसी सर्वसामान्यांचा 'अमर योद्धे'मध्ये समावेश आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय सहभाग घेण्याबरोबरच आर्थिक आणि सामाजिक सुधारणांसाठी झटणाऱ्या तसेच भारतीय उपखंडाच्या भौगोलिक-सामाजिक-राजकीय क्षितिजावर आपला ठसा उमटवणाऱ्या इतर काही जणांचाही यात समावेश आहे.

आपल्या भारतातील विविध समुदायांमध्ये सहिष्णुता, समन्वय आणि सलोखा साधण्यासाठी केलेले कोणतेही सकारात्मक प्रयत्न इष्ट आहेत. सामायिक प्रयत्न आणि बलिदानात प्रत्येक समाजाचा वाटा सविस्तरपणे आणि सर्व पुराव्यानिशी लोकांसमोर प्रकट करून इतिहासातील वास्तव आणि वस्तुस्थितीचे प्रबोधन करणे हा इतिहास लिहिण्याचा स्तुत्य मार्ग आहे.

व्यापाराच्या नावाखाली भारतात घुसलेल्या पण मर्यादा ओलांडणाऱ्या इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीकडून देशाच्या भवितव्याला असलेल्या धोक्याचा अंदाज घेणारा बंगालचा नवाब सिराज-उद-दौला हा पहिला भारतीय राजा होता. कंपनीचे दुष्ट डावपेच हाणून पाडण्यासाठी त्यांनी धाडसी पुढाकार घेतला. बंगालचे शेवटचे स्वतंत्र नवाब सिराज-उद-दौला यांचा जन्म १७३३ मध्ये झाला आणि त्यांनी वयाच्या २३ व्या वर्षी सत्तेची सूत्रे हाती घेतली.

सिराज-उद-दौला यांना त्यांच्या नातेवाइकांकडून होणाऱ्या त्रासाचा फायदा घेत ईस्ट इंडिया कंपनीने शेतकरी आणि व्यापाऱ्यांसह लोकांचे शोषण सुरू केले. त्यानंतर सिराज यांनी त्या अत्याचारांना आळा घालण्यासाठी पुढाकार घेतला.

सुरवातीला ते यशस्वी झाले असले तरी शत्रूस क्षमा करण्याच्या वृत्तीमुळे त्यांना मोठी किंमत मोजावी लागली जी भारताच्या भवितव्यासाठी घातक ठरली. अशा प्रतिकूल परिस्थितीत सिराजची मावशी घासिती बेगम, तिचा दत्तक मुलगा शौकत जंग आणि त्याचा समर्थक व दिवाण राज वल्लभ यांचा मुलगा कृष्ण दास, सिराजचे मुख्य सेनापती व त्यांचे काका मीर जाफर, प्रभावशाली व्यापारी माणिक चंद, अमीरचंद आणि सावकार जगत सेठी यांनी रॉबर्ट क्लाईव्हसोबत सिराज यांची सत्ता उलथवून टाकण्याचा कट रचला होता.

सिराज यांना आपल्या विरोधातील टोळीची माहिती नसल्याने ते ब्रिटिश सैन्याविरुद्ध लढण्यासाठी सुमारे ५०,००० सैनिकांसह प्लासी येथे पोहोचले. भारतीय इतिहासात एक महत्त्वाचे स्थान असलेल्या प्लासीच्या लढाईला २३ जून १७५७ रोजी सुरुवात झाली.

ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य केवळ ३२०० होते आणि त्यातील ब्रिटिश सैनिकांची संख्या केवळ ९५० होती. परंतु विश्वासघातकी प्रमुख सेनापती मीर जाफर आणि दुसरा सेनापती रॉय दुर्लभ यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याला मदत करण्यासाठी नवाब सिराज-उद-दौला यांना युद्धाच्या मैदानात एकटेच सोडले.

परिणामी सिराज-उद-दौला यांना पराभवास सामोरे जावे लागले आणि ते २४ जून रोजी राजधानी मुर्शिदाबादला परतले. तिथेही तरुण नवाबसाठी परिस्थिती प्रतिकूल होती. त्यांच्यापुढे कोणताही पर्याय शिल्लक नसल्याने सिराज यांनी राजधानी सोडली.

दरम्यान, रॉबर्ट क्लाईव्ह ने मीर जाफरची बंगालचा नवाब म्हणून नेमणूक केली. मीर जाफरने आपला मुलगा मीर मिरान याला सैन्यासह सिराज यांना पकडण्यासाठी पाठवले. २ जुलै १७५७ रोजी तरुण सिराज यांना पकडून दरबारात आणून त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.

इंग्रजांचा धोका ओळखून त्यांच्याविरोधात शौर्याने लढा देणारा 'पहिला योद्धा' म्हणून बंगालचा नवाब सिराज-उद-दौला भारतीय इतिहासात स्मरणात राहील.

लेखक : सय्यद नसीर अहमद

भाषांतर : शाहजहान मगदुम


(प्रेरणादायी सत्यकथा)

इराणमधील 'अस्फहान' शहराजवळ असलेल्या 'रोजबा' या गावात 'माबा'चा जन्म झाला. माबा दिसायला खूपच सुंदर होता. त्याचे वडील त्याचा खूपच लाड करायचे. मुलींप्रमाणे त्याला नटवायचे, मुलीसारखं जपायचे. घराबाहेरही जास्त पडू द्यायचे नाहीत. 

माबा, हा अग्निपूजक होता पण त्याच्या हृदयात एक चेतना होती, जी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. त्याला वाटायचे की आपण स्वतःच पेटवलेला हा अग्नी कधीच आपला देव होऊ शकत नाही. त्याचे वडील बोजख्शान हेदेखील एक महान अग्निपूजक होते.

एके दिवशी ते माबाला म्हणाले, "आज मी शेतात जाऊ शकणार नाही, त्यामुळे आज शेताची काळजी घेण्याची जबाबदारी तुझी आहे."

त्या वेळेस माबा दहा बरा वर्षांचा होता. शेतात जाताना तो ख्रिश्चनांच्या चर्चमधे गेला. ख्रिश्चनांच्या उपासनेच्या पद्धतीमुळे प्रभावित झाला आणि त्याच दिवशी त्याने आपला मूळ धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला. ही बाब त्याच्या वडिलांना कळताच त्यांनी त्याला घरात कैद केले. काही दिवसांनी बापाच्या कैदेतून कसातरी बाहेर पडून माबा सीरियाला जाणाऱ्या ताफ्यात सामील झाला. इथून सत्याच्या शोधाचा त्याचा प्रवास सुरू झाला. तो गावोगावी, देशोदेशी भरकटत राहिला. सीरियापासून मोसुल (इराक), तिथून नुसयबिन (तुर्की) आणि नंतर 'अमुरिया'पर्यंत भटकला.

अमुरियाला पोहोचल्यावर तो तिथल्या धर्मगुरूच्या सेवेत राहू लागला. जेव्हा या धर्मगुरूच्या मृत्यूची वेळ आली तेव्हा त्यांनी माबाला बोलावले आणि म्हणाले, "माझ्या मुला! आता मी, हे जग सोडत आहे. आता शेवटच्या काळातील पैगंबराच्या उदयाची वेळ जवळ आली आहे, जो अरेबियाच्या वाळवंटातून उठेल. तो सत्यधर्म पुनरुज्जीवित करेल आणि अशा भूमीत स्थलांतर करेल जिथे भरपूर खजूर असतील. त्याच्या दोन खांद्यांच्या मधोमध पाठीवर प्रेषित्वाची मोहोर असेल. तो त्याला अर्पण केलेल्या बाबींचा स्वीकार करेल पण दानधर्म म्हणून दिलेल्या गोष्टी इतरांना देईन, स्वतःसाठी अवैध मानेल. जेव्हा तुला या पवित्र पैगंबराचे दर्शन होतील, तेव्हा तू त्यांच्या सेवेत अवश्य उपस्थित राहावे."

या धर्मगुरूंच्या मृत्यूनंतर माबा हिजाजला जाण्यासाठी काफिला शोधू लागला. शोध पूर्ण झाला आणि बनू कलब जमातीचा एक काफिला अमुरियामधून निघाला. माबा या काफिल्यात सामील झाला, पण वाटेत काफिल्यावाल्यांचे इरादे बदलले आणि जेव्हा हा काफिला 'वादी-अल-कुरी'ला पोहोचला तेव्हा त्यांनी माबाला ज्यू लोकांच्या हाती विकले. कदाचित हेच आपले भाग्य म्हणून, माबा त्या ज्यू माणसाचा गुलाम म्हणून राहू लागला.

पण असे असतानाही त्याच्यातील सत्याच्या शोधाची चेतना छातीत तेवत राहिली. एके दिवशी, ज्यूचा एक नातेवाईक जो यसरब (मदीनाचा रहिवासी) होता. त्याला भेटायला आला. त्याला एका गुलामाची गरज होती. त्याने माबाला मालकाकडून विकत घेतले आणि यसरबला आणले. माबाने इथे खजुराची झाडे पाहिली. उंटांचे कळप पाहिले तेव्हा त्याला समजले की, आता आपला शोध संपणार.

एके दिवशी माबा झाडावर काम करत असताना, शहरातून एक ज्यू धावत आला आणि म्हणाला, "मी ऐकले की, खुबा वस्ती मध्ये एक व्यक्ती आला आहे, तो स्वतःला प्रेषित संबोधित आहे, सर्व लोक त्याच्या भोवती गोळा होत आहेत."

हे ऐकून माबा अस्वस्थ मन:स्थितीत झाडावरून खाली आला आणि त्या व्यक्तीला म्हणाला, "तू काय म्हणालास? पुन्हा सांग."

त्याच्या मालकाला खूप राग आला आणि त्याने माबाला थप्पड मारली आणि सांगितले की, "तू जा आणि तुझे काम कर."

त्यावेळी माबा गप्प बसला, पण एके दिवशी तो काही खाद्यपदार्थ घेऊन प्रेषित मुहम्मद (स) यांच्याकडे आला आणि त्यांना त्या वस्तू दान म्हणून दिल्या. प्रेषित (स.) यांनी त्या गोष्टी आपल्या साथीदरांमध्ये वाटून टाकल्या. स्वतः काहीच घेतले नाही.

दुसऱ्या दिवशी माबा पुन्हा काही खाद्यपदार्थ घेऊन आला आणि पैगंबरांच्या सेवेत भेट म्हणून अर्पण केले. पैगंबरांनी स्वतःही ते खाद्यपदार्थ खाल्ले आणि साथीदारांमध्येही वाटले. माबाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता, कारण शेवटच्या पैगंबरांविषयी सांगितलेली दोन चिन्हे पूर्ण झाली होती, आता शेवटचे चिन्ह म्हणजे पैगंबराची मोहोर पाहणे बाकी होते.

काही दिवसांनी माबाला कळाले की, पवित्र प्रेषित (स.) एक अंत्ययात्रा घेऊन बकी गरखद येथे गेले आहेत. माबाही तेथे पोहोचला. प्रेषितांना अभिवादन करून त्यांच्या मागे उभे राहिला. प्रेशितत्वाची मोहोर पाहण्याचा प्रयत्न करू लागला. पैगंबरांनी त्याची अवस्था ओळखून पाठीवरून कापड सरकवले. तिसरी खूणही दिसली. माबाचा सत्याचा शोध आता संपला होता.

माबा हा प्रेषितांचा अनुयायी बनला. आता तो माबा न राहता सलमान फारसी (र.) म्हणून ओळखला जाऊ लागला. पैगंबरांनी त्यांना ज्यूच्या गुलामगिरीतून मुक्त केले. ते पैगंबरांसोबत राहू लागले. ते एक उत्तम साथीदार बनले.

- सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881


केंद्र सरकारने राज्यांना मोफत सवलतीच्या घोषणेवर कडक निर्बंध घालण्यास सांगितले आहे. प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत २७-२९ डिसेंबर रोजी नवी दिल्लीत झालेल्या मुख्य सचिवांच्या बैठकीत केंद्राने इशारा दिला होता की, प्रत्येक राज्याने आपल्या आर्थिक स्थितीची पडताळणी आणि विचार करूनच मोफत सवलती जाहीर कराव्यात, अन्यथा आर्थिक संकट ओढवेल. पाकिस्तानसारख्या देशांच्या दुर्दशेकडेही केंद्राने लक्ष वेधले. या अतार्किक आर्थिक धोरणामुळेच श्रीलंका आणि पाकिस्तानसारख्या शेजारी देशांची दिवाळखोरी झाली आहे. मोफत सवलती मुलींच्या शिक्षणासह समाजकल्याण क्षेत्रापुरत्या मर्यादित असाव्यात, अशी केंद्राची भूमिका आहे. राजकीय पक्षांना निवडणुकीच्या अनुषंगाने फुकट काम करण्यापासून रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेतही केंद्राने अशीच भूमिका घेतली होती. लोकांचा पाठिंबा वाढविण्यासाठी अनेक राज्ये मोफत सवलती देत असताना केंद्राने हा इशारा दिला आहे. पंजाब, दिल्ली, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळसारखी विरोधी पक्षशासित राज्येच नव्हे, तर भाजपशासित राज्येही मोफत सवलती देत आहेत. यूपीमध्ये महिलांच्या कल्याणासाठी सुरू करण्यात आलेल्या 'कन्या सुमंगल योजना' अंतर्गत २५ हजार रुपये योगी आदित्यनाथ सरकार एका मुलीला मोफत देत आहे. अनेक राज्यांत आणि केंद्रात सत्ताधारी पक्षाची सत्ता कायम राहावी, यासाठी अशा सवलतींचा मोठा वाटा आहे. यामुळे सरकारांसमोर गंभीर संकट उभे राहणार आहे. गेल्या अर्थसंकल्पात सरकारने म्हटले होते की, पंजाबचे सार्वजनिक कर्ज ३.४ लाख कोटी रुपये आहे, जे सकल देशांतर्गत उत्पादनाच्या सुमारे ५० टक्के आहे. मार्च २०२२ मध्ये गुजरातचे कर्ज ३.२० लाख कोटी रुपये होते, जे मार्च २०२३ मध्ये वाढून ३.४० लाख कोटी रुपये झाले. २०२४ पर्यंत ते वाढून ३.८१ लाख कोटी रुपयांवर जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याच्या वित्त विभागाच्या प्रधान सचिव मोना कनाधर यांनी दिली. देशातील सर्वांत मोठे औद्योगिक राज्य असलेल्या महाराष्ट्रावर २०१६ पर्यंत ३.७९ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. याच वर्षी उत्तर प्रदेशचे कर्ज ३.२७ लाख कोटी रुपये होते. डिसेंबर २००२ मध्ये तेलंगणाचे  कर्ज ६.७१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी जानेवारीत प्रसिद्ध केलेल्या अभ्यास अहवालानुसार केरळचे सार्वजनिक कर्ज ३.९० लाख कोटी रुपये होते. राज्याची आर्थिक परिस्थिती कशीही असली तरी प्रचंड प्रशासकीय खर्च आणि जनतेचा पाठिंबा टिकवून ठेवण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या सवलतींचा या प्रचंड कर्जात मोलाचा वाटा आहे. प्रत्येक राज्य आपल्या महसुलाचा बराचसा हिस्सा कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन आणि कर्जावरील व्याज यासारख्या 'सक्तीच्या खर्चा'वर (वचनबद्ध खर्च) खर्च करते, जे एकूण महसुलाच्या ६० ते ८० टक्के आहे.  उरलेला पैसा अनेकदा अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या प्रकल्पांच्या कामांसाठी पुरेसा नसतो. त्याशिवाय अर्थतज्ज्ञांकडून मोफत सवलती दिल्या जातात. याबाबत अनेकदा इशारा देण्यात आला आहे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसीचे अर्थतज्ज्ञ हरी नायडू यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, वित्तीय कायदे तयार केले पाहिजेत ज्यामुळे राज्यांना मोफत वस्तूंचे नियमन करण्यास भाग पाडले जाईल. काही आणीबाणीच्या परिस्थितीत सरकारला मोफत सुविधा पुरवाव्या लागतील. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे लोकांच्या उत्पन्नाच्या स्रोतांवर, जसे की काम, व्यापार इत्यादींवर परिणाम झाला असताना, महाराष्ट्रासह अनेक राज्ये तांदूळ आणि किट मोफत पुरवत होती. जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती रोखण्यासाठी सरकारी दुकानांमध्ये मोफत रेशन आणि काही किराणा माल दिला जात होता. यापैकी कोणत्याही गोष्टीला निरुत्साहित किंवा नियंत्रित केले जाऊ नये. लोकांना दिलासा देणे आणि अडचणीच्या वेळी मदतीला धावून येणे हे सरकारचे कर्तव्य आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यांनी जाहीर केलेल्या सवलतींविरोधात केंद्राने कठोर भूमिका घेतल्याने राजकीय हितसंबंधांवर शंका उपस्थित होत आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मोफत देणाऱ्या 'प्रधानमंत्री किसान सन्मान' योजनेसारख्या अनेक सवलती केंद्राने जाहीर केल्या आहेत, हे विसरता कामा नये. प्रधानमंत्र्यांनी २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याची मुख्य घोषणा केली होती, जी आजही अपूर्ण आहे.

- शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक, 

मो.: ८९७६५३३४०४


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget