Halloween Costume ideas 2015
Latest Post


’’इस्लाम तहेजीबो अख्लाक (सांस्कृतिक शिष्टाचार) और तकमिले फजाईल (ईश्वरीय कृपा) की शहेंशाही है’’ - अल्लाम्मा शिबली नोमानी रह.

ऑगस्ट 2021 रोजी तालीबानकडून अफगानिस्तानचा ताबा घेतल्यानंतर त्यांनी जाहीर केले की, ’’ते देशामध्ये पाश्चिमात्य पद्धतीची लोकशाही व्यवस्था लागू करणार नाहीत तर शरई व्यवस्था लागू करतील.’’ या घोषणेनंतर साहजिकच जागतिक स्तरावर खळबळ माजली. 1999 ते 2001 या कालावधीत तालीबानच्या काळात या व्यवस्थेच्या नावाखाली अनेक अत्याचार केले गेले होेते. त्यामुळे यावेळी पुन्हा तसेच अत्याचार अफगानी जनतेवर केले जातील, अशी साधार भीती संयुक्त राष्ट्र संघापासून ते लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या अनेक देशांकडून व्यक्त केली जात आहे. म्हणूनच या आठवड्यात या व्यवस्थेबद्दल चर्चा करण्याचा मानस आहे.  

शरई व्यवस्थेबद्दल एका लेखात सर्व काही लिहिणे शक्य नाही परंतु या व्यवस्थेसंबंधी सर्वात मोठा हरकतीचा  जो मुद्दा उपस्थित केला जातो तो त्यातील दंड संहितेचा आहे. जगाच्या मते ही दंड प्रक्रिया रानटी आहे, अश्मयुगीन आहे, मानवाधिकाराचे हनन करणारी आहे. खरेच असे आहे का? हे तपासण्याची हीच योग्य वेळ आहे. 

या संदर्भात एक रोचक घटना वाचकांच्या समोर मांडावीशी वाटते. ती अशी की, अमेरिकेच्या पत्रकारांचा एक समूह सऊदी अरबमध्ये अभ्यास दौऱ्यावर गेला होता. त्या दौऱ्याचा एक भाग म्हणून त्या काळाचे शासक शहा फैसल यांना तो भेटला. त्या भेटीदरम्यान एका महिला पत्रकाराने तावातावाने शहा फैसल यांना विचारले की, तुम्ही चोरांचे हात कापता, व्याभिचार किंवा बलात्कार करणाऱ्यांना दगडाने ठेचून मारता, छोट्या मोठ्या कारणासाठी फटके मारता ते ही भर बाजारात. जग कुठे पोहोचले आहे आणि तुम्ही कोठे आहात? त्यावर काही क्षणासाठी शहा फैसल गप्प बसले. इकडे पत्रकाराच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. तिला वाटले की आपण बादशाहाला निरूत्तर करून टाकले आहे. तेवढ्यात शाह फैसल त्या व तिच्या सोबत असलेल्या महिला पत्रकारांना संबोधित करून म्हणाले की, ’’तुम्ही रियादच्या सराफ मार्केटमध्ये जा. तेथून कोणत्याही दुकानातून तुम्हाला जेवढे दागिने घ्यायचे तेवढे घ्या. त्याचे बिल मी अदा करतो आणि ते दागिने घालून सऊदी     -(उर्वरित पान 2 वर)

अरबच्या कोणत्याही शहरात एकट्या फिरून या. तुमच्या केसालाजरी धक्का लागला तर त्याची जबाबदारी माझी. पण माझी एक शर्त आहे तेच दागिने घालून तुम्हाला तुमच्या देशात एकट्याने फिरून दाखवावे लागेल.’’ त्यावर सर्व पत्रकार भांबावून गेले. त्यांच्यापैकी काहींनी सांगितले की, ’’शहरात तर सोडा विमानतळावरून दागिने घातलेली एकटी महिला तिच्या घरापर्यंत सुद्धा सुरक्षित जाऊ शकणे शक्य नाही.’’ ही आहे शरई व्यवस्थेतील शिक्षा आणि लोकशाही व्यवस्थेतील शिक्षांमधील फरक. ही घटना आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे. ज्यांना विश्वास नसेल त्यांनी सर्च करून वाचावी. 

सप्टेंबर 2019 मध्ये मदिनाच्या एका मोठ्या बिन-दाउद नावाच्या मॉलमध्ये खरेदी करतांना, एक गोष्ट प्रकर्षाने माझ्या लक्षात आली की तेथे विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या खाद्य पदार्थांची गुणवत्ता अतिशय उच्च दर्जाची आहे. एका बांग्लादेशी विक्रेत्याला ज्याला हिंदी येत होती, मी या संबंधी विचारणा केली असता तो म्हणाला, ’’सहाब ये सऊदी अरब है, यहां मिलावट करनेवाले को चौक में कत्ल किया जाता है. यहां किसी भी दुकानपर आपको हर चीज शुद्ध मिलेगी.’’ 

ही झाली विदेशातील उदाहरणे. आता आपल्या देशातील फक्त या आठवड्यात देशभरात घडलेल्या शेकडो गुन्ह्यांच्या घटनांपैकी फक्त दोन घटनांचा या ठिकाणी उल्लेख करून थांबतो. पहिली घटना दिल्ली सारख्या राजधानीच्या शहरातील आहे. एका सेवानिवृत्त सैनिकाने आपली सून आणि भाडेकरू कृष्णा तिवारी यांच्यातील आक्षेपार्ह जवळीक पाहून कृष्णा तिवारीसह त्याच्या कुटुंबातील तीन सदस्यांचा खून केला. या संबंधीची मीडियाला माहिती पोलीस उपायुक्त दीपक सहारण यांनी दिली. दुसरी घटना मुंबईच्या विरार पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे. पोलीस इन्स्पे्नटर प्रकाश बेळे यांनी मीडियाला सांगितले की, त्यांच्या हद्दीमध्ये एका 16 वर्षाच्या एका तरूणीला तिच्या वडिलांनी ऑनलाईन्नलाससाठी स्मार्ट फोन घेऊन दिला त्यातून तिला पॉर्न पाहण्याची इतकी सवय जडली की तिने स्वतःच्या 13 वर्षाच्या भावाला पॉर्न्निलप्स दाखवून उत्तेजित करून स्वतःशी लैंगिक संबंध स्थापित करण्यास बाध्य केले व त्यातून ती पाच महिन्याची गर्भवती झाली. या बातमीत असेही म्हटलेले आहे की, हे बहिण-भाऊ रोज रात्री एकत्रच झोपत होते. या पार्श्वभूमीवर शरियतची ही तरतूद किती उपयुक्त ठरते की, शरितयने म्हटलेले आहे, मुलं 8 ते 10 वर्षाची होताच त्यांचे बिछाने वेगळे करा. ह्या दोन्ही बातम्या सर्वच आघाडीच्या वर्तमानपत्रातून प्रकाशित झालेल्या आहेत. या दोन घटनांची निवड यासाठी केलेली आहे की, अशा घटनांमुळे समाजाच्या नैतिक स्थितीचा अंदाज येतो. आज कुठलाही दिवस, कुठलेही वर्तमानपत्र आणि कुठलेही चॅनल अनैतिक संबंधातून होत असलेल्या गुन्हेगारी घटनांच्या वर्णनाशिवाय प्रकाशितच होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. आज तुरूंगात असलेल्या कैद्यांपैकी बहुसंख्या अशाच कैद्यांची आहे जे नैतिक अधःपतनामुळे गुन्हेगारीकडे वळले आहेत. आज अशा गुन्हेगारांचे समर्थन तिरंगा झेंडा घेऊन करण्याइतपत प्रगती आपल्या लोकशाहीने साधलेली आहे. 

शरई शिक्षांचे प्रकार

शरई शिक्षा एकूण तीन प्रकारच्या असतात. 1. ताज़ीर, 2. हद, 3. कफ्फारा.

1. ताज़ीर : ही किरकोळ गुन्ह्यासाठी दिली जाणारी शिक्षा असते. ही सौम्य असते. स्थानिक काझी (न्यायाधीश) आरोपीला, पती-पत्नीला, आई-वडिल आपल्या पाल्यांना, मालक आपल्या गुलामांना, शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना देऊ शकतात. रागाने, तुच्छतेने पाहणे, गोश्माली (कान दुमडणे), तंबी करणे आणि फटके मारणे इत्यादी शिक्षा देण्याचा समावेश या गटात होतो. या शिक्षेचे वैशिष्ट्ये असे की, या शिक्षा किती द्याव्यात याची निश्चिती शरियतने केलेली नाही. हा अधिकार शरियतने शिक्षा देणाऱ्याच्या सद्सद्विवेक बुद्धीवर सोडला आहे.  ही गोष्ट किती सुंदर आहे पहा. 

2. हद - ही शिक्षा निश्चित अशी शिक्षा आहे. यामध्ये चोरी, डाका, देशद्रोह, व्याभिचार, भ्रष्टाचार, भेसळ, बलात्कार, हत्या इत्यादी सारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश होतो. कुरआनच्या विविध आयातींमधून अशा गुन्ह्यात लिप्त गुन्हेगारांना किती शिक्षा द्यावी याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. यात काझीला शिक्षा कमी करण्याचे अधिकार नाहीत. 

3. कफ्फारा : या प्रकारच्या शिक्षा म्हणजे नुकसान भरपाई करून देणे होय. यात फिर्यादीला आरोपीकडून किंवा आरोपीची ऐपत नसेल तर सरकारकडून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे अधिकार कोर्टाला देण्यात आलेले आहेत. ही नुकसान भरपाई द्यावीच लागते. त्यातून कुठली पळवाट नाही. अपवाद फक्त जखमी झालेल्या फिर्यादीचा किंवा खून झालेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांचा आहे. त्यांनी जर गुन्हेगाराला क्षमा केली तर कोर्ट गुन्हेगाराला शिक्षा देऊ शकत नाही. आपल्याकडे खुन्यातील गुन्हेगाराला सर्वोच्च न्यायालयाने दिलेली शिक्षा माफ करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. ही अतिशय अतार्किक आणि आश्चर्याची बाब आहे. वास्तविक पाहता शरियतने माफीचा अधिकार मयताच्या जवळच्या नातेवाईकाला दिलेला आहे. हीच बाब सद्सद्विवेक बुद्धीला पटणारी आहे. 

शरई शिक्षा तार्किक आहेत

मेरे किरदार में मुज्मर है तुम्हारा किरदार

देखकर क्यूं मेरी तस्वीर खफा हो तुम लोग

कल्पना करा की आजच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये अ ने ब च्या वडिलांचा खून केला तर त्याचे तीन संभाव्य परिणामांपैकी एक परिणाम होतो. पहिला परिणाम असा की, त्याला शिक्षाच होत नाही. दूसरा परिणाम असा की, त्याला फाशी होऊ शकते. पण असे फार क्वचितच होते. तीसरा परिणाम त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते आणि सर्वसाधारणपणे अशीच शिक्षा होते. यातील गंमत पहा. अ ने ब च्या वडिलांचा खून केला आणि अ ला जन्मठेप झाली. आता जन्मभर अ तुरूंगामध्ये ब ने दिलेल्या वेगवेगळ्या करातून (टॅक्स) पोसल्या जातो. म्हणजे एक तर ब चे वडील गेले आणि दूसरे अ गुन्हेगाराला पोसण्याची जबाबदारी ब वर आली. किती हा उरफाटा न्याय? या उलट शरई शिक्षांमध्ये एक तर अ ला तात्काळ मृत्यूदंड दिला जातो किंवा त्याला ब कडून क्षमादान मिळू शकते. येथे आयुष्यभर गुन्हेगाराला पोसण्याची व्यवस्था नाही. वाचकांनी स्वतः निर्णय करावा की शिक्षेची कोणती पद्धती योग्य आहे? 

दगडाने ठेचून मारण्याची शिक्षा

लोकशाहीमध्ये बलात्काराला शिक्षापात्र अपराध मानले गेलेले आहे व्याभिचाराला नाही. मात्र शरियतमध्ये दोन्ही गुन्ह्यांमध्ये कॅपिटल पनिशमेंटची तरतूद आहे. यातील आरोपी अविवाहित असतील तर 100 फटके आणि विवाहित असतील तर दगडाने ठेचून मारणे. बलात्काराला बळी पडलेल्या महिलेला अर्थातच शिक्षा होत नाही. 

या शिक्षेची खूप चर्चा होत असते. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेतली जात नाही ती ही की, व्याभिचार असो का बलात्कार हे असे सामाजिक अपराध आहेत की ज्यामुळे समाज उध्वस्त होतो म्हणून याची शिक्षाही कठोर आहे. 

इस्लामी शिक्षांसंबंधीची कारण मिमांसा

इस्लामी शिक्षांना भले ही रानटी म्हटले जात असले तरी एक गोष्ट स्पष्ट आहे ती ही की माणसं जर रानटी असतील त्यांना शिक्षा सुद्धा रानटीच देणे योग्य होईल ना? एका निरपराध तरूणीवर बलात्कार करणे रानटीपणा नव्हे काय? मग त्याला भर चौकात लटकविले तर तो रानटीपणा कसा? त्याने केलेले कृत्य रानटी नाही आणि शिक्षा मात्र रानटी. हा उरफाटा तर्क त्याच लोकांच्या गळी पडू शकतो ज्यांना इस्लामोफोबिया नामक आजार झालेला आहे. बलात्कार आणि व्याभिचार हे किती घृणित अपराध आहेत हे दिल्ली येथील वर उल्लेखित घटनेमधून स्पष्ट झालेले आहे. कृष्णा तिवारी आणि त्या सैनिकाच्या पुत्रवधू यांच्यातील अनैतिक संबंधाचे मुल्य कृष्णा तिवारीच्या पत्नी आणि तीन मुलांना आपले जीव देवून चुकवावे लागले, शिवाय हे हत्याकांड करणाऱ्या माजी सैनिकाला शिक्षा होईल ती वेगळीच. समाजामध्ये बदनामी झाली त्याचा तर काही हिशोबच नाही, असे हत्याकांड देशात अनेक ठिकाणी कुठे ना कुठे घडतच असतात. प्रचलित कायदा, कोर्ट, पोलीस, वकील आणि न्यायाधीश हे सर्व मिळून अशा गुन्ह्यांना नियंत्रणात आणू शकत नाहीत, हे एव्हाना सिद्ध झालेले आहे. अशा परिस्थितीत सऊदी अरबसारख्या देशात जेथे शरई शिक्षांची तरतूद आहे. तिथल्या महिलाच नव्हे तर सगळा समाज गुन्हेगारांपासून सुरक्षित आहे, याची नोंद सुजान वाचक घेतीलच. असेही नाही की सऊदी अरबमध्ये सगळीकडे हात तुटके लोक दिसत असतात किंवा रोज कोणाला ना कोणाला दगडाने ठेचून मारले जाते. एकाचा हात कापला तर अनेक वर्षे कोणी चोरी करण्याचे धाडस करू शकत नाही. मक्का आणि मदिना दोन्ही ठिकाणी हरम शरीफ (परिसर) ला खेटूनच अनेक सोन्या-चांदीची दुकाने आहेत. ते लोक अजान होताच शटर न डाऊन करता नमाजला जातात व परत येतात. पण एक गुंज सोन्याची चोरी होत नाही. आपल्याकडे साध्या अपघात झालेल्या ट्रकमधील दारूच्या बाटल्या अपघात स्थळाजवळच्या गावातील संभ्रांत लोक लुटून नेतात. हा लोकशाही व्यवस्था आणि शरई व्यवस्थेमधील फरक आहे.

शरई शिक्षा कठोर आहेत यात वाद नाही. पण त्या देण्यापूर्वी ईश्वराने लोक गुन्हेगारीकडे वळू नयेत याची तरतूद करण्याची जबाबदारी शासन तसेच जनतेवर टाकलेली आहे. इस्लामी इबादती विशेषतः पाच वेळेसची नमाज अनिवार्य करून अगोदर सामाजिक वातावरण पवित्र करण्याची जबाबदारी सरकार आणि नागरिकांवर आहे. त्यानंतर नागरिकांना सर्व सोयीसुविधा पुरविण्याची जबाबदारी सरकारची आहे. या सर्व सोयी सुविधा मिळूनही जर कोणी गुन्हे करत असेल तर मात्र त्याला कठोर शिक्षेची तरतूद केलेली आहे, यात चुकीचे काय आहे? उदा. पुरूषांच्या पॉलिगामस प्रवृत्तीचा विचार करून चार विवाह करण्याची सोय करून दिलेली आहे. मात्र या सोयीचा लाभ घेऊनही कोणी बलात्कार किंवा व्याभिचार करत असेल तर मात्र त्याला दगडाने ठेचल्याशिवाय पर्याय नाही. अशा लिंगपिसाटांसाठी हीच शिक्षा योग्य आहे की नाही? याचा निर्णय वाचकांनी स्वतः करावा. रोजगार देण्याची जबाबदारी शरियतने सरकारवर टाकलेली आहे. रोजगार उपलब्ध असूनही जर कोणी चोरी करत असेल तर त्याचा हात कापण्याशिवाय कुठली योग्य शिक्षा होऊ शकेल? याचाही विचार वाचकांनी करावा. 

थोडक्यात मणुष्यप्राणी हा ईश्वरीय प्रॉड्नट आहे व तो किती गुणी आहे हे ईश्वराला माहित आहे. तसेच शरई व्यवस्था ही ईश्वरीय व्यवस्था आहे म्हणून ती त्रुटीविरहित आहे. कायदा आणि शिक्षा यांच्या बाबतीत एक अंतिम सत्य येथे नमूद करतो ते असे की, अशा शिक्षांची भीती सज्जनाला असण्याची गरजच नाही आणि दुर्जनाला ती असायलाच हवी, तरच समाज सुरक्षित राहील अन्यथा नाही. मला आशा आहे शरई व्यवस्थेअंतर्गत कठोर शिक्षेचा भाग वाचकांच्या लक्षात आलेला असेल. ज्यांच्या लक्षात आला नाही त्यांच्या बाबतीत दुआ करतो की, ’’ऐ अल्लाह ! त्यांना क्षमा कर ते भौतिकतेमध्ये एवढे गुरफटलेले आहेत की त्यांची सद्सद्विवेकबुद्धी सुद्धा बाधित झालेली आहे.’’ खरे पाहता मटेरियालिस्टीक जीवन जगणाऱ्या लोकांमध्ये एवढी उच्च आणि पवित्र संवेदनाच नसते जी की इस्लामी आयडियालॉजीला समजण्यासाठी आवश्यक असते. ’’अल्लाह आपल्या सर्वांना अशी पवित्र संवेदना आणि सद्बुद्धी देओ.’’ आमीन.

- एम.आय.शेख



15 ऑगस्ट रोजी सबंध देश स्वातंत्र्यदिन साजरा करत असतानाच भारताच्याच एका कोपऱ्यात काळा दिवस मनवण्यात आला. मेघालयातील एक बंडखोर नेता पोलीस गोळीबारात ठार झाल्यामुळे वातावरण इतके तापले की थेट गृमंत्र्यांनाच राजिनामा द्यावा लागला, मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले. मेघालयातील हा असंतोष नेमक्या कोणत्या घटनेमुळे सुरू आहे आणि त्याचे संभाव्य परिणाम काय असतील यावर केलेली ही मांडणी...

ऑगस्ट देशाच्या स्वातंत्र्यदिनी शिलाँगमधील रस्त्यांवर सरकारच्या निषेधात दुचाकी व चार चाकींची मिरवणूक काढण्यात आली. या तरुणांनी हातात काळे झेंडे घेतले होते. पोलिसांच्या एका स्कॉर्पिओ जीपचं काही तरुणांनी अपहरण केलं, काळे स्कार्फ चढवलेले तरुण पोलिसांच्या रायफली हातात मिरवत होते. मेघालयातील माजी बंडखोर नेता, चेश्टरफील्ड थँग्यूचा पोलीस चकमकीत मृत्यू झाल्याच्या निषेधात हे तरुण निदर्शनं करत होते. संतप्त तरुणांनी पोलिसांच्या आणि खाजगी वाहनांवर दगडफेक केली, मुख्यमंत्री कॉन्रॅड संगमा यांच्या घरावर पेट्रोल बॉम्ब टाकला. शिलाँगच्या काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली. मोबाईल फोन आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. चेश्टरफील्ड थँग्यूच्या मृत्यूबाबत न्यायालयीन चौकशीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली, राज्याचे गृहमंत्री लखमेन रांयम्बो यांनी राजीनामा दिला. ज्या तरुणांनी पोलिसांच्या वाहनाचं अपहरण केलं, पोलिसांच्या रायफली हिसकावून घेतल्या त्यांनी शस्त्रं परत करावीत, त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

हायेनट्रेप नॅशनल लिबरेशन कौन्सिल या फुटीरतावादी संघटनेचा संस्थापक होता चेश्टरफील्ड थँग्यू. प्रदीर्घकाळ तो भूमिगत होता. 2018 साली तो प्रकट झाला. पोलिसांचा दावा होता की त्याने समर्पण केलंय, परंतु तो सांगत होता की मी आता निवृत्त झालोय. जुलै महिन्यात मेघालयात दोन किरकोळ बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये कोणीही मृत्यूमुखी पडलं नाही परंतु काही लोक जखमी झाले. या दोन बॉम्बस्फोटांमध्ये थँग्यूचा सहभाग होता अशी पक्की माहिती पोलिसांना मिळाली. त्याला अटक करण्यासाठी पोलीस भल्या पहाटे त्याच्या घरी गेले. मेघालयाचे पोलीस महासंचालक आर. चंद्रमोहन यांनी पत्रकारांना सांगितलं की, थँग्यू आणखी एक बॉम्बस्फोट घडवण्याच्या कटात गुंतला आहे अशी खबर मिळाल्याने त्याला अटक करणं भाग होतं. परंतु थँग्यूने पोलिसांवर सुरीहल्ला केला आणि स्वसंरक्षणार्थ पोलीसांनी एक गोळी त्याच्यावर झाडली. इस्पितळात नेताना वाटेतच तो मृत्यू पावला.

पोलीस महासंचालकांच्या या स्पष्टीकरणावर विश्वास बसणं कठीण आहे. हातात सुरी असलेल्या व्यक्तीला सशस्त्र पोलीस सहजपणे अटक करू शकतात. एकाच गोळीने थँग्यूचा मृत्यू झाला म्हणजे चकमक खोटी होती अशीच समजूत होते. पोलिसांनी थँग्यूचा खून केलाय असा आरोप थँग्यूच्या कुटुंबियांनी केला आहे.

सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँण्ड पीस स्टडीज ही संस्था ईशान्य भारतातील फुटीरतावादी गटांचा अभ्यास करते. मेघालयातील भूमिपुत्र-गारो, खाँसी आणि जैंतिया या जमाती, यांनी बाहेरून आलेल्या-पंजाबी दलित, हिंदी, आसामी, नेपाळी, बंगाली, इत्यादींच्या विरोधात सुरु केलेल्या आंदोलनातून, फुटीरतावादी संघटनांचा जन्म झाला. हायेनट्रेप आचिक लिबरेशन कौन्सिलची स्थापना 1980 मध्ये झाली. यामधील हायेनट्रेप म्हणजे खाँसी व जैंतिया या दोन जमाती. हायेनट्रेप म्हणजे मूळ आदिवासी कुटुंबं ज्यांच्यापासून मानवजातीची सुरुवात झाली अशी या आदिवासी जमातींची धारणा आहे. आचिक म्हणजे गारो जमात. शेकडो वर्षांपूर्वी तिबेटमधून गारो मेघालयात स्थलांतरित झाले असं मानलं जातं. गारो केवळ मेघालयात नाहीत आसममध्येही आहेत. गारोंचा समावेश बोडोंमध्येही होतो. हायेनट्रेप आचिक लिबरेशन कौन्सिलमध्ये फूट पडली आणि आचिक मॅत्ग्रीक लिबरेशन आर्मी ही गारोंची संघटना वेगळी झाली. तिचंच रुपांतर पुढे आचिक नॅशनल व्हॉलेंटिअर्स कौन्सिल या संघटनेत झाले.

खाँसी-जैंतिया आणि गारो या दोन जमातींमध्ये तणाव आहे. खाँसी व जैंतिया हे बहुसंख्य आहेत परंतु त्यांच्यामध्ये ऐक्य नाही. त्यामुळे निवडणुकीत त्यांच्या मतांची विभागणी होते. साहजिकच मेघालयाचं मुख्यमंत्रीपद वा सत्ता गारोंच्या ताब्यात येते. कॉन्रॅड संगमा हे विद्यमान मुख्यमंत्री गारो जमातीचे आहेत. लोकसभेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक, पूर्णो संगमा यांचे हे पुत्र. त्यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीला भाजपने रसद पुरवली आहे. त्यांच्या मंत्रिमंडळात भाजपही सामील आहे. हायेनट्रेप नॅशनल लिबरेशन कौन्सिल ही खाँसी जमातीची संघटना मानली जाते. खाँसी तरुणांना या संघटनेचा गर्व आहे. भारतापासून वेगळं होऊन स्वतंत्र राष्ट्र स्थापन करणं हे या संघटनेचं कागदोपत्री उद्दीष्ट आहे. परंतु या संघटनेची शक्ती फारशी नाही. या संघटनेतील सशस्त्र तरुणांची संख्या जास्तीत जास्त शंभर असावी. त्यापैकी बहुतांश तरुण बांग्लादेशात आहेत. या संघटनेने घडवून आणलेले स्फोट कमी तीव्रतेचे होते. म्हणजे या संघटनेला परदेशी राष्ट्रांची फारशी मदतही नाही.

चेश्टरफील्ड थँग्यूला अटक करणं पोलीसांना सहज शक्य होतं, खोट्या चकमकीत त्याचा खून करण्यात आला अशी बहुसंख्य खाँसी तरुणांची साधार धारणा आहे. भाजपला एकात्मिक राष्ट्रवाद लोकांवर लादायचा असल्याने जाती-जमातींचं वैविध्य व स्वायत्तता यांना चिरडून टाकण्याचं धोरण अवलंबलं जातंय असंही मानलं जातं. युनायटेड न्यूज ऑफ इंडियाचा पत्रकार अभिजीत देब शिलाँगमधील बंगाली कुटुंबात जन्माला आला. त्याचे अनेक मित्र खाँसी आहेत. खाँसी राष्ट्रवादाचे चटके अभिजीतलाही बसले आहेत. तो मला म्हणाला की भाजपच्या एकात्मिक राष्ट्रवादाच्या आक्रमक भूमिकेमुळे ईशान्य भारतातील आदिवासी वा मूळ रहिवासी बिथरले आहेत. गोवंश हत्याबंदीचा कायदा भाजपच्या आसाम सरकारने केला आहे. आदिवासी राज्यांमधील गाईगुरं मेघालय, मिझोराम, नागालँण्ड, अरुणाचल प्रदेश या आदिवासी राज्यांमध्ये विक्रीला जातात. आसाम सरकारच्या कायद्यामुळे ही निर्यात थंडावली आहे. साहजिकच त्याचा फटका या आदिवासी राज्यांना बसला आहे. ईशान्य भारतात आसाम हे मध्यवर्ती राज्य आहे, त्याचा भूप्रदेश आणि लोकसंख्या सर्वाधिक आहे. केवळ गाईगुरंच नाही तर सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आसाममधूनच या राज्यांना होतो. आसामसोबत अनेक राज्यांचे सीमाविवाद आहेत. आपल्या हद्दीचं उल्लंघन करण्यात आलं आहे का यावर नजर ठेवायला राज्य सरकारं ड्रोनचा उपयोग करू लागली आहेत. शेखर गुप्ता या ज्येष्ठ पत्रकारानेही आसाममधील हिंदुराष्ट्रवादाचा फटका आदिवासी राज्यांना बसतो आहे या आशयाची नोंद शिलाँगमधील घडामोडींसंबंधात केली आहे. मेघालयाच्या तीन दिशांना आसाम आहे तर एका दिशेला बांग्लादेश आहे. ईशान्य भारतातील प्रत्येक राज्य आंतरराष्ट्रीय सरहद्दीला भिडलेलं आहे. संपूर्ण ईशान्य भारताला जोडणारा सिलीगुडी हा भूप्रदेश केवळ 22 किलोमीटर्सचा आहे. उत्तरेला चीन आहे तर दक्षिणेला बांग्ला देश यांच्या चिमटीत सापडेल्या या भूप्रदेशावर नियंत्रण नाही तरी नजर ठेवण्यासाठी चीन उत्सुक आहे. याच मुद्द्यावरून डोकलाम येथे चीन आणि भारतीय सैन्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता.

मणिपूर असो की मिझोराम वा मेघालय किंवा नागालँण्ड वा दस्तुरखुद्द असम, ईशान्य भारतातील जनजीवनात जमात हीच ओळख आहे, अस्मिता आहे. ईशान्य भारतात दर पन्नास मैलांवर भाषा बदलते. एका जमातीची भाषा दुसऱ्या जमातीला कळत नाही. या जमातींची स्वायत्तता, त्यांचं वैविध्य, त्यांच्या प्रदेशातील नैसर्गिक स्त्रोतांवरील त्यांचे अधिकार, अन्य जमाती व प्रदेशांशी असेल त्यांचे व्यापारी व आर्थिक संबंध यावर भाजपच्या एकात्मिक राष्ट्रवादाचा विपरीत परिणाम होतो आहे. मिझोराम असो की मेघालय दोन्ही राज्यांत भाजपच्या पाठिंब्यावरच स्थानिक पक्ष सत्तेवर आहेत. आसाममध्ये तर भाजपचीच सत्ता आहे. परंतु तरीही जमातीच्या अस्मिता उग्र होताना दिसतात. यावर्षी शिलाँगमध्ये काळा स्वातंत्र्यदिन पाळण्यात आला. राज्य सरकारचा कारभार आणि भाजपच्या आक्रमक एकात्मिक राष्ट्रवादाच्या विरोधातील नाराजी त्यातून प्रकट झाली आहे. मेघालयाच्या मुख्यमंत्र्यांनी पोलिसांच्या रायफली परत करणाऱ्या तरुणांना माफ करण्यात येईलं अशी घोषणा केली आहे.

- सुनिल तांबे

(साभार : दिव्य मराठी रसिक स्पेशल)

suniltambe07@gmail.com


 

(७) वस्तुस्थिती अशी आहे की ज्या लोकांना आमची भेट अपेक्षित नाही आणि जे या जगातील जीवनावर संतुष्ट व समाधानी बनले आहेत व जे लोक आमच्या संकेतांपासून गाफील आहेत,

(८) त्यांचे शेवटचे ठिकाण नरक असेल त्या दुष्टतेपायी ज्यांची कमाई ते (त्यांच्या या चुकीच्या श्रद्धेमुळे व चुकीच्या आचरणामुळे) करीत राहिले.१२

(९) आणि ही देखील वस्तुस्थिती आहे की ज्या लोकांनी श्रद्धा ठेवली आणि सत्कृत्ये करीत राहिले त्यांना त्यांचा पालनकर्ता त्यांच्या श्रद्धेमुळे सरळमार्गी बनवील, ऐश्वर्यसंपन्न स्वर्गांमध्ये, त्यांच्या खालून कालवे वाहतील.१३

(१०) तेथे त्यांची उद्घोषणा अशी असेल की, ‘‘पवित्र आहेस तू हे परमेश्वरा!’’ त्यांची प्रार्थना अशी असेल, ‘‘शांती व सुरक्षितता असो’’ आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा शेवट असा असेल, ‘‘सर्व स्तुती सर्व जगांच्या पालनकत्र्या अल्लाहसाठीच आहे.’’१४

(११) जर एखादे वेळी१५ अल्लाहने लोकांशी वाईट व्यवहार करण्यात तितकीच घाई केली असती जितकी ते लोक या जगातील भले मागण्यासाठी घाई करतात तर त्यांची कार्यमुदत केव्हाच संपुष्टात आणली गेली असती. (परंतु ही आमची रीत नव्हे) म्हणून आम्ही त्या लोकांना ज्यांना आम्हाला भेटण्याची अपेक्षा नाही त्यांच्या शिरजोरीतच भटकत राहण्याची सूट देत असतो.

(१२) माणसाची स्थिती अशी आहे की जेव्हा त्याच्यावर एखादा बिकट प्रसंग ओढवतो तेव्हा उभा असता, - बसता व पहुडला असता आमचा धावा करतो, पण जेव्हा आम्ही त्याचे संकट निवारण करतो तेव्हा अशाप्रकारे तो चालता होतो जणूकाही त्याने कधीही त्याच्या कोणत्याही बिकट प्रसंगी आमचा धावा केलाच नव्हता. अशाप्रकारे मर्यादा ओलांडणाऱ्यासाठी त्यांची कृत्ये शोभिवंत बनविली गेली आहेत.

(१३) लोकहो! तुमच्या पूर्वीच्या जनसमूहांना१६ आम्ही नष्ट करून टाकले१७ जेव्हा त्यांनी अन्यायाचे वर्तन अवलंबिले आणि त्यांचे पैगंबर त्यांच्यापाशी उघडउघड संकेत घेऊन आले आणि त्यांनी श्रद्धा ठेवलीच नाही. अशाप्रकारे आम्ही गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्याचा बदला देत असतो.

(१४) आता त्यांच्यानंतर आम्ही तुम्हाला भूतलावर त्यांची जागा दिली आहे जेणेकरून पाहावे, तुम्ही कशी कृत्ये करता.१८ 



१२) येथे पुन्हा दाव्यासह त्याचा पुरावा संकेतमध्ये स्पष्ट केला आहे. दावा आहे की परलोकावरील विश्वासाला नाकारण्याचा अनिवार्य आणि निश्चित परिणाम नरक आहे. यासाठी पुरावा देण्यात आला आहे की परलोक विश्वासाला नाकारणारा आणि यावर आपले एखादे विचार न ठेवणारा दुष्टतेच्या आहारी जातो. या दुराचारांची शिक्षा नरकाशिवाय दुसरी असत नाही. परलोक विश्वासासाठी हा एक आणखी पुरावा आहे. पहिले तीन पुरावे बौद्धिक स्वरुपाचे आहेत आणि ते अनुभव सिद्ध पुरावे आहेत. येथे याचा फक्त संकेत दिला आहे. परंतु कुरआनमध्ये वेगवेगळया ठिकाणी आम्हाला याचे विस्तृत विवरण सापडते. या पुराव्यांचा सार म्हणजे माणसाचे वैयक्तिक जीवनव्यवहार आणि सामाजिक जीवनव्यवहार तोपर्यंत दुरुस्त होत नाही जोपर्यंत त्याच्या मनात परलोक चेतना आणि विश्वास घर करून राहात नाही. तसेच हा परलोकध्यास मनुष्याच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनव्यवहारात दडलेला असतो की आम्हाला अल्लाहसमोर आपापल्या कर्मांचा हिशेब द्यावा लागणार आहे. आता हे विचार करण्यासारखे आहे की शेवटी हे असे का आहे? काय कारण आहे की परलोकध्यास कमजोर झाल्याने किंवा नष्ट झाल्याने मनुष्य जीवनव्यवहराची व चारित्र्याची गाडी दुष्टतेकडे चालू लागते. जर परलोक विश्वास  वास्तविकतेनुसार  नसता  आणि  त्याचे  नाकारणे  सत्याविरुद्ध  असते  तर  हे  असंभव  होते  की   परलोक मान्य करणे अथवा अमान्य करणे एकसारखे समोर आले असते. एकाच गोष्टीचे बरोबर परिणाम समोर येणे आणि त्याच्या नसल्याने गोष्टी चुकीच्या ठरणे याचा भक्कम पुरावा आहे की ती गोष्ट स्वत: एक सत्य गोष्ट आहे. (असे आढळून येते की अल्लाहशी द्रोह करणारे आणि परलोक  नाकारणारेसुद्धा  सत्चरित्र  असतात  आणि  सदाचारी  असतात,  परंतु  ही  आपत्ती  किंवा  विचार  वरवरचा आहे) अल्लाह आणि परलोकाला नाकारणारे जगात काही सदाचार आणि काही दुराचारापासून दूर राहणारे आढळतात. परंतु त्यांचा हा सदाचार आणि धार्मिकता त्यांच्या जीवनाच्या भौतिकवादी दृष्टिकोनाचा परिणाम नाही तर त्या धर्मप्रभावाचे फळ आहे जे नकळत त्यांच्या मनात घर करून आहेत. त्यांचे नैतिक संचित धर्मापासून चोरलेले आहे आणि त्यास हा मनुष्य अनुचित प्रकारे अधार्मिकतेत प्रयोगात आणत आहे. त्यामुळे आपल्या अधार्मिक आणि भौतिकवादाच्या संचितात याच्या स्त्रोताला दर्शवू शकत नाही.  

१३) या वाक्याचा विषयक्रम गंभीरतापूर्ण लक्ष केंद्रित करू इच्छितो.

१) या लोकांना परलोक जीवनात स्वर्गप्राप्ती का होईल? कारण हे जगातील जीवनात सरळमार्गावर चालत राहिले. प्रत्येक कार्यात त्यांनी सत्यनीतीचा स्वीकार केला आणि असत्य रीतींचा त्याग केला.

२) प्रत्येक वेळी सत्य आणि असत्य, चूक किंवा बरोबर हे अंतर त्यांना कसे कळले? मग त्या अंतराप्रमाणे सत्यावर (सरळमार्ग) चालण्यासाठी आणि वाममार्गापासून दूर राहण्यासाठीची शक्ती त्यांना कोठून मिळाली? त्यांच्या पालनकर्ता स्वामीकडून कारण तोच ज्ञानात्मक मार्गदर्शन आणि व्यावहारिक सन्मतिस्त्रोत आहे. त्यांचा पालनकर्ता त्यांना हे मार्गदर्शन आणि ही सन्मती का देतो? तर त्यांच्या ईमान धारण करण्यामुळे!

हे परिणाम जे वर्णन झालेत कोणत्या ईमानचे परिणाम आहेत? त्या ईमानचे नाहीत जे फक्त मानण्याच्या अर्थापुरतेच असते. परंतु त्या ईमानाच्या परिणामस्वरुप मनात घर करून राहाते आणि आचरणाचा आत्मा बनतो. त्याच्या शक्तीमुळे चारित्र्य आणि व्यवहारात भलाई (चांगुलपणा) प्रकट होतो.

१४) येथे एका सूक्ष्म शैलीत हे दाखविले गेले की समृद्धशाली स्वर्गात प्रवेश केल्यानंतर हे लोक तेथील सुख वैभवाच्या वस्तूंवर तुटून पडणार नाहीत. स्वर्गाचे नाव ऐकताच काहींच्या मनात आपल्या वक्र बुद्धीमुळे  हा विचार येतो. परंतु सदाचारी ईमानधारक जगात उच्च् विचार आणि चारित्र्यशीलतेने आपल्या भावनांना सावरून तसेच आपल्या  चरित्राला  पवित्र  बनवून  एक श्रेष्ठतम  व्यक्तित्वाची  उभारणी  करतात  असेच  लोक  जगाच्या  वातावरणाशी भिन्न स्वर्गाच्या पवित्र वातावरणात आणखीन श्रेष्ठतम बनतील. जगातील त्यांचे सद्गुण स्वर्गात त्यांच्या चरित्रात पूर्णत्वाने दिसून येतील. त्यांचे सर्वप्रिय कार्य म्हणजे अल्लाहचे पावित्र्यगान असेल ज्याचा त्यांना जगात ध्यास होता. आपल्या समाजातील एक दुसऱ्याचे कल्याण करण्याची भावना कार्यरत होती ज्यास त्यांनी जगात आपल्या सामाजिक जीवनाचा उद्देश बनविला होता.

१५) वरील आरंभीच्या वाक्यानंतर आता उपदेश आणि समजून सांगण्यासाठीचे व्याख्यान सुरु होत आहे. या व्याख्यानाला वाचण्याअगोदर याच्या पार्श्वभूमीच्या दोन गोष्टींना जाणून घेणे आवश्यक आहे.

(१) या व्याख्यानाअगोदर काही दिवसांपूर्वी तो भीषण दुष्काळ समाप्त् झाला होता ज्यामुळे मक्कानिवासी अत्यंत विचलीत झाले होते. या दुष्काळात कुरैशच्या गर्विष्टपणाने अकडलेली मान अगदीच झुकून गेली होती. प्रार्थना करीत होते आणि रडत होते. तसेच अनेकेश्वरत्वात आणि मूर्तीपूजेत लक्षणीय घट झाली होती. एक अल्लाहकडे हे कुरैश आपले डोळे लाऊन होते. ही वेळ येऊन ठेपली की अबू सुफियान याने पैगंबर मुहम्मद (स.) यांना विनंती केली की, आपण अल्लाहशी प्रार्थना करावी की हे संकट टळावे. परंतु जेव्हा दुष्काळ समाप्त् झाला आणि पाऊस पडू लागला, सुख समृद्धीचा काळ पुन्हा आला तेव्हा जी मने अल्लाहकडे लागलेली होती ती पुन्हा मूर्तीपूजेकडे आणि विद्रोह व दुराचाराकडे वळू लागली.

 दुसरे म्हणजे पैगंबर मुहम्मद (स.) या लोकांना सत्याला नाकारण्याच्या शिक्षेने सावधान करीत होते तेव्हा ते म्हणत की तुम्ही अल्लाहचा ज्या कोप पासून आम्हाला धमकावित आहात तो कोप का होत नाही? त्याच्या येण्यात उशीर का होत आहे? 

यावरच सांगितले जात आहे की अल्लाह लोकांवर दया व कृपा करण्यात जेवढे लवकर करतो, त्यांना शिक्षा देण्यात  व  पापकृत्यावर  त्यांची  पकड  करण्यात  तेवढी  घाई करीत नाही. तुम्हाला वाटते की  ज्याप्रकारे  तुमची प्रार्थना ऐकून त्याने दुष्काळ लवकर दूर केला त्याचप्रमाणे तुमचे आव्हान ऐकून व उदंडता पाहून अल्लाह तुमच्यावर शिघ्र कोप होईल. परंतु अल्लाहची ही पद्धत नाही. लोकांनी कितीही जास्त उदंडता कृत्ये करोत, अल्लाह त्यांची पकड करण्यापूर्वी त्यांना सुधरण्याची संधी देत असतो. जेव्हा सवलत देण्यात अति होते तेव्हा कर्माच्या बदल्याचा नियम लागू केला जातो.

१६) मूळ अरबी शब्द `कर्न' आहे. म्हणजे एका युगातील लोक, परंतु कुरआनमध्ये ज्याप्रकारे वेगवेगळया प्रसंगाने या शब्दाचा प्रयोग झाला आहे, त्यावरून असे वाटते की `कर्न' म्हणजे ते राष्ट्र जे आपल्या काळात पूर्ण विकसित होते आणि त्याने काही किंवा पूर्णत: जगाचे नेतृत्व केले असेल. अशा राष्ट्राचा विनाश अनिवार्यपणे अशा अर्थाने नाही की त्याच्या पूर्ण वंशाला नष्ट केले जावे. परंतु त्या राष्ट्राचा विकास आणि नेतृत्वाच्या पदावरून खाली येणे त्यांच्या संस्कृती व सभ्यतेचे नष्ट होणे, त्याची ओळख नष्ट होणे तसेच त्याच्या वंशाचे तुकडे तुकडे होऊन दुसऱ्या वंशात सामील होणे हे सर्व विनाशाचेच रूप आहेत.

१७) `अत्याचार' शब्द येथे सीमित अर्थाने नाही. तर तो त्या सर्व पापी कृत्यांचा परिपाक आहे ज्यांना मनुष्य आज्ञाधारकतेच्या सीमेपलीकडे जाऊन करतो. (तपशीलासाठी पाहा सूरह २, टीप ४९)

१८) येथे संबोधन अरबांशी आहे. त्यांना सांगितले जात आहे की पूर्वीच्या राष्ट्रांना आणि वंशांना त्यांच्या काळात कार्य करण्याची संधी देण्यात आली होती. परंतु त्यांनी (आपल्या पैगंबरांचे ऐकले नाही आणि अत्याचार व विद्रोहाची नीती स्वीकारली.) यामुळे आमच्या परीक्षेत विफल ठरले आणि मैदानातून हटविण्यात आले. आता हे अरबांनो, तुमची वेळ आली आहे. जर तुमची गत त्यांच्याप्रमाणे होऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर या संधीचा सदुपयोग करा. मागील राष्ट्रांच्या इतिहासापासून बोध घ्या आणि  त्या  चुकांची  पुनरावृत्ती  करू  नका  ज्या  मागील  लोकांनी  केल्या  होत्या.  त्या  चुका  त्यांच्या   विनाशाचे कारण ठरले होते.



हे चक्र चालत राहिले तर शेवटी सर्व विश्व दिवाळखोर होऊन जाईल आणि धरतीवर असा कोणताही भूभाग शिल्लक राहणार नाही, ज्याच्याकडे दिवाळखोरीच्या संकटाला स्थलांतरित केले जाऊ शकेल. मग हे आवश्यकता भासते की मंगळ, बुध आणि शुक्र ग्रह मध्ये पैसे लावले जावेत आणि अतिरिक्त माल खपविण्यासाठी बाजार शोधले जावेत.

या जागतिक संघर्षात बँका पतपेढ्या आणि उद्धव व्यापाऱ्यांची, भांडवलदारांची लहान अशी टोळी सर्व जगाची आर्थिक सामग्री आणि संसाधनावर या प्रकारे प्रभावी झालेली आहे. समस्त उपाय त्यांच्याविरोधात पूर्णपणे निरुपाय झालेले आहे. आता कोण्या व्यक्तीसाठी हे असंभव झालेले आहे की तो आपल्या कष्टाने आणि आपल्या बुद्धीच्या योग्यतेने एखादे काम स्वतंत्र रूपाने करू शकेल. तसेच ईश्वराच्या धरतीवर अस्तित्वात असलेल्या जीवन साधने स्वतः काही भाग प्राप्त करू शकेल. लहान व्यापारी, लहान कारागीर आणि लहान शेतकऱ्यांसाठी आज जगात हात-पाय मारण्याची काही एक संधी बाकी राहिलेली नाही. सर्वच्या सर्व भांडवलदारांचे गुलाम, नौकर, मजूर बनण्यास विवश आहेत. हे लोक कमीत कमी जीवन सामग्रीच्या मोबदल्यात त्यांच्या शरीर आणि बुद्धीच्या सर्व शक्तीआणि त्यांचा पूर्ण वेळ घेतात. या कारणास्तव सर्व मानव जात एक आर्थिक पशु बनून राहिलेली आहे खूप कमी भाग्यशाली लोकांना या आर्थिक संघर्षामध्ये इतका वेळ मिळू शकतो की आपल्या आध्यात्मिक विकासासाठी काही करू शकतील. कोण अशा उद्देशा कडे लक्ष देऊ शकेल जो पोट भरण्याच्या उद्देशा पेक्षा श्रेष्ठ आहे.आपल्या व्यक्तीत्वाच्या त्या तत्त्वांना विकसित करू शकेल जे उपजीविकेच्या शोधा पेक्षा दुसऱ्या पवित्र उद्देशासाठी ईश्वराने त्याच्या मध्ये ठेवले होते. वास्तवात या सैतानी व्यवस्थेमुळे आर्थिक संघर्ष इतके कठोर रूप धारक करते की, जीवनाचे इतर दुसरे विभाग निष्क्रिय हो होऊन बसतात.यापेक्षाही मोठे मानवाचे दुर्भाग्य हे आहे की जगाचे नैतिक दर्शन राजनीतिक व्यवस्था आणि कायदे सिद्धांत या सैतानी अर्थव्यवस्थेने प्रभावित झालेले आहेत. पूर्वेपासून पश्चिमे पर्यंत नैतिकतेचे आचार्य अतिरिक्त खर्चापासून वाचण्यावर जोर देत आहेत. जितके कमवायचे तितकाच खर्च करून टाकणे एक मूर्खता समजली  जाते . प्रत्येक व्यक्तीला शिकवण दिली जाते की, आपल्या मिळकतीतून काही न काही वाचवून बँकेत डिपॉझिट ठेवावे अथवा विमा पॉलिसी खरेदी करावी अथवा कंपन्याचे शेअर खरेदी करावेत. म्हणजे जी गोष्ट मानवतेचा विनाश करणारी आहे तीच नैतिकतेच्या दृष्टीत चांगुलपणाचे मापदंड करणारी ठरली आहे. राहिली राजनीतिक शक्ती तर ती व्यवहारतः पूर्णपणे एका सैतानी व्यवस्थेच्या ताब्यात आलेली आहे. ती या अत्याचारापासून मनुष्याला वाचविण्या ऐवजी स्वतः अन्याय करणारी मशीन झालेली आहे. जगाचे कायदे सुद्धा या व्यवस्थेच्या प्रभावात संयोजित होत आहेत.

या कायद्यांनी लोकांना व्यवहारतः पूर्ण सूट देऊन ठेवली आहे की ते ज्याप्रकारे इच्छितील समाजहिताच्या विपरीत आपल्या आर्थिक उद्देशासाठी प्रयास करतील. पैसे कमविण्याच्या पद्धतीत वैथ आणि अवैधतेचा फरक जवळजवळ लुप्त झालेला आहे. प्रत्येक ती पद्धत जिच्याने व्यक्ती दुसऱ्यांना लुटून अथवा नष्ट करून धनवान बनवू शकतो, कायद्याच्या दृष्टीत पात्र आहे दारू बनवा आणि विका व्यभिचाराचे अड्डे स्थापन करा, कामोत्तेजक चित्रपट बनवा, अश्लिल निबंध लिहा वासनालय, भावना भडकवणारी चित्रे प्रकाशित करा, सटृयाचा व्यवहार पसरवा, व्याजखोरीच्यासंस्था स्थापन कराजुगाराच्या नवनवीन पद्धती काढा. सारांश हा की वाटेल ते करा. कायदा फक्त याची परवानगीच देणार नाही तर तुमच्या अधिकारांचे रक्षण ही करेल.

इस्लामी उपाय

1: इस्लामने जीवनाच्या सर्व समस्यांना या नियमात समोर ठेवले आहे की, जीवनाचे जे सिद्धांत स्वाभाविक आणि नैसर्गिक आहेत, त्यांना शिल्लक ठेवले जावे आणि जिथे नैसर्गिक मार्गाने विचलित झाले आहे, तेथूनच त्याला वळवून नैसर्गिक मार्गावर लावून दिले जावे.

2: दुसरा महत्वपूर्ण नियम ज्यावर त्याची सर्वच सुधारात्मक कार्य निर्भर असतात, तो हा आहे की समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये केवळ काही वरवरचे उपाय लागू करण्यावर न थांबता, सर्वात जास्त जोर नाही नैतिक आणि मानसिक सुधारावर दिला जावा. कारण मानवी मनात निर्माण होणाऱ्या बिघाडाची मुळे कापली जावीत.

3: तिसरा मौलिक नियम ज्याची झलक आपणास संपूर्ण इस्लामी जीवन प्रणालीत मिळेल, हा आहे की शासनाच्या बळावर आणि कायद्यांच्या शक्तीने फक्त तीच कामे घेतली जावीत जिथे याशिवाय काम चालू शकत नसेल. या तिन्ही नियमांना दृष्टीसमोर ठेवते इस्लाम जीवनाच्या आर्थिक विभागामध्ये त्या सर्वच अभाविक सिद्धांतांना अधिकाहुन अधिक नैतिक सुधार आणि कमीत कमी प्रशासनिक हस्तक्षेपाद्वारे मिटवीत असतो, जे सैतानाच्या प्रभावाने मानवाने अंगीकारले आहेत. मानव आपल्या जिविकेसाठी प्रयास करण्यास स्वतंत्र असावा. मानव आपल्या श्रमाने जे काही प्राप्त करेल ती त्याची मिळकत स्वीकार केली जावी आणि मानवामध्ये योग्यतांच्या आणि त्यांच्या परिस्थितीच्या प्रमाणानुसार अंतर असावे. या सर्व बाबींना इस्लाम त्याच मर्यादेपर्यंत स्वीकार करतो ज्या मर्यादेपर्यंत हे निसर्ग अनुकूल असते. मग तो यांच्यावर असे प्रतिबंध लावीत असतो ज्यांच्यामुळे न ही निसर्गाच्या सीमेच्या पुढे वाढू शकते आणि न अन्याय आणि अत्याचाराचे कारण बनते.

सर्वात अगोदर धन कमविण्याच्या प्रश्नाला घ्या इस्लामने मनुष्याच्या या अधिकाराला स्वीकारले आहे. अल्लाहच्या धरतीवर आपल्या रुची, क्षमता आणि योग्यतेनुसार स्वतः आपली जीविका त्याने शोधावी. परंतु तो त्याला हा अधिकार देत नाही की त्याने आपली जीवीका प्राप्त करण्यासाठी नैतिकतेला बीघडविणारी व सभ्यतेच्या व्यवस्थेला बिघडविणारी साधने वापरावीत. तो धन कमविण्याच्या साधनांमध्ये अवैध आणि वैधतेचे अंतर निर्धारित करतो. अत्यंत विस्तारासहीत वेचून वेचून प्रत्येक हानिकारक पद्धतीला अवैध करून टाकतो. त्याच्या कायद्यामध्ये दारू आणि दुसरे मादक पदार्थ केवळ आपल्या जागेवर अवैध आहेत तर त्यांचे बनविणे, विकणे, विकत घेणे आणि बाळगणे सर्व अवैध आहे. तो व्यभिचार, संगीत आणि याच प्रकारच्या इतर दुसऱ्या साधनांना सुद्धा संपत्तीच्या कमाईचे वैध साधन मानत नाही. तो अशा सर्व साधनांना अवैध ठरवितो, ज्यात एका व्यक्तीचा लाभ दुसऱ्या लोकांच्या अथवा समाजाच्या हानीवर निर्भर करीत असेल.

लाच, चोरी, जुगार ,सट्टा तसेच धोका, दगाबाजी चे व्यवहार जमा खोरी अर्थात गरजेच्या साधनांना यासाठी रोखून ठेवणे की किमती वाढाव्यात. उत्पादनाच्या साधनांना एक व्यक्ती अथवा काही व्यक्तीचा अधिकारी ठरविणे की दुसऱ्यासाठी प्रयास क्षेत्र तंग व्हावे. या सर्व पद्धतींना त्यांनी अवैध ठरवले आहे. या व्यतिरिक्त व्यवसायाच्या अशा सर्व प्रकारांना त्याने वेचून वेचून अवैध घोषित केले आहे जे आपल्या आकाराच्या दृष्टीने विवाद निर्माण करणारे आहेत इस्लामच्या या व्यापारी कायद्यांचे विस्तृत रूपाने अध्ययन कराल तर आपणास माहित होईल की आज ज्या पद्धतीने लोक करोडपती बनत आहेत. त्यांच्यातून अधिकांश त्या पद्धती आहेत ज्याच्यावर इस्लामने अत्यंत कडक कायदेशीर प्रतिबंध लावले आहेत. तो धन कमविण्याच्या ज्या साधनांना अवैध ठरवितो, त्यामध्ये सीमित राहून काम केले तर लोकांसाठी अपार धन जमा करत जाण्याची खूप कमी संभावना शेष राहते.

आता पहा, मनुष्य मान्य पद्धतीने जे काही प्राप्त करेल, त्याला इस्लाम त्या व्यक्तीची मिळकत म्हणून परवानगी देतो. परंतु तिच्या उपभोगात त्याला पूर्णतः हा स्वतंत्र सोडत नाही तर त्यावरही अनेक बंधने घालतो. विदित आहे की या कमाविलेल्या संपत्तीच्या वापराचे तीन प्रकार संभव आहेत. एक तर ती खर्च करून टाकावी, किंवा तिला लाभदायक कामावर लावावे, अथवा ती जमा करावी. यामधून एक एकावर इस्लामने जी बंधने घातली आहेत संक्षेपात अशी आहेत. खर्च करण्याचे जितके प्रकार नैतिकतेला हनी पोचवितात अथवा ज्यांच्यामुळे समाजाला नुकसान पोहोचते ते सर्व वर्जित आहेत. आपण आपली संपत्ती जुगारात उडवू शकत नाही व दारू पिऊ शकत नाही. आपण व्याभिचार करू शकत नाही. आपण गाणे वाजविणे, नाच रंग आणि विलासितेच्या दुसऱ्या प्रकारांमध्ये आपला पैसा वाहू शकत नाही. तुम्ही रेशमी वस्त्र परिधान करू शकत नाही. सोने व जवाहीर यांच्या दागिन्यांचा वापर करू शकत नाही. असे दागिने फक्त स्त्रिया घालू शकतात. आपण छायाचित्रांनी आपल्या भिंतींना समजू शकत नाही. सारांश हा की इस्लामने त्या सर्व दारांना बंद करून टाकले ज्यांच्यामुळे मांनवाच्या संपत्तीचा अधिकांश भाग आपल्या विलासितेवर खर्च होत असतो. तो खर्चाच्या ज्या पद्धतींना मान्य करतो त्या या प्रकारच्या आहेत की माणसाने फक्त एका सामान्य दर्जाचे शिष्टता पुर्ण आणि पवित्र जीवन व्यतीत करावे. त्याहून अधिक जर काही शिल्लक राहत असेल तर त्याला खर्च करण्याचा मार्ग इस्लामने हा सुचविला आहे की त्याला पुण्य आणि भलाईच्या कामांमध्ये जनहितार्थ आणि त्या लोकांच्या सहाय्यता कार्यात खर्च करावे जे आर्थिक संपत्ती मधून आपल्या गरजांनुसार वाटा मिळविण्यापासून वंचित राहिले आहेत. इस्लामच्या दृष्टीत सर्वात अधिक योग्य पद्धती आहे की माणूस जे काही कमवितो त्याला आपल्या मान्य आणि उचित गरजांवर खर्च करावे आणि मग जे काही शिल्लक राहील त्याला दुसऱ्यांना देऊन टाकावे. म्हणजे ते आपल्या या गुणाला इस्लामने उच्चतम स्तराच्या नैतिकतेत सम्मिलित केले आहे. एका आदर्शाच्या रूपात याला इतक्या शक्तीनिशी प्रस्तूत केले आहे की जेव्हा कधी समाजात इस्लामच्या नैतिकतेचा गाजावाजा असेल सामाजिक जीवनामध्ये ते लोक अधिक आदराच्या दृष्टीने पाहिले जातील जे कमवितात खर्च करून टाकतात आणि त्या लोकांना चांगल्या दृष्टीने पाहिले जाणार नाही जी संपत्तीला साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतील किंवा कमिविलेल्या संपत्तीतून शिल्लक राहिलेल्या वाट्याला पुन्हा कमविण्याच्या कामी लावतील.तरीसुद्धा विशुद्ध नैतिक शिकवणी द्वारा आणि समाजाच्या नैतिक प्रभाव आणि दबावाने अत्याधिक लोभ आणि लोलुपता ठेवणाऱ्या लोकांच्या कमतरतेचे पूर्णतः उन्मूलन केले जाऊ शकत नाही. असे असताना सुद्धा अनेक असे लोक बाकी राहतील जे आपल्या गरजा पेक्षा अधिक असलेल्या संपत्तीला आणखीन जास्त संपत्ती कमविण्यात लावू इच्छितात. यासाठी इस्लामने त्यांच्या वापराच्या पद्धतीवर काही कायदेशीर प्रतिबंधलावलेले आहेत. इस्लामी कायद्यात पूर्णतः निषिद्ध आहे आपण कोणाला आपला माल कर्जावर देत आहात जरी त्याने ते कर्ज आपल्या गरजा वर खर्च करण्यासाठी घेतले असेल अथवा जिविकेच्या साधन निर्मिती साठी इत्यादी, प्रत्येक दशेत आपण त्याच्याकडून केवळ आपली मूळ रक्कम परत घेण्याचे अधिकारी आहेत. या प्रकारे इसलाम अन्याया वर आधारित भांडवलदारी ची कंबर तोडून टाकतो आणि त्या सर्वात मोठ्या शास्त्राला बोथट करून टाकतो. ज्याला आपण व्याज म्हणतो. ज्याच्या द्वारे भांडवलदार केवळ आपल्याच बळावर आसपासच्या आर्थिक धनसंपत्तीला साठवत जातो. शिल्लक धन व्यक्ती वाटेल तर आपल्या व्यापार उद्योग अथवा दुसऱ्या व्यवसायात लावू शकतो अथवा दुसऱ्याच्या सोबत लाभा मध्ये सामील होऊन त्याने संपत्ती जमा करावी याला इस्लाम वैध करार देतो आणि यापेक्षा जी आवश्यकतेपेक्षा अधिक धन लोकांजवळ साठत जाते त्याचा उपाय   दुसऱ्या प्रकारे करीत असतो.

(क्रमशः, भाग - ३)

-अब्दुल मजीद खान

नांदेड, Mob. 9403004232



एक अफगाणी आपले गाढव घेऊन टेकडीवर चढत होता. ते गाढव टेकडीवर पुढे जाण्यास काही केल्या तयार नव्हता. ते तिथेच अडून राहिले. त्या अफगाणीने गाढवाला खूप मारले. शेवटी कसे तरी ते गाढव टेकडी चढू लागले. वर पोहोचल्यानंतर पुन्हा त्या अफगाणीने गाढवाला मारायला सुरवात केली. एक माणूस दूरवरून हा सर्व प्रकार पाहात होता. गाढवाला अफगाणीकडून मारले जाताना तो जवळ येऊन त्या अफगाणीला विचारले की, का बरे आता पुन्हा या गाढवाला मारत आहात, टेकडीवर चढून आल्यावरसुद्धा? त्यावर तो अफगाणी उत्तरला, अडणे हा अफगाणींचा स्वभाव आहे, गाढवाचा नाही. गाढवाने अडायला नको होते. म्हणून आधी त्याला अडून राहाण्याबद्दल मारले आणि मग अडलाच होता तर टेकडीवर चढला कशाला? म्हणून पुन्हा टेकडीवर चढण्याची शिक्षा दिली.

असेच काही अफगाणिस्थानबाबत अमेरिकेचे झाले आहे. आधी त्या देशात गेलेचे कशाला आणि जर गेलेच होते तर माघारी का परतले?... नंतर या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची गरज नाही.

ही झाली विनोदाची बाब. अमेरिकेने अफगाणिस्थान सोडून तिथल्या नागरिकांना वाऱ्यावर सोडून जसे निघून गेले आणि निघून गेल्यावर तालिबानींनी त्या देशावर जसा ताबा मिळवला त्यावर जगभरातील प्रत्येक प्रकारच्या माध्यमांमध्ये इतके बोलले, लिहिले जात आहे, इतक्या चर्चा घडवून आणल्या जात आहेत की त्यातले दहा टक्केही लोक वाचत, पाहात, ऐकत असतील तर नक्कीच येत्या काही दिवसांत त्यातले बरेच जण मानसिक आजाराने गासलेले आढळतील. जो तो मुस्लिमांना आवर्जून प्रश्न विचारतो की अफगाणिस्थानात जे काही घडलंत त्याबद्दल तुमचं काय मत आहे? जणू भारताच्या मुस्लिमांनीच अफगाणिस्थानात सत्तापालट केली असावी. अमेरिकेने अफगाणिस्थानातून का पळ काढला, याचेसुद्धा उत्तर इथल्याच नागरिकांना विचारले जाते. तिथले लोक देश सोडून पळून का जातात याबद्दलसुद्धा मुस्लिमांनीच उत्तरे द्यावीत, असे त्यांचे म्हणणे आहे, असे वाटते. अमेरिकेने २० वर्षे त्या देशाची नासधूस केली, लाखो अफगाणींना ठार केले, त्या वेळी कुणी मुस्लिमांना, हे अमेरिकेचे वागणे बरोबर आहे का? असे विचारले नव्हते. अफगाणिस्थानवर तालिबानने कब्जा केला. अमेरिकेने लोकशाही साथापन करण्यासाठी त्या देशावर चढाई केली होती. अफगाणींना आधुनिक व्यवस्थेत आणायचे होते. त्या देशाच्या सुरक्षेसाठी तीन लाखांचे सैन्य उभारले होते. त्यांना आधुनिक शस्त्रे व प्रशिक्षण पुरविले होते. त्या सर्वांचे पळून गेलेल्या अशरफ गणींनी काय केले? हे प्रश्न अशरफ गणी आणि अमेरिकेला न विचारता भारतीयांना विचारले जातात, यामागचा खरा हेतू काय?

अमेरिकेने दहशतवादाविरूद्ध युद्धाची घोषण केली. साऱ्या जगाने अमेरिकेपुढे लोटांगण घातले. या युद्धात अमेरिकेने जवळजवळ सव्वा कोटी माणसांची हत्या केली. लहान मुलांसाठी सुद्धा औषधांच्या पुरवठ्यावर अमेरिकेने जगभरातील देशांवर बंदी घातली. याचे उत्तर कुणी त्याला विचारत नव्हते. शहरेची शहरे उद्ध्वस्त करून खंडरमध्ये त्यांचे परिवर्तन केले. लीबिया, इराक, येमेन, सीरिया हे देश जणू जगाच्या नकाशावर मानवी संस्कृती म्हणून शिल्लकच नाहीत. इतकी नासधूस केली की पुढची शंभर वर्षे ते पुन्हा उभारू शकणार नाहीत. हे प्रश्न कुणीतरी का विचारत नाही? जगात फक्त अफगाणिस्थानच एक देश नाही. इराककडे जैविक शस्त्रे नसताना तसा आरोप त्यावर लावला. जगातील इतर राष्ट्रांनी अमेरिकेच्या या आरोपाला समर्थन दिले. ती जैविक शस्त्रे आता कुठे आहेत? इराकला पिंजून काढल्यानेदेखील त्यांचा पत्ता का लागला नाही? हे प्रश्न कुणी विचारायचे? सगळेकाही उद्ध्वस्त झाल्यावर काही मानवतावादी आता असे म्हणू लागले की इराककडे तशी शस्त्रे नव्हतीच. अमेरिकेचा आरोप खोटा होता. प्रश्न असा उपस्थित होतो की तेव्हा का हे मानवतावादी मूग गिळून बसले होते?

अमेरिकेने जी दहशत जगभर माजवली त्यास प्रत्येक देशाची संमती होती. म्हणजे एक प्रकारे केवळ अमेरिकाच नव्हे तर त्याला समर्थन देणारेसुद्धा दहशतवादी आहेत का? हा प्रश्न देखील कुणीतरी कधीतरी विचारायला हवा की नाही?

मानवतावादी, शांतताप्रेमी, सुसंस्कृत, सभ्य अमेरिकेने जगभर जो पराक्रम गाजवला त्याची काही छायाचित्रे इथे देत आहोत. जगाच्या इतर मानवतावादी, शांतताप्रिय राष्ट्रांनी ती पाहावित, कारण यात त्यांचादेखील पुरेसा वाटा आहे.

- सय्यद इफ्तिखार अहमद

मो.: ९८२०१२१२०७




जातीनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी ११ पक्षांच्या प्रतिनिधीमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भेटीत काय ठले, कुठले आश्वासन दिले की नाही, अशा गोष्टी समोर आलेल्या नाहीत. कमालीची गोष्ट म्हणजे ज्या अकरा पक्षांच्या प्रतिनिधीमंडळाने या मागणीसाठी पंतप्रधानांची भेट घेतली, त्या अकरा सदस्यांमध्ये खुद्द भाजपचेही नेते होते. सुशीलकुमार मोदी हे बिहार भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. जातीनिहाय जनगणनेला भाजपचा विरोध लपलेला नाही. एवढेच नव्हे तर संघाचे सरसंघचालक यांनीदेखील मागासवर्गांसाठी संवैधानिक आरक्षणाच्या तरतुदींवर वेळोवेळी प्रश्न उपस्थित केला आहे. अशात स्वतः मोदी ओबीसीमधून येतात. म्हणून त्यांचा पाठिंबा मिळेल अशी कुणी आशा वाळगली असेल तर ते मूर्खपणाचे ठरेल. कारण कोणात्याही जातीचा नेता शासकवर्गात दाखल होतो तेव्हा त्याने आपल्या जातीच्या लोकांना घटस्फोट दिलेला असतो. आपल्या जातबांधवांशी त्याचे काही देणे-घेणे नसते. हीच गोष्ट विविध धर्मियांच्या नेत्यांबाबत देखील लागू पडते. कोणत्याही धर्माच्या नेत्याला मंत्रीपद मिळाले की त्याला आपला धर्म आणि धर्मबांधव यांच्याशी काहीएक संबंध उरत नाही. याचे उत्तम उदाहरण मुख्तार अब्बास नकवी आहेत. २०१४ नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत ओबीसींच्या भाजपसाठी मतदानाचा टक्का वाढत गेला आहे. मात्र अहीकडच्या निवडणुकांत त्यात घसरण झाली हे पाहून ओबीसींना आकर्षित करण्यासाठी मंत्रीमडळ विस्तारात मोठ्या प्रमाणात ओबीसींमधील मंत्री बनवण्यात आले. हे पाहून नितिशकुमार, तेजस्वी यादव आणि इतरांना असे वाटले असेल की पंतप्रधान ओबीसींना जास्त प्रतिनिधित्व देत आहेत. म्हणून त्यांनी जातीनिहाय जनगणनेचा आग्रह धरला असावा. पण या प्रतिनिधीमंडळात भाजप नेत्यांचा सहभाग म्हणजे फक्त देखावा असेल किंवा ओबीसी नेत्यांची समजूत घालण्यासाठी मोदीजींनी त्यांना आमंत्रित केले असावे. मंडल आयोगाच्या शिफारसींनंतर देशात जातीय उद्रेक उफाळून आला होता. यात भाजपनेच मंडलचा कडाडून विरोध केला होता, हे सर्वांना माहीत आहे. पण नंतर याच भजापला त्या शिफारसी लागू झाल्यानंतर ओबीसींना आपल्याकडे आकर्षित केले होते. कल्याणसिंह यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनवले. उमाभारतींना केंद्रीय मंत्रीमंडळात घेतले. महाराष्ट्रात ओबीसींचा सिंहाचा वाटा भाजपच्या गळाला लागला. या जोरावर भाजपने आपला पक्ष विस्तारला. बाबरी मस्जिद विरूद्ध आंदोलन उभे केले गेले. नंतर ती उद्ध्वस्त करून घेतली ती कल्याणसिंह यांच्याच हस्ते. एकदा भाजपने अजेंडा लागू केल्यानंतर या ओबीसी नेत्यांना पक्षातूनच बाहेर फेकले होते, हे आजच्या ओबीसींना माहीत नसेल.

दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की भारतातून जातीय व्यवस्था कधीही नष्ट होणार नाही, हे स्पष्ट आहे. याचे कारण हे की इथल्या वर्गव्यपस्थेला सवर्ण जातीच्या लोकांनी वर्णव्यवस्थेमध्ये परिवर्तित केले. वर्गव्यवस्थेतून माणसे बाहेर पडू शकतात, प्रगती करू शकतात, पण वर्णव्यवस्थेतून मरेपर्यंतच नव्हे तर मेल्यानंतरदेखील बाहेर पडू शकत नाहीत. ओबीसींना जर असे वाटत असेल की जातीनिहाय जनगणा झाल्यावर त्यांना त्यांच्या संख्येच्या तुलनेत विकासात वाटा मिळेल, तर ती समज चुकीची. शिवाय जर इथल्या शासकवर्गाला जर जातीनिहाय जनगणना करूनच घ्यायची होती तर ती संविधान बनवतानाच करून घेतली असती. किंवा नंतर मंडल आयोगाच्या शिफारसींनंतर केली गेली असती. केंद्रात दोन-तीन वेळा बिगर काँग्रेस सरकार होते. काँग्रेसला ती करून घ्यायची तेव्हा ती घेतली नाही आणि आजही घ्ययाची नाही. पण इतर पक्षांच्या सरकारांनी तरी ती करून घेतली असती. यात ब्यूरोक्रेसीने असे वातावरण तयार केले होते की जातीनिहाय जनगणना कुणाला करताच येऊ नये. ओबीसीसहित इतर मागासवर्गांना या जनगणनेतच गुंतवून ठेवायचे आणि या समस्येतून ते कधीच बाहेर पडू नयेत, अशी रणनीती सवर्ण जातीची आहे. मुस्लिमांना तीन तलाक, समान नागरी कायदा, इत्यादी समस्यांमध्ये जसे गुंतवून ठेवले तसेच इतर मागासवर्गांना जातीनिहाय जनगणनेत गुंतवून ठेवायची ती रणनीती आहे. जातीनिहाय जनगणना होण्याचे जर कुणी स्वप्न पाहात असेल तर ते पाहाण्यात काही गैर नाही.

- सय्यद इफ्तिखार अहमद

संपादक, मो.: ९८२०१२१२०७


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget