Halloween Costume ideas 2015
Latest Post


महाराष्ट्राची सत्ता जेव्हापासून देवेंद्र फडणवीस यांच्या हातातून निसटली आणि ती उद्धव ठाकरे यांच्या हातात गेली तेव्हापासून ते विचलित झाले आहेत. इतके की विरोधी पक्ष नेता म्हणून सरकारच्या कामांवर नजर ठेवत त्यांच्यातील चुकांना सभागृहात उपस्थित करण्याऐवजी ते फक्त उद्धव ठाकरे यांनाच आपल्या टिकेचे लक्ष्य करत आहेत. त्यांना मुख्यमंत्री पदी ”पुन्हा मीच”ची संधी मिळाली नाही ती उद्धव ठाकरेंमुळेच असे त्यांना वाटते. 

मग जेव्हा मुख्यमंत्री पदी कार्यरत असताना उद्धव ठाकरे यांनी जे काही केले, करत आहेत, करत राहतील त्या सर्वांचा दोष त्यांच्यावरच असा का? असे त्यांना वाटते. त्यांचे कार्य पाहून शासनाच्या कारभारावर त्याच्या उणीवांवर टीका करण्याचे आहे की त्यांना शासनाचा कारभार कसा असावा याची माहितीच नाही कुणाला माहित. 5 वर्षे त्यांनी राज्याचा कारभार एकमुखी हाताळला. इतर पक्षांशी आघाडी करून त्यांचे सरकार सत्तेत आले नव्हते. शिवसेनेशी त्यांच्या वैचारिक आणि राजकीय संबंधांचा इतिहास होता तरी देखील त्यांनी आपल्या कार्यकिर्दित कोणते मोठे कार्य राज्याच्या विकासासाठी केले असल्याची कुठे नोंद नाही. जसे ठाकरे यांनी राज्याची सुत्रे हाती घेताच कोरोनाच्या महामारीशी सामना करावा लागला आणि त्यातून ते यशस्वीरित्या पार पडले. अशा कोणत्या भयंकर समस्येला त्यांना सामोरे जावे लागले नाही. बरे झाले ही देखील राज्याच्या जनतेवर एक प्रकारची दैवी कृपाच होती. फडणवीसांच्या काळात असे काही उद्भवले असते तर नागरिकांचे काय झाले असते याची कल्पनाच केली जावू शकते. 

उद्धव ठाकरेवर इतर कोणते आरोप करता आले नसल्याने भ्रष्टाचाराचे जे सध्या केद्र सरकारचे शिष्टाचार झाले आहे, फडणवीस उद्धव ठाकरे यांनी कशी हिंदुत्वाची साथ सोडली फक्त हीच एकमेव टीका ते करत आले आहेत आणि करतही राहणार की काय असा प्रश्‍न पडतो. दुसरा प्रश्‍न असा की हिंदुत्व म्हणजे काय याचा अर्थ तरी त्यांनी आणि हिंदुत्ववाद्यांनी सांगायला हवे . नेमके काय केल्याने हिंदुत्व समजावे असा प्रश्‍न साहजिकच पडतो. उद्धव ठाकरे पूर्वीपासून हिंदुत्ववादी आहेत. आजही ते स्वतः म्हणत असतात की त्यांनी ती विचारधारा सोडलेली नाही तेव्हा उद्धव ठाकरे यांनी काय करावे, ज्यामुळे त्यांच्यावर हिंदुत्व सोडण्याची टीका करता येणार नाही हे फडणवीसांनी स्पष्ट सांगावे म्हणजे सर्वांना देखील हिंदुत्व म्हणजे काय हे समजता येईल. उद्धव ठाकरे यांच्या आजवरच्या काळात राज्यात एकही सांप्रदायिक दंगा झाला नाही म्हणूनसाठी उद्धव ठाकरे यांना दोषी धरायचे काय? तसे पाहता फडणवीस यांच्या काळात देखील कुठे दंगा झाला नव्हता. मग हिंदुत्व सोडल्याचा आरोप त्यांच्यावरही लावायचा का?

आपल्या धर्म, संस्कृती आणि सभ्यतेचे रक्षण करणे, त्यांचे संवर्धन करण्याचा सर्व धर्मियांचा अधिकार आहे. जसा तो हिंदु बांधवांचा आहे. तसाच मुस्लिम, ख्रिस्ती, शीख सर्वांचा आहे. पण आपल्या संस्कृतीच्या भल्यासाठी आपल्या धर्माच्या शिकवणी जोपासण्यासाठी परधर्मियांच्या धार्मिक भावना दुखावणं त्यांच्या शिकवणींची अवहेलना करणं. धर्माच्या कारणावरून परधर्मियांवर अन्याय अत्याचार करणं याला धर्म संस्कृती म्हणता येते काय? नकारात्मक विचारांनी कोणतेही काम करता येत नाही की उद्दिष्ट साकारता येत नाही. सकारात्मकतेबरोबरच कोणतीही विचारधारा सर्वसमावेशक असायला हवी. राष्ट्राच्या तमाम नागरिकांच्या हितासाठी सविस्तर कार्यक्रम असावा फक्त एकाच समाजाच्या संप्रदायाच्या हितासाठी कार्य करण्याने कोण नैतिक उद्दिष्ट साकार होत नसते. धर्माच्या बाबतीत अहंकार नाही कृतज्ञता असावी. अहंकाराचा शेवट हिटलर मुसोलीनी सारखा होतो. जिवांच्या भीतीपोटी लोक उघड बोलत नसले तरी ती हृदयात मानसिकतेत घर करून राहते.

दुसरे असे की हिंदुत्वाचा नेमका अर्थ म्हणजे काय? नागरिकांना राष्ट्राला देशोधडीला लावणे, शेतकर्‍यांना उपाशी ठेवून त्यांची कमाई धनदांडग्या उद्योगपतींना बहाल करणे, देशाला, राष्ट्राला, व्यवस्थेला, उद्योजकांच्या दावणीला बांधून, राष्ट्राची संपत्ती लुटारूंना बहाल करणं हे अभिप्रेत आहे काय?

न्यायव्यवस्थेला लाचारी पत्करायला, रोजगारांच्या संधी नष्ट करून कोट्यावधींना बेरोजगार करणे, आम जनतेवर हरप्रकारचे टॅक्स आकारणी करून कार्पोरेट जगताला कोट्यावधींची सूट देणे याला विकास म्हणतायत हिंदुत्वाच्या विचारधारेत म्हणजे एकंदर तमाम नागरिकांना गुलाम बनवणे असा तर याचा अर्थ होत नाहीना. उद्धव ठाकरे इथेच चुकले असतील त्यांनी असे काहीही केल नाही.

- संपादक



दिल्लीत काँग्रेस कार्य समितीची 22 जानेवारी रोजी बैठक झाली. पक्षांतर्गत निवडणुकांचा प्रश्‍न त्यात उपस्थित झाला. त्याला जोडूनच पूर्णवेळ अध्यक्ष हवा, अशी मागणीही झाली. म्हटले तर नेतृत्वाला पक्षातून आव्हान मिळाले आणि म्हटले तर पक्षामध्ये तरी किमान लोकशाही आहे, असे चित्र निर्माण झाले. मे 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडले, तेव्हापासून सोनिया गांधी नेतृत्व करत आहेत. पक्षांतर्गत निवडणुका लवकर घ्या, मतदान घेऊन पूर्णवेळ अध्यक्ष निवडा, अशी काँग्रेसमधील एका गटाची मागणी आहे. तर, पाच राज्यांतील निवडणुकांनतर अध्यक्ष निवडण्याचा पक्षनेतृत्वाचा मानस आहे. यावरुन बैठकीत वादही झाला. पण, काँग्रेसमधील ही मतमतांतरे म्हणजे लोकशाही जिवंत असण्याचे लक्षण आहे. संभाव्य पक्ष नेतृत्वाविषयी मते मांडता येणे, काही मागण्या करता येणे, पक्षांतर्गत सुधारणा सुचवणे, ही सकारात्मक बाब आहे. हे पक्षांतर्गत बंड वा धुसफूसही नाही.

मानवी सभ्यतेला नव्या गोष्टी संघर्षातून मिळतात, असे मार्क्सवादी विश्‍लेषण आहे. ते मानले तर काँग्रेसमधील संघर्षाकडे उदार दृष्टीने पाहावे लागेल. एकचालुकानुवर्ती पक्षात असे काहीच घडत नसते. त्याला काही जण स्वयंशिस्त म्हणू शकतील, पण ती हळूहळू काचू लागते. पुढे हा काच बंडाचे रुप धारण करतो. मध्यंतरी काँग्रेसच्या बुर्जुर्गांनी लिहिलेल्या पत्राची पक्षनेतृत्वाने दखल घेतली आणि या नेत्यांशी चर्चासुद्धा केली. काँग्रेसमध्ये नव्या-जुन्यांचे सुरू असलेले मंथन लक्षवेधी आहे. पक्षात लोकशाही नसेल, तर सत्ता मिळाल्यावर काय होईल? काँग्रेसमध्ये घराणेशाही आहे. पण, या पक्षात लोकशाहीसुद्धा आहे. म्हणून शीर्ष नेतृत्वाला 23 नेते प्रश्‍न विचारू शकले. या नेत्यांनी पक्षांतर्गत प्रश्‍न चव्हाट्यावर आणल्याने त्यांच्याविषयी राग व्यक्त झाला, मात्र कारवाई झाली नाही. यामुळेच काँग्रेसला सर्वांना सामावून घेणार्‍या, वाहत्या प्रवाहाची उपमा दिली जाते. काँग्रेसमध्ये लोकशाही जिवंत असल्याचे दाखवणार्‍या ज्या गोष्टी घडत आहेत, तशा अन्य पक्षातही घडो. म्हणजे किमान बिग ब्रदर संस्कृतीचा जन्म तरी होणार नाही. आणि राष्ट्रवाद अन् देशभक्तीच्या उन्मादात कुणी लोकशाहीच्याच गळ्याला नख लावणार नाही. 


( साभार : दिव्य मराठी)


औरंगाबाद (प्रतिनिधी) 

ईश्‍वराने दिलेल्या मार्गदर्शनानुसार जगल्यास जीवन प्रकाशमय होईल. हे मानवजातीने स्विकारावे असे आवाहन मौलाना कलिम सिद्दीकी यांनी केले. 

जमाअते इस्लामी हिंद औरंगाबाद तर्फे तापडिया नाट्यमंदिरात आयोजित ’अंधारातून प्रकाशाकडे’ या अभियानातील प्रारंभिक कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर जमाअते इस्लामी हिंदचे प्रदेशाध्यक्ष रिजवानुर्रहेमान खान, सत्यपाल महाराज, औरंगाबादचे शहराध्यक्ष इंजि. वाजेद कादरी,  नौशाद उस्मान, मौलाना महेफुजूर्रहेमान आदी उपस्थित होते. 

प्रदेशाध्यक्ष रिजवानुर्रहेमान खान म्हणाले, अंधारातून प्रकाशाकडे जी मोहीम सुरू केली आहे याच्या माध्यमातून इस्लाम धर्माने मानव जातीसाठी जी शिकवण दिली त्यानुसार नवीन सकारात्मक उर्जा निर्माण करायची आहे. जीवन अमुल्य आहे. मृत्यूची वेळही अनिश्‍चित आहे. जीवनानंतर एक परलोक जीवन आहे. ज्यात आपल्याला आपल्या स्वामीपुढे जाब द्यायचा असल्याचे ते म्हणाले. शहराध्यक्ष इंजि.वाजेद कादरी म्हणाले स्वतंत्रता, समता, बंधुत्व, सामाजिक न्यायावर आधारित आदर्श समाज निर्माण करण्याचा प्रकाशमय मार्ग इस्लामने दिला आहे. अकोटचे सत्यपाल महाराज यांनी आपल्या खास शैलीत म्हणाले मला इथे येवून इश्‍वर भेटला. माणसाला माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी ज्या नैतिक मुल्यांची गरज होती तो इस्लाम आहे. हा माणसाचा जन्मजात स्वभाव आहे. धर्माला घेवून भांडण्यापेक्षा प्रत्येकाने धर्मानुसार आचरण केले पाहिजे तर आपले जीवन प्रज्वलित होईल असे निवृत्ती महाराज घोडके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. 

कार्यक्रमाची सुरुवात मौलाना महेफुजुर्रहमान यांनी केलेल्या कुरआन पठणाने झाली. नौशाद उस्मानिया यांनी प्रस्ताविक भाषण केले. उस्मानपुरा गुरुद्वाराचे प्रमुख ग्रंथी खडकसिंग महाराज, संत तुकाराम महाराज आश्रमचे निवृत्ती महाराज, आकोटचे सत्यपाल महाराज, भन्ते अभयपुत्र, अमन कांबळे, मराठा सेवा संघाचे डॉ. रमेश पवार, मोहंमद समी यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख उपस्थिती डॉ. शादाब मुसा, डॉ. हसीब अहमद, डॉ. सलमान मुकर्रम, फैजान काजी, फहीमुन्निसा बाजी उपस्थित होते. सुत्रसंचालन डॉ. इमरान अहेमद यांनी केले. कार्यक्रमात महिला व युवकांची उपस्थिती लक्षणीय होती.



जगभरात उत्सवाच्या नावाखाली भरपूर मद्यपान केले जाते. काहींचा तर रोजचीच दिनचर्या आहे. मद्याचा पहिला घोट घेतल्यापासून माणसाच्या शरीरावर अल्कोहोलचा प्रभाव सुरू होतो. दारूचा परिणाम सामाजिक, आर्थिक, राजकारण इत्यादी जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर होतो आहे. त्यामुळे आपण आज अल्कोहोलचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम यावर चर्चा करू.

दाहक नुकसान

(Pancreas) यकृत हा एक अवयव आहे जो अल्कोहोलसह आपल्या शरीरातून हानिकारक पदार्थ तोडण्यास आणि काढून टाकण्यास मदत करतो. दीर्घकालीन अल्कोहोलचा वापर या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करतो. यामुळे यकृत दाह आणि यकृत रोगाचा तीव्र धोका वाढतो. या जळजळांमुळे होणारी डाग सिरोसिस म्हणून ओळखली जाते. डाग ऊतकांची निर्मिती यकृत नष्ट करते. यकृत वाढत्या प्रमाणात खराब झाल्यामुळे आपल्या शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकणे कठीण होते.

साखरेची पातळी

Liver and pancreas आपल्या शरीराच्या इंसुलिनच्या वापराचे आणि ग्लूकोजच्या प्रतिसादाचे नियमन करण्यास मदत करते. जेव्हा आपले स्वादुपिंड आणि यकृत योग्यरित्या कार्य करत नाहीत, तेव्हा आपण कमी रक्तातील साखर अनुभवण्याचा धोका पत्करता जी जीवघेणा असू शकते. खराब झालेले स्वादुपिंड देखील साखर वापरण्यासाठी पुरेसे इन्सुलिन तयार करण्यापासून शरीरास प्रतिबंधित करू शकते. यामुळे हायपरगिसेमिया किंवा रक्तात जास्त साखर होऊ शकते. यामुळे मधुमेहाचा धोका असतो आणि आधीच स्थापित मधुमेह गुंतागुंत होतो.

केंद्रीय मज्जासंस्था

आपल्या शरीरावर अल्कोहोलचा प्रभाव समजून घेण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे तो आपल्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर कसा परिणाम करतो हे समजून घेणे. आपले समन्वय आणि अशा प्रकारे मेंदूवर परिणाम होतो हे प्रथम लक्षणांपैकी एक म्हणजे अस्पष्ट भाषण. अल्कोहोलमुळे आपला मेंदू आणि शरीर यांच्यातील संवाद कमी होऊ शकतो. हे समन्वय अधिक कठीण करते. संतुलित होण्यास आपणास कठीण वेळ येऊ शकेल. त्यामुळे वाहन चालविण्यावर निर्बंध.

अल्कोहोलमुळे आपल्या मध्यवर्ती मज्जासंस्थेचे अधिक नुकसान होते म्हणून आपण आपल्या पाय आणि हातांमध्ये सुन्नपणा आणि मुंग्या येणे संवेदना जाणवू शकता. अल्कोहोलमुळे आपल्या मेंदूला दीर्घकालीन आठवणी तयार करणे देखील अवघड होते. हे स्पष्टपणे विचार करण्याची आणि तर्कसंगत निवडी करण्याची आपली क्षमता देखील कमी करते. कालांतराने, मेंदूचे नुकसान (फ्रंटल लोब) होऊ शकते. मेंदूचे हे क्षेत्र इतर महत्त्वपूर्ण भूमिकांव्यतिरिक्त भावनिक नियंत्रण, अल्प-मुदतीची मेमरी आणि निर्णयासाठी जबाबदार आहे. तीव्र आणि गंभीर मद्यपान केल्यामुळे मेंदूत कायमचे नुकसान होऊ शकते. यामुळे वेर्निक्के-कोर्साकोफ सायकोसिस होऊ शकतो, मेंदूचा विकार.

व्यसन

काही लोक जे जास्त प्रमाणात मद्यपान करतात त्यांना अल्कोहोलवर शारीरिक आणि भावनिक अवलंबन वाढू शकते. मद्यपान करणे कठीण आणि जीवघेणे असू शकते. माघार घेण्याच्या गंभीर प्रकरणांमध्ये जप्ती, मतिभ्रम आणि डिलरियम येऊ शकतात.  

पाचक प्रणाली

अल्कोहोलचे सेवन आणि आपल्या पाचक प्रणालीमधील संबंध त्वरित स्पष्ट दिसत नाही. साइड इफेक्ट्स बहुधा नुकसान झाल्यावरच दिसून येतात. आणि जितके तुम्ही प्याल तितके जास्त नुकसान होईल. अल्कोहोल आपल्या पाचक मुलूखातील ऊतींचे नुकसान करू शकते आणि आपल्या आतड्यांना अन्न पचवण्यापासून आणि पोषक आणि जीवनसत्त्वे शोषून घेण्यापासून रोखू शकतो. म्हणून मद्यपान करणार्‍यांमध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे कमी असतात. अन्नामधून जीवनसत्त्वे आणि खनिजांचे शोषण करण्यात अडचण अशक्तपणास कारणीभूत ठरू शकते- अशी स्थिती जिथे आपल्याकडे हिमोग्लोबिन कमी आहे. जे लोक जास्त प्रमाणात मद्यपान करतात त्यांच्यामध्ये अल्सर किंवा मूळव्याध (हायड्रेशन आणि बद्धकोष्ठतेमुळे) सामान्य असतात.

कर्करोग

जे लोक जास्त प्रमाणात मद्यपान करतात त्यांना कर्करोगाचा धोका देखील असू शकतो. जे लोक वारंवार मद्यपान करतात त्यांना तोंड, घसा, अन्ननलिका, कोलन किंवा यकृतमध्ये कर्करोग होण्याची शक्यता असते. जे लोक नियमितपणे तंबाखू पितात आणि वापरतात त्यांना कर्करोगाचा धोका जास्त असतो.

पाचक आणि अंतःस्रावी ग्रंथी

जास्त मद्यपान केल्याने स्वादुपिंडामुळे तयार होणार्‍या पाचक एंजाइमची असामान्य सक्रियता होऊ शकते. या सजीवांच्या शरीरात निर्माण होणारे द्रव्य तयार होण्यामुळे स्वादुपिंडाचा दाह म्हणून ओळखले जाणारे जळजळ होऊ शकते. स्वादुपिंडाचा दाह एक दीर्घकालीन स्थिती बनू शकतो आणि यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात.

रक्ताभिसरण प्रणाली

अल्कोहोल आपल्या हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम करू शकते. जे लोक दीर्घकाळ मद्यपान करतात त्यांना मद्यपान न करणा र्‍यांपेक्षा हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका जास्त असतो. मद्यपान करणार्‍या स्त्रियांना हृदयरोग होण्याची शक्यता जास्त असते.

रक्ताभिसरण प्रणालीच्या गुंतागुंतांमध्ये हे समाविष्ट आहे: 

उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, हृदय अपयश, हृदय स्नायू कमकुवतपणा (कार्डिओमायोपॅथी) इ. अन्नामधून जीवनसत्त्वे आणि खनिजांचे शोषण करण्यात अडचण अशक्तपणा होऊ शकते. ही अशी स्थिती आहे जिथे आपल्याकडे लाल रक्तपेशी कमी असतात. अशक्तपणाचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे थकवा.

रोगप्रतिकारक प्रणाली

जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने आपल्या शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. यामुळे आपल्या शरीरावर आक्रमण करणार्‍या जंतू आणि विषाणूंविरूद्ध संघर्ष करणे अधिक कठीण होते. जे लोक दीर्घ कालावधीत जास्त मद्यपान करतात त्यांना सामान्य लोकांपेक्षा न्यूमोनिया किंवा टीबी होण्याची शक्यता जास्त असते. जगभरातील टीबी प्रकरणांपैकी सुमारे 10% प्रकरणे अल्कोहोलच्या सेवनाशी संबंधित आहेत. मला असे वाटते की इतर कोणत्याही पदार्थात नुकसान संभाव्यतेचा असा बहुआयामी पोर्टफोलिओ नाही. तरीही अल्कोहोल हे जगातील सर्वात जास्त प्रमाणात मद्यपान केले जाते.

 आपण सध्या मद्यपान करत असल्यास, त्याबद्दल विचार करा आणि त्यापासून मुक्त होण्यासाठी मार्ग शोधा. डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपण अद्याप अल्कोहोलचे सेवन केले नसेल तर अभिनंदन! त्याला कधीही स्पर्शही करू नका.  

As an alcoholic, you will violate your standards quicker than you can lower them - Robbin Willliams, Weapons of Self Destruction.


- डॉ. आसिफ पटेल


प्रत्येक वेळेस, पावला- पावलावर आर्थिकरित्या कमकुवत लोकांना पैशाची आवश्यकता असते. जे जेव्हा कुणाला पैशाची मागणी करतात, तेव्हा एक दोघांचा अपवाद सोडल्यास इतर त्याला सावकाराकडे जाण्याचा सल्ला देतात. याच व्याजाच्या चक्रात फसून तो आपल्या गरजा पूर्ण करतो. याप्रकारे सावकारी पद्धत सभ्य समाजात रुढ झालेली आहे. खरे पाहता सभ्य समाज आणि व्याजाची व्यवस्था एकमेकांच्या विरोधी आहे. एकाचे प्रभुत्व दुसर्‍यासाठी मृत्युचा संदेश आहे. या दोन परस्परविरोधी बाबींमध्ये कधीच सामंजस्य असू शकत नाही. जे व्यक्ती आणि समाजावर व्याज प्रणालीचे प्रभुत्व असते ते नेहमीच वास्तविक सुख आणि समृद्धीपासून वंचित असतात. त्यांच्यावर ईश्‍वर आपली कृपादृष्टी ठेवत नाही. असा समाज तक्रारीच्या आगीत जळत असतो. अशा ठिकाणी माणसं माणसाविषयी सहानुभूती ठेवण्याऐवजी एकमेकांचे रक्त शोषण्यात व्यस्त असतात. यालाच ते आर्थिक सफलता समजतात. लोकांचा असा विश्‍वास आहे की, जर ही व्यवस्था बंद केली तर जगाचे आर्थिक चक्र थांबून जाईल.  

आश्‍चर्यांची बाब ही की, 1 जुलै 1944 ते 22 जुलै 1944 पर्यंत अमेरिकेच्या बर्टन वूड शहरातील माऊंट वॉशिंगटनमध्ये बँकींग व्यवस्थेवर कॉन्फ्रन्स घेण्यात आली. यामध्ये 44 देशांच्या 730 प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला होता. त्यांचा उद्देश जगात वैश्‍विक वित्तीय व्यवस्था कशी लागू करावी यावर विचार करणे हा होता. त्यावेळेव व्याजाधारित आर्थिक व्यवस्थेस मान्यता देण्यात आली. तेव्हापासून ती जगात लागू करण्यात आली. या वैश्‍विक कराराअंतर्गत एक बँक सुरू करण्यात आली, तिचे नाव ’इंटरनॅशनल बँक ऑफ सेलटमेन्ट’ ठेवण्यात आले. प्रत्येक देशासाठी कागदाचे एक चलन अनिवार्य करण्यात आले. कागदावर सुंदर चित्र छापून त्या चलनाचे मुल्य निर्धारित करणे याचा मुख्य उद्देश होता. कागदाचे मुल्य एक रुपयापासून तर पाच हजार रुपयांपर्यंतच्या वास्तविक स्विकार्हता होऊन जाते.

व्याजाच्या वापराने आपल्या शरीरावर प्रतिकुल परिणाम होतो. सावकारांच्या उन्मुलनाला सोप्या पद्धतीने समजने फार कठीन आहे. मनुष्याचे अस्तित्व फक्त भौतिक नसून नैतिक सुद्धा आहे. व्याज मनुष्याला स्वार्थी, कठोर हृदयी आणि निर्दयी बनवितो. त्याला पैसे आणि संसारिक लोभी बनवितो. व्याज मनुष्याला समाजातील पिडित व्यक्तींप्रति नैतिक जबाबदारीतून मुक्त करतो. आपल्या परिघात तो गतीहीन जीवन जगण्यास बाध्य करतो. यामुळे सेवा, सहकार्य, आपलेपणाचा स्वभाव नष्ट होत आहे़  आज या भौतिकता आणि पुंजीवादामुळे अतिथी सत्कारातही चहाचा कप सुद्धा व्याजाच्या दुष्प्रभावामुळे मागे ओढला जात आहे. कुणालाही जराशी सवड किंवा वेळ नाही की, आसपासच्या वातावरणाची समीक्षा करावी. आपला गरीब शेजारी, असहाय्य लोक किती समस्यांचा सामना करीत आहे हे बघायलाही वेळ नाही, ह्या सर्व जणू जुन्या गोष्टी झाल्या आहेत.

त्याच्यावर मायेची चादर टाकणारा कुणी नाही. त्यामुळेच आज गल्लोगल्ली सावकारांचे जाळे पसरले आहे, जे एखाद्या जळू प्रमाणे छोट्या राशीच्या मोबदल्यात व्याजावर व्याज चढवून अवैध वसूली करीत आहेत. हे सर्व होत असतांना समाज मात्र तंद्रीत गेल्याप्रमाणे वागतांना दिसतो, 

कर्जदारांमध्ये असेही लोक असतात जे हातावर आणून पानावर खाणारे आहेत. आपल्या परिवाराचे कसेबसे पालन पोषण करणार्‍या या लोकांवर कर्जाची परतफेड करण्याची मोठी जबाबदारी सुद्धा असते. मात्र यांना या संकटातून मार्ग दाखविणारा व यातून बाहेर काढणारा कुणीच नसतो. चांगल्या लोकांचे उदाहरण तसेच आहे ज्यात स्वयं दु:खात असतांना दुसर्‍याची मदत केली जाते. इतकेच नाही तर मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय, मोठे व्यापारी, उद्योगपती आणि उद्योग यांचाही कर्जाशी जवळचा संबंध असतो. विविध उद्योग आवश्यकतेच्या नावावर कर्जाचे आदान प्रदान हा कर्करोगाप्रमाणे असाध्य रोगाचे रूप धारण करीत आहे. व्याजावर आधारित कर्ज प्राप्तीसाठी संगठित व सशक्तपणा बघायला मिळतो. व्याजासाठी नवनव्या आकर्षक योजना बघायला मिळतात. बोटांवर मोजता येणारे पुंजीपती या कर्ज व व्याजाच्या योजनांवर नियंत्रण ठेऊन आहेत. जेव्हा की हेच मोठे लोक कर्ज किंवा व्याज न देता अत्यंत सहजपणे ‘पळ’काढतात. त्यांना न्यायाच्या कठड्यात उभे करणे कठीन होऊन जाते. जेव्हा की अशाच वेळी गरीबांची बेआब्रु केली जाते.

देशात कर्जदरांना जीवंत राहणे कठीन झाले आहे व या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे. देशात अनेक क्षेत्र असे आहेत जिथे मोठ्या प्रमाणावर आत्महत्या होतात. कर्जावरील व्याज आणि मुद्दल रक्कम परत न करण्याच्या परिस्थितीने पिडित व निराश व्यक्ती आत्महत्येचा पर्याय निवडतो आहे आणि आपल्या कुटुंबाला समस्येच्या मार्गावर नेऊन सोडतात. अशी स्थिती सामान्य नागरिक, शासनकर्ते, राजकीय व्यक्ती, व्यापारी, शिक्षित आणि बुद्धिजीवी यांच्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणारी आहे. अशातही सरकार आणि राजकारणातील जादूगर सहानुभूती आणि मानवतेचे ढोंग करण्यात मागे राहत नाही.

धर्मग्रंथानुसार आपल्याला शक्यतोवर कर्जापासून स्वत:ला वाचवायला हवे, मात्र आजच्या भौतीकतावादी युगात जीवनातील गरजांची पूर्तता करण्यासाठी लोकांना अनेकदा कर्ज घ्यावे लागते. यात बँकेकडून घेण्यात येणार्‍या आणि इतर माध्यमातून घेण्यात येणार्‍या कर्जाचा समावेश आहे. ‘लोन’ किंवा कर्ज घेण्यात काहीच वाईट नाही, मात्र जर कर्ज घेणार्‍याकडून कर्जाचे हप्ते फेडण्यात उशीर होत असेल, किंवा त्याला कर्जाचा परतावा करण्यात अडचण येत असेल, अशा परिस्थितीत कर्ज घेणार्‍याकडून व्याजाच्या रकमेची मागणी करणे हे माणवतेला कलंकित करणारे आहे.

वैदिक काळ प्राचिन भारतीय संस्कृतीचा एक कालखंड आहे. याच काळात वेदांची रचना करण्यात आली. हडप्पा संस्कृतीच्या पतनानंतर भारतात अनेक नवीन संस्कृतींचा जन्म झाला. वेदातही कर्जावर व्याज घेणार्‍यांचा उल्लेख ‘व्याजखाणारा’ असा करण्यात आला आहे. वेदातही व्याजाला वर्जीत ठरविण्यात आले. ‘जास्त धन प्राप्तीच्या लोभात, पैसे उधार देणार्‍याकडून संंबधित धन ईश्‍वरही हिसकावून घेतो’ (ऋग्वेद - 3:53:14).

बायबलच्या नियमांच्या आधारावर ख्रिस्ती धर्मातही व्याज घेण्याची निंदा करण्यात आली आहे. 1179 पासून व्याज घेणार्‍याला बहिष्कृत करण्यास सांगण्यात आले होते. कॅथलिक चर्च नुसार व्याज खाने निषिद्ध समजण्यात आले आहे. बायबल मध्ये व्याजाचा विरोध पुढील प्रमाणे केला आहे़ ‘तू आपल्या भावांना व्याजावर कर्ज देऊ नको, ते भोजन असो, पैसा असो किंवा इतर वस्तू असो.’ (बायबल अनुवाद व्यवस्था विवरण 23:19).

कुरआनमध्ये व्याजाला वर्जित ठरविण्यात आले आहे. ‘आणि जे लोक व्याज खातात, ते त्याच प्रकारे उठतात जसे तो व्यक्ती उठतो ज्याला सैतानाने हात लावून बावळट केले आहे, आणि ते म्हणतात व्यापार हा व्याजाप्रमाणेच आहे.’ जेव्हा की अल्लाहने व्यापाराला वैध आणि व्याजाला अवैध ठरविले आहे. अंतत: ज्याला त्याच्या ईश्‍वराकडून चांगला मार्ग मिळाला आणि तो सुधरला, तर जे काही त्याने आधी घेतले होते ते त्याच्याजवळ राहिले आणि नंतर निर्णय अल्लाह करणार. मात्र जो सुधरला नाही आणि पुन्हा तेच व्याज घेण्याचे कार्य केले तर त्याला नरकातील आग मिळेल, व ते नेहमी त्या आगीत राहतील. (कुरआन 2:275).

इस्लामच्या दृष्टीने व्याजाच्या निंदेसंदर्भात प्रेषित हजरत मुहम्मद (सल्लल्लाहु अलैही वसल्लम) यांचा राग बघितल्यानंतर, इस्लामला मानणार्‍या कुणालाही ही परवानगी नाही की तो एका क्षणासाठीही प्रामाणिकपणा, अंतरात्माची हत्या करणार्‍या आणि बंधुभावाचा वैरी असणाजया व्याजाला सहन करेल.


- डॉ. एम.ए. रशीद 

(नागपूर) 


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget