Halloween Costume ideas 2015
Latest Post


    माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, जेव्हा माझा पालनकर्ता मला आकाशात घेऊन गेला तेव्हा मी तेथे काही लोकांच्या जवळून गेलो ज्यांची नखे पितळेची होती आणि ते
आपल्या चेहऱ्यावर आणि छातीवर ओरखडे काढत होते. मी जिब्रिल (अ.) यांना विचारले, ‘‘हे कोण लोक आहेत?’’ जिब्रिल (अ.) यांनी सांगितले, ‘‘हे लोक जगात दुसऱ्या लोकांचे मांस खात होते आणि त्यांच्या अब्रूशी खेळत होते.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : ‘लोकांचे मांस खात होते’ म्हणजे त्यांच्या चहाड्या करीत होते आणि त्यांची अब्रू नष्ट करण्याच्या मागे लागले होते.
    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एका मुस्लिमचे दुसऱ्या मुस्लिमवर सहा अधिकार आहेत.’’ विचारले गेले, ‘‘ते कोणकोणते आहेत, हे अल्लाहचे पैगंबर!’’ पैगंबर म्हणाले, ‘‘जेव्हा तू मुस्लिम बंधुला भेटशील तेव्हा त्याला सलाम कर आणि जेव्हा तो तुला जेवणाचे आमंत्रण देईल तेव्हा ते स्वीकार कर आणि जेव्हा त्याच्या तुझ्याकडून काही अपेक्षा असतील तेव्हा त्याच्या अपेक्षा पूर्ण कर आणि जेव्हा त्याला शिंक आली आणि त्याने ‘‘अलहम्दुलिल्लाह’’ म्हटले तर तू त्याचे उत्तर दे आणि जेव्हा तो आजारी असेल तेव्हा त्याची विचारपूस कर आणि जेव्हा त्याचा मृत्यू होईल तेव्हा त्याच्या अंत्ययात्रेत सामील हो.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : सलाम करण्याचा अर्थ फक्त ‘‘अस्सलामु अलैकुम’’चे शब्द उच्चारणे पुरेसे नाही तर ही एक या गोष्टीची घोषणा व प्रतिज्ञा आहे की ‘‘माझ्याकडून तुझे प्राण, संपत्ती आणि अब्रू सुरक्षित आहे. मी तुला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही’’ आणि या गोष्टीची दुआ (प्रार्थना) आहे की ‘‘अल्लाह तुझ्या ‘दीन’ व ‘ईमान’ला सुरक्षित ठेवो आणि तुझ्यावर आपली कृपावृष्टी करो.’’
    ‘तशमीत’ या शब्दाचा अर्थ आहे की शिंकणाऱ्यासाठी चांगुलपणाचे शब्द म्हणणे जसे– ‘यरहमुकल्लाह’ म्हणणे. म्हणजे ‘‘अल्लाह तुझ्यावर आपली कृपावृष्टी करो आणि तू अल्लाहची उपासना करीत राहावा आणि तुझ्याकडून अशी कोणतीही चूक घडू नये जेणेकरून दुसऱ्यांना ज्यावर हसण्याची संधी मिळावी.’’
    माननीय उकबा बिन आमिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांना असे म्हणताना ऐकले आहे, ‘‘मुस्लिम मुस्लिमचा बंधु आहे. जो मुस्लिम आपल्या बंधुला एखाद्या वस्तूची विक्री करेल आणि त्यात खोट असेल तर त्याने ती खोट त्याला स्पष्टपणे सांगितली पाहिजे. खोट लपविणे कोणत्याही मुस्लिम व्यापाऱ्याकरिता वैध नाही.’’ (हदीस : इब्ने माजा)
    माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘चांगले चरित्र व स्वभावाच्या मुस्लिमाकडून जर एखादी चूक घडली तर त्याला काही मर्यादेपर्यंत क्षमा करा.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : एक मनुष्य सदाचारी व संयमी आहे, अल्लाहची अवज्ञा करीत नाही, अशा मनुष्याच्या हातून कधी अनावधानाने पापकृत्य घडले तर त्यामुळे त्याला तुच्छ लेखू नका, त्याला अपमानीत करू नका, त्याची ती चूक इतरांना सांगत सुटू नका, त्याऐवजी त्याला क्षमा करा. होय, जर त्याने शरियत (इस्लामी कायदा) मध्ये निश्चित असलेला अपराध केला, जसे- व्यभिचार, चोरी वैगेरे, तर अशा प्रकारचे अपराध क्षमा केले जाणार नाहीत.
मुस्लिमेतर नागरिकांचे अधिकार
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,   
    ‘‘जो मुस्लिम एखाद्या मुस्लिमेतर नागरिकावर अत्याचार करील अथवा त्याचे अधिकार हिरावून घेईल अथवा त्याच्यावर त्याच्या शक्तीपेक्षा अधिक भार (म्हणजे ‘जिझिया’- विशिष्ट प्रकारचा संरक्षक कर आहे) टाकील अथवा त्याची एखादी वस्तू जबरदस्तीने हिसकावून घेईल तर मी अल्लाहच्या न्यायालयात त्या मुस्लिमाविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या खटल्यात त्या मुस्लिमेतर नागरिकाचा वकील बनून उभा राहीन.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : येथे आणखी एक गोष्ट लक्षात असू द्या की यापूर्वी शेजारी, अतिथी, आजारी आणि सहप्रवाशांचे जे अधिकार सांगितले गेले आहेत त्यामध्ये मुस्लिम व मुस्लिमेतर सारखेच आहेत.

-कलिम अजीम, अंबाजोगाई
‘ट्रिपल तलाक' प्रकरणात सुप्रीम कोर्टाने थेटपणे हस्तक्षेपास नकार देत केवळ इन्स्टंट तलाक रद्दबातल ठरवला आहे. त्यामुळे तलाक आणि भरण-पोषणाचा प्रश्न पूर्णपणे सुटला आहे, असं नाही. तरीही सुप्रीम
कुरआनमध्ये एका बैठकीत तलाक अवैध ठरवलं आहे. असं असलं तरी सुन्नी, तबलिगी, सल्फी, हन्फी अशा विचारसरणीच्या वादामुळे तलाक रद्द करण्यासंबधी अनेक मतभेद होते. त्यामुळे सुधारणावादी इस्लामिक संघटना या तलाक पद्धतीविरोधात असतानाही स्वत:चे हात बांधून गप्प होते. जगभरातील इस्लामिक राष्ट्रांनी ही अघोरी प्रथा संपुष्टात आणली आहे. पाकिस्तान, बाग्लादेश, श्रीलंका, सिरिया, मिस्र, ट्यूनिशिया, सुडान अशा देशात ही पद्धत स्थानिक कायदेमंडळाने कालबाह्य ठरवली आहे. असं असताना भारतात धर्मपंडितांनी ही पद्धत का सुरु ठेवावी? भारत परकीय इस्लामचं करतो. असं का करतो हा वादाचा मुद्दा ठरु शकतो. खान-पान व राहणीमानात भारतीय इतर इस्लामिक राष्ट्राचं अनुकरण करतात. मग तलाक रद्द करण्यात हे अनुकरण का नसावं हा मुद्दा इथं उपस्थित होतो.
धार्मिक नेते, प्राच्चपंडीत आणि शिक्षीत वर्गाने पुढाकार घेवून ही प्रथा संपुष्टात आणायला हवी होती. मात्र टीका सहन करत अडेलतट्टेपणा स्वीकारला गेला. व्यक्तिगत कायदा आणि  शरियतमध्ये हस्तक्षेप नको म्हणत अघोरी प्रथा झाकून ठेवण्यात आली. 'झाकल्यानेही कोंबडा आरवतो' कदाचित हे प्राच्चपंडीतांना उमगलं नसावं. वर्षानुवर्षापासून पर्सनल लॉ बोर्ड आणि शरियतमध्ये अडवूâन पडलेली प्रकरणे सुप्रीम कोर्टात गेली. तोंडी तलाकबद्दल ११ ते १८ मे दरम्यान सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या प्रकरणाचा निकाल कोर्टाने राखून ठेवला होता. केंद्र सरकार व पर्सनल लॉ बोर्डाने कोर्टात शपथपत्र सादर केले होते. अखेर २२ ऑगस्टला पकोर्टाने तोंडी तलाक रद्द ठरवला. मात्र पर्सनल लॉ बोर्डात कोर्टानं हस्तक्षेप नाकारला. ३-२ या मताने ट्रीपल तलाक न्यायाधिशांनी अवैध ठरवला. अर्थात ५ न्यायाधिशांच्या खंडपीठात निप्णयावरुन मतभेद झाले. तोंडी तलाक प्रथेमुळे घटनेतील कलम १४, १५, २१ आणि २५ चे उल्लंघन होत नाही, असं चीफ जस्टिस जेएस खेहर आणि जस्टिस अब्दुल ऩजीर यांनी मते मांडली. तर जस्टिस कुरियन जोसे़फ, जस्टिस यूयू ललित, जस्टिस रोहिंग्टन नरीमन यांनी ट्रिपल तलाक' घटनाबाह्य असल्याचे मत मांडलं.
गेल्या अनेक महिन्यांपासून तिहेरी तलाकचा मुद्दा चर्चेत होता. भाजप सरकार तोंडी तलाक रद्दीकरणातून हिंदुत्ववादी अजेंडा राबवू पाहात होतं, त्या सुप्रीम कोर्टानं चपराक लगावली आहे. मे महिन्यात भाजप सरकारकडून अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सुप्रीम कोर्टात बाजू मांडली होती. यावेळी भाजपनं मुस्लीम समाजातील तलाकच्या तिन्ही पद्धती घटनाबाह्य ठरवलं होतं. निकाह ए हलाला, निकाह-ऐहसन आणि निकाह ए हसन या तिनही पद्धती पूर्णपणे रद्द कराव्यात अशा सूचना मांडल्या होत्या. ५ राज्यांच्या निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर भाजपनं ट्रीपल तलाकचं राजकारण केलं होतं. तलाक रद्द करण्यातून हिंदुत्ववादी डाव साधण्याचा भाजपचा प्रयत्न होता. सोप्या भाषेत बोलायचं झालं तर व्यक्तिगत कायद्यात भाजप हस्तक्षेप करु पाहात होतं. उत्तर प्रदेशच्या निवडणूक काळात मीडियाला हाताशी धरुन प्रपोगंडा मोड्यूल म्हणून तलाकचा वापर करण्यात आला. भारतीय मुस्लीम समाजाची तलाक ही एकमेव समस्या आहे, असं प्रचारित करण्यात आलं. भाजप तलाकआड मुस्लीमद्वेषी राजकारण रेटू पाहात असल्याचं स्पष्ट जाणवत होतं.
भाजप सामाजिक प्रश्न धार्मिक दृष्टीकोनातून सोडवू पाहात होतं. मीडिया आणि न्यूज पुरवणाऱ्या एजन्सीज पगारी कामावर असल्यासारख्या देशभरात तलाक प्रकरणे शोधण्यात व्यस्त होती. घरवापसी, कथित लव्ह जिहाद, गौरक्षक, भारत माता, वंदे वादावर मुस्लिमांना झोडणारा भाजप तलाकप्रश्नी भावनिक होण्याचं नाट्य करत होता. समस्त भारतातील महिलांऐवजी तलाक पीडित मुस्लीम महिलांच्या समस्या भाजपला दिसत होत्या. इतर धर्मियातील विधवा, घटस्फोटीता, परितक्त्या, सोडून दिलेल्या माता-भगिनींच्या वेदना भाजप नजरेआड करत होता. एका सर्वेक्षातून देशभरात राज्या-राज्यात प्रत्येक खेड्यात किमान २५ ते ४० सोडून दिलेल्या, विधवा, घटस्फोटीत महिला आहेत. धुणी-भांडी करुन, बिगारी मजुरी करुन या महिला आपली गुजराण करतात. काहींनी नातेवाईकांकडे हलाखीची परिस्थिती स्वीकारली आहे. अशा माता-भगिनीसाठी भाजप सरकार कायदेशीर मार्गाने प्रयत्न करणार आहे का? नुसतं मुस्लिमांसाठी सोयीचे मुद्दे लावून धरुन सामाजिक भेदभावाची मते तयार करुन समाजमन कलुषित करणार आहेत. सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निकालात शरियत आणि पर्सनल लॉ बोर्डात हस्तक्षेपाला नकार देवून भाजपचा अजेंडा मोडीत काढला आहे. त्यामुळे तोंडी तलाक आमच्यामुळे रद्द झाला असा आव आणण्याचं काम भाजप व इतर हिंदुत्ववादी संघटनांनी करु नये..
इन्स्टंट तलाक रद्द झाला असला तरी सर्व समस्या सुटल्या असं नाही. तलाकनंतर निर्माण होणाऱ्या समस्यांवर कोर्टानं काही भाष्य केलेलं नाहीये. मुळात याचिकेची मुख्य मागणी वारसाहक्क आणि भरण-पोषण मिळावं अशी होती. यावर कोर्टानं काहीच म्हटलेलं प्रथमदर्शनी दिसत नाहीये. तलाकपीडितांना पोटगीचा हक्क कोर्टानं द्यायला हवा होता. पोटगीचे अनेक लाखो प्रकरणे कुटुंब न्यायालयात पेंडीग आहेत. यावर कोर्टाव्यतिरिक्त धार्मिक नेते, उलेमा आणि प्राच्चपंडितांनी तात्काळ व सक्तीची उपाययोजना करावी अन्यथा याचे विदारक परिणाम दिसतील. मग पुन्हा विरोधी संघटना बोटं उगारण्यासाठी सज्ज होतीलच. यातून समाज आणि विद्वानाचं हसं पुन्हा एकदा झाल्याशिवाय राहणार नाही.
कोर्टाने एका बैठकीत दिला जाणारा तलाक अवैध ठरवला आहे. तूर्तास कोर्टाच्या या निर्णयाचं स्वागत करुया.

तोंडी तलाक रद्द करुन ऐतिहासिक म्हणावा असा निकाल २२ ऑगस्टला दिला आहे. यासंबंधी ६ महिन्यांत कायदा करावा असा आदेश सरकारला दिला आहे. देशभरातून कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत होत आहे. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड, जमियत ए उलेमा हिंद अशा महत्वाच्या संघटनेनं कोर्टाच्या निर्णयाचं खुशामदिद केलं आहे. हेच प्रकरण या संघटनांनी फार पूर्वी कुरआनच्या चौकटीत हाताळलं असतं तर आज भारतीय राज्यघटना आणि कायदेमंडळाची छाती अभिमानाने फुगली असती.

-शाहजहान मगदुम
भारतीय सर्वोच्च न्यायालयाने त्रिवार तलाकबाबत नुकताच तथाकथित ऐतिहासिक निर्णय दिला आणि तलाकच्या या एकाच वेळी तीनदा ‘तलाक’ शब्द उच्चारून विवाहविच्छेद करण्याच्या प्रथेला येत्या सहा महिन्यांपर्यंत बंदी घातली. त्याचबरोबर याबाबत कायदा करण्यात यावा, असा आदेश केंद्र सरकारला देण्यात आला. समजा सहा महिन्यांच्या आत तसा कायदा अस्तित्वात आला नाही तर ही बंदी त्यापुढेही जारी राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. वास्तविक पाहता त्रिवार तलाक देण्याची पद्धत सध्या भारतात फारशी प्रचलित नसल्याचेच विविध सर्वेक्षणांवरून सिद्ध झाले आहे. ही पद्धत इस्लामी शिकवणींनुसार वैध असली तरी अनिवार्य नाही हे वेळोवेळी सांगितले जात असताना तलाकचा मुद्दा उपस्थित करून राजकीय खेळी खेळण्याची जुनी पद्धत भारतीय राजकारण्यांमध्ये रूढ झाल्यामुळे विशिष्ट समाजाला वेठीस धरण्याच्या उद्देशाने आणि अशा प्रकारचे मुद्दे उपस्थित करून आपली राजकीय पोळी भाजण्याचे कारस्थान होत असल्याचे आढळून येते. मुस्लिमांना त्यांच्या धार्मिक रूढीपरंपरांनुसार जीवन व्यतीत करण्याचा संवैधानिक अधिकार असताना हेतूपुरस्सर त्यांच्या अधिकारांवर आक्षेप घेऊन त्यांना त्रास देण्याचे काम आजतागायत येथील राजकारण्यांनी केले आहे. महिलांच्या वास्तविक अधिकारांचे रक्षण करण्याऐवजी त्यांनी फक्त आणि फक्त राजकीय खेळी खेळण्यासाठी मुस्लिम समुदायाच्या संवैधानिक अधिकारांचे मैदान बनविले आहे. शाहबानो प्रकरणाला काँग्रेसने उचलून धरले होते तर आता तीन तलाकचा मुद्दा भाजपने आपला राजकीय अजेंडा बनविला आहे. संवैधानिक खंडपीठातील तीन न्यायाधीश कुरियन जोसेफ, यू.यू. ललित आणि आर.एफ. नरिमन यांनी बहुमताच्या निर्णयाद्वारे ‘त्रिवार तलाक’च्या पद्धतीला असंवैधानिक ठरविले. मुख्य न्यायाधीश जे. एस. खेहर आणि अब्दुल नजीर यांनी अल्पमताच्या या निर्णयानंतर संसदेला याबाबतीत कायदा करण्याचे आदेश दिले. न्या. खेहर यांच्या मते ‘त्रिवार तलाक’मुळे संविधानाचे कमल १४, १५, २१ आणि २५ चे उल्लंघन होत नाही. मग त्यावर सहा महिन्यांची बंदी घालण्यासाठी कलम १४२ नुसार आदेश देण्याचे औचित्य लक्षात येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मुस्लिम समाजापेक्षा अधिक हिंदू समाजातील विशिष्ट वर्गाला अतिशय आनंद झाला आहे. जसे- महिलांचे प्रश्न, समस्या मांडणारे मानवाधिकार संघटना, अथवा अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करून ज्यांचे उखळ पांढरे झाले आहे असे लोक. खरे तर अत्यानंद होण्यासारखी ही घटना घडलेलीच नाही. त्यांना झालेल्या आनंदामागे वेगळेच कारण आहे. सांप्रदायिक विचारधारेची मुळे खोलवर रुजलेली असतात आणि निरनिराळ्या प्रकारे प्रकट होत असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आहे. मात्र भाजपा झालेल्या अत्यानंदाचे कारण चुकीच्या विचारसरणीवर आधारित आहे. त्यांना मुस्लिम समाजात निर्माण होणाऱ्या दूहीमुळे त्यांना हर्षवायूने ग्रासले आहे. ती दूही त्यांच्या पराभवाच्या स्वरूपात पाहून ते आपली सांप्रदायिक भावनेचे तुष्टीकरण करीत आहेत. मुस्लिमांतील अनिष्ठ प्रथा आणि परंपरांमुळे तसेच इस्लामच्या खऱ्या शिकवणींच्या अभावामुळेच त्यांना ही संधी प्राप्त झाली आहे. यासाठी येथील मुस्लिमांचे धर्मगुरू आणि स्वत: अनुयायी समाजदेखील जबाबदार आहे. येथील मुस्लिमांनी आपल्या धर्माच्या खऱ्या शिकवणींची अंमलबजावणी करण्याऐवजी अनिष्ठ प्रथांना आत्मसात करून आपल्याच धर्मावर अंगूलीनिर्देश करण्यासाठी इतर धर्मीयांना उद्युक्त केले आहे. याचाच गैरफायदा येथील सांप्रदायिक पक्ष-संघटना घेताना दिसत आहेत. जेव्हा समाज सत्य धार्मिक शिकवणींकडे दुर्लक्ष करतो तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते. जेव्हा एखाद्याला काटा बोचतोदेखील तेव्हा त्याच्या शत्रूला आनंद होत असतो, असे म्हटले जाते. खरा दोष इंग्रजांनी पेरलेल्या त्या वैमनस्याचा आहे ज्याचा उपयोग सध्या मतांच्या ध्रूवीकरणासाठी केला जात आहे. एकाच देशात राहून शत्रुत्व अबाधित राहिले तर विकासाची सर्व ऊर्जा नष्ट होईल आणि तेव्हा विकासाची जागा विनाशाने घेतलेली असेल. मुस्लिम समाजाशी घृणा बाळगणाऱ्या अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी त्रिवार तलाकबाबत सर्वोच्च न्यायालयाचा आलेल्या निकालाचे स्वागत केले आहे. मुस्लिम महिलांबाबत सहानुभूतीचे नाटक चालविले आहे. अशांना गुजरात दंगलीतील पीडित महिलांबाबत सहानुभूती वाटत नाही. जकिया जाफरी, जहिरा शेख, कौसर बी, इशरत जहाँ या सर्व पीडित महिला मुस्लिम समाजातूनच येतात. या महिलांचा न्याय कोण करणार? त्यांना कोण न्याय देणार? त्रिवार तलाकला अवैध अथवा रद्द केल्याने मुस्लिम महिलांना मौलिक अधिकार कसे प्राप्त होतील? त्यांचे शिक्षण, त्यांचे आरोग्य इत्यादी समस्यांकडे सरकार केव्हा लक्ष देईल? तलाक घेण्याचा अधिकार धार्मिक कायद्यानुसार त्या त्या पतिपत्नींना देण्यात आलेला आहे, त्यात हस्तक्षेप म्हणजे निश्चितच संवैधानिक अधिकाराचे हनन नव्हे काय?

-मुहम्मद सलमान अहमद
(अध्यक्ष, एस.आय.ओ. दक्षिण महाराष्ट्र)

१) प्रेम व बंधुभाव
मानवतेच्या आदराच्या मार्गातील महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे मानवतेविषयी प्रेम असणे ही होय. तो समाज की ज्यामध्ये मानवतेशी प्रेमाच्या भावनेला स्थान नसते. तो कायद्याच्या भीतीने काही प्रमाणात तर
सहिष्णूतेच्या मार्गाचा अंगिकार करू शकतो. परंतु खऱ्या अर्थाने तो मानवतेच्या आदराचा अधिकार पार पाडू शकत नाही. कारण मानवतेचा आदर ही एक अशी भावना आहे की जिला कायद्याच्या बळावर किंवा जोरजबरदस्ती करून कुठल्याही समाजावर लादता येत नाही. तर ती मनामध्ये व माणसाच्या मानसिकतेतून घडणारी एक प्रक्रिया आहे. ज्याची प्रचिती व्यक्ती व समाजाच्या आचरणातून दिसून येते. आम्ही पाहतो की ज्या समाजात प्रेम व सहानुभूतीचा अभाव असतो तेथे कायद्याची सक्ती देखील निरर्थक ठरते. ईश्वराच्या या धरतीवर अलिकडील काळात घटित होणाऱ्या हिंसाचाराच्या घटना व मानवाधिकारांची होणारी पायमल्ली, अपराध, दहशत, दंगे, सामूहिक हल्ले या सर्व घटनांवरून हे स्पष्ट होते की आज मानवतेला प्रेम, सहानुभूती व बंधुभावाची नित्तांत गरज आहे. या प्रेम, सहानुभूती व बंधुभावाचे वर्तुळ जितके विस्तीर्ण होईल तेवढ्याच प्रमाणात समाजामध्ये मानवतेविषयी आदरभावाचा विस्तार होऊ शकेल.
इस्लामी शिकवणच तो एक सफल उपाय आहे जी तुकड्यांच्या स्वरूपात विखुरलेल्या संपूर्ण मानवजातीला पुन्हा एकदा एकात्मता व बंधुभावाच्या माळेत गुंफून टाकू शकते.
‘‘लोकहो, आम्ही तुम्हाला एका पुरूष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकत: अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.’’ (कुरआन ४९:१३)
‘‘संपूर्ण मानवजाती अल्लाहचे कुटूंब आहे’’ (बहेकी)
संपूर्ण मानवजाती एकाच ईश्वराची निर्मिती व एकाच मात्यापित्याची संतती असणे हा विचार जागतिक बंधुत्वाचा असा आदर्श प्रस्तुत करतो ज्याला देश, वर्ण, पंथ, भाषा व संस्कृती सारखे खोटे दावे व संकुचित वृत्ती अजिबात तोडू शकत नाही. हा विचार जेथे मुस्लिम, हिंदू व अन्य समुदायांना एक दुसऱ्याचे रक्तपात करण्यापासून दूर ठेवण्याची क्षमता बाळगतो. तेथेच एकदुसऱ्यांच्या अधिकारांच्या रक्षणासाठी स्वत:च्या प्राणांची आहुती देण्यासाठी तयार करतो.
२) मूलभूत मानवाधिकार
मानवतेचा आदर या अधिकाराला मानवाच्या इतर मूलभूत गरजा उदा. धार्मिक स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, आचार विचाराचे स्वातंत्र्याच्या यादीमध्ये ठेवले जाऊ शकत नाही अपितु मानवतेचा आदर हा तो मूलभूत आधार आहे की ज्याच्यावर या अधिकारांची इमारत उभी राहते आणि हा आदर जन्मत: प्रत्येक मनुष्याला सारख्या प्रमाणात त्याच्या पालनकत्र्याकडून निश्चित करण्यात आला आहे. मानवाच्या मुलभूत अधिकारांची यादी ही फार लांबलचक आहे. परंतु याच्यापैकी काही महत्वपुर्ण अधिकार जे इतर अधिकारांच्या बाबतीत सहाय्यक ठरतात ज्यांचा उल्लेख भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत केला गेला आहे.
१) न्याय (सामाजिक, आर्थिक व राजनैतिक)
२) स्वातंत्र्य (विचार, अभिव्यक्ती, धार्मिक व उपासनाविषयक)
३) समानता (अवस्था व संधी)
या अधिकारांच्या उल्लेखासोबतच घटनेच्या प्रस्तावनेतील हे मूलभूत अधिकार सर्व नागरिकांना मानवीय आदर व राष्ट्रीय बंधुभाव व एकात्मतेच्या वाढीवर भर देण्यासाठीदेखील ताकीद करण्यात आलेली आहे. कमी अधिक प्रमाणात का होईना संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीनेही या मूलभूत अधिकारांची पूर्तता करण्यावर चर्चा घडवून आणण्यात आली आहे व या अधिकारांच्या रक्षणावर भर देण्यात आला आहे.
१) जगात सद्यस्थितीत शरणार्थींची संख्या ६५० लाखाहून अधिक आहे, जवळपास दर मिनिटाला २४ व्यक्ती आपलं घरदार सोडत आहेत. (एम्नेस्टी आंतरराष्ट्रीय अहवाल)
२) एका अंदाजानुसार केवळ युध्दात मारल्या गेलेल्यांची संख्या ही १२२ दशलक्ष व काहींच्या मते १६० दशलक्ष एवढी आहे. (मॅथ्यू व्हाइट)
३) केवळ भारतात दर १५ सेकंदाला एका पाच वर्षाखालील मुलाचा मृत्यू होतो. दरवर्षी जवळपास २ दशलक्ष योग्य औषधोपचार व वैद्यकीय सुविधेअभावी कुपोषणाचे बळी ठरत आहेत. (द गार्डीयन)
४) जगभरात दरवर्षी जवळपास ८ लाख लोक आत्महत्या करत आहेत. ज्यापैकी १७ टक्के म्हणजेच १ लाख ३५ हजार भारतीय आहेत. दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो. (एन.सी.आर.बी. -२०१५)
५) या वेळी जगातील जवळपास २१ दशलक्ष लोकसंख्या ही मानवी तस्करीची बळी ठरत आहे. दरवर्षी ६ ते ८ लाख लोक याचे बळी पडत आहेत. (युनिसेफ)
६) जगातील ५० टक्के धनसंपत्ती ही एवूâण लोकसंख्येच्या १ टक्का लोकांकडे आहे व उर्वरित ५० टक्क्यांवर ९९टक्के जनसंख्या जीवन जगत आहे. जगातील ६२ व्यक्तींजवळ जगातील ५० टक्के लोकांच्या एवूâण संपत्तीपेक्षा जास्त संपत्ती आहे. स्वत: भारतातही केवळ एक टक्का श्रीमंत मंडळी ही देशातील ५८ज्ञ्  संपत्तीचे मालक आहेत. (ऑक्सफॅम अहवाल)
७) जवळपास १० दशलक्ष जनता दरवर्षी म्हणजे प्रत्येक १० सेकंदाला उपासमारी व तीच्याशी निगडीत कारणाने मृत्यूमुखी पडत आहे. (यूएन फूट प्रोग्रॅम रिपोर्ट)
८) उपासमारी व तिच्याशी संबंधित अन्य गरजांपोटी ८२० दशलक्ष लोकसंख्या प्रभावित आहे. याच्यापैकी ३० टक्क्यांहून अधिक संख्या ही भारतीयांची आहे. भारतात या समस्येने पीडित जवळपास ३००० ते ७००० लोक आपले प्राण गमावत आहेत. दरवर्षी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या ही जवळपास २५ लाख ऐवढी आहे. (यूएन अहवाल)
समस्यांच्या व अडीअडचणीच्या या घोर काळोखमय वातावरणात इस्लामी जीवनव्यवस्थाच एकमेव आशेचीे किरण आहे. ज्याच्या साहाय्याने जगातील मानवतेला जुलूम व अत्याचाराच्या या भयानक काळोखमय वातापरणातून मुक्ती मिळू शकते.
मानवाधिकारांच्या रक्षणाच्या संदर्भात इस्लामी शिकवणीचे आदर्श चित्र पवित्र कुरआन व प्रेषित (स.) यांच्या जीवन चारित्र्याच्या माध्यमाने व त्याचे प्रतिनिधी (खुल्फा-ए-राशिदा) यांच्या आचरणातून दिसून येते.
‘‘याच कारणास्तव बनी इस्राईलकरिता आम्ही हे फरमान लिहिले होते की, ‘ज्याने एखाद्या मानसाला खुनाबद्दला अथवा पृथ्वीतलावर उपद्रव पसरविण्याव्यतिरिक्त अन्य कारणाने ठार केले तर त्याने जणू काही सर्व मानवांना ठार केले. आणि ज्याने कोणाला जीवनदान दिले त्याने जणू काही सर्व मानवजातीला जीवन प्रदान केले.’ परंतु त्याची अवस्था अशी आहे की आमचे प्रेषित वरचेवर त्यांच्यापाशी उघड उघड आदेश घेऊन आले. तरीसुध्दा त्यांच्यात मोठ्या संख्येने पृथ्वीवर अतिरेक करणारे लोक आहेत.’’ (कुरआन ५:३२)
‘‘ती व्यक्ती श्रध्दावंत होऊ शकत नाही जी स्वत: पोटभर जेवते परंतु तिचा शेजारी उपाशी झोपतो.’’ (बहेकी)
मानवाधिकाराच्या या भागात इस्लामची ही शिकवण आपल्या मुलभूत अधिकारांपासून वंचित व अत्याचार पीडित जनता जी बहुसंख्येवर आधारीत आहे, तिच्या समस्यांचे निराकरण करीत समानता व न्यायावर आधारित समाजाची स्थापना करू शकते एका निरापराध व्यक्तीची हत्या व रक्षणाला संपूर्ण मनुष्यजातीची हत्या व रक्षणाशी जोडून, मानवी प्राणाला तो मान सन्मान व आदर इस्लामी शिकवणीनुसार प्रदान केला जातो की ज्याचा अंदाजही कोणी लावला नसेल. धनदौलतीवर मानवाला प्रभूत्व न देता त्याला ईश्वराची ठेव समजणे व नंतर तिला संपूर्ण मानवजातीवर खर्च करण्याची शिकवण देणे हा इस्लामी शिकवणीच्या आर्थिक व्यवस्थेचा तो उज्ज्वल पैलू आहे की जो आर्थिक विषमतेसारख्या शेकडो समस्यांचे निराकरण करण्याचे सामथ्र्य ठेवतो. जेथे आपल्या संस्कारमूल्यांशी निगडीत शिकवणीच्या आधारावर इस्लाम जुलूम व अत्याचाराचे मार्ग बंद करतो तेथेच समानता व न्याय तसेच शिक्षेच्या तरतुदीनुसार अपराधाच्या परिणामाला एक धडा म्हणून समाजापुढे प्रस्तुत करतो व समाजाला नवजीवन प्रदान करतो.
३) न्याय व समता
प्रेम आणि बंधुत्वासोबतच मुलभूत मावाधिकराच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण गोष्ट जी मानवी आदराच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे, ती म्हणजे समाजात समता व न्यायाची स्थापना करणे होय. समता व न्यायाशिवाय शांती व मानवतेची कामना करणे असे आहे जसे पिकांची खतपाण्याची काळजी न घेता चांगल्या दर्जेदार पिकाची अपेक्षा बाळगणे. जर समानता व न्यायाच्या संदर्भात देशाच्या वर्तमान परिस्थितीचा आढावा घेतला तर फार भयानक चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. खालील मुद्यांच्या आधारे या बाबतीत थोडे अवलोकन केले जाऊ शकते.
१) २०१६ च्या सुरूवातीच्या पाच महिन्यात भारतात सांप्रदायिक दंगलींच्या २७८ घटना घडल्या. (गृहमंत्रालय भारत सरकार)
२) २०१५ मध्ये ३४,६०० पेक्षा जास्त बळजबरी अत्याचाराच्या घटना घडल्या. (एनसीआरबी-२०१५ अहवाल)
३) भारतात जवळपास २.८१ कोटी प्रकरणे न्यायालयात प्रलंबीत आहेत. (एनसीआरबी अहवाल)
४) २०१४ च्या अहवालानुसार देशात तुरुंगातील कैद्यांची संख्या ही ४,१८,५३६ एवढी आहे. ज्यांच्यापैकी ६८ जणांवरील आरोप अजून ही सिध्द झालेले नाहीत. (एनसीआरबी अहवाल)
५) मागील काही महिन्यांत झुंडीच्या माध्यमातून दहशतीच्या (मॉब लिंचिंग) घटना व त्यांच्यातून हत्या करण्याच्या घटना २० पेक्षा जास्त घडल्या आहेत. (इंडियन एक्सप्रेस)
समानता व न्यायाची स्थापना करणे ही मुस्लिम समुदायाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे. या अनुषंगाने इस्लामची महत्त्वपूर्ण शिकवण पुढीलप्रमाणे आहे.                  (पान  ६  वर)
‘‘हे श्रध्दावंतांनो! न्यायाचे ध्वजवाहक बना आणि अल्लाहसाठी साक्षीदार बना, यद्यपि तुमच्या न्यायाचा व तुमच्या साक्षीचा आघात तुम्हा स्वत:वर अथवा तुमच्या आईबापावर व तुमच्या नातेवाईकांवर जरी होत असेल तरीदेखील! मामल्यातील पक्षकार मग तो श्रीमंत असो अथवा गरीब, अल्लाह तुमच्यापेक्षा जास्त त्यांचा हितिंचतक आहे. म्हणून आपल्या मनोवासनेच्या अनुकरणात न्यायापासून दूर राहू नका आणि जर तुम्ही पक्षपाताची गोष्ट बोललाच अथवा त्याला बगल दिली तर समजून असा की जे काही तुम्ही करता अल्लाहला त्याची माहिती आहे.’’ (कुरआन ४:१३५)
‘‘जर प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या मुलीने जरी चोरी केली असती, तर तिचेही हात छाटण्यात आले असते.’’ (बुखारी)
समानता व न्यायाच्या मैदानात इस्लामची ही शिकवण समस्यांचे समुळ उच्चाटन करण्याचे सामर्थ्य ठेवते. ही शिकवण केवळ प्रशासनालाच जबाबदार धरीत नाही तर समाजाच्या सर्वच वर्गाला व संस्थांना या दिशेने आपली भुमिका पार पाडण्यासाठी पायबंद घालते. मैत्री असो वा शत्रुत्व समानता व न्यायापासून तोंड वळवणे म्हणजे ईशभयाशी द्रोह व ईश्वराच्या प्रकोपाला निमंत्रण देणारे कार्य असल्याचे घोषित करीत तत्कालिन प्रशासकाला तत्कालिन हुकूमशाहच्या तुलनेत वास्तविक हुवूâमशाहसमोर उत्तरदायी बनवते. कायद्याच्या दृष्टिकोनातून गरीब व श्रीमंत सर्वांना समान लेखून ईश्वराशिवाय सर्वांच्या गुलामगिरीतून मुक्त करून अन्ययाची दारे ही शिकवण बंद करते. इस्लामी शिकवण या सर्वांना सोडून ईशवाणीला आपले हत्यार व पायाभूत भिंतीच्या स्वरूपात उभी करते की जिच्यावर मानव आदराची प्रचंड व विशालकाय इमारत कुठल्याही विषमतेशिवाय प्रस्थापित केली जाऊ शकते.
मानवतेचा एक महत्त्वपूर्ण पैलू :
मानवी आदराच्या संदर्भात इस्लामी शिकवणीचा एक महत्त्वपूर्ण पैलू हादेखील आहे की तो आदराला कुठल्याही एका व्यक्ती, एक समाज व वर्गाची समस्या मानीत नाही तर तो यांचा संबंध अत्याचारी व अत्याचारपीडित, हत्या करणारा व ज्याची हत्या झाली आहे तो, राजा व प्रजा या प्रत्येकाशी त्याचा संबंध जोडून प्रस्तूत करतो. कुठल्याही व्यक्तीकडून एखाद्या निरापराध व्यक्तीच्या करण्यात आलेल्या हत्येला केवळ त्या मयताचा अनादरच मानीत नाही तर खुन्याला स्वत: त्याच्या माणुसकीच्या विरूध्द घोषित करतो. आदराच्या या उत्कृष्ट व महत्त्वपूर्ण पैलुच्या माध्यमाने इस्लाम दुर्बल व अत्याचारपीडितांच्या मानसन्मान व आदराला बळ प्रदान करतो व बलशाली लोकांना जुलूम व अत्याचारापासून दूर ठेण्याचा प्रयत्न करतो. आदराचा हा पैलू आणि पारलौकिक जीवनात उत्तरदायित्वाची भावना जुलूम व अत्याचाराच्या विरोधावर इस्लाम एक मजबूत मानसिक व संस्कारित शस्त्र आहे.
‘‘(या सर्वांचा फैसला त्या दिवशी होईल) जेव्हा प्रत्येक जन आपल्याच बचावाच्या काळजीत पडलेला असेल आणि प्रत्येकास त्याने केलेल्या कृत्यांचा मोबदला पुरेपूर दिला जाईल आणि कुणावरही तिळमात्रदेखील अन्याय होणार नाही.’’ (कुरआन १६:१११)
प्रेषित मुहम्मद (स.) सांगतात की ‘‘आपल्या भावाची मदत करा, मग तो अत्याचारी असो वा अत्याचारपीडित.’’ अनुयायींनी विचारले, ‘‘हे प्रेषित (स.) अत्याचारपीडिताची तर मदत केली जाऊ शकते, परंतु अत्याचार करणाऱ्याची मदत कशी करावी?’’ प्रेषित (स.) यांनी सांगितले, ‘‘अत्याचाऱ्याला त्याच्या अत्याचारापासून थांबवणे ही त्याची मदत करणे आहे.’’ (बुखारी)
मानव आदर व मुस्लिम समुदाय :
मानवी आदराचा इस्लामी दृष्टिकोन, त्याच्याशी संबंधित शिकवण व वर्तमान परिस्थितीला चांगल्या प्रकारे समजून घेतल्यानंतर एक महत्त्वपूर्ण प्रश्न मुस्लिम समुदायातील लोकांच्या अपेक्षित भूमिकेबद्दल निर्माण होतो. जागतिक मानवता, तिच्या आदराच्या अनुषंगाने मुस्लिम समुदायाच्या अपेक्षित भूमिकेचे निर्धारण इस्लामी शिकवणीच्या आधारावर सहजपणे केले जाऊ शकते.
‘‘हे श्रध्दावंतांनो! अल्लाहसाठी सत्यावर अढळ राहणारे व न्यायाची ग्वाही देणारे बना. एखाद्या गटाच्या शत्रुत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की तुम्ही न्यायापासून विमुख व्हाल. न्याय करा, हे ईशपरायणतेशी अधिक निकटवर्ती आहे. अल्लाहचे भय बाळगुन कार्य करीत राहा. जे काही तुम्ही करता, अल्लाह त्याची पुरेपूर खबर ठेवणारा आहे.’’  (कुरआन ५:८)
‘‘मानवांमध्ये सर्वश्रेष्ठ तो आहे जो मानवजातीला फायदा पोहचवत असेल.’’  (कंजुल आमाल)
मुस्लिम समुदायाच्या अपेक्षित भूमिकेच्या संदर्भात इस्लामी शिकवणीचा विचार केला तर मानवी आदराच्या संदर्भात ज्या कार्याची जबाबदारी या समुदायावर येते ती ही की या समुदायाने आफरातफरी व नैराश्यापासून अलिप्त राहून पूर्ण आत्मविश्वासाने आपल्या आदर व मानसन्मानासोबतच संपूर्ण मानवतेच्या उध्दारासाठी व कल्याणासाठी प्रयत्नशील असावे, इस्लामच्या या शिकवणीला एक आदर्श व परिपूर्ण उपाययोजनेच्या स्वरूपात प्रवचन व आचरणाच्या माध्यमातून जगासमोर प्रस्तुत करावे. आपल्या व्यक्तीगत व सामुहिक वागणुकीच्या माध्यमातून आपली योग्य साधने व विचारांनी स्वत:ला मानवतेचा हितिंचतक या नात्याने प्रस्तुत करावे. स्वत: न्यायावर कायम राहावे व संपूर्ण जगातील मानवतेला समानता व न्यायासाठी प्रोत्साहित करावे आणि या सर्व गोष्टींपेक्षाही जास्त स्वत:ला व ईश्वराच्या सर्व दासांना अल्लाहशिवाय इतर सर्व प्रकारच्या शक्तींच्या गुलामगिरीतून मुक्त करण्याचा ध्यास घ्यावा व हे दाखवून द्यावे की अल्लाहशिवाय अन्य कोणापुढेही नतमस्तक होण्यापेक्षा जास्त अपमानित करणारे किळसवाणे कार्य दुसरे कोणते न पूर्वी होते न आज आहे. ही गोष्ट लोकांना पटवून देणे ही काळाची गरज आहे व ही मुस्लिम समुदायाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे.
मानव आदराचा प्रवास :
पवित्र कुरआनमध्ये दोन प्रकारच्या दृष्टिकोनातून मानव आदर व त्याच्या मानसन्मानाचा उल्लेख करण्यात आला आहे. एक म्हणजे जन्मत: मनुष्याला प्राप्त आदर व मानसन्मान हा आहे. जो संपूर्ण मानवजातीला कसल्याही प्रकारचा भेदभाव न करता त्याला प्राप्त होतो. या आदराचा संबंध या ऐहिक जगापुरता व येथील जीवनातील घडामोडींशी संबंधित आहे. परंतु पवित्र कुरआन मध्ये आणखीण एका आदराचा उल्लेख करण्यात आलेला आहे जो आदर त्याला मरणोपरांत जीवनात ईश्वराच्या दरबारात मिळणार आहे. या आदराचा संबंध ईशभीरूतेशी आहे, हे निश्चित करण्याचा अधिकार केवळ आणि केवळ ईश्वरालाच आहे. या ऐहिक जीवनाशी निगडीत पहिल्या आदराचा संबंध हा मानवतेचा मुलाधार आहे तर दुसरा आदर हा पारलौकिक जीवनातील सफलतेशी संबंधित आहे. पहिल्या टप्प्यापासून दुसऱ्या टप्प्यापर्यंत प्रवास करणारा प्रवाशीच सफल व इतर सर्व असफल आहेत. ईश्वराकडे प्रार्थना आहे की त्याने प्रत्येक प्रवाशाला त्याच्या योग्य स्थळापर्यंत पोहचवावे. आमीन. (उत्तरार्ध)
(अनुवाद : सलीम खान, औरंगाबाद)

जालियनवाला बाग हत्याकांड ज्या दिवशी घडले तेव्हा तीन दिवस देशभरात चूल पेटलेली नव्हती. कारण त्याकाळी लोकांमध्ये मानवी जीवाचा आदर मुबलक प्रमाणात होता. मात्र १० ऑगस्ट ला गोरखपूरमध्ये ६३ चिमुकल्यांचा हकनाक जीव गेल्यानंतर ही देशात फारशी खळखळ झाली नाही. उलट मुख्यमंत्री अजयसिंह
उर्फ योगी आदित्यनाथ यांनी राज्यभरातील पोलिसांना पोलीस ठाण्यात कृष्णाजन्माष्टमी उत्साहात साजरी करण्याचे असंवैधानिक आदेश दिले. टी.व्ही. वाहिन्यांवरच्या आचरट मालिका नेहमीप्रमाणे सुरूच राहिल्या. व्हॉट्‌सॲप, फेसबुकमध्ये थोडेसे वादळ उठले मात्र लगेच सर्व काही शांत झाले. खरे पाहता कुणाच्या का चुकीने असेना ते चिमुकले जीव गेले होते. ही घटना म्हणजे राष्ट्रीय शर्मेचा विषय होता. तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळून त्या चिमुकल्या जीवांना श्रद्धांजली द्यावयास हवी होती. पुन्हा अशा घटना देशात कोठेच घडणार नाही, याची ग्वाही प्रधानमंत्र्यांनी लाल किल्यावरून घ्यावयास हवी होती. परंतु असे काही घडलेले नाही. कारण! याचे कारण असे की, आजकाल मानवी जीवाचा म्हणावा तेवढा आदर राहिलेला नाही. गोरखपूरचे बालमृत्यूकांड आपल्या सामाजिक असंवेदनशीलतेचे एकमेव उदाहरण नाही. भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या मते अशा घटना भारतारसारख्या मोठ्या देशात अधून मधून घडतच असतात. रस्ते अपघातातून जेवढी माणसे आपल्या देशात मरतात किंवा जायबंदी होतात तेवढी जगात कुठेच होत नाहीत. तरी पण रस्ते बांधणी मधील भ्रष्टाचार थांबत नाही. याचे ही कारण हेच की मानवी जीवनाचा हवा तेवढा आदर राहिलेला नाही. शहरी भागात सुद्धा आत्महत्यांचे प्रमाण वाढलेले आहे. शहरे बकाल होत आहेत. गरीबांना तेथे सन्मानाने राहता येत नाही. त्यामुळे शहरी आत्महत्यांचा दरही वाढत आहे. महिलांवर अत्याचार वाढलेले आहेत. महाराष्ट्रात हजारो शेतकऱ्यांनी गरीबीला कंटाळून आत्महत्या केलेल्या आहेत.  शेकडो करीत आहेत. फक्त 7 दिवसात मराठवाड्यात ३४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. (लोकसत्ता १७/८/१७) तरी शेतकऱ्यांच्या मृत्यूसंबंधी महाराष्ट्रामधील इतर गबर लोकांना कीव येत नाही. त्यांच्या चंगळवादी जीवनशैलीमध्ये काही फरक पडत नाही. हे का घडते? मानवी जीवाचा आदर कमी झाला किंबहुना  संपला म्हणून असे घडते. देशात सर्व स्तरावर बोकाळलेला भ्रष्टाचार, प्रत्येक  क्षेत्रात गुन्हेगारीचा वाढता आलेख, स्त्रियांवरील अत्याचार यातून हेच सिद्ध होते की, मानवी जीवनाचा आदर राहिलेला नाही. तो पुनःप्रस्थापित व्हावा यासाठी समाजातून फारसे प्रयत्न होताना दिसत नाही. मात्र या महत्वाच्या प्रश्नाकडे एसआयओ (स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन) ने लक्ष दिलेले आहे. त्यांनी यासंदर्भात जनजागृती करण्याची सुरू केलेली मोहिम नुकतीच संपली. यासाठी त्यांचे करावे तेवढे कौतुक कमिच आहे. ज्या वयामध्ये तरूण कॉलेजच्या अभ्यासाकडे कमी व कॅम्पस मधील ईतर गोष्टींमध्येच अधिक ’रस’ घेतांना आढळून येतात, त्याच वयामध्ये एसआयओच्या दक्षिण महाराष्ट्र विभागाने ‘मानवी आदर’ वृद्धींगत व्हावा यासाठी १० ऑगस्ट ते २५ ऑगस्ट दरम्यान एक यशस्वी आंदोलन केले. कॉलेज व कॅम्स मध्ये यासंबंधी जनजागृती केली. केली. विद्यापीठातून मानवी आदरासंबंधीची जाणीव निर्माण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले. कॉर्नर मिटींग्ज घेतल्या, पत्रकार परिषद घेतल्या या विषयावरील साहित्य प्रकाशित केले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. माणसा माणसांमधे प्रेम वाढावे एकमेकांचा आदर वाढावा यासाठी काय करावे लागेल यासंबंधीची चर्चा यानिमित्ताने करणे अनुचित राहणार नाही. म्हणून या आठवड्यात मी वाचकांसमोर या महत्वाच्या विषया संबंधीची चर्चा करणार आहे.

एकमेकांचा आदर कमी होण्याची कारणे

मानवी जीवनाचा आदर कमी होण्यासाठी अनेक कारणे कारणीभूत आहेत़ त्यातील सर्वात मोठे कारण व्याज आहे़ व्याजाधारित अर्थव्यवस्थेमध्ये जीवन जगणाऱ्या लोकांएवढे दुर्देवी जीव दूसरे नसतील़ कारण की व्याजामुळे माणसाची मने कठोर होतात. त्यांच्यातील दयाभाव संपतो. ते वस्तू व संपत्तीशी प्रेम करतात आणि माणसांना वापरून घेतात.वास्तविक पाहता माणसाशी प्रेम करून वस्तू आणि संपत्ती यांचा वापर व्हायला हवा. व्याजामुळे लोभ वाढतो व लोभामुळे सामाजिक व्यवस्थेचा प्रवास उलट्या दिशेने सुरू होतो. व्याजासंबंधी जमाअते इस्लामीचे संस्थापक मौलाना अबुल आला मौदूदी रहे़ म्हणतात, ‘‘जगातील कोणताच देश असा नाही ज्या देशात महाजन (सावकार) आणि महाजनी (सावकारी) संस्था व्याजाच्या मार्गाने गरीब, मजूर, शेतकरी आणि अल्प उत्पन्न असलेल्या लोकांचे रक्त पीत नाहीत़ व्याजामुळे अल्प उत्न्न गटातील लोकांना आपल्या डोक्यावरील कर्ज फेडने अत्यंत कठीण होऊन जाते. बऱ्याचदा अशक्य होऊन जाते़ मग एक कर्ज फेडण्यासाठी दूसरे कर्ज, दूसरे फेडण्यासाठी तीसरे कर्ज घेतली जातात़ मूळ कर्जापेक्षा अधिक रक्कम अदा करून सुद्धा मूळ कर्ज जसचे तसे बाकी राहते़. कष्टाने कमविलेला पैसा सावकार घेऊन टाकतो व या गरीबाला स्वत:च्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणे देखील कठिण होऊन जाते़ व्याजाच्या विळख्यात अडकलेले लोक आतल्या आत जळत जातात़ हात तंग असल्याने पौष्टिक अन्न मिळत नाही़ वेळेवर औषध उपचार करता येत नाही म्हणून त्याचे आरोग्य कधिच चांगले राहत नाही़ अशाप्रकारे काही लोक लाखो गरीबांचे रक्त पीऊन धष्टपुष्ट होतात़ मात्र सगळा समाज खंगून जातो़’ (संदर्भ : तफहिमुल कुरआन खंड १, पान क्र. २१८) अशा समाजामध्ये जे लोक कर्जदार आहेत त्यांच्या विषयीचा आदर आपोआपच कमी होतो़.
    दूसरे कारण आर्थिक प्रगती आहे़ जशी-जशी आर्थिक प्रगती होत जाते तशी-तशी नवश्रीमंतांच्या मनामध्ये स्वत: बद्दलचा आदर वाढतो व गरीबांबद्दलचा आदर कमी होतो.
    तीसरे कारण कारखानदारी आहे़ कारखानदारी सुद्धा जशी-जशी वाढत जाते, तशी-तशी मजुरांची गरज वाढत जाते.  मग कारखानदार आणि सरकार यांच्या अभद्र युतीतून गरीबांच्या विरूद्ध शासकीय ध्येय धोरणे आखली जातात व मोठ्या प्रमाणात मजूर तयार होतील, याची व्यवस्था केली जाते. अशा भांडवलशाही व्यवस्थेमध्ये मजुरांच्या जीवाचा आदर आपोआप कमी होतो.
     चौथे कारण अध्यात्मिकतेचा अभाव. वेगाने आर्थिक विकास साधण्यासाठी सनदशीर मार्गांचा फारसा उपयोग होत नाही. म्हणून वाम मार्गाचा अवलंब करावा लागतो. त्यामुळे असे मार्ग चोखाळणाऱ्या लोकांच्या मनामध्ये ईश्वरावरचा विश्वास कमी होत जातो. त्यांच्यातून रूहानियत (अध्यात्मिकता) कमी होत जाते, परिणामी, तक्वा कमी होतो, ईश्वराची भीति राहत नाही. जे काही होते ते पैशाने होते, असा गैरसमज श्रीमंतामध्ये निर्माण होतो. या सर्व गोष्टींचा परिणाम असा होतो की समाजामध्ये गरीबाच्या जीवाची पर्वा रहात नाही आदर तर लांब राहिला.

यावर उपाय काय?

    जगात प्रचलीत जीवन पद्धतीमध्ये केवळ इस्लामी जीवन पद्धतीच अशी पद्धती आहे की ज्यामध्ये यावर उपाय नुसते सुचवलेलेच नाहीत तर एकमेकांच्या जीवाचा आदर करणाऱ्या एका आदर्श समाजाची रचना अरबस्थानामध्ये प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ललाहु अलैहि व सल्लम यांनी करून दाखविलेली आहे़ या जीवन व्यवस्थेची मुलभूत तत्वे खालीलप्रमाणे -
   १) कुरआनमध्ये स्पष्ट म्हटलेले आहे कि, ’ऐ! लोगों हमने तुम्हें एक मर्द और एक औरत से पैदा किया, और फिर तुम्हारी कौमें और बिरादरीयाँ बना दी, ताकी तुम एक दूसरे को पहेचान सको’ (सुरे हुजरात आयत नं १३)
   समस्त मानव समाजाला या आयातीवर विश्वास ठेवल्या शिवाय गत्यंतर नाही़ आज जरी एका स्त्री आणि एका पुरूषाच्या मिलना शिवाय मनुष्य निर्मिती होणे शक्य नाही परंतु जगाची सुरूवात स्वर्गातून पाठविण्यात आलेल्या पहिल्या जोडप्या आदम अलै. व हव्वा अलै़  पासून झालेली आहे. हे जोडपे पूर्ण विकसीत जोडपे होते व त्यांच्यापासून मानव वंशाचा विस्तार झाला़ या नात्याने आज जगभर पसरलेली ७ अब्जापेक्षा जास्तीची माणसे रक्ताच्या नात्याने आपसात भाऊ-बहीण आहेत. इस्लामने दिलेला हा उदात्त विचार जर का एकदा स्विकारला तर त्याचे दोन परिणाम होतात. एक - माणसाची संकुचित विचारसरणी संपत्ते रंग, वंश, राष्ट्रवाद इत्यादी संकुचित विचारांचा त्याग करून माणूस व्यापक दृष्टीकोणातून हे विश्वची माझे घर या विचारापर्यंत पोहोचतो. माणसाच्या लोभी प्रवृत्तीला लगाम लागण्यास बरीच मदत होते़ तो आपल्याबरोबर दूसऱ्यांच्या जीवाचीही चिंता करतो व यातूनच माणसा-माणसांत आदराची भावना विकसित होते.
   २) ‘’जिसने एक इन्सान का नाहक कत्ल किया उसने सारी इन्सानियत का कत्ल कर दिया़  और जिसने किसी एक बेगुनाह की जान बचा ली तो उसने सारी इन्सानियत की जान बचा ली.’’ (संदर्भ : सुरे मायदा आयत नं.३२). मानवी जीवाचे मुल्य किती मोठे आहे? हे या आयातीमध्ये स्पष्ट केलेले आहे़ या आयातीवर विश्वास ठेवणारा प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाच्या जीवाचा आदर केल्याशिवाय राहूच शकत नाही.
   ३) ’’आणि आपल्या गरजांपेक्षा दुसऱ्यांच्या गरजांना ते अधिक महत्व देतात मग ते स्वतः कितीही गरजवंत का असेनात.’’ (सुरे अल हश्र : आयत नं. १३).
   चारित्र्यवान मुस्लिमांचा व्यवहार दुसऱ्या माणसांशी कसा असावा या संदर्भाचे वर्णन करत असताना कुरआननी सुरे हश्रमध्ये म्हटलेले आहे कि, मुस्लिम स्वतः कितीही गरजवंत असो आपल्या गरजांपेक्षा तो इतर लोकांच्या गरजांना प्राधान्य देतो. हा एक असा मानवी गुण आहे कि,  गरजेच्या वेळेस मदत करणारा आणि ज्याची मदत केली गेली आहे, अशा लोकांमध्ये रक्ताच्या पेक्षाही जास्त दृढ नातेसंबंध निर्माण होतात. ईतरांना निर्वाज्य मदत करण्याचा गुण त्याच वेळेस निर्माण होतो ज्यावेळेस गरजवंत व्यक्तीच्या जीवाची पर्वा मदत करणाऱ्याला आपल्या जीवापेक्षा जास्त असते.

मानवी आदर आणि मुस्लिमांची भूमिका

कार-ए-कम्बख्त खुद करो
लानत करो शैतान पर
    पश्चिमेकडून आलेली भौतिक हितसाधणारी आधुनिक  शिक्षण आणि जीवन पद्धतीचा अंगीकार करून या देशातील बहुसंख्यांकांनी आपल्या जीवनाची वाटचाल कोणत्या दिशेने होणार हे निश्चित केलेले आहे़ व्याजाला आपल्या देशात अर्थव्यवस्थेचा कणा बनविण्यात आलेले आहे. त्यामुळे भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे सर्व अवगून आपल्या समाजात आपोआप झिरपलेले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या असो का गोरखपूरच्या बालमृत्यूची घटना असो. त्यातून बहुसंख्यांक बोध घेऊन पेटून उठतील व मानवी जीवनाचे मुल्य ओळखून त्यांची पर्वा करतील ही शक्यता कमीच आहे. मात्र या देशाचे जबाबदार नागरिक व बहुसंख्यांकांचे बंधू म्हणून मुस्लिमांचे मात्र हे दुहेरी कर्तव्य आहे की, ज्या-ज्या गोष्टी या मानवी जीवनाच्या अनादराला कारणीभूत ठरत आहेत़, त्यांचे उच्चाटन करून मानवी जीवनाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा करावी. यासाठी एसआयओ ने पुढाकार घेतलेला आहे़ तसाच पुढाकार सर्व मुस्लिमांनी घ्यावा. कारण या कामाचे महत्व व त्याचा आकार एवढा मोठा आहे कि, हे काम एकट्या एसआयओने होने शक्य नाही़  मात्र त्यांनी या कामी पुढाकार घेऊन हे सिद्ध केलेले आहे की, सामाजिक समस्यांची त्यांना जाण आहे. सामाजिक दुर्गूणांच्या उच्चाटणासाठी ते यथाशक्ती निरंतरम प्रयत्नशील आहेत़ बहुसंख्यांक बांधवांनीही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण हवा, पानी आणि प्रकाशाएवढेच महत्व मानवी जीवनामध्ये इस्लामी तत्त्वांचे आहे. मुस्लिमांविषयी असलेल्या पूर्वग्रहामुळे जर का त्यांनी इस्लामच्या कल्याणकारी तत्वांकडे दुर्लक्ष केले तर त्यामुळे ना मुस्लिमांचे नुकसान होणार ना इस्लामचे, नुकसान त्यांच्या स्वत:चे होईल. सर्व साधारणपणे मुस्लिम समाज सुद्धा बहुसंख्याक समाजाप्रमाणे पश्चिमेकडून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला आदर्श मानतो़ स्वत: वाईट वागतो व ‘‘ये तो शैतान का बहेकावा है’’ म्हणून दोष सैतानावर टाकून मोकळा होतो. मात्र आजही एसआयओमधील तरूणांसारखे मुठभर लोक असेही आहेत की त्यांना आपल्या देशातील खऱ्या सामाजिक समस्यांची जाण आहे.

मुसलमां को मुसलमां कर दिया तुफाने मगरिबने
तलातुम हाय दरिया ही से हे गौहर की सैराबी

    मानवी जीवनाचा आदर किती महत्वाचा आहे? ह्याची जाण असणे किती महत्वाचे आहे़  हे शेतकरी आत्महत्या, मानवी चुकीमुळे झालेले गोरखपूर बालमृत्यूकांड तसेच देशभरात होत असलेल्या मॉबलिंचिंगच्या घटना मधून स्पष्ट झालेले आहे़  एसआयओच्या नुकत्याच संपलेल्या मोहिमेनंतर मानवी जीवनाचा आदर हा विषय मागे पडता कामा नये. या संदर्भात सर्व समाजामध्ये जाणीवेचा स्फुल्लिंग पेटो व त्यातून निर्माण झालेल्या उर्जेतून सामाजिक जाणीवा प्रगल्भ होवो हीच सर्वश्रेष्ठ अल्लाहकडे प्रार्थना करून थांबतो. (आमीन) जय हिंद!

मीना नलवार
दिवसाचा ताण दिल्यानंतर ऐन पोळयाच्या अगोदर महाराष्ट्रभर पडलेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. विशेषकरून मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या पावसाने या विभागातील पिण्याच्या पाण्याची समस्या जरी
हलकी केली तरी कसदार जमिनी वगळता इतर जमिनीमधील पिकांसाठी हा पाऊस काही उपयोगी ठरणार नाही. पिकाचा उतारा निश्चितपणे कमी होईल. महाराष्ट्रात सध्या खरीपाचे पीक म्हणून सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली आहे. महिनाभरात मूग, उडीदाबरोबर सोयाबीनही काढण्यास सुरूवात होईल. मागच्या वर्षी तूर खरेदीमध्ये झालेला गोंधळ पाहून या वर्षी शेतकऱ्यांनी तुरीचा पेरा हात राखूनच केलेला आहे. खरीपाच्या पेरण्या शेतकरी कर्ज घेऊन करीत असतो. खरीप आल्यानंतर कर्ज फेडून उर्वरित रक्कमेमध्ये रब्बीची तयारी करीत असतो. यावेळेस अनियमित पावसामुळे आर्धे अधिक सोयाबीन हातचे गेलेले आहे. पूर्वी शेतकरी आत्महत्या करीत होते. आता शेतकऱ्यांच्या मुलां-मुलींनीही आत्महत्या करण्यास सुरूवात केलेली आहे. मराठवाड्यात झालेल्या एक तरूणी आणि दोन तरूणांच्या आत्महत्यामुळे हा नवीनच प्रश्न उत्पन्न झालेला आहे. शेतकऱ्यांच्या मुलांची लग्नांची समस्या एका नव्या रूपात पुढे आलेली आहे. विदर्भ, मराठवाडाच नव्हे तर अगदी पश्चिम महाराष्ट्र जिथले शेतकरी श्रीमंत म्हंटले जातात त्यांच्याकडेही मुला-मुलींच्या लग्नाची एक नवीनच समस्या भेडसावत आहे. शेतकऱ्याच्या घरी विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घरी कोणीच मुलगी द्यायला तयार नाही. अगदी शेतकरी सुद्धा. त्यात मोफत शिक्षणाच्या सोईमुळे शेतकऱ्यांच्या मुलीही शिकायला लागलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या घरी असलेले अठरा विश्व दारिद्रय त्यांना शेतकऱ्याच्या घरी जाण्यापासून रोखत आहेत. लहानपणापासून वयात आल्यापर्यंत दारिद्रयात आयुष्य गेलं. पुढच आयुष्यही तसेच दारिद्रयात जावं, अशी कोणाचीच इच्छा नाही. मुलींचीही नाही व मुलींच्या शेतकरी आई-बापांचीही नाही. त्यामुळे खेडोपाडी 30-30 वर्षाची लग्न न झालेली मुलं दिसून येत आहेत. नुकत्याच लातूर जिल्ह्यातून अनेक मुली आमिष देवून लांब नेऊन लग्न करून दिल्याच्या घटना उघडकीस आलेल्या असून, त्यामागे वधू-वर सूचक मंडळाची एक राजकीय पार्श्वभूमी असलेली महिला आढळून आलेली आहे. पूर्वी अशा मुली राजस्थान, हरियाणा सारख्या राज्यामध्ये ज्या ठिकाणी कन्याभ्रुण हत्येमुळे स्त्री-पुरूष संतुलन बिघडलेले आहे त्या राज्यात जायच्या. आता हे लोन महाराष्ट्रातही पसरलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी ठोस निर्णय आणि अंमलबजावणीची गरज आहे.

आपल्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेली व अनेक यशस्वी आंदोलनाची जनक एमपीजे अर्थात मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस ने महाराष्ट्रात १५ ऑगस्टपासून बंधुता अभियान सुरू केलेले आहे. ज्याची सांगता गांधी जयंती अर्थात २ ऑक्टोबरला होईल. अशी माहिती प्रदेशाध्यक्ष मुहम्मद सिराज यांनी दिली. या
अभियानादरम्यान देशाच्या घटनात्मक मुल्यांची जाणीव जनतेला करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. या अभियानाचा मुख्य उद्देश सामाजिक सलोखा वाढविणे आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे भारतात संवैधानिक विचारांना चालना देणे आहे. असे विचार जे नागरिकांच्या व्यक्तिगत जीवनाचा सन्मान करतात आणि राष्ट्राची एकता आणि अखंडता सुनिश्चित करतात. अलिकडे देशामध्ये राष्ट्रवादाच्या नावाखाली वेगवेगळया प्रकारचे विचार पेरून देशातील साध्या भोळया जनतेला भ्रमित करण्याचे काम जोमाने सुरू आहे. वास्तविक पाहता देशात एकच राष्ट्रवाद आहे तो म्हणजे घटनात्मक राष्टवाद. घटनेच्या चौकटीच्या बाहेर जाऊन कुठलाच राष्ट्रवाद कल्याणकारी राष्ट्रवादी असू शकत नाही. म्हणून आपल्या घटनेच्या पूर्व पिठीकेमध्ये म्हटलेले आहे कि, आम्ही भारताचे लोक भारताला एक संपूर्ण प्रभूत्व संपन्न, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकतंत्रात्मक गणराज्य बनविण्यासाठी आणि त्याच्या सर्व नागरीकांना न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुभाव मिळवून देण्याचा दृढ संकल्प करीत आहोत. या अभियानाअंतर्गत एमपीजेने म्हटलेले आहे कि, ’ देशाची सद्यःपरिस्थती आणि आपल्या जबाबदाऱ्या’ या शिर्षकाखाली जनसभांचे आयोजन करण्यात येईल. सोबतच एमपीजे कॅडरसाठी घटनात्मक बंधुभाव या विषयावर दोन दिवसाच्या कार्यशाळेचेही आयोजन करण्यात येईल. औरंगाबाद येथे झालेल्या जनसभेमध्ये एमपीजेचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद सिराज यांनी सध्याच्या सामाजिक आणि राजनीतिक परिस्थीतीबद्दल चिंता व्यक्त करतांना म्हटले आहे कि, आता वेळ आलेली आहे देशात फोफावू पाहणाऱ्या फासिस्ट (अतिवादी) शक्तींना रोखण्यासाठी सगळयांनी मिळून काम करावयास हवे. या सभेमध्ये ॲड. सुभाष सल्विन्गकर, ज्येष्ठ साम्यवादी नेते भालचंद्र कांगो, बालासाहेब गरूड आणि मोहम्मद ओवेस यांनीही आपले विचार व्यक्त केले.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget