Halloween Costume ideas 2015
Latest Post


भारत हा कृषिप्रधान देश आहे, या देशातील ७० ते ८० टक्के लोकांचा व्यवसाय शेती आहे, मात्र यंदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आ वासून उभे राहिले आहेत. वर्षभरात राबराब राबून हातात आलेले पीक अवकाळी पावसाने बघता बघता गिळंकृत केले आहे. विदर्भ मराठवाडा येथील शेतकऱ्यांना उभ्या पिकांची नासाडी, फळफळावळ बागांचे नुकसान डोळ्यांदेखत पाहून हताश व निराश व्हावे लागले आहे. काही दिवसांत हातात येऊ घातलेल्या संत्री, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष, आंबा, केळी या फळपिकांचे तर होत्याचे नव्हते झालेच शिवाय सोयाबीन, ज्वारी, बाजरी, गहू, यासारख्या पिकांचे ही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यंदा ऊस उत्पादन ही तुलनेने कमी झाले आहे. विक्रमी उत्पादन झालेल्या कांदा व लसूण या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे.

जगाच्या पाठीवर भारतीय शेती अत्यंत सुपीक आहे. अगदी प्राचीन काळापासून कृषी संस्कृतीच्या पाऊलखुणा या देशात टिकून आहेत.आज एकविसाव्या शतकात सुध्दा कृषी उद्योग जगभरात सर्वश्रेष्ठ मानला जातो, भारतात आज पारंपरिक पद्धतीबरोबरच आधुनिक पद्धतीने शेती व्यवसाय केला जातो, शेतीतून उत्पादन ही मोठ्या प्रमाणात घेतले जाते, भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला असून भारतीय अन्नधान्याच्या निर्यातीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे. मात्र यंदा वर्षी अवकाळी पावसामुळे पिकांची व फळबागांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्ग हताश, हतबल व निराश होऊ लागला आहे. शेतकरी आत्मविश्वास व हिंमत गमावून बसला आहे. डोळ्यांदेखत होत्याचे नव्हते पाहण्याचे दुर्भाग्य शेतकऱ्यांच्या वाट्याला आले आहे. त्यातूनच शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्येला प्रवृत्त होत आहे. एक दोन दिवस झाले की, शेतकरी आत्महत्यांचे वृत्त कानावर पडत आहे, ही दुर्दैवाची गोष्ट आहे, ही परिस्थिती बदलण्यासाठी मायबाप सरकारने आता शेतकऱ्यांच्या बाजूने कंबर कसली पाहिजे. नैसर्गिक आपत्ती ही पूर्वकल्पना नसताना येते आणि अल्प कालावधीत होत्याचे नव्हते करून जाते. डोळ्यांदेखत होणारे नुकसान असह्य झाले झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली. मराठवाडा, विदर्भासह उर्वरित महाराष्ट्राला यांचा जोराचा फटका बसला आहे. दरवर्षी उन्हाळ्यात दुष्काळ आणि पाणीटंचाई याला तोंड द्यावे लागते,मात्र यावर्षी अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांना हैराण केले आहे.

नैसर्गिक आपत्तीशी सामुदायिकपणे, परस्पर सहकार्य व समन्वयाने सामना करावा लागतो. प्रचंड गारपिटीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासाडी, फळबागांचे नुकसान, पशूधनाची दूरावस्था, पाहता ही नैसर्गिक आपत्ती सहनशीलतेच्या पलिकडची आहे. अशावेळी आपत्तीग्रस्त शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, दीन दुबळे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची जबाबदारी मायबाप सरकारची असते. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून ताबडतोब सरकारने शेतकऱ्यांना आधार द्यायलाच हवा. राज्यातील महसूल विभागाने नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित, योग्य व वास्तव पंचनामे करायला हवेत. अर्थात आजवरच्या अनुभवावरून तलाठी, ग्रामसेवक व मंडल अधिकारी , तसेच कृषी खात्याचे अधिकारी पंचनामे करतांना कामचुकारपणा व भेदभाव तसेच आर्थिक गैरव्यवहार करतात. त्यांची मिलीभगत असल्याने वास्तवतेप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळत नाही. व त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते,गरीब व असाह्य शेतकरी याविरोधात दाद मागू शकत नाही.तरी सर्व आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे व्यवस्थित व योग्य ते सर्वेक्षण व्हावे आणि कोणत्याही आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. यात अडथळा किंवा भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.

यंदाच्या वर्षी अवकाळी पावसामुळे महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे. शेतकरी पुर्णपणे खचला आहे, अशा वेळी शासनाची मदत ही शेतकऱ्यांच्या मनाला दिलासा व उभारी देणारी ठरणार आहे.तरी विनाविलंब मदत मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत.

सध्या नागपूर येथे सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना  आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी निर्णय घेऊन मायबाप सरकारने धावून जावून त्यांच्यात आत्मविश्वास जागविण्यासाठी प्रयत्नशील राहणे, आवश्यक होते, शेतकऱ्यांसमोर आलेल्या संकटाची जाणीव सध्याच्या राजकारण्यांना असणे स्वाभाविक आहे, तेव्हा मायबाप सरकारने शेतकऱ्यांच्या हलाखीची परिस्थिती पाहून मोठ्या प्रमाणात मदत करण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे.


- डॉ. सुनिलकुमार सरनाईक

कोल्हापूर

भ्रमणध्वनी :९४२०३५१३५२



प्रेषितपूर्व काळात मुहम्मद (स.) रमजानच्या महिन्यात मक्काजवळील हिरा नामक गुहेत एकाग्र होऊन विचारविनिमय करत होते. मक्का अरबस्थानमध्ये एक असे शहर होते जिथे काबागृह होते. या काबागृहाचे दर्शन करण्यासाठी अरबस्थानातून विभिन्न भागांचे लोक दरवर्षी एकत्र येत होते. आणि म्हणूनच मक्केचे व्यापारी अरबस्थानच्या इतर भागांपेक्षा जास्त श्रीमंत होते. अरबस्थानात सर्वत्र कबिल्या-कबिल्यांमध्ये भांडणे आणि लढाया सर्रास चालायच्या. पण मक्केत काबागृह आणि त्या काबागृहाचे दर्शन करण्यासाठी अरबस्थानच्या कानाकोपऱ्यांतून लोक येत असत. म्हणून या शहरात कधी लढाया वा तंटे होत नसत, तर नेहमी शांतता नांदत असे. काबागृहाचा अभिमान अरबस्थानातील ज्यू आणि ख्रिस्ती धर्मियांनाही होता. अरबांना ही गोष्ट नेहमी खटकत होती की ख्रिस्ती आणि ज्यू धर्मियांना जसे अल्लाहने धर्मग्रंथाने नवाजले आहे तसे त्यांच्यासाठी कोणी धर्मग्रंथ पाठवला नाही. अल्लाहने त्यांना दैवी योजनेपासून वेगळे ठेवले अशी त्यांना खंत होती. पण अरबांच्या स्थितीत एका घटनेपासून विलक्षण बदल झाला. मुहम्मद (स.) ज्या गुहेत झोपलेले होते तेथे त्यांना हाक देऊन जागवले गेले आणि त्यांना एक अनुभव आला ज्याची त्यांनी कल्पनाच केली नव्हती. त्यांच्याकडे एक देवदूत (जिब्रईल अ.) आले आणि त्यांना म्हणाले, “वाचा, अल्लाहच्या नावाने.” मुहम्मद (स.) म्हणाले, “मला वाचता येत नाही.” त्या देवदूतांनी त्यांना आलिंगन दिले आणि पुन्हा वाचायला सांगितले आणि त्यांनी सांगितले तसे वाचायला सुरुवात केली. हा दैवी ग्रंथ होता ज्याच्या अवतरणाची सुरुवात मुहम्मद (स.) यांच्यावर झाली. अल्लाहने मुहम्मद (स.) यांची प्रेषित म्हणून निवड केली आणि त्यांच्याद्वारे अरबांचाच सन्मान वाढवला. पुढे जाऊन प्रेषित मुहम्मद (स.) सर्व मानवजातीसाठी प्रेषित म्हणून निवडले गेले. अशा प्रकारे अरबांची शतकानुशतकांची खंत संपली. त्यांनाही दैवी ग्रंथ अल्लाहने प्रेषितांद्वारे पाठवला. ही घटना रमजान महिन्यातील सातव्या रात्रीची होती. अल्लाहने प्रथमच अरबांशी प्रेषितांद्वारे संवाद साधला होता. त्यांच्या स्वतःच्या भाषेत ह्या धर्मग्रंथाला पवित्र कुरआनचे नाव दिले गेले.

पण या महत्त्वाच्या घटनेचे पडसाद भयंकर होते. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी जेव्हा अल्लाहचा संदेश अरबांना पोहोचता करण्याची सुरुवात केली, तेव्हा सबंध अरबस्थानात भयंकर अराजकता होती. जितके अरबांचे कबिले तेथे होते तितकेच त्यांचे स्वतःचे कायदे आणि नियम होते. कोणत्याही एका कबिल्याच्या वर्चस्वाला कुणी मानत नव्हते आणि म्हणून वर्षाच्या बारा महिने कोणत्या न् कोणत्या कबिल्यामध्ये भांडण होई आणि पुढे जाऊन युद्ध होत असे. आणि ह्या लढाया वर्षानुवर्षे, पिढ्यान् पिढ्या चालत राहत. हिजाझचा संपूर्ण भूभाग आणि तिथले निवासी जगातल्या कोणत्याच सभ्यतेत सामील नव्हते. मुक्त सभ्यतेशी त्यांचे काहीही देणेघेणे नव्हते. पण जेव्हा २३ वर्षांनंतर प्रेषित मुहम्मद (स.) यांनी या जगाचा निरोप घेतला ८ जून ६३२ रोजी प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अरबस्थानातल्या साऱ्या कबिल्यांना एकत्र करून त्यांना मुस्लिम समुदायात सामील केले. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी असंख्य अडचणी, विरोध, लढाया या सर्वांचा सामना करून अरबमध्ये ही एकता घडवून आणली. आपल्या ह्या महान राजकीय कामगिरीद्वारा प्रेषितांनी आपल्या लोकांच्या जीवनात कायापालट केला. त्यांनी अरबांना सतत चालत आलेल्या हिंसेपासून आणि रक्तपातापासून वाचवले आणि त्यांना अभिमान वाटावा अशी ओळख जगभर मिळवून दिली. ज्या लोकांचा कोणत्या संस्कृती-सभ्यतेचा कसलाही संबंध नव्हता त्यांना एक विशेष संस्कृती दिली. प्रेषित मुहम्मद (स.) यांमच्या शिकवणींनी अशी शक्ती त्या लोकांना प्रदान केली की केवळ शंभर वर्षांमध्ये अरबांच्या साम्राज्याचे स्पेनपासून हिमालयापर्यंत विस्तार झाला. मुहम्मद (स.) यांनी फक्त हेच साकार केले नव्हते तर त्यांनी ज्या धर्माच्या शिकवणी अरबांना दिल्या त्या धर्माची जी कल्पना त्यांनी लोकांसमोर ठेवली त्याचा परिपाक म्हणजे त्यांना हे अनन्यसाधारण यश प्राप्त झाले. कारण त्यांच्या अनुयायांनी स्वतःची एक आध्यात्मिक गरज म्हणून त्या शिकवणींचे पालन केले. त्यांचे अनुयायी आणि सबंध अरब लोकच एका संघर्षाला सामोरे जात होते जर धर्म आणि धर्माच्या शिकवणींचा त्यांना आधार मिळाला नसता तर ते टिकू शकले नसते की जगू शकले नसते. तत्कालीन मुस्लिमांना प्रेषितांच्या अभूतपूर्व सामर्थ्याची जाणीव होती आणि म्हणूनच त्यांना हे भान होते की प्रेषितांनी अरबस्थानाचीच नव्हे तर जागतिक इतिहासाचे चक्रच बदलून टाकले.

(अनुवाद – सय्यद इफ्तिखार अहमद)


एक व्यक्ती प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या सेवेत हजर झाली आणि विचारले की आपल्या सेवकाला किती वेळा माफ करू? प्रेषितांनी त्यांना उत्तर दिले नाही ते मौन होते. त्या व्यक्तीने पुन्हा तोच प्रश्न विचारला, तेव्हा प्रेषित मुहम्मद (स.) यांनी त्यांना उत्तर दिले, “दररोज ७० वेळा (माफ करत जा).” (ह. अब्दुल्लाह बिन उमर, तिर्मिजी)

एके दिवशी प्रेषित मुहम्मद (स.) मस्जिदमध्ये एका उंच जागेवर उभे राहिले आणि आवाज दिला की, “हे लोकहो, तुम्ही तोंडाने तर श्रद्धेचा उच्चार केला, पण तुमच्या मनामध्ये ती पूर्णपणे उतरली नाही.” पुन्हा सांगितले, “मुस्लिमांना त्रास देऊ नका. त्यांना लाज वाटेल असे काही म्हणू नका, त्यांच्या गुप्त उणिवांच्या मागे लागू नका. तसे केल्यास अल्लाह स्वतः अशा व्यक्तीच्या उणिवांच्या मागे लागेल आणि ज्याच्या उणिवांमागे अल्लाह लागेल अल्लाह अशा माणसाला लाजिरवाणे करून टाकील जरी तो आपल्या घरीच बसून राहिला तरीदेखील.” (ह. इब्ने उमर (र.), तिर्मिजी)

ह. अबू जर (र.) म्हणतात, मला माझ्या अत्यंत जवळच्या मित्रांनी सात गोष्टींची ताकीद दिली आहे. त्यांनी मला निराधार आणि गरिबांवर प्रेम करण्याची आज्ञा दिली आहे आणि त्यांनी मला म्हटले आहे की मी अशा लोकांवर नजर ठेवावी जे माझ्यापेक्षा खालच्या स्तराचे आहेत. आणि अशा लोकांकडे पाहू नये जे माझ्यापेक्षा प्रतिष्ठित आहेत. आणि मला आज्ञा दिली की मी आपल्या नातेवाईकांशी कृपेचा व्यवहार करावा आणि त्यांच्याबरोबर असलेले नाते जोडून ठेवावे जरी त्यांनी माझ्याशी असा व्यवहार नाही केला तरीदेखील. तसेच मला आज्ञा दिली गेली आहे की मी कुणाशी काहीही मागू नये आणि मला आज्ञा दिली गेली आहे की मी सत्य आहे तेच बोलावे जरी ते कितीही कटू असले तरी. आणि मला असे म्हटले गेले आहे की अल्लाहच्या संदर्भात मी कुणाच्या निंदानालस्तीला भिऊ नये. आणि मला आज्ञा दिली गेली आहे की मी नेहमी वाचन करत राहावे. (अल्लाहच्या मदतीशिवाय परिस्थितीत बदल होऊ शकत नाही आणि सामर्थ्यदेखील प्राप्त होत नाही). या सर्व गोष्टी उशीखाली असलेल्या खजिन्यामधील आहेत.

संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद  



(९७) जो कोणी सत्कर्म करील मग तो पुरुष असो अथवा स्त्री मात्र अट ही की तो ईमानधारक असावा, त्याच्याकडून आम्ही जगात पवित्र जीवन व्यतीत करवू आणि (परलोकात) अशा लोकांना त्यांचा मोबदला त्यांच्या उत्तम कृत्यानुसार प्रदान करू. 

(९८) मग जेव्हा तुम्ही कुरआनचे पठण करू लागाल तेव्हा धिक्कारलेल्या सैतानापासून अल्लाहचा आश्रय मागा.२८ 

(९९) त्यांना त्या लोकांवर प्रभुत्व प्राप्त होत नाही जे ईमान धारण करतात व आपल्या पालनकर्त्यावर विश्वास ठेवतात. 

(१००) त्याचा जोर तर त्याच लोकांवर चालतो जे त्याला आपला वाली बनवितात व त्याच्या बहकविण्याने अनेकेश्वरत्व पत्करतात. 


२८) याचा अर्थ केवळ इतकाच नाही की तोंडाने ‘‘अऊ़जु बिल्लाहि मिनश-शैतानिर-रजीम’’– ‘‘मी बहिष्कृत सैतानापासून अल्लाहचा आश्रय घेतो’’ उच्चारावे. तर याबरोबरच प्रत्यक्षात मन:पूर्वक अल्लाहशी अशी प्रार्थनादेखील केली पाहिजे की कुरआनचे वाचन करताना त्याला सैतानाच्या दिशाभूल करणार्‍या भ्रमापासून सुरक्षित ठेवावे. कारण ज्याला येथून बोध प्राप्त झाला नाही त्याला मग कोठूनही बोध प्राप्त होणार नाही व ज्याने या ग्रंथापासून दिशाभूल करवून घेतली त्याला मग मार्र्गभ्रष्टतेच्या चक्रातून जगाची कुठलीही शक्ती मुक्त करू शकणार नाही.

(खऱ्याखुऱ्या गमतीदार गोष्टी)

समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाय सांगण्यात चार इमाम खूप प्रसिद्ध आहेत. इमाम मालिक रह., इमाम अल-अबू हनीफा रह., इमाम शाफी रह. आणि इमाम अहमद बिन हंबल रह..

या इमामांपैकी इमाम अबू हनीफा न्यायशास्त्रात फार पारंगत होते. तो काळ खलीफा मन्सूरचा काळ होता. इमाम अबू हनीफा रह. खलीफाशी खूश नव्हते.

खलीफा मन्सूरने इमाम साहेबांची कीर्ती ऐकली होती. ते खूप ज्ञानी आणि धर्मनिष्ठ आहेत हेही त्याला समजले. त्याने इमाम साहेबांना देशभरातील काझींचा अधिकारी बनवायचे ठरवले. (जसे आजकाल सरन्यायाधीश आहेत) त्याने इमाम साहेबांना बोलावले आणि सांगितले की, "माझी इच्छा आहे की, तुम्हाला सरन्यायाधीश बनवावे." 

इमाम साहेब त्याच्यावर नाराज होते. त्यांना भीतीही वाटत होती की, जर मी नकार दिला तर हा खलीफा मला देहदंड देईल. ते खलीफाला म्हणाले, "मी न्यायाधीश होण्यास योग्य नाही."

हे उत्तर ऐकून खलीफा म्हणाला, "मला माहीत आहे की तुम्ही न्यायाधीश होण्यास योग्य आहात. मग खोटं का बोलत आहात?"

इमाम साहेब पटकन म्हणाले, "मी खोटं बोललो, याचा अर्थ मी खोटारडा आहे आणि खोटं बोलणाऱ्याला न्यायाधीश बनवता येत नाही." इमाम साहेबांचे बोलणे ऐकून खलीफा मन्सूर शांत झाला आणि इमाम साहेब त्याच्या तावडीतून निसटले.

----------------------

टोपी

एकदा हजरत अली (र.) वुजू करत असताना, हजरत उमर (र.) यांनी गंमत म्हणून त्यांच्या डोक्यावरून टोपी काढून एका उंच जागी टांगली.

वुजू केल्यानंतर हजरत अली (र.) गेले आणि टोपी काढण्याचा प्रयत्न केला आदरणीय अली (र.), आदरणीय उमर (र.) पेक्षा उंचीला तुलनेने कमी होते, त्यामुळे टोपीपर्यंत त्यांचे हात पोहोचू शकले नाहीत. खूप प्रयत्न केले पण निष्फळ ठरले. 

त्यांनी थोडा वेळ वाट पाहिली. हजरत उमर (र.) जेव्हा वुजू करायला बसले तेव्हा त्यांनी उमर (र.) यांच्या डोक्यावरून टोपी काढून टाकली आणि एका झाडाचं जड खोड होतं त्याखाली टोपी ठेवली.

हजरत उमरने वुजू केला आणि जाऊन खोडाखालची टोपी काढण्याचा प्रयत्न केला. पुरेशी ताकद लावली पण खोड काही हलले नाही. हजरत उमर (र.) हे हजरत अली पेक्षा ताकदीच्या बाबतीत तुलनेने कमी होते. त्यामुळे जे खोड अली यांनी सहज उचलून त्याखाली टोपी ठेवली ते खोड उमर (र.) यांना उचलता आले नाही.

शेवटी आदरणीय उमर (र.), हजरत अली यांना (र.) म्हणाले, "ठीक आहे भाऊ मी तुझी टोपी काढून देतो, तू माझी टोपी काढून दे!"

---------------------------


खजुराच्या बिया

एक प्रसिद्ध आणि गमतीदार घटना आहे. अनेक साथीदार पवित्र प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यासोबत फलाहार घेत बसले होते. खजूर खाल्ल्यानंतर प्रेषित (स.) यांनी बी हजरत अली यांच्यासमोर फेकली.

सर्वच साथीदार खजूर खाल्ल्यानंतर बिया अली (र.) समोर फेकू लागले. मग झालं असं की, थोड्याच वेळात हजरत अली (र.) यांच्यासमोर बियांचा ढीग जमा झाला. जेव्हा खाणे संपले तेव्हा एक साथीदार गंमतीने हजरत अली (र.) यांना म्हणाला, "अली (र.), तुम्हाला जास्त भूक लागली होती. तुम्ही सर्वांत जास्त खजूर खाल्ल्या. बघा तुमच्यासमोर बियांचा किती ढीग जमा झालाय."

अली (र.) यांच्या लक्षात आले. ते हसले आणि म्हणाले, "कदाचित तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त भूक लागली असेल, कारण मी िबया सोडल्या आणि तुम्ही बियांसमवेत खजूर खाल्ले असावेत!"

- सय्यद झाकीर अली

परभणी, 9028065881


प्रख्यात राजकीय तत्त्वज्ञ अरिस्टॉटल यचे म्हणणे आहे की लोकशाहीद्वारा स्वतंत्र लोकांवर राज्य केले जाऊ शकते, पण श्रीमंत वर्गावर सत्ता केली जाऊ शकत नाही. लोकशाही कायद्याचे राज्य या संकल्पनेचे महत्त्व कमी करते. सर्वांसाठी कायद्याचे राज्य असावे. जर तसे नसेल तर जे शक्तिशाली लोक किंवा वर्ग कोणत्या देशामध्ये, समाजामध्ये असतात त्यांना आपल्या मर्जीनुसार काहीही करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. लोकशाहीची दुसरी बाजू अशी की कोणत्याही राष्ट्रात गरीब लोकांची संख्या धनवानांपेक्षा अधिक असल्याने श्रीमंतवर्गाला मागे ठेवतात आणि त्यांना कंगाल करून टाकतात. गरीब आणि श्रीमंत तर लोकांचा लोकशाहीच्या संदर्भामध्ये अरिस्टॉटलचे विचार चुकीचे आहेत. म्हणजे सध्याच्या काळात ज्या काळी त्यांनी आपले विचार मांडले होते तो इ.सन पूर्वीचा काळ होता, लोक सुशिक्षित नव्हते. श्रीमंतीही नव्हती. सभ्यता-संस्कृती इतकी उंचावलेली नव्हती जितकी सध्याच्या काळाने गाठली आहे. बऱ्याच खोट्या आणि लबाड गोष्टींचे ज्ञान त्या काळातील लोकांना नव्हते, कारण त्यांच्याकडे शिकण्या-सवरण्याची साधनं नव्हती की त्यासाठी लागणारी श्रीमंती नव्हती. बिचारे गरिबीचे जीवन जगत होते आणि गरीब म्हटलं की प्रामाणिक, इमानदार वगैरे हे गुण स्वाभाविकच त्यांच्याकडे असणार. पण जसजसा लोकांकडे पैसा येत जातो चांगले जीवन जगण्याची संधी मिळते. शिक्षण, संस्कृती वगैरे चालून येतात तसतशी त्यांच्यातली नैतिकता, प्रामाणिकपणा, एकमेकांशी आपुलकी वगैरे मानवी जीवनमूल्ये, श्रीमंतीची साधने जसजशी त्यांच्याकडे एकवटतात उपरोल्लेखित गुण आपोआप बाहेर निघून जातात. तेव्हा अरिस्टॉटलने लोकशाही वगैरेच्या बाबतीत जे काही म्हटले आहे ते आजच्या लोकशाहीबाबत नाही हे वाचकांनी समजून घ्यावे.

सध्याची लोकशाही म्हणजे जितके म्हणून शक्तिस्रोत श्रीमंतीचे कोणत्या राष्ट्रात असतात ते सर्वचे सर्व फक्त आणि फक्त सत्ताधारीवर्गाकडे एकत्रित होतात आणि सत्ताधारीवर्ग याला स्वतःची कामगिरी समजतात. जनतेला भगवानच्या दारी सोड़तात, कारण त्याच भगवानच्या नावावर त्यांनी कमवलेले असते. पण ती जी कला आहे कमवण्याची ती जनतेला माहीत होऊ देत नाही. काही लोक गटार साफ करत असतील तर त्यांना ते काम करताना आध्यात्मिक समाधान मिळते, असे काही समजावलेले असते. असे करून एका समाजाला नाही एका राष्ट्राला आपले गुलाम बनवून टाकतात. अरिस्टॉटलचे म्हणणे असेही आहे की गुलामीचेही बरेच प्रकार असतात. एका प्राकृतिक गुलामाला समजुतदारपणा कशाला म्हणतात हे कळते, पण तो स्वतःकडे असावा जेणेकरून आपण इतरांची गुलामी करू नये हे कळत नाही. म्हणजे सत्ताधारी जे काही आदेश देत असतात त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करतात, पण ते प्राकृतिक गुलाम असल्याकारणाने इतरांना आदेश देण्याची क्षमता आपल्याकडे असावी असे त्यांना वाटत नाही. असे लोक इतरांकडून आदेश घेत असतात, त्याचे पालन करण्यासाठी. पण त्यांनी स्वतः इतरांना आदेश द्यावेत ज्याचे इतरांनी पालन करावे अशी इच्छा त्यांच्यामध्ये नसते, कारण त्यांची कल्पानाशक्ती विकसित झालेली नसते किंवा ‘कल्पना’ हा आभासच त्यांना होत नाही.

असे नाही की फक्त निरक्षर आणि गरीब लोकच या समस्येला बळी पडतात. बरेचसे श्रीमंत, बुद्धिजीवी, राजकारणी लोकसुद्धा लोकशाही व्यवस्थेशी बऱ्याच आशा-आकांक्षा लावून असतात आणि आज ना उद्या त्यांनासुद्धा इतरांना आदेश देण्याची संधी मिळेल या आशेवर जगता जगता केव्हा गुलाम बनून जातात हे कळत नाही. सत्ताधारीवर्गाला चांगले माहीत असते कधी कुणाला गुलाम बनवायचे. भारतात मात्र लोकशाही व्यवस्थेचे कित्येक राजकारणी बळी गेलेत. त्यांना माहीतही झाले नाही की लोकशाही सत्तेच्या दालनातून त्यांची कशी हकालपट्टी झाली. त्यांची अवस्था गुलामासारखी याच लोकशाहीने केलेली आहे. लोकशाही जुलमी राजवटीत कधी परिवर्तित होते हे लवकर कळतसुद्धा नाही!

- सय्यद इफ्तेखार अहमद

संपादक, मो.: 9820121207


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget