Halloween Costume ideas 2015
Latest Post


एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार मोहन भागवत यांनी हरियाणा राज्यातील एका हॉस्पिटलचे उद्घाटन करताना आपल्या भाषणात असा दावा केला की, ब्रिटिश राज्याच्या आगमनापूर्वी आपल्या देशातील 70 टक्के नागरिक सुशिक्षित होते, बेरोजगारी नव्हती. याच काळात इंग्लंडमध्ये फक्त 17 टक्के लोक सुशिक्षित होते. इंग्रजांनी भारताची शिक्षण प्रणाली आपल्या देशात रुजवली आणि आपली शिक्षण प्रणाली आमच्या देशात लागू केली आणि म्हणूनच इंग्लंडमधील 70 टक्के लोक साक्षर झाले आणि आपली साक्षरतेची टक्केवारी 17 टक्के वर आली. 

1707 इसवीसन हा औरंगजेबाचा काळ होता. इंग्लंडमधील एक धर्म गुरु (पादरी) विलियम अ‍ॅडम हे1818 साली भारतात आले. तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विलियम बेन्टिक यांच्या आदेशानुसार भारतीय उपमहाद्विपामध्ये शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी विलियम यांनी बंगाल आणि बिहार मधील शिक्षण व्यवस्थेचे सर्वेक्षण केले. त्यांनी आपल्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार हे मान्य केली की बंगाल आणि बिहार मधील जवळपास 1 लाख शाळांमधून भौतिक शिक्षण दिले जात होते. शाळेला जाण्योग्य प्रत्येक 32 मुलांसाठी एक शाळा होती.  नलतूर ज्या राजशाहीची लोकसंख्या 129640 होती तिथे दोन प्रकारच्या शिक्षणाची सोय होती. एक प्रकारच्या शाळेत आधुनिक शिक्षण दिले जात होते आणि दुसऱ्या प्रकारात घरच्या घरी शिक्षण देण्याची सोय होती. यात एक शिक्षक घरातल्या समस्त कुटुंबाला एकाच वेळी शिक्षण देत होता. आधुनिक शिक्षणाच्या शाळेमध्ये आठ वर्षे वयाच्या मुलांना दाखला दिला जात होता. पाच वर्षाच्या शिक्षणानंतर चौदाव्या वर्षी त्याचे सर्वांगीण शिक्षण झालेले असे. नलतूरमध्ये 12 शाळांमधून अरबी भाषेत शिक्षण दिले जायचे तर दहा बंगाली भाषेत आणि चार फारशी भाषेत शिक्षण मिळत होते. प्रत्येक मुलाला या तिन्ही पैकी कोणत्याही प्रकारचे शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य होते. 

1822 ते 1826 इसवी सनाच्या काळात मद्रास प्रांतात शिक्षण व्यवस्थेची पाहणी करण्यात आली होती. या अहवालानुसार तिथल्या 12498 शाळांमधून 188650 विद्यार्थी शिक्षण घेत होते. असेच एक सर्वेक्षण मुंबई प्रांतात ही करण्यात आले होते. तिथे 30 विद्यार्थ्यांसाठी एक शाळा होती. पंजाबच्या बाबतीत शासकीय महाविद्यालय लाहोरचे प्राचार्य विलियम लाटेनज यांनी लिहिलेल्या ग्रंथानुसार प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांची संख्या, शिकवले जाणारे विषय आणि शैक्षणिक दर्जा यांचा विस्तृत अहवाल उपलब्ध आहे. तिथे देखील शिक्षक घरोघरी जाऊन शिक्षण देत होते. एडवर्ड थॉमसन नावाचा ब्रिटिश साहित्यकाराने भारतातील बाजारपेठेंच्या बाबतीत जे लिखाण केले आहे त्यानुसार तो एक सभ्य समाज होता. थॉमसनच्या ग्रंथानुसार शाळेला जाऊन शकणारे गोरगरीब लोक सुद्धा लिहिण्या वाचण्यात अवगत होते. थॉमसन यांनी बऱ्याच बंगला भाषेतील पुस्तकांचे भाषांतर केले होते. तो लिहितो की बंगालच्या बाजारात लाखोंच्या संख्येने पुस्तकांची विक्री होत होती. शरदचंद्र चटर्जी लिखित देवदास या कादंबरीच्या दोन लाख प्रति विकल्या होत्या.

महाविद्यालय आणि विद्यापीठांचे भले मोठे जाळे पसरलेले होते. 1820 ते 1822 या काळात मुंबई प्रांताचे सर्वेक्षण केले गेले त्यावेळी ही माहिती समोर आली की, मुंबई येथे 222 महाविद्यालये आणि विद्यापीठे अस्तित्वात होती. अहमदनगरमध्ये 16 महाविद्यालये, पुणे शहरात 164 महाविद्यालये होती. तसेच मद्रास प्रांतात उच्च शिक्षणाचे 1109 महाविद्यालये होती. सर्वात जास्त कॉलेज राजमुद्रामध्ये होते 137, तंजावूर मध्ये 109, या 5431 महाविद्यालयांमध्ये तत्त्वज्ञान, खगोलशास्त्र, काव्य, वैद्यकीय शिक्षण, बांधकाम आणि शस्त्रास्त्रे निर्मितीची शिक्षण दिले जात होते. क्रोशियाचा एक साहित्यकार दी बारलेटो रोमियो याने 1798 मधील भारतीय शिक्षण व्यवस्थेला त्या काळातील जगातील सर्वोत्तम व्यवस्था म्हटले आहे. त्याच्या मते या काळात भारतात अशा विषयांचे शिक्षण दिले जात होते ज्याची कल्पना देखील युरोपमध्ये केली जाऊ शकत नव्हती.

मुस्लिम बादशहांनी शिक्षणाच्या उच्चवर्णीय आणि राजघराण्यांच्या सीमा ओलांडून सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवले होते. ज्यावेळी इंग्रजांनी बंगालमध्ये जातीय व्यवस्थेवर आधारित शिक्षणाचे सिलेक्शन केले तर हे तथ्यसमोर आले की तिथे एकंदर 1 लाख 75 हजार 89 हिंदू विद्यार्थ्यांपैकी केवळ 24 टक्के उच्चवर्णीय विद्यार्थी होते. 42 हजार 502 ब्राह्मण, 19669 वैष्य आणि 85400 विद्यार्थी क्षुद्र होते. टिपू सुलतान यांच्या शिक्षण व्यवस्थेत 65 टक्के शूद्र विद्यार्थी होते. इंग्रजांनी दिल्ली पूर्वी बंगाल, बिहार, ओडीसा, मद्रास, मैसूर आणि पंजाब वगैरे प्रांतात आपली सत्ता स्थापन केली होती. मोहन भागवत यांच्या म्हणण्यात हे तथ्य आहे की भारतातील शिक्षण व्यवस्थेला इंग्रजांनी आपल्या देशात स्थापन केले. 1920 मध्ये संबंध ब्रिटिश देशात केवळ 500 शाळा होत्या . आणि तेथे फक्त आणि फक्त उच्चवर्णीय लोकांना शिक्षण दिले जात होते. दुसरीकडे सतराव्या आणि अठराव्या शतकातील मोगल भारतामध्ये शाळा महाविद्यालये आणि त्यामध्ये सर्वांना दाखला दिला जात होता.

1802 वर्षीच्या पील्स कायद्यानुसार सर्व मुलांना वाचणे-लिहिणे आणि गणिताचे शिक्षण घेणे सक्तीचे झाले. जोसेफ लिंकस्टर आणि अँड््रयू बेल यांनी भारताच्या शिक्षण व्यवस्थेच्या धरतीवर शिक्षण व्यवस्था सुरू केली. 1801 मध्ये इंग्लंडमध्ये 3363 शाळा आणि 41 हजार विद्यार्थी होते. त्याच काळात भारतात लक्षावधी शाळा होत्या. 1818 इसवी सणामध्ये त्या संख्येत वाढ होऊन 674883 इतकी झाली आणि 1851 साली 21 लाख 44 हजार 377 झाली आणि विद्यार्थ्यांची संख्या 46 हजार 114 इतकी होती. इंग्रजांमधील ही क्रांती भारतात प्रचलित शिक्षण व्यवस्थेला आपल्याकडे लागू केल्यावर झाली. भारतात त्यावेळी या शाळांमधून धार्मिक आणि ऐहिक दोन्ही शिक्षणाचा समावेश होता. हदिस आणि कुराण बरोबरच तर्कशास्त्र, तत्वज्ञान, गणित, भूमिती, बीजगणित, वैद्यकशास्त्र, व्याकरण साहित्य आणि बांधकामाचे विषय शिकविले जात होते. या शाळांमधून शिकलेले विद्यार्थी न्यायव्यवस्था, शासकीय सेवा, आरोग्य, शिक्षण क्षेत्र आणि बांधकाम या विभिन्न क्षेत्रामध्ये आपली सेवा देत होते. त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या धर्माचे शिक्षण घेत असायचे. ओरिया मकबूल जान यांच्या संशोधनानुसार मुघल राजवटीत शहा अब्दुर्ररहीम यांनी शिक्षण व्यवस्थेचा पाया घातला होता. त्याकाळी धार्मिक आणि ऐहिक शिक्षणात कोणताच फरक नव्हता. वेगवेगळ्या शाळा देखील नव्हत्या. प्रख्यात शिक्षण तज्ञ पुरूषोत्तम अग्रवाल यांनी मोहन भागवतांच्या मताशी सहमती दर्शविली असून त्यांची प्रशंसा केली आहे. अग्रवाल यांच्या मतानुसार भारतात शिक्षण व्यवस्था भक्कम होती. मक्तब आणि शाळांमध्ये धार्मिक शिक्षणाबरोबरच ऐहिक शिक्षण सुद्धा दिले जात होते. इंग्रज येण्यापूर्वी औरंगजेबाच्या काळात भारताचे सकल उत्पादन (जीडीपी) जगाच्या 24 टक्के होते. इंग्रज भारत सोडून जातांना ते 4 टक्क्यांवर आले होते.

- डॉ. सलीम खान



आजकाल चार-पाच वर्षाच्या मुलांनाही उपवास करण्यास लावून त्यांचे छायाचित्र समाज माध्यमांवर टाकण्याची जणू स्पर्धाच सुरू झालेली आहे. मात्र ज्या वयात पालकांनी आपल्या मुलांना उपवास करायला सुरूवात केली पाहिजे, ते वय म्हणजे मुलं उपवास करण्यास सक्षम आहेत याची त्यांना खात्री पटायला हवी. साधारणपणे इस्लामी विद्वानांनी दहा वर्षे वयाची व्याख्या केलेली आहे. मात्र प्रत्येक मुलाच्या शरीर रचनेप्रमाणे हे वय कमी जास्त होवू शकते. 

’’लहान मुलांसाठी ते पौगंडावस्थेपर्यंत पोहोचेपर्यंत उपवास करणे बंधनकारक नाही.’’

हजरत अल अवजाई यांनी या संदर्भात म्हटले आहे की, ’’जर मुलगा/मुलगी तीन दिवस सतत व्यत्यय न घेता आणि कमजोर न होता उपवास करू  शकतील असा आई-वडिलांना जोपर्यंत विश्वास येणार नाही तोपर्यंत मुलांना उपवास करायला लावू नये. हजरत इसाक यांचे या संदर्भात म्हणणे असे की, ’’जेव्हा मुलं 12 वर्षाची होतात तेव्हा मला वाटतं की त्यांना उपवास करायला लावायला हवे.’’ प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी एके ठिकाणी फरमाविले आहे की, ’’मुलं जेव्हा उपवास करण्यासाठी शारीरिकरित्या सक्षम होतील तेव्हाच त्यांना उपवास करायला सांगा. तेव्हा सुद्धा समजा एखादे मूल रोजाच्या अवस्थेमध्ये भूकेने व्याकूळ झाले तर त्याचे लक्ष विचलित करण्यासाठी त्याला एखादी खेळणी द्यावी परंतु, शारीरिक दुर्बलता किंवा आजारपणाच्या परिस्थितीत त्यांना उपवास करण्यास भाग पाडू नये.’’

सहाबा रजि., जे मुस्लिम उम्माहमधील सर्वोत्कृष्ट लोक आहेत ते त्यांच्या मुलांना लहान असताना उपवास करू द्यायचे. (मजमुआए फतवा अल शेख इब्ने उथायमिन 19/28-29). तरूण पिढीसाठी रमजान हा खूपच आकर्षक विषय आहे. तरूणांसाठी रमजान हा विचार करण्यासाठी प्रवृत्त करणारा महिना आहे. विचार शक्ती वाढविण्याचा महिना आहे. 

इस्लामिक सेंटर ऑफ ग्रेटर सिनसिनाटी (अमेरिका) येथील तरूणांचे म्हणणे आहे की, शुक्रवारपासून सुरू झालेला रमजानचा महिना हा उत्सव आणि आनंदाच्या वाढीसाठी पोषक आहे. अल्लाहशी एकरूपता आणि मुस्लिम उम्माहसोबत एकता वाढविण्याचा महिना आहे. कारण या महिन्यात सर्व लोक अध्यात्मिक शिस्तीत असतात. कितीही उष्णता असो हे लपलेले सामर्थ्य शोधण्यासाठी उपयुक्त महिना आहे. आपल्या व्यक्तीमत्वातील उणीवा दूर करण्याचा महिना आहे. हे अध्यात्मिक प्रबोधनाबद्दल आहे. जे लोक प्रार्थना करण्यात आणि कुरआन पठण करण्यात जास्त वेळ घालवितात त्यांना या महिन्यात खूप पुण्य मिळेल. इफ्तारसाठी लहान भावंडांसाठी वेगवेगळ्या गोडवस्तूंची गुडीबॅग बनविण्यात अधिक आनंद आहे. 

17 वर्षीय दानियाल खान या मुलाचे म्हणणे आहे की, बऱ्याच लोकांना रमजानचा महिना उपवासामुळे शुद्ध संघर्षाचा वाटतो. पण मी म्हणू शकतो की हा वर्षातील मजेदार आणि शांततामय काळ आहे. उपवास आम्हाला अधिक मजबूत बनवितो. मी स्वतःला या महिन्यात धन्य समजतो. 

हायस्कूलच्या विद्यार्थ्यांसाठी जे वर्षातील बहुतेक वेळ अभ्यासात आणि शालेय क्रियाकल्पात रममान असतात. रमजान त्यांना स्वतःला नैतिकदृष्ट्या सिद्ध करण्यासाठीची  दुर्मिळ संधी देतो. 16 वर्षीय फरिआल जिंदानी म्हणते की, जितका वेळ ती कारमध्ये असते तितका वेळ तिने ऑडिओ कुरआन ऐकण्याची व्यवस्था केलेली आहे. पश्चिम मुंबईचा 18 वर्षीय आबेद कादरी म्हणतो की, ’’रमजानमध्ये त्याच्या पालकांना अतिरिक्त आदर दाखविण्याचा तो प्रयत्न करतो आणि स्वतःच्या शिष्टाचार आणि वर्तनाबद्दल अधिक जागरूक असतो.’’

जोयबा बकाली (17, रा. नागपूर) ही विद्यार्थीनी  म्हणते की, रमजानमध्ये ती संपूर्ण कुरआन वाचून पूर्ण करते. यामुळे तिचे मन प्रार्थनेत केंद्रित होते. नंतर लोकांशी दयाळूपणे वागण्यास मदत होते. रमजान वर्षातून एकदाच येतो म्हणून तुम्हाला त्याचा फायदा घ्यायचा आहे. अकोला येथील आसिफ सय्यद (17, अध्यक्ष युवक मंडळ अकोला) म्हणतो की, ’’उपवास, प्रार्थना आणि आत्मपरीक्षण यांचे संयोजन एक उच्च आणि अकल्पनीय अध्यात्मिक अनुभुती देते. मी रोज रात्री तरावीह नमाजसाठी मस्जिदमध्ये जातो. एकत्र प्रार्थना करतो आणि घरी येऊन व्यक्तिगत प्रार्थना करतो. तेव्हा मला मानसिक आणि शारीरिक प्रसन्नता जाणवते, हा महिना आनंदाचा आहे. 

नागपूरचाच नासीर शेख (19) म्हणतो की, ’’ मी इस्लामिक सेंटर चालवितो. माझ्या मनामध्ये रमजानमध्ये शुद्धतेची नवीन भावना निर्माण होते. एरव्ही आपले ईमान थोडेसे कमीजास्त होते. परंतु, रमजानमध्ये ईमानवर लक्ष केंद्रित करत असतो आणि प्रत्येक दिवस अध्यात्मिक शुद्धी करण्यासारखा असतो.’’ 

ब्रिटनमधील अलसादिक अल जहरा स्कूल ही एक अशी शाळा आहे, जी चांगल्या व्यवस्थापनामुळे ओळखली जाते. ही शाळा एक स्वतंत्र इस्लामिक शाळा आहे. रमजानच्या काळात शाळेमध्ये मुलींना व्यस्त ठेवण्यासाठी खेळाच्या माध्यमातून त्यांंचे नेतृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी युथ स्पोर्टस् ट्रस्ट गर्ल अ‍ॅ्निटव्ह फेस्टिव्हलचे आयोजन करते. रमजानमध्ये ही एक अतिशय चांगली कृती त्या शाळेने केलेली आहे. 

शाळेमध्ये खूप स्पर्धा आणि अ‍ॅ्निटव्हिटी घेतल्या जातात. पण काही अ‍ॅ्निटव्हिटीमध्ये विद्यार्थ्यांच्या मुखामध्ये पाणी जाण्याची शक्यता असते. शाळेने अशा अ‍ॅ्निटव्हिटीज घेवू नये. 

रमजानमध्ये तरूण व्यावसायिकांचे अनुभव 

’’मला वाटते की माझ्यासाठी एक अधिक कठीण झाले आहे. कारण मला कोणत्याही ब्रेकशिवाय सात तास काम करावे लागते. एक विद्यार्थी म्हणून मी शाळेत किंवा विद्यापीठ असतांना मला एक तास ब्रेक मिळत होता. पण व्यावसायामध्ये तो मिळत नाही.’’- फय्याजअली नागपूर

आफिया जबीन (32, सॉफ्टवेअर इंजिनिअर बेंगलोर) म्हणाली, ’’रमजानपूर्वी माझे झोपेचे सत्र सामान्य होते. मी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास झोपायची आणि सकाळी 7 वाजता उठायची. पण आता रमजानमध्ये मला पहाटे सहरी करून पुन्हा सात वाजता कामावर जायचे आहे. मी माझे झोपेचे सत्र 9 वाजता करायचे निश्चित केले परंतु ते मला आजपर्यंत साध्य झाले नाही. मी अजूनही 12 वाजता झोपते, सहेरीसाठी वेळेवर उठते पुन्हा 7 वाजता नियमितपणे कामावर जाते. आणि सायंकाळी 5 वाजता ऑफिसहून येवून इफ्तारची तयारी करते. तरीपण मला रमजानमध्ये खूप आनंदी वाटते थकवा येत नाही. 

बिलाल मुहम्मद म्हणतो की, ’’महिनाभरच्या उपवासानंतर ईदच्या दिवशी मी फ्रिजसमोर उभा राहतो. तेव्हा माझ्या मनात येते की मी काही काहीही खावू शकत नाही. मात्र ताबडतोब माझ्या लक्षात आले येते की आज माझा उपवास नाही आज तर ईद आहे. आज मी मला वाटेल तेव्हा खावू पिवू शकतो आणि त्याचा आनंद घेऊ शकतो. माझ्यासाठी आणि माझ्यासारख्याच अनेक लोकांसाठी आम्ही आमचा धर्म गांभीर्याने घेतो. आम्ही स्वतःला वचन देतो की आम्ही हे कायम ठेवू. रमजान संपल्यानंतर माझे मन एकीकडे आनंदी होते तर दूसरीकडे दुःखी होते. की आता रमजान संपले. रमजान महिना मला खूप आवडतो. या महिन्यात आपण खूप काही शिकतो. 

1400 वर्षापूर्वी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी एकदा म्हटले आहे की, आधी पाच गोष्टींचा फायदा घ्या. 

1. तारूण्याचा वृद्ध होण्यापूर्वी 2. आरोग्याचा आजारी पडण्यापूर्वी 3. श्रीमंतीचा गरीब होण्यापूर्वी 4. तुमच्या मोकळ्या वेळेचा  व्यस्त होण्यापूर्वी 5. तुमच्या जीवनाचा मृत्यू होण्यापूर्वी. ही किती मोठी गोष्ट आहे समजणाऱ्यांसाठी असे माझे मत आहे.

- डॉ. समीना अन्सारी, खामगाव



10 एप्रिलला विश्व होमिओपॅथिक दिवस साजरा केला जातो. या पॅथिचे जनक जर्मन फिजिशियन डॉ.ख्रिश्चयन फेड्रिक सॅम्युअल हानेमान आहेत. यांचा जन्म 10 एप्रिल 1755 रोजी जर्मनीमध्ये झाला होता. त्यांच्या नावाने हा दिवस साजरा केला जातो. त्यांचे वडिल ख्रिश्चन गॉटफ्राईड हानेमान एक पोर्सलेन पेंटर होते. त्यांच्या आईचे नाव जोना ख्रिश्चयना होते. ते आपल्या आई-वडिलांचे तीसरे अपत्य होते. त्यांचे वडिल अत्यंत गरीब होते. ते सॅम्युअलची शालेय फी सुद्धा भरू शकत नव्हते. परंतु, सॅम्युअलच्या अचाट बुद्धीमत्तेमुळे त्यांना शालेय फीसमध्ये सूट दिली जायची. त्यांच्या शाळेचे नाव पिल्स स्कूल होते. त्यांनी आपले शिक्षक व्हॅन क्वारिन यांच्याकडून वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यांना ब्रदर्स ऑफ मर्सी या रूग्णालयातून अभ्यासाची संधी मिळाली. ते आपल्या शिक्षकाबरोबर नेहमी रूग्ण पाहण्यासाठी जात होते. त्यामुळे त्यांचे प्रॅ्निटकल नॉलेज वाढले होते. त्यानंतर त्यांनी इर्लेगिन युनिव्हर्सिटी येथून आपली एम.डी. पदवी प्राप्त केली. 1779 ते 1792 दरम्यान त्यांनी आपली वैद्यकीय सेवा दिली. त्या दरम्यान, 17 नोव्हेंबर 1782 ला त्यांनी जॉहन्ना लिओपोल्डाईन हॅनरएट कुचलर हिच्याशी विवाह केला. डॉ. हानेमान आपल्या वैद्यकीय सेवेसंबंधी संतुष्ट नव्हते. कारण अ‍ॅलोपॅथिक औषधांचे साईड इफे्नट फार होते. 1796 मध्ये होमिओपॅथिचा जन्म झाला. त्याचे असे झाले की, डॉ. हानेमान हे कुलिन्स मॅटेरियामेडिका या पुस्तकाचे भाषांत करत होते तेव्हा त्यांना  सिनकोना बार्क हे मलेरियामध्ये उपयुक्त आहे असे आढळून आले.  होमिओपॅथीचा एक नियम आहे की सीमिलीया सीमीलीबस क्युरेंटर लाईक क्युअर्स लाईक. होमिओपॅथिला 1811 ते 1822 मध्ये डावलले गेले. 48 वर्षाच्या आनंददायी वैवाहिक जीवनानंतर 31 मार्च 1830 मध्ये डॉ. हानेमानच्या पत्नीचा मृत्यू झाला. जी त्यांच्या 11 मुलांची आई होती. डॉ.हानेमान यांनी आपल्या जीवनात स्वतःवर आणि आपल्या मुलांवर  औषधांचे प्रयोग केले आणि आज दोन हजार पेक्षा जास्त औषधी होमिओपॅथिला दिली. 2 जुलै 1834 ला पॅरिसमध्ये त्यांचा मृत्यू झाला. होमिओपॅथिमध्ये माणसाला एक पूर्ण व्यक्तीमत्व समजले जाते आणि पूर्ण व्यक्तीचा विलाज केला जातो. उदा. एका विद्यार्थ्याला जास्त डोकेदुखी झाली ती अभ्यासामुळे झाली का ती पडल्यामुळे झाली, प्रवासामुळे झाली. कशामुळे डोकेदुखी झाली, याचा शोध घेतला जातो. मुलं जेव्हा त्रास देतात तेव्हा आईला जी डोकेदुखी होते, मानसिक तणाव होतो, त्यामुळे वेगळ्या प्रकारची डोकेदुखी होते. शारीरिक थकव्यामुळे होणारी डोकेदुखी वेगळी असते. ताप आल्यामुळे होणारी डोकेदुखी वेगळी असते. थोडक्यात कशामुळे डोकेदुखी होत आहे की, वातावरण बदलल्यामुळे डोकेदुखी होत आहे. भीतीमुळे तर डोकेदुखी होत नाही. नाक बंद झाल्यामुळे तर डोकेदुखी होत नाही, अर्ध शिषीमुळे तर डोकेदुखी होत नाही. या सर्वांचा शोध घेऊन कारण निश्चितीकरून औषधोपचार केला जातो. महेंद्रलाल सरकार भारतातील पहिले होमिओपॅथी डॉ्नटर होत. कलकत्ता होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची स्थापना 1881 ला त्यांनी केली. जागतिक आरोग्य संघटनेच्या अनुसार होमिओपॅथी जगातली दुसऱ्या क्रमांकाची पॅथी आहे. पहिल्या क्रमांकावर अ‍ॅलोपॅथी आहे. होमिओपॅथी ही भविष्याची पॅथी ही म्हणविली जाते. कारण लोक अ‍ॅलोपॅथीच्या दुष्परिणामामुळे बेजार होऊन होमिओपॅथीकडे वळत आहेत. आपल्या देशाला होमलँड ऑफ होमिओपॅथी म्हटले जाते. याचे कारण दोन लाखांपेक्षा जास्त होमिओपॅथिक डॉ्नटर रात्रंदिवस आपली सेवा प्रदान करत आहेत. ही संख्या जगात सगळ्यात जास्त आहे. होमिओपॅथी जुनाट आजारांवर विशेष करून प्रभावशाली ठरते. त्यामुळे लोक सुद्धा जुनाट रोगांमध्येच विशेषकरून या पॅथीमध्ये विलाज करून घेण्यासाठी प्राधान्य देतात. एक फारच महत्त्वाचा गैरसमज असा की, होमिओपॅथिक इलाजाचा गुण हळूहळू येतो. परंतु, असे नाही. खरे उपचार झाले तर त्याचे परिणामही तात्काळ दिसून येतात. होमिओपॅथी आता काही लोकांची इलाज करण्याची पद्धत राहिलेली नसून हळूवार पद्धतीने मात्र प्रभावशाली विलाज होतो. यात बारिक आकाराच्या गोड गोळ्या दिल्या जातात. ज्यांना सामान्य भाषेत शाबुदान्यासारख्या गोळ्या म्हटले जाते. कारण या गोळ्या साबुदान्यासारख्याच दिसतात. लहान मुलं सुद्धा या पॅथीद्वारे विलाज करून घेण्यामध्ये आनंद मानतात. जे विद्यार्थी नीटमध्ये कमी गुण प्राप्त करतात त्यांना वैफल्यग्रस्त होण्याची गरज नाही. त्यांना एमबीबीएसची सीट जरी नाही मिळाली तरी बीएचएमएसचे चांगले ऑप्शन आहे. यात करीअर करून ते यशस्वी वैद्यकीय अधिकारी म्हणून नावारूपाला येवू शकतात. भविष्यात याच पॅथीकडे उगवती वैद्यकीय उपचार पद्धती म्हणून पाहिली जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या पॅथीकडे दुर्लक्ष करू नये.  



पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``स्वर्गात एक कचरा ठेवण्याचे ठिकाण जग आणि जगातील सामानापेक्षा उत्तम आहे.'' (हदीस : बुखारी व मुस्लिम)

स्पष्टीकरण : `कचरा ठेवण्याचे ठिकाण' म्हणजे ती लहानशी जागा आहे जेथे मनुष्य आपले अंथरुण टाकून पहुडलेला असतो. अर्थात अल्लाहच्या `दीन'- जीवनधर्माचे अनुसरण करताना एखाद्याचे जगच नष्ट झाले, सर्व सामानसुमानापासून वंचित झाला आणि त्या बदल्यात स्वर्गातील मर्यादित आणि लहानशी जमीन मिळाली तर हा फारच क्षुल्लक सौदा आहे, नाशवंत वस्तूच्या बलिदानाच्या परिणामस्वरूप अल्लाहने त्याला ती वस्तू दिली जी निरंतर राहणारी आहे.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, जगातील सर्वांत जास्त सुखी नरकवासीला आणले जाईल आणि नरकात टाकले जाईल. जेव्हा आग त्याच्या संपूर्ण शरीरावर आपला प्रभाव दाखवू लागेल तेव्हा त्याला विचारले जाईल, ``तू कधी चांगली स्थिती पाहिली आहे काय? तू कधी ऐशोआरामात जीवन व्यतीत केले आहेस काय?'' तो म्हणेल, ``नाही, तुझी शपथ हे माझ्या पालनकर्त्या! कधीच नाही.'' मग जगात अत्यंत हलाखीच्या (गरिबीच्या) स्थिती जीवन व्यतीत करणाऱ्या स्वर्गवासीला आणले जाईल. जेव्हा त्याच्यावर स्वर्गातील ईशकृपांचा प्रभाव पडेल तेव्हा त्याला विचारले जाईल, ``तू कधी हलाखी पाहिली आहेस काय? कधी तुला संकटांना सामोरे जावे लागले आहे काय?'' तो म्हणेल, ``हे माझ्या पालनकर्त्या! मी कधीही हलाखी व गरिबीत अडकलो नाही, मला कधीच संकटांना सामोरे जावे लागले नाही.'' (हदीस : मुस्लिम)

पैगंबर मुहम्मद ( स.) यांनी सांगितले, नरकाला स्वादांनी व अस्तित्वाच्या इच्छांनी घेरण्यात आले आहे आणि स्वर्गाला कठोरता व संकटांनी घेरण्यात आले आहे. (हदीस : बुखारी व मुस्लिम)

स्पष्टीकरण : जो मनुष्य आपल्या अस्तित्वाची पूजा करील आणि जगातील स्वादांमध्ये गुरफटला जाईल त्याचे ठिकाण नरक आहे आणि ज्याला स्वर्गप्राप्तीची इच्छा असेल त्याने काटेरी मार्ग अवलंबावा, आपल्या अस्तित्वाला हरवून त्यास त्रास व प्रत्येक प्रकारच्या अडचणींना अल्लाहसाठी सहन करण्यास विवश करावे, जोपर्यंत एखादा मनुष्य ही अवघड खाडी ओलांडत नाही, आराम व सुखात कसा पोहोचेल.

पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``मी नरकाच्या आगीपेक्षा अधिक भयानक कोणतीही वस्तू पाहिली नाही, ज्यापासून पळणारा झोपला आहे आणि स्वर्गापेक्षा अधिक चांगली वस्तू पाहिली नाही, ज्याची इच्छा बाळगणारा झोपला आहे.'' (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण : एखाद्या भयानक वस्तूला पाहिल्यानंतर मनुष्याची झोप उडते. तो तिच्यापासून पळत सुटतो आणि जोपर्यंत समाधान वाटत नाही तोपर्यंत झोपत नाही. अशाप्रकारे ज्याला चांगली वस्तू हवीहवीशी वाटू लागते तेव्हा जोपर्यंत ती मिळत नाही तोपर्यंत तो झोपत नाही की आरामात बसत नाही. जर ही हकीकत असेल तर स्वर्गाची इच्छा बाळगणारे का झोपले आहेत? ते नरकापासून पळ काढण्याचा प्रयत्न का करीत नाहीत? ज्याला एखाद्या गोष्टीची भीती वाटते तो बेसावध झोपत नाही आणि ज्याच्या अंतर्गत चांगल्या वस्तूची उत्कटता असते तो आरामात बसत नाही.

माननीय सहल बिन सअद यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ``मी `हौज-ए-कौसर' (स्वर्गातील एक हौद) वर तुमच्या अगोदर पोहोचून तुमचे स्वागत करीन आणि तुम्हाला पाणी पाजण्याची व्यवस्था करीन. जो माझ्याजवळ येईल तो `कौसर'चे पाणी पियील, त्याला पुन्हा कधी तहान लागणार नाही आणि काही लोक माझ्याजवळ येतील, मी त्यांना ओळखत असेन आणि ते मला ओळखत असतील, परंतु त्यांना माझ्याजवळ पोहोचण्यापूर्वी अडविले जाईल तेव्हा मी म्हणेन, ही माझी माणसे आहेत (त्यांना माझ्यापर्यंत येऊ द्या), तेव्हा उत्तरात मला सांगितले जाईल, तुम्हाला माहीत नाही की तुमच्या मृत्यूपश्चात तुमच्या `दीन'- जीवनधर्मात किती नवीन गोष्टी (बिदआत) घातल्या आहेत, तेव्हा (हे ऐकून) मी म्हणेन, दूर व्हा, दूर व्हा, त्या लोकांकरिता ज्यांनी माझ्यापश्चात `दीन' (इस्लाम) चा आराखडा बदलला.'' (हदीस : बुखारी व मुस्लिम)

स्पष्टीकरण : ही हदीस स्वत:च एक शुभवार्ता आहे आणि फार मोठे भयदेखील. शुभवार्ता अशी की पैगंबर मुहम्मद (स.) त्यांनी आणलेला (दीन) जीवनधर्म कसल्याही फेरबदलाशिवाय स्वीकारणाऱ्या आणि त्याचे अनुसरण करणाऱ्या लोकांचे स्वागत करतील आणि जाणूनबुजून जीवनधर्मात (दीनमध्ये) निषिद्ध असलेल्या नवनवीन गोष्टींची त्यात सरमिसळ करणारे लोक पैगंबरांपर्यंत पोहोचतील आणि `कौसर'चे पाणी पिण्यापासून वंचित राहतील.

संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद



(११) त्यांच्या पैगंबरांनी त्यांना सांगितले, ‘‘खरोखरच आम्ही काहीच नाही परंतु तुमच्याचसारखे मानव. परंतु अल्लाह आपल्या दासांपैकी ज्याला इच्छितो त्याला उपकृत करतो,२१ आणि हे आमच्या अखत्यारीत नाही की तुम्हाला एखादे प्रमाण आणून द्यावे. प्रमाण तर अल्लाहच्याच आज्ञेने येऊ शकते आणि अल्लाहवरच श्रद्धावंतांनी विश्वास ठेवला पाहिजे.

(१२) आणि आम्ही अल्लाहवर का विश्वास ठेऊ नये ज्याने आमच्या जीवन-मार्गात मार्गदर्शन केले आहे? ज्या यातना तुम्ही लोक आम्हाला देत आहात त्यावर आम्ही संयम बाळगू आणि विश्वास ठेवणाऱ्यांचा विश्वास अल्लाहवरच असला पाहिजे.’’

(१३-१४) सरतेशेवटी इन्कार करणाऱ्यांनी आपल्या पैगंबरांना सांगून टाकले, ‘‘एक तर तुम्हाला आमच्या संप्रदायात परत यावे लागेल२२ अन्यथा आम्ही तुम्हाला आपल्या देशांतून हुसकावून देऊ.’’ तेव्हा त्यांच्या पालनकत्र्याने त्यांच्याकडे दिव्य प्रकटन केले, ‘‘आम्ही या अत्याचाऱ्यांना नष्ट करून टाकू. आणि त्यांच्यानंतर तुमचे भूतलावर पुनर्वसन करू.२३ हे इनाम आहे त्याच्यासाठी जो माझ्या ठायी उत्तरदायी होण्याचे भय बाळगतो आणि माझ्या इशाऱ्याला भितो.’’

(१५) त्यांना निर्णय हवा होता (तर असा त्यांचा निकाल लागला) आणि सत्याचा प्रत्येक उन्मत शत्रू तोंडघशी पडला.२४

(१६-१७) यानंतर त्याच्यासाठी जहन्नम (नरक) आहे. जेथे त्याला रक्त पू सारखे द्रव पिण्यास दिले जातील, ज्याला तो जबरदस्तीने घशाखाली उतरविण्याचा प्रयत्न करील आणि मोठ्या कष्टाने उतरवू शकेल. मृत्यू त्याच्यावर सर्व बाजूंनी आच्छादित राहील परंतु तो मरू शकणार नाही व पुढे एक कठोर यातना त्याच्या जिवाशी लागून राहील.


२१) नि:संदेह आम्ही मानवच आहोत परंतु अल्लाहने तुमच्या दरम्यान आम्हाला सत्यज्ञान देण्यासाठी आणि पूर्ण विवेक प्रदान करण्यासाठी नियुक्त केले आहे. यात आमच्या अधिकारातील काहीच नाही. हा सर्व अल्लाहच्याच अधिकाराचा मामला आहे. तो आपल्या दासांपैकी ज्याला हवे ते देतो. आमच्या अधिकारात नाही की आमच्याजवळ जे आले आहे ते अल्लाहला सांगून तुमच्याकडे त्याने पाठवावे. आम्ही हेसुद्धा करू शकत नाही की जे सत्य आमच्यावर प्रकट झाले आहे त्याच्याशी आम्ही डोळेझाक करावी.

२२) याचा अर्थ असा होत नाही की पैगंबर हे पैगंबरत्व प्राप्ती अगोदर आपल्या मार्गभ्रष्ट लोकांत सामील असत. याचा अर्थ होतो की पैगंबर हे पैगंबरत्व बहाली अगोदर एकांतात जीवन जगत असत. ते एखाद्या धर्माचा प्रचार आणि प्रचलित धर्माचे खंडन करीत नसत. यामुळे त्यांचे समाजबांधव हे समजून घेत की ते पैगंबर त्यांच्याच समाजाचे आहेत. पैगंबरकार्य सुरु केल्यानंतर मात्र त्यांच्यावर हा आरोप लावला जात असे की त्यांनी आपल्या पूर्वंजाच्या धर्माला सोडले आहे. पैगंबर तर पैगंबरत्व बहालीपूर्वीसुद्धा अनेकेश्वरवादी समूहात सामील नव्हते. मग त्यांच्यावर समाजातून बहिष्काराचा आरोप बिनबुडाचा व अयोग्य आहे.

२३) म्हणजे घाबरू नका. ते म्हणतात की तुम्ही या देशात राहू शकत नाही. परंतु आम्ही सांगतो की हेच आता या भूभागात राहू शकत नाहीत. आता जो तुम्हाला मान्य करील तोच येथे राहील.

२४) लक्षात असू द्या की येथे ऐतिहासिक वर्णनस्वरुप वास्तविकपणे मक्का येथील नाकारणाऱ्यांना त्यांच्या प्रश्नांचे उत्तर दिले जात आहे. ते लोक हे प्रश्न पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याशी नेहमी विचारत असत. प्रत्यक्षात येथे उल्लेख पूर्वीच्या पैगंबरांचा आणि त्यांच्या सामाजिक घटनांचा आहे. परंतु ते तंतोतंत लागू होत आहे त्या परिस्थितीवर जेव्हा हा अध्याय अवतरित होताना होती. या ठिकाणी मक्का येथील विरोधकांना म्हणजे अरबच्या अनेकेश्वरवादींना स्पष्ट शब्दांत सचेत केले की तुमचे भविष्य आता त्या व्यवहारावर अवलंबून आहे जो तुम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या चळवळीविषयी स्वीकाराल. तुम्ही पैगंबर मुहम्मद (स.) यांचा संदेश स्वीकाराल तर अरब भूमीत राहू शकाल. याला अमान्य कराल तर येथून तुमचे नामोनिशान मिटून जाईल. या गोष्टीला ऐतिहासिक घटनांनी एक स्वयंसिद्ध सत्यता बनविले आहे. या भविष्यवाणीला पूर्ण पंधरा वर्षे झाली नव्हती की अरब भूभागात एकही अनेकेश्वरवादी शिल्लक राहिला नाही.


आज राष्ट्र राष्ट्राशी संघर्ष करत आहे. मनुष्य मनुष्यासाठी पशुवत बनला आहे. जगात चहूकडे बलवान शक्तिहीनांना गिळंकृत करत आहे. चहूकडे जगात अत्याचार, धोकाधडी आणि धर्माच्या आड अधर्म माजला आहे. आज मनुष्यस्वभावात आणि चारित्र्यात सत्यता शिल्लक राहिलेली नाही. शेवटी या सर्व दुराचारांचे कारण काय आहे? कारण आहे कुरआनपासून दुरावा आणि त्या एकमेव ईश्वराची आज्ञा न बाळगणे.

कुरआन अल्लाहचा ग्रंथ आहे. प्रत्येक मुस्लिमाच्या घरात हा ग्रंथ असतो. या ग्रंथाची भाषा अरबी आहे. हा ग्रंथ अरब लोकांच्या दरम्यान अवतरित झाला आहे. त्या अरब लोकांची भाषा अरबी होती. या ग्रंथाचा संदेश तमाम मानवजातीसाठी आहे. या ग्रंथाचा अनुवाद जगातील इंग्रजी, हिंदी, मराठी या भाषांसह अनेक भाषांमध्ये झालेला आहे.

सर्वसाधारणतः असे समजले जाते की हा मुस्लिमांचा धार्मिक ग्रंथ आहे. परंतु हा ग्रंथ वास्तविकपणे समस्त मानवजातीसाठी अवतरित केला आहे आणि हा ग्रंथ सर्वांसाठी आहे. अत्यंत दुर्भाग्यपूर्ण गोष्ट म्हणजे कुरआन ग्रंथ लोकांसाठी एक रहस्यमय ग्रंथ बनला आहे. बहुतांश मुस्लिम जाणत नाहीत की या ग्रंथात काय आहे?

अरबी भाषेत 'कुरआन' या शब्दाचा अर्थ होतो 'वारंवार वाचला जाणारा ग्रंथ'. हे सत्य आहे की जगातील अएन्य कोणताच ग्रंथ इतका वाचला जात नाही, जितका कुरआन वाचला जातो. करोडो मुस्लिम प्रत्येक दिवशी पाच वेळा आपल्या नमाजमध्ये अंशतः कुरआन पठण करतात. दरवर्षी रमजान महिन्यात रात्रीच्या विशेष नमाजमध्ये महिन्याभरात जगातील लाखो मस्जिदींमध्ये संपूर्ण कुरआन पठण होते. पूर्ण कुरआन कंठस्थ असलेल्यांना 'हाफीज' म्हटले जाते. मुस्लिम जगतात यांची संख्या लाखोंमध्ये आहे. जगातील लाखो शाळांमध्ये आणि मदरशांमध्ये दररोज मुलांना कुरआन शिकविले जाते. हे सर्वमान्य आहे की जगातील अन्य कोणताच धार्मिक ग्रंथ इतक्या मोठ्या प्रमाणात वाचला जात नसेल.

कुरआनचे अवतरण कसे झाले? आणि कोणावर झाले?

कुरआनचे अवतरण शेवटचे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर अरबी भाषेत झाले. कारण - तिथले लोक अरबी भाषा बोलत होते. पण भारतातील मुस्लिम अरबीचे पठण करतात आणि उर्दू भाषेत समजून घेतात. तसेच ह्याविषयी दुसरी महत्त्वाची गोष्ट जाणून घेणे आवश्यक आहे की हा ग्रंथ एकाच वेळी लिखित रूपात प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावर अवतरित झाला नाही, तर अभिभाषणाच्या स्वरूपात अवतरित झालेला आहे. हे अवतरण एकदा दोनदा नव्हे तर तेवीस वर्षांत थोडे थोडे करून झाले आहे. वेगवेगळ्या प्रसंगानुरुप अवतरित झाला आहे. याच कारणामुळे हे जाणून घेणे आवश्यक आहे की कोणत्या परिस्थितीत कोणती आयत अवतरली आहे. हा अवतरण-संदर्भ जाणून घेणे, कुरआनला चांगल्या प्रकारे समजून घेणे आवश्यक आहे. अन्यथा कुरआन शिकवणीचा चुकीचा अर्थ निघू शकतो. कुरआन अवतरण जसजसे होत गेले, प्रेषित मुहम्मद (स.) त्यास आपल्या सहकाऱ्यांकरवी लिहवून घेत होते. महत्त्वाची गोष्ट अशी की प्रेषित (स.) हे अशिक्षित होते.

कुरआन मानवजातीसाठी मार्गदर्शक आहे.

कुरआनची शिकवण आहे की एकमेव ईश्वराची उपासना करणे हेच मनुष्याचे जीवनध्येय आहे आणि ईशप्रदत्त जीवनप्रणालीनुसार जीवनयापन करणे आहे. इस्लाममध्ये 'इबादत' (उपासना) ला व्यापक अर्थ आहे. ज्यात मनुष्याच्या सर्व आचारविचारांना (वैयक्तिक व सार्वजनिक) ज्यांच्याशी अल्लाह प्रसन्न होतो. आणि जे अल्लाहला आवडतात, अल्लाह जो आदेश देतो तो करताना एक मुस्लिम ईशोपासना करत अइइसतो आणि जीवनामध्येच साध्य करण्याचा प्रयत्न करत असतो. एकमेव ईश्वरावर ईमान धारण करणे. कुरआन स्पष्टोक्ती आहे,

"तुमचा ईश्वर एकच आहे. त्या परम दयाळू व कृपाळू ईश्वराशिवाय अन्य कोणतचाही ईश्वर नाही." (कुरआन, २:१६३)

संपूर्ण कुरआनमध्ये एकेश्वरत्वाचा अतिमहत्त्वाचा विषय वर्णन करण्यात आला आहे. एकमेव ईश्वरावर ईमान धारण करण्यास सतत स्मरण करण्यात आले आहे. ईश्वर कुरआनमध्ये माणसाला स्मरण करून देत आहे की त्याच्या तोडीचा व जोडीचा अन्य कोणीही नाही किंवा त्याचा कोणी पुत्र नाही आणि सृष्टीत दुसऱ्या अन्य कोणालाही ईश्वर म्हणून मिरवण्याचा अधिकार नाही. सृष्टिनिर्माता ईश्वरच एकमेव उपास्य आहे. निर्मिती निर्माणकर्त्यासमान होऊ शकत नाही. ईश्वराला मनुष्याचे गुणधर्म चिकटविणे व मर्यादित करण्यास कुरआन स्पष्ट नाकारत आहे.

"मानवी इतिहासातील या घटकांमध्ये बुद्धी व विवेक बाळगणाऱ्यांसाठी बोध आहे. हे जे काही कुरआनमध्ये वर्णिले जात आहे या काही बनावटी गोष्टी नाहीत तर जे ग्रंथ यापूर्वी आलेले आहेत, हे त्यांचेच प्रमाणित सत्य आहे आणि प्रत्येक गोष्टीचा तपशील आणि ईमानधारकासाठी मार्गदर्शन व कृपा आहे." (कुरआन, १२:१११)

कुरआनमध्ये मानवी इतिहासातील अनेक बोधप्रद घटनांचा उल्लेख आला आहे. पूर्वी होऊन गेलेले ईशप्रेषित उदा. आदम, नूह, इब्राहीम, मूसा व इसा (अ.) यांचे वर्णन आहे.

कुरआन मनुष्यवाणी नाही. कुरआनची वर्णनशैली अगदी वेगळी आहे. जेव्हा कुरआन मानवजातीला सत्कर्मांचे फायदे दाखवितो आणि कुकर्मांवर त्याला चेतावणी देतो तेव्हबा दोन्ही ठिकाणी कुरआनची भाषा आणि संबोधन अगदी वेगळे असते. पूर्ण कुरआन तीस भागांत (पारा) आहे. त्यात ११४ अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायाला 'सूरह' म्हटले जाते. यापैकी काही अध्याय फारच मोठे आहेत. उदा. सूरह बकरा, तर काही अध्याय अत्यंत लहान आहेत उदा. सूरह अहद. प्रत्येक अध्यायाला एक स्वतंत्र नाव आहे. परंतु ही सांकेतिक नावे आहेत. कारण मोठ्या अद्यायात अनेक विषयांवर चर्चा आलेली आहे. कुरआनच्या श्लोकांना (वाक्यांना) 'आयत' म्हटले जाते.

कुरआनमध्ये आपले जीवन कसे जगायचे, आईवडिलांची सेवा कशी करायची, मुलांना चांगले शिक्षण देण्याचे नियम दाखविले, गरिबांना आधार कसा द्यायचा, पत्नीचे अधिकार, शेजाऱ्यांचे अधिकार, नातेवाईकांचे अधिकार असे खूप काही आपल्या जीवनाबद्दल सांगितले आहे. जसे की कुरआनची ही आयत पाहू या. यात माणसाचे जीवन जगण्याचे मार्गदर्शन आहे.

"अल्लाहने तुम्हाला तुमच्या मातांच्या उदरातून निर्मिले, अशा अवस्थेत की तुम्ही काहीच जाणत नव्हता. त्याने तुम्हाला कान दिले, डोळे दिले, व विचार करणारे हृदय दिले याकरिता की तुम्ही कृतज्ञ बनावे." (कुरआन, २२:७८)

"हा एक ग्रंथ आहे, जो आम्ही तुम्हावर अवतरित केला आहे, जेणेकरून तुम्ही लोकांना अंधाराच्या गर्तेतून काढून प्रकाशाकडे आणावे." (कुरआन, १४:१)

"हे पैगंबर (स.), सावध करा यांना त्या दिवसापासून जेव्हा पृथ्वी व आकाशाचे मूळ रूप बदलले जाईल. आणि सर्वच्या सर्व एकमेव महान शक्तिमान अल्लाहसमोर उघडे पडून हजर होतील. त्या दिवशी तुम्ही अवराध्यांना पाहाल की साखळदंडाने हातपाय जखडलेले असतील, वितळलेल्या शिशाचा पोशाख केलेला असेल आणि आगीच्या ज्वाला त्यांच्या चेहऱ्यावर आच्छादल्या जात असतील. हे अशासाठी घडेल की अल्लाहने प्रत्येक जीवाला त्याने केलेल्या कृत्यांचा बदला द्यावा. अल्लाहला हिशेब घेण्यास काही वेळ लागत नाही." (कुरआन, १४:४८-५१)

हे ते मौलिक सत्या आहे ज्यावर या सृष्टीची व्यवस्था टिकून आहे. आपण या सृष्टीपासून वेगळे नाहीत तर त्यात आपण एका अंशासारखे राहत आहोत म्हणून आपल्या जीवनासाठीसुद्धा हे सत्य एक मूलभूत सत्य आहे. आज हा प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकासाठी आणि जगातील सर्व माणसांसाठी चिंताजनक रहस्य आहे की, आज माणसाच्या जीवनातून शांती आणि सुखचैन नष्ट का झाले आहे? आज राष्ट्र राष्ट्राशी संघर्ष करत आहे. मनुष्य मनुष्यासाठी पशुवत बनला आहे. जगात चहूकडे बलवान शक्तिहीनांना गिळंकृत करत आहे. चहूकडे जगात अत्याचार, धोकाधडी आणि धर्माच्या आड अधर्म माजला आहे. आज मनुष्यस्वभावात आणि चारित्र्यात सत्यता शिल्लक राहिलेली नाही. शेवटी या सर्व दुराचारांचे कारण काय आहे? कारण आहे कुरआनपासून दुरावा आणि त्या एकमेव ईश्वराची आज्ञा न बाळगणे. म्हणून तुम्ही आपले जीवन या चुकीच्या विचारसरणीनुसार व्यतीत करीत राहिला तर त्याचे विनाशकारी परिणाम तुम्हा स्वतःलाच भोगावे लागतील. तुम्ही तुमच्या जीवनात मग कितीही कष्ट, उपासना करा आणि तुमच्या या चुकीच्या जीवनपद्धतीला तुम्ही कितीही सत्य ठरवित राहिलात तरी वस्तुस्थिती अजिबात बदलत नाही. एखाद्या नोकराला पगार देऊन तुम्ही तुमच्या नोकरीत ठेवले असेल तर त्याची वस्तुस्थिती काय आहे? तो तर तुमच्या आज्ञेचे नेहमी पालन करीत राहील, तुमच्या इच्छेनुसार वागत राहील आणि नोकराच्याच सीमेत राहील. बादशाहाच्या राज्यात राहून तुम्ही बादशाहीचा दावा कधीच करू शकत नाही. किंवा दुसऱ्याची बादशाही मान्य करून त्यांच्या आज्ञेचे पालन सुद्धा तुम्ही करू शकत नाही, अन्यथा तुम्ही विद्रोही ठराल आणि विद्रोहासाठीच्या शिक्षेला तुम्हाला सामोरे जावे लागेल.

या उदाहरणांवरून तुम्हाला कङून चुकले असेल की ईश्वराच्या य. अफाट साम्राज्यात आपली स्थिती दासाची आणि तीदेखील एका आज्ञाकारी दासाची आहे. तुम्ही स्वतःच्या मर्जीनुसार चालू लागला तर तोंडघशी पडाल. ईश्वराला जेव्हबा इच्छा होईल आमची बोळवण करील. मातीत मिसळून आपल्या शरीराचा एक एक कण छिन्विच्छिन्न लोईहल. तसेच अग्नीत जळून खाक होईल. तसेच आपले शरीर पाण्यात वाहून माशांचे भोजन बनले असेल किंवा समुद्राच्या पाण्यात विरघळून जाईल. तरीदेखील चहूकडून ईश्वर आपणास (संपूर्ण मानवजातीला) बोलावून एकत्र करील. तेव्हा ईश्वर तुम्हाला विचारील की, तुम्ही माझे दास होता तर बादशाहीचा दावा करण्याचा अधिकार तुम्हाला कोठून मिळाला? माझे दास असून तुम्ही दुसऱ्याचे दासत्व कसे स्वीकारले? हा विद्रोह तुमच्यासाठी कसा उचित ठरला? सांगा, तुमच्यापैकी कुणाजवळ या प्रश्नाचे उत्तर आहे? कोणता वकील आपले कायद्याचे डावपेच वापरून तिथे बचावासाठी मार्ग काढणार? आणि कोणत्या शिफारशीवर तुम्ही भरोसा ठेवता की ज्यामुळे तुम्हाला या विद्रोहाच्या गुन्ह्याची शिक्षा भोगण्यापासून वाचविल?

आपण सर्वजण परीक्षा देत आहोत. आमच्या बुद्धीची, आमच्या हृदयाची, आमच्या कर्तव्याची आणि आमच्या ईश्वरोपासनेची कठीण परीक्षा आहे. आता आमच्यापैकी प्रत्येकाला स्वतः कठीण निर्णय घ्यावयाचा आहे की तो आपल्या निर्माणकर्ता प्रभूचा विश्वासू आणि सच्चादास बनू इच्छितो की नमकहराम दास? हा निर्णय घेण्यास तुम्ही स्वतंत्र आहात. मनुष्याने हा मार्ग स्वीकारायचा की तो मार्ग स्वीकारायचा हे त्याच्या मनावर आहे. कुरआनमध्ये पण अल्लाहने स्पष्ट केले आहे की,

"धर्माच्या बाबतीत कोणतीही जोरजबरदस्ती नाही. सत्य असत्यापासून वेगळे केले गेले आहे." (कुरआन, २:२५६)


 - तबस्सुम परवीन

पुसद


महाराष्ट्रात एकही 'लव्ह जिहाद' खटला नाही!


फोबिया स्वत:च निर्माण झाले किंवा विकसित झाले, तरी त्यांचे एक सामान्य स्वरूप आहे जे केवळ समाजातील एका वर्गावरच परिणाम करत नाही, तर समाजातील प्रत्येक घटकावरदेखील परिणाम करते. अनेकदा लक्ष्यित गटापेक्षा इतरही फोबियाच्या छळाला बळी पडतात. हिटलर आणि युरोपातील ख्रिश्चन लोकांनी ज्यूंविरुद्ध निर्माण केलेल्या शत्रुत्वाने आणि फोबियाने शेवटी ज्यू समुदायावर कहर केला जो दुसऱ्या महायुद्धात जगाने पाहिलेले क्रूर नरसंहार होता. याचा अर्थ असा की ज्यूंविरुद्धच्या शत्रुत्वाचा परिणाम एवढा मोठा युद्धाच्या स्वरुपात पाहायला मिळाला. अमेरिकेतील प्रोटेस्टंट ख्रिश्चनांनी कॅथलिक ख्रिश्चनांविरुद्ध, नंतर ज्यूंविरुद्ध आणि नंतर पुन्हा कृष्णवर्णीय आणि स्थलांतरितांविरुद्ध निर्माण केलेल्या द्वेष आणि फोबियामुळे अमेरिकन लोकांमध्ये अधिक असुरक्षितता निर्माण झाली आहे. जागतिक स्तरावर इस्लामविरोधी उद्योगांनी मुस्लिमांचे जगणे तर दयनीय केले आहे. कारण भीती हा माणसाला होणारा सर्वात मोठा मानसिक छळ आणि दु:ख आहे. एखाद्या व्यक्तीच्या/लोकांच्या मनात जी काही भीती निर्माण होते, ती एक तीव्र मानसिक छळ असते. विशेषत: ज्या गोष्टीची कधीही भीती बाळगू नये अशा गोष्टीबद्दल जर भीती निर्माण होत असेल तर ते संपूर्ण मानवजातीविरुद्ध क्रूर पाप आहे.  बस, रेल्वे, विमान, शाळा-कॉलेज अशा सगळीकडे मुसलमानांना भीतीच्या सावटाखाली पाहण्याची दुर्दशा निर्माण करणारे साहजिकच मुस्लिमांना तणावग्रस्त तर करत आहेतच, पण शेवटी सर्व सार्वजनिक ठिकाणी आनंदाने आणि शांततेने वागण्याच्या माणसाच्या स्वातंत्र्यावर गदा आणत आहेत.

अलीकडच्या काळात बळजबरीने धर्मांतर करण्याविरोधात कडक नियम लागू करणाऱ्या भारतीय जनता पक्षशासित राज्यांमध्ये महाराष्ट्रही सामील होण्याच्या मार्गावर आहे. लव्ह जिहादच्या कथित प्रकरणांमागे प्रथमदर्शनी षडयंत्र असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केला आणि त्यासाठी कायदेशीर तोडगा काढण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचे जाहीर केले. केरळमध्ये काही ख्रिश्चन गटांनी सर्वप्रथम लव्ह जिहादचा वापर केला असला तरी मुस्लिम पुरुष आणि हिंदू स्त्री यांच्यातील आंतरधर्मीय संबंधांचे वर्णन करण्यासाठी उजव्या विचारसरणीच्या गटांनी लव्ह जिहाद हा शब्द लोकप्रिय केला आहे.

राज्यात लव्ह जिहादची एक लाखांहून अधिक प्रकरणे आहेत, अशी माहिती राज्याचे महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली. आंतरधर्मीय विवाहाच्या प्रकरणांचा मागोवा घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला राज्यात कथित 'लव्ह जिहाद'चे एकही प्रकरण सापडले नसल्याने हा दावा खोटा ठरला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये महाराष्ट्र सरकारने लोढा यांच्या अध्यक्षतेखाली आंतरधर्मीय विवाहांवर लक्ष ठेवण्यासाठी समितीची घोषणा केली होती. राज्यातील आंतरधर्मीय विवाहांवर लक्ष ठेवणे आणि अशा विवाहांमध्ये पीडित महिलांना मदत करणे हा या समितीचा उद्देश आहे. यापूर्वी ही समिती आंतरजातीय विवाहांवरही लक्ष ठेवणार होती, मात्र विरोधानंतर हा मुद्दा या पॅनलमधून काढून टाकण्यात आला.

अनेक पक्षांनी या पॅनलला विरोध केला, पण डिसेंबरमध्ये या समितीची स्थापना करण्यात आली. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी महाराष्ट्राच्या महिला व विकास मंत्रालयाला पत्र लिहून समितीसमोर किती प्रकरणे आहेत, याची विचारणा केली असता, समितीकडे आतापर्यंत शून्य प्रकरणे असल्याचे उत्तर त्यांना मिळाले. यावरून लग्नाच्या माध्यमातून धर्मांतराची समस्या असल्याचा दावा दिशाभूल करणारा असल्याचे दिसून येते. ज्या देशात मोजकीच जोडपी श्रद्धेच्या मर्यादा ओलांडतात, त्या देशात सरकारने त्यांच्या हक्कांचे रक्षण केले पाहिजे. गेल्या चार महिन्यांपासून महाराष्ट्रात काही हिंदुत्ववादी गटांनी अलीकडे स्वत:हून जो लब्ह जिहादरुपी फोबिया निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. आतापर्यंत मुंबई, नागपूर, अमरावती, पुणे, वर्धा, बुलढाणा, शिर्डी, श्रीरामपूर, सातारा यासह महाराष्ट्रात ५० हून अधिक ठिकाणी असे मोर्चे काढण्यात आले आहेत. श्रद्धा वालकर (२७) या तरुणीची गेल्या वर्षी दिल्लीत लिव्ह इन पार्टनर आफताब पूनावाला याने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. वालकर हे मुंबईजवळील वसईचे रहिवासी होते.

मात्र विरोधी महाराष्ट्र विकास आघाडीने एक विडंबना निदर्शनास आणून दिली आहे, ती म्हणजे राज्यात भाजप-बीएसएसची हिंदुत्ववादी आघाडी सत्तेत असताना आणि केंद्रात भाजपचे नेतृत्व असताना हे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. ही भाजपची रॅली होती, हिंदूंच्या जनआक्रोशाचे प्रतिनिधित्व करणारी रॅली नव्हती. महाराष्ट्र ही धार्मिक सलोख्यासाठी जगणाऱ्या हजारो वर्षांची भूमी आहे. येथील लोक आणि ज्यांनी आपल्या लोकांचे नेतृत्व केले त्यांनी नेहमीच एकमेकांना साथ देऊन सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या जगणाऱ्यांना सलोख्याचा मंत्र दिला आहे. शांतता ही प्राथमिक गोष्ट जगू इच्छिणाऱ्या सर्व मानवांना आवश्यक आहे. येथे सुद्धा काही जातीय दंगलींद्वारे सामाजिक सलोखा नष्ट करण्याच्या प्रयत्नांना चालना मिळाली आहे. अशा प्रयत्नांमागे छुपे हेतू आहेत हे सर्वश्रुत आहे. अगदी क्षुल्लक खोटेपणा देखील मोठी दरी निर्माण करू शकतो. जर यामुळे जातीय सलोखा बिघडला तर त्याची भरपाई करण्यासाठी नक्कीच पुरेसा वेळ किंवा प्रयत्न होणार नाहीत. आणि होणारे सामाजिक नुकसान कधीचत भरून निघणारे नसेल.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती के. एम. जोसेफ आणि न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांच्या खंडपीठाने गेल्या बुधवारी गंभीर आक्षेप घेतला. द्वेषयुक्त भाषण हे दुष्टचक्र असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, हे उद्गार अतिरेकी घटकांकडून केले जात आहेत आणि लोकांनी स्वत:ला असे करण्यापासून रोखले पाहिजे. राजकारणी जेव्हा राजकारणाला धर्मात मिसळत असतात तेव्हा मोठी समस्या निर्माण होते. ज्या क्षणी राजकारण आणि धर्म वेगळे होतील, त्या क्षणी हे संपेल. जेव्हा राजकारणी धर्माचा वापर बंद करतील, तेव्हा हे सर्व थांबेल. आम्ही नुकत्याच दिलेल्या निकालातही म्हटले आहे की, धर्माशी राजकारण मिसळणे लोकशाहीसाठी धोकादायक आहे.

अशी भाषणे करणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यात अपयशी ठरल्याबद्दल महाराष्ट्रासह विविध राज्य सरकारांविरोधात दाखल करण्यात आलेल्या अवमान याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने म्हटले आहे की, टीव्ही आणि सार्वजनिक व्यासपीठांसह इतरांना बदनाम करण्यासाठी दररोज काही घटक भाषणे करत आहेत. 

खंडपीठाने त्या भाषणांचा संदर्भ देत 'प्रत्येक कृतीची समान प्रतिक्रिया असते', असे नमूद केले आणि "आम्ही राज्यघटनेचे पालन करीत आहोत आणि प्रत्येक प्रकरणातील आदेश हे कायद्याच्या राज्याच्या रचनेतील विटा आहेत. राज्ये वेळीच कारवाई करत नसल्याने आम्ही अवमान याचिकेवर सुनावणी करत आहोत. कारण राज्य नपुंसक, शक्तिहीन झाले आहे आणि वेळेवर कृती करत नाही. जर ते गप्प असेल तर आपल्याकडे राज्य कशाला असावे?" अवमान याचिकेच्या सुनावणीत न्यायालयाने काही कडक निरीक्षणे नोंदवली ज्यात न्यायालयाने म्हटले आहे की, "द्वेषयुक्त भाषणे एका दुष्टचक्रासारखी असतात. एक जण ते बनवेल आणि मग दुसरा बनवेल. जेव्हा आपल्या संविधानाची स्थापना झाली, तेव्हा अशी भाषणे झाली नव्हती. आता बंधुत्वाच्या कल्पनेत तडे येऊ लागले आहेत. थोडा संयम ठेवावा लागेल. अशा प्रकारच्या वक्तव्यांना आळा घालता यावा, यासाठी राज्यसरकारने यंत्रणा विकसित करण्याची गरज आहे. 

महाराष्ट्रात रॅली काढणाऱ्या 'हिंदू समाज' या संघटनेने दाखल केलेला हस्तक्षेप अर्ज सर्वोच्च न्यायालयाने आपल्या वकिलांना विचारला की, 'काही लोकांकडून विधाने केली जात आहेत, जी बहुसंख्य समाजमान्य करत नाहीत. ते नियमितपणे अशा गोष्टी बोलत आहेत ज्यामुळे इतरांच्या प्रतिष्ठेचा अपमान होत आहे आणि त्यांना धक्का पोहोचत आहे. 'पाकिस्तानात जा' अशी विधाने केली जातात. इतर समाजातील लोकांनी या देशाची निवड केली. ते तुमच्या भाऊ-बहिणीसारखे आहेत. त्या पातळीवर जाऊ नका, असे सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २८ एप्रिलरोजी ठेवली असून या याचिकेवर महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितले आहे. देशातील जातीय सलोखा राखण्यासाठी हेट स्पीच बंद करणे ही मूलभूत गरज आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी म्हटले होते आणि हेट स्पीचप्रकरणांमध्ये एफआयआर दाखल केल्यानंतर काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा केंद्र सरकारला केली होती.

शांतता आणि सलोखा ही जर जगायची इच्छा असणाऱ्या माणसाच्या मूलभूत गरजा असतील तर त्या सामूहिकरीत्या नक्कीच साध्य व्हायला हव्यात. जेव्हा एक वर्ग दुखावण्याचा प्रयत्न करतो, तर दुसरा शिवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा असे आजार दूर होत नाहीत. जखमा निर्माण होण्यापासून वाचवण्याची जबाबदारी समाजाची आणि सामाजिक नेतृत्वाची आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. ज्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांतता शिकवायची आहे, त्यांनी जर जखमा निर्माण केल्या तर त्या वेदना आपल्या समाजाला परवडण्यापलीकडे जातील. त्यामुळे जखमा बऱ्या करण्याचे प्रयत्न दुर्दैवाने होत नाहीत. जातीय सलोखा व सहिष्णुता नष्ट करू पाहणाऱ्यांचा उत्साह न वाढवू देता ऐक्य व शांतता कायम राखणे ही सर्व समाजांची एकमेव जबाबदारी बनली आहे.

आता गरज आहे ती जखमांना चिकटून न राहता वेदना भरून काढण्याची. चुकीच्या गोष्टी सुधारणाऱ्यांनी दुरुस्त केल्यानंतर त्या परत मिळवण्यासाठी एकमत व्हायला हवं. दुर्दैवाने आता तसं घडत नाहीये. आधुनिक समाजात नेहमी तीन प्रकारच्या सुधारक शक्ती कार्यरत असतात. एक म्हणजे जनता, दुसरी तरुणाई आणि तिसरी म्हणजे गोष्टींचा गांभीर्याने अभ्यास करण्याची. जोपर्यंत चूक करणारे समोरून त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत नाहीत तोपर्यंत तिघांनाही जागृत होऊन कृती करण्याची वेळ आली आहे. या तिघांनाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशाची शांतता आणि सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ताळ्यावर आणून त्यांची योग्य समजूत काढण्यासाठी नागरी समाजाने नेहमीच अग्रेसर राहिले पाहिजे. आधुनिक जगाची धडधड तरुणांना आणि विद्यार्थ्यांनाच सर्वात जास्त माहिती आहे. अर्थात, त्यांनी किमान सुधारक शक्ती म्हणून काम केले पाहिजे. यामुळे गुंडांना उजेडात आणता येईल आणि शांतता प्रस्थापित होईल. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माविषयी लव्ह जिहाद, भू-जिहाद आणि बळजबरीने होणारे धर्मांतर याविषयीच्या अधिकृत भूमिकेचा सखोल अभ्यास केला पाहिजे. केवळ एका वर्गावर हल्ला करण्याच्या दुसऱ्या गटाच्या प्रयत्नांचा अभ्यास न करता निःपक्षपाती अभ्यास होऊ द्या;  साहजिकच यामुळे आपला चेहरामोहरा बदलेल. भांडणापेक्षा समाजाला नेहमीच ऊर्जा देणारी ही शिकवण आहे.

- शाहजहान मगदुम

8976533404


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget