Halloween Costume ideas 2015
Latest Post

सकाळी 9 वाजण्यापूर्वीच रफीक भाईंचा फोन आला. आज नऊ वाजता एक ख्रिस्ती आश्रमात जायचा कार्यक्रम ठरला होता आणि त्यासाठी माझ्या घराखाली असलेल्या  इस्लामिक सेंटरमध्ये जमायचे ठरले होते. त्यांनी आणि अहमद भाईंनी अगोदर जाऊन कार्यक्रमाची परवानगी घेतली होती. जमाअत-ए-इस्लामी हिंद,मुंब्रा मधील 13 पुरूष आणि 6 स्त्रीयांवर आधारित टीम वेगवेगळ्या खाजगी वाहनांनी ’स्वर्गद्वार आश्रम’ परिसरात पोहोचलो. जवळपास 30 एकर जमिनीवर आधारित आश्रमाची स्थापना तीस वर्षे पूर्वी एका इटालियन भारतीय नागरिकाने केली होती. आज त्या आश्रमात तीन वेगवेगळ्या ख्रिस्ती संस्था स्वतंत्रपणे कार्यरत आहेत. त्यातील एक मुख्य संस्था कुष्ठरोग (ङशिीेीू) असलेल्यांसाठी इलाज, दूसरी रस्त्यावरील बेघर मुलांना (ीीींशशीं लहळश्रवीशप) आश्रय देणे आणि तिसरी एड्स ग्रस्त स्त्रीयांना आणि वृद्ध स्त्रीयांसाठी जोतीज् केअर सेंटर नावाने वृद्धाश्रम चालवत आहेत. स्वर्गद्वाराच्या गेटवर पोहचल्यावर स्त्रीयांची गाडी दुसरीकडे मागच्या बाजूला असलेल्या जोतीज् केअर सेंटरच्या प्रवेशद्वाराकडे पाठवून आम्ही सर्व  पुरूष आणि मुलांच्या आश्रमात पोहोचलो. गेटमध्ये दाखल झाल्यावरच समोर डावीकडे एक मजली लहान इमारत होती. तिच्या तळ मजल्यावर दर बुधवार आणि शनीवारी डाक्टर्सची टीम आल्यावर पेशंटची चाचणी  व औषधपाणी देण्याची जागा होती. तिच्या जवळच पुढे दुसरी एक इमारत होती ज्यामध्ये ऑफीस आणि ग्रंथालय होते. समोर जेवणाचे हॉल होते आणि त्याच्यासमोर उजवीकडे एक छोटे से कौलारू घर होते जे सर्व धर्माच्या प्रार्थनेसाठी निश्चित केलेले आहे. त्याच्या भिंतीवर बायबल मधील काही विशिष्ट श्लोक लिहिलेले होते. झाडांनी झाकलेल्या परिसरात अनेक लोक वेगवेगळी कामे करीत होते. आम्हाला बघताच दोन नन पुढे आल्या आणि स्वागत करुन मग एक भिंत नसलेल्या हॉलमध्ये घेऊन गेल्या. त्यामध्ये दोन्हीकडे जेवणाचे टेबल आणि खुर्च्या लावलेल्या होत्या आणि समोर किचन होते. किचनमधून जेवण बाहेर देण्यासाठी एक खिडकी होती. वरच्या बाजूला लिहले होते की ’जो काम करना नहीं चाहता उसे भोजन नहीं दिया जाये.’ जो काम करने के बिना भोजन खाता है, वह चोर है.’ जो शारीरिक काम कभी नहीं करता वह परजीवी है ’ या विधानांसाठी बायबलचा हवाला दिला गेला होता. शेजारी एका कोपर्यात जाड लोखंडी छोटासा दरवाजा होता ज्यामध्ये टी.वी.लावलेला होता. संध्याकाळी 6 नंतर याच हॉलचा वापर टी.व्ही.पाहण्यासाठी पण केला जातो. आम्हाला घेऊन आलेल्या नन हॉलमध्ये आमच्या जवळच गप्पा मारत बसल्या. मुळात आंध्रप्रदेशमधील राहणार्या त्या दोन्ही नन मागील आठ वर्षांपासून त्या आश्रमात सेवा देत आहेत.विचारल्यावर त्यांनी सांगितले की दोन वर्षानंतर दहा बारा दिवस गावी जाऊन भेटून येतात. बाकी पूर्ण जीवन येशूच्या प्रेमासाठी लोकांच्या सेवेत लावले आहे. थोड्या वेळानं आश्रमातील मुख्य फादर आले. रफिक भाईंनी आम्हा दोघांची एकमेकांशी ओळख करुन दिली. त्यांच्याशी गप्पा मारुन झाल्यावर आम्ही त्यांच्या सोबत त्या सर्वधर्म प्रार्थना घराकडे गेलो. खाली वाकून डोके सांभाळत आखूड दरवाजाने त्या सर्वधर्म प्रार्थना गृहात शिरल्यावर मधील कॉलमवर नजर गेली.तेथे वेगवेगळ्या धर्माचे चिन्ह दिसले.एकीकडे  काही धर्मग्रंथ ठेवलेले आणि भिंतीवर वेगवेगळ्या धर्माची प्रार्थना ज्या दिवशी केली जाते त्याचे वेळापत्रक तर दुसरीकडे ज्याने त्या आश्रमची स्थापना केली त्या इटालियन भारतीयाचा व त्याच्या सोबत अनेक वर्ष सहकार्य करणार्या एका वृद्ध ननचा फोटो लावलेला होता. परत फिरतांना दरवाजाच्या शेजारच्या भिंतीवर 14 नावे आणि पुढे ईसवी सन लिहिलेले दिसले. विचारले ही कोणाची नावे आहेत? फादर यांनी सांगितले की जे लोक इथे मरण पावले ही त्यांची नावे आहेत. त्यांच्या दैनंदिन शेड्यूल्डमध्ये त्यांनी आमच्यासाठी अॅडजेस्ट केलेली कार्यक्रमाची वेळ होताच घंटा वाजवायला एकाने सुरूवात केली. सर्वजण आपआपले काम सोडून हॉलमध्ये जमा झाले. आम्ही पण त्या मल्टीपर्पज जेवणाच्या हालमध्ये पोहचलो. आमच्या पाठोपाठ काहीजण जे लहान निराधार मुलांसोबत गप्पा मारत परिसरातील म्हशी, गाय, बकरे, कोंबडी पालन पाहण्यासाठी गेले होते तेही पोहोचले.
         यावेळी आश्रमातील हॉलमध्ये उपस्थित 53 पुरूष आणि मुलांच्या जमावांना संबोधून रफीक भाईंनी हातात माईक घेऊन कार्यक्रमाविषयी बोलायला सुरूवात केली आणि फादर व मला आपआपल्या खुर्चीवर येवून बसण्याचे आमंत्रण दिले. ईद -उल-अजहाच्या निमीत्ताने आयोजित केल्या जाणार्या आजच्या कार्यक्रमात खरेतर प्रोफेसर जावेद शेख यांना ’कुर्बानी’ या विषयावर आपले विचार मांडायचे होते.पण काही कारणात्व ते हजर राहू शकले नाही आणि ही जबाबदारी माझ्यावर (सैफ आसरे) आली.
    मुसलमान ’कुर्बानी’ का करतात आणि धार्मिक दृष्टिकोनातून आजारपण काय आहे? आणि आजारी झाले तर काय केले पाहिजे? या विषयावर आपले विचार मांडले.
    हा कार्यक्रम संपल्यावर त्यांची जेवणाची वेळ होण्यास 40 मिनिटे उरली होती. या वेळेत मग एकमेकांचा परिचय आणि विचारपूस करून घेण्याचा कार्यक्रम सुरू झाला. एका मुलाला विचारले तुझे कोणी आहेत का? त्याने सांगितले माझे कोणीच नाहिये. मला रस्त्यावरून यांनी येथे आणले आणि आता मी येथेच राहात आहे. हेच माझे आई-वडील आणि हेच माझे नातेवाईक.दुसर्याने सांगितले मला माझी आई येथे सोडून गेली त्यानंतर तीचा मृत्यू झाला म्हणतात. तिसरा म्हणाला माझे आई-वडील तर नाहीत पण नातेवाईक आहेत.मी कधी कधी त्यांना भेटायला जातो. ते आनंदाने आपले खेळायची जागा दाखवत होते. जवळच शाळा आहे तेथे ते शिकण्यासाठी जातात.फादरने सांगितले की आमच्या येथील मुलांना कोणीच आपल्या शाळेत घेत नव्हते. ज्या शाळेत ही मुले जातात ती बनवण्यासाठी आमच्या आश्रमाच्या मुख्य फाऊंडरने 70 % खर्च दिला आणि ही कंडीशन लावली की आमच्या मुलांना मोफत शिकवले जाईल.
    यानंतर काही पुरूषांशी गप्पा मारायला सुरू केली.एका पुरूषाचे हात कुष्ठरोगामुळे वाकडे झालेले होते. त्याने सांगितले की तो तिथे गेली अठरा वर्षे राहात आहे. कोळी होता आणि समुद्रात मच्छी पकडण्यासाठी खूप आतपर्यंत जात असे, त्याने आपल्या मासेमारी शौर्याच्या काही गाथा ऐकवल्या.त्यानंतर म्हणाला की एक दिवस माझ्या पायात जखम झाली आणि मग ती पुढे वाढतच गेली आणि मी आज या परिस्थितीत आहे. येथे माझा ईलाज होत आहे. दुसर्याने सांगितले की तो बरा होऊन घरी गेला होता. त्याला पुन्हा हा आजार सुरू झाला म्हणून परत आला आहे. म्हणतात ना की,’जिंदगी है तो कहानी भी होगी’.
    प्रत्येकाच्या जीवनाची कथा तर असतेच पण त्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो. इथे राहणार्यांच्या कथेची सुरूवात वेगवेगळी असली तरी शेवटी मध्यांतरानंतरची कथा सारखीच होती. आश्रमात आल्यावर शेड्यूल्ड प्रमाणे उठणे,बसणे,जेवणे आणि काहीतरी कष्ट करणे. त्यांच्या कष्टाचा मोबदला पण त्यांना दिला जातो, असे सांगितले. जीवंत लोकांच्या आत्मकथा ऐकतच होतो आणि जेवणाची घंटा वाजली. सर्व मिळून जेवणासाठी पुन्हा हॉलमध्ये एकत्र झालो. यावेळी नन म्हणाल्या की बसण्यापूर्वी प्रथम प्रार्थना होणार. आम्ही सर्व उभेच होतो.शांतता होताच एकजण प्रार्थनाचे शब्द बोलू लागला आणि त्याच्या सर्व तेच शब्द जोरात उच्चारु लागले. खुदा तेरा शुक्रिया, खुदा तेरा शुक्रिया, खुदा तेरा शुक्रिया
    मनात आलं जेवायच्या पूर्वीच शुक्रिया कसे काय? कारण अंतिम पैगंबर सल्ल. यांनी मुस्लिमांना शिकवलेली पद्धत ही आहे की, जेवायला सुरू करण्यापूर्वी, अल्लाहच्या नावाने सुरू करीत आहे जो अत्यंत दयाळू आणि कृपाळू आहे ही प्रार्थना करून  जेवण सुरू करायचे आणि जेवण झाल्यावर,अल्लाहच प्रशंसनीय आहे, ज्याने जेवण आणि प्यायला पाणी दिले,आणि आम्हांला मुसलमान (आपला आज्ञाधारक) बनवलेही  प्रार्थना म्हणून आभार मागायला शिकवले आहे. असो.... अल्लाहचे आभार खायच्या पूर्वी की नंतर, पण मानायचे ही कॉमन गोष्ट सगळीकडेच दिसून येते.  मुंब्रा शहरातच काल आम्ही जेवणाची 100 पाकिटे आणि गुलाब जामुन आर्डर करून 11:00 ला आश्रमात पोहचवण्याची सप्लायरला सूचना दिली होती. त्याने वेळेवर पोहचल्यावर स्त्रीयांसाठी त्यांच्या आश्रमात 35 पाकिटे पाठविली गेली आणि आम्ही उरलेल्या पाकिटांमध्ये आम्ही सर्वांनी जमजम पुलावचा स्वाद घेतला. जेवण आटोपून थोड्या वेळाने आम्ही निघू लागलो तेव्हा आश्रमातील मुख्य फादरने आम्हाला आनंदीत होऊन गळभेट दिली आणि म्हणाले येत जा. तुम्ही आलात त्यामुळे खरच आम्हाला फार छान वाटले. नन आणि सर्व हजर पुरूष व मुलांनी पण -(उर्वरित आतील पान 7 वर)
पुन्हा यायची विनंती केली. रफीक भाईंनी स्त्रीयांच्या आश्रमातील  आमच्या संस्थेच्या स्त्रीयांशी संपर्क करून सांगितले की गाडी पाठवीत आहे. त्यामध्ये बसून बाहेर मेन रोडवर या. त्यांनी सांगितले की तुम्हा सर्वांना येथील स्त्रियांच्या आश्रमातील फादर आणि नन इत्यादींनी भेटायला बोलाविले आहे. आम्ही पुरूषांच्या आश्रमाच्या गेटमधून बाहेर पडून थोड्याच वेळात पाठीमागे त्यांच्या गेटवर पोहचलो. फादर आणि नन बाहेरच वाट पाहात होते. गाडी गेटवर पोहचल्यावर एक ननने गेट उघडले आणि पार्क झाल्यावर गाडीतून उतरून आम्ही त्या आश्रमातील फादर आणि दोन्ही नन यांना भेटलो. त्यांच्याशी थोडावेळ चर्चा केली. त्यांनाही आमच्या मशीदीला भेट देण्याचे आमंत्रण देऊन घराकडे यायला निघालो. रस्त्यातच दुपारच्या जोहर या नमाजची वेळ झाली होती. एक मशीदीजवळ गाडी उभी करून नमाज अदा केली. आणि अल्लाहचे आभार मानले.
    कानामध्ये सतत त्या फादरचे शब्द ऐकू येत होते. तुम्ही कुर्बानी विषयी जे सांगितले ते मला प्रथमच माहीत झाले. मी तर समजत होतो की मुसलमान मांस खाण्यासाठी कुर्बानी करतात. कुर्बानी ही पैगंबर अब्राहमच्या महान जीवानातील अनेक टप्प्यावर केलेल्या त्याग आणि बलिदानासाठी केली जाते हे माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे. यासाठी तर मग ख्रिस्ती आणि ज्यू लोकांनी काय जगातील सर्वांनी मुसलमानांसोबत त्यादिवशी कुर्बानी केली पाहिजे. अब्राहम तर सर्वांसाठी आदर्श आहेत. ईश्वराशी प्रेम कसे असावे हे तर मानवाने अब्राहमकडून शिकावे. मनाने स्वतःलाच प्रश्न केला, किती गरज आहे लोकांपर्यत सत्यधर्माची शिकवण पोहचविण्याची?
    अल्लाह आणि त्याचा पैगंबर येशूला मानणारा एक ख्रिस्ती फादर, त्यांच्या प्रेमापोटी जन्मभर लग्न ,संसार सर्वकाही आनंद सोडून लोकांच्या सेवेत आपले जीवन खर्च करणारे लोक पण इस्लाम विषयी इतके अज्ञानी असू शकतात? मशिदीत बसल्या बसल्याच पुन्हा स्वतःच नकळत कपाळ जमीनीवर पोहचले. त्या अल्लाहशी  स्वतःसाठी,आपल्या सोबतींसाठी आणि आश्रमातील सर्वांसाठी प्रार्थना केली.अल्लाह तूच फक्त महान आहेस. आम्हा सर्वांना तुझ्याकडे येण्याचा सत्यमार्ग दाखव, त्यावर चालायची शक्ती दे, सर्वांना चांगले स्वास्थ दे. जे आजारी आहेत त्यांना त्या आजारपणाच्या परीक्षेतून बाहेर काढ. त्यांचे हे जीवन पण सुखरूप कर आणि अनंत जीवन पण... तुझ्याशिवाय कोणात हे सामर्थ्य नाही...( आमीन.)
 

- सैफ आसरे, मुंब्रा
70451087045

हैदराबाद मुक्तिसंग्राम किंवा मराठवाड़ा मुक्तिसंग्राम हा विषय निघाला की आपण निजामाच्या जुलमी राजवटीतून ,रझाकारांच्या पाशवी जाचातून कसे मुक्त झालो याविषयी भरभरून बोलतो, लिहितो, ठीक आहे याला कुणाची पण हरकत असण्याचं कारण नाही, नसावी. पण...पण... पण... या स्वातंत्र्य लढ्याच्या आड किती दरोडेखोरांनी, चोरांनी, गुंडांनी, बदमाश लोकांनी धुमाकूळ घातला? सर्व सामान्य मुस्लिमांवर अत्याचार केले गेले त्याबद्दल कुणी चर्चा करीत नाही की काही बोलत नाही.
    17 सप्टेंबर ला एकच बाजू मांडली जाते. एक धर्म विशेष समाजाला आरोपीच्या पिंजर्यात बंदिस्त करण्याचे प्रयत्न केले जातात. अंबाजोगाई सारख्या शांततावादी शहरामध्ये जेथे रझाकारानी निमूटपणे शस्त्रे खाली ठेवली होती, कुठेही भारतीय सैनिकांना प्रतिकार झालेला नव्हता, त्या अंबाजोगाईत सर्वत्र राज्य प्रशासन कोलमडलेले होते. अधिकारी, पोलिस, रझाकार सारे पळून गेलेले होते. कुठेच कोणाचा पत्ता नव्हता. काही ठिकाणी गुंडांचे राज्य चालू होते. मुस्लिमांच्या कत्तली झालेल्या होत्या. लूटालूट, जाळपोळ चालू होती. याची असंख्य उदाहरण आहेत की हिंदूंनी पुढे येऊन हजारो मुस्लिमांची अब्रू,जीव वाचविला याला मीच काय कुणीही नाकारू शकत नाही. याच्याविषयी गौरवाने बोललं गेलं पाहिजे. लिहलं गेलं पाहिजे, यात दुमत नाही, पण निजामाच्या हैदराबाद संस्थानात एकूण 16 जिल्ह्यात 22,00 गाव होती. खेड्यापाड्यातून एकेकाळी -(उर्वरित लेख पान 7 वर)
जहागीरदार, जमीनदार असलेली मुस्लिम कुटुंबे रस्ता दिसेल तिकडे पळत होती. हयातभर परद्याच्या बाहेर न आलेल्या स्त्रियांना चिखलात, पावसात, नदीच्या पुरात जीव घेऊन अब्रू वाचविण्यासाठी आणि जीव वाचविण्यासाठी लपावे व पळावे लागत होते. त्यांचा कुणीही त्राता नव्हता. अंबाजोगाई गावात खूपच लुटालूट झालेली होती. गुंड रात्रींचा फायदा घेऊन मुस्लिम मोहल्लयात जावून धुमाकूळ घालीत होते.
या सर्व परिस्थितीमध्ये मुस्लिम स्त्री-पुरुषांची दैना, त्यांची गावोगावी पडून असलेली मोकळी घरे, मोकळया घरातील मोकळी पडलेली संपत्ती हे सर्व भयंकर होते.
    केजचा अनुभव तर अत्यंत हृदय द्रावक होता. तेथे अफाट लुटालूट झालेली होती. बारव भरून प्रेते साठलेली होती. घराघरातून आणि गल्लीगल्लीतून हुंदके, आक्रोश या शिवाय कानावर काही येत नव्हते. एके घरी एका सासूने आपल्या 13 सुनांना आणून उभे केले. त्यांचे नवरे यामध्ये मारले गेले होते. ती स्फुंदुन-स्फुंदुन, आम्ही रझाकार होतो का? असा प्रश्न करीत होती. अश्रूंचे पाट वाहात होते आणि तिने सवाल केला या 13 जणीचे काय करू? या प्रश्नाचे कुणाजवळच उत्तर नव्हते. साश्रुनयनाने मान खाली घालण्याशिवाय कोणी काय करू शकणार होते?  या दृश्याने हृदय पिळवटून निघालेले नसेल असा कुणी असणे शक्यच नव्हते.
    येळंब आणि नांदूरघाट जवळच्या भागाला अमळाचा बरड म्हणतात. कळंबचे एक अति श्रीमंत कुटुंब महंमद शरीफ कळंब सोडून आश्रयासाठी फिरत होते. फिरत-फिरत या बरडावर आले. महंमद शरीफ कळंबचे कपड्यांचे व किराणाचे एक मोठे व्यापारी होते. लग्नाचे बसते मानवतनंतर त्यांच्याकडेच बांधले जातं. ते मोठे जमीनदार व सावकार होते. या कुटुंबात एकूण 13 माणसे होती. जीव वाचविण्यासाठी बरोबर ऐवज व पैसे घेऊन ते लोक फिरत होते. पैसे घ्या पण जीवदान द्या, असा त्यांचा घोषा होता. पण त्या पैश्यानेच त्यांचे प्राण धोक्यात आणले, प्रत्येका जवळ 1- 1 लाखाचे धन होते. हे सर्वच्या सर्व अमळाच्या बरडावर कापले गेले. आवरगाव, चिंचोली माळी आणि केजच्या गुंडानी त्यांना लुटले आणि खलास केले.
मराठवाड्यात या वेळपर्यंत झालेल्या लुटीमध्ये ही सर्वात मोठी लूट होती आणि ही लूट या भागातील आजूबाजूच्या प्रतिष्ठित लोकांनी केली होती. चिंचोली माळी व केजमध्ये त्यात धागेदोरे होते. आवरगावच्या गुंडांचा त्यात हात होता.
    वरील घटना या ऐकीव नाहीत. याचे लेखी पुरावे आहेत माझ्याकडे आणि हे लिहिणारे कुणी मुस्लिम नसून अंबाजोगाईतील प्रतिष्ठित आदरणीय स्वतंत्रतासेनानी आहेत. ह्या संवेदनशील लोकांनी जर हे त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवले नसते तर हे सत्य कधीच समोर आले नसते.
या दोन तीन घटनाच मुख्यतः मी इथे मांडल्या. अशा हजारो घटनांचा उल्लेख करता येईल. धारूर, उस्मानाबाद, नांदेड येथे प्रचंड प्रमाणात मुस्लिम समाजाचे शिरकाण करण्यात आले. संपत्ती लुटली गेली, हजारोंच्या संख्येने लोक देशोधडीला लागले. या पोलीस एक्शन वास्तविक पाहता ते मिलिट्री अॅक्शनमध्ये सरकारी आकड्यांचा जर आपण विचार केला तर जवळपास 40,000 हजार निष्पाप,माणसं मारली गेली होती असे हे आकडे सांगतात, कोट्यावधीची त्यांची संपत्ती लुटली गेली. हे सर्व काही रझाकार नव्हते.
    पण कुणी यांच्या विषयी चिकार एका शब्दाने पण बोलत नाही की लिहीत नाही. हैदराबाद मुक्तीसंग्राम वर लिहल्या गेलेल्या कोणत्याही इतिहासाच्या पुस्तकात तुम्हांला यावर एक ओळ सुध्दा सापडणार नाही. गुजरातलाही लाजवेल अस हे हत्याकांड आपल्या मराठवाड्यात घडलेले आहे. हा इतिहास आहे. यावर अभ्यास करून संशोधन करून अजून प्रकाश टाकता येईल. 17 सप्टेंबरची ही पण एक बाजू आहे जी मला आपल्यासमोर आणायची होती, मांडायची होती.


- मुजीब काझी
अंबाजोगाई 
80875 62875

स्वतःचा आवाज हरवून, गुलामीची गोडी वाढलेल्या या समकालात जगण्याची उमेद बारगळत चालली आहे. दररोज बदलणारे इंधनाचे चढे दर, सणासुदीच्या मार्केटींग मधून पळवापळवीच्या हरामबाता, समर्थन संमोहनातून छोट्या मुलांपर्यंत पाजलेली कट्टरतेची लस यांचा अतिरेक झाला आहे.
    प्रश्नांचा ढीग समोर घेऊन, उत्तरांच्या शोधात भटकणारे बुद्धिजीवी फोल ठरताहेत. बोलघेवड्या, उतावीळ पोपटपंची प्रतिक्रियांनी वेळ मारून नेली जातेय. म्हातारी मरतच आहे, काळ सोकावतोच आहे. दुःख मांडण्याची आणि सुखासाठी  भांडण्याची इच्छाशक्ती लुळीपांगळी करत व्यवस्था सुखरूप सर्वताबा घेत आहे.
    अशा व्यवस्थेत हस्तक्षेप न करता ’चांदण्यात रमणार्या’ कलेची निर्मिती होणं म्हणजे या फॅसिस्ट व्यवस्थेला पुरक असणं ही साधी गोष्ट आज एकूण साहित्य- संस्कृतिकतेला कळत नाही. याचाच अफसोस वाटतोय. मूळ मानवी मुल्यांना डावलून वेगळ्या चुली मांडून, वादांची नावे भांडून, केवळ आत्मसमाधानात रमणार्या या पुरक व्यवस्थांची किमान सकारात्मक चिकित्सा व्हायलाच हवी. माध्यमं आणि मेंदूला आलेली सूज यामुळे टेस्ट ट्युब बेबी किंवा प्रिमॅच्युअर डिलीव्हरी वा सरोगसीसारख्या टॅग्समधून प्रसवणारी कोणतीही कला ही पिढी  बर्बाद -(उर्वरित लेख पान 7 वर)
करणारी ठरत आहे. कथा, कविता, साहित्य, नाट्य, संगीत नृत्य चित्र शिल्प या माध्यमांनी किमान पक्षी ’डिग्नीटी ऑफ ह्युमॅनिटी’ चे संगोपन करावं की केवळ कट्टरतावादी धर्मांध उजव्या-डाव्या मुल्यांच पोषण करावं? सकाळी उठल्यापासून उशिरा निजेपर्यंत साथीचा मोबाईल पसरवत राहतो अफवांचा कचरा, पुराव्यापुरातन सनातन धार्मिक अंधश्रद्धांनी वाटोळं करत राहतात. चॅनल्समधून पुस्तकांच्या पानापानांतून विषारी शब्दांचा विखार ढासळवत जातोय. विवेकाची घरं... हंगामी संवेदना मांडून मिळवल्या जाताहेत टाळ्या आणि मृत्यूशोकावर रचलं जातयं नृत्य-संगीत आणि मुल्यमानाची ऐसीतैशी करून मिळवला जातोय बांडगळी मोठेपणा. जिथे-तिथे सर्वत्र मुल्यात्मक कलानिर्मिती हा मानवी बुद्धीचा आविष्कार पण मुल्यांचं अवमुल्यन केवळ जाणीवपूर्वक करण्याच्या वीडा बहुतेक सर्वत्र सर्वांनी उचललेला दिसतो. साहित्य, कला तत्वज्ञान, विज्ञान यातून मानवतेचं उन्नयन व्हावंच, पण यातला गोतावळा व्यवस्था समर्थक ठरला की सामान्य मानवी समुहाचे दारिद्रय, गुलामी, दुःख वेदना तशाच प्रभावी राहतील यात शंका नाही. कुठलीही कला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, अभ्यूदयाची आशा प्रसवात असते. पाब्लो पिकासो आपल्या कृतीबद्दल सहज बोलून जातो. माझे कुठलेही चित्र केवळ सजावट, शोभेसाठी नाहीच तर ते साधन आहे, अविवेकाच्या विरोधातील शस्त्र आहे. अलिकडच्या काळात विशेषतः संमोहीसनातन संघी व्यवस्थेच्या काळात या कलांचे शस्त्र बोथट झाले आहे. ज्यांनी कुणी कलेचा वापर करून समाजाबद्दलाचा किंवा व्यवस्थेत हस्तक्षेप करण्याचं थोडं धाडसं केल त्यांना पुसून टाकलं गेलं. आम्ही निषेध मोर्चा अनागोंदी यातच गुरफटून रहिलो. येणार्या पिढींची भाषा आणि वेदनेला नव्या लिपीत व्यक्त करण्यासाठी सुसज्ज होण्याची हीच वेळ आहे.
    टाळ्या मैफीली, धनाचे पुरस्कार, पेपरातील कात्रणी बातमी यापेक्षा येणार्या पिढीने कलावंत-कलाकाराला मुल्यस्थापना करणारा म्हणून ओळखावं, यासाठी हमी दिली  पाहिजे. सभासंमेलने मेळावे कार्यक्रम सारखे इव्हेंट केवळ इव्हेंट्स न राहता मूल्यकेंद्रीत मुव्हमेंट कसे होतील याचा विचार करावयास हवा. प्रतिगामी, क्रुरतेचा काळ स्वतःहून ओढवून घेतला की बुद्धीचा गंज ’मी’ पणाने गडद होतो. मुठभर चांगलं काम करणार्यांच्या ’मी’चा ’आम्ही’ होणे आज गरजेचे आहे. आम्हीचा हा प्रवास बळकट करण्यासाठी मूलभूत दुव्यांची पायवाट तयार होतेय आता यावरचे प्रवासी वाढले पाहिजेत.
    ’येरे माझ्या मागल्या’ चे माथी मारलेले पुराणगीत बाजूला सारून नवविवेकी मुल्यांची, मानवी प्रेमस्नेहाचे दृढीकरण करण्यासाठी... बहरून येण्यासाठी स्वतःप्रत गाडून घेणे, समर्पित होण्याची ताकद येत राहो...
    ”मैं अकेला चला था” वगैरा ऐवजी आम्ही सारे निघालो सामूहिक बळाची नित्तांत गरज आहे.’
    कला ही क्रांतीच्या टप्प्यावर अर्थपूर्णता आणत असते. मर्यादेत हे सार मांडत असताना दाखल उदाहरणांची साखळी मी जोडणार नाही, पण अत्याचार, दारिद्रयाच्या भयानवास्तवाला करकचून बांधण्यासाठी निःसत्व होणार्या समुहासाठी ’मानव अस्मितेचा’ मुद्दा सहजसुंदर संपन्न होईल. यास्तव शब्दांची किमान मजबूत सांगड मांडत राहीन.
    ”आम्ही घरीधन शब्दांचीच शस्त्रे’ म्हणत आता समजेच्या सत्याला परजत राहूया. एखादा पाब्लो, एखादे तुकोबा आणि डॉ. अल्लामाला अशावेळी किमान आठवूया.
    ”फतवा है शेख का ये ़जमाना कलम का है
    दुनिया में अब रही नहीं तलवार कारगर”


- साहिल शेख
कुरूंदवाड (कोल्हापूर) - 8668691105

थोडीसी पी हमने थोडी उछाल दी
इस तरह हमने जवानी निकाल दी
    ही वर्षापूर्वी माझा एक मित्र जद्दा विमानतळावर फक्त या कारणासाठी अटक झाला होता की, त्याच्या लगेजमध्ये खोकल्याच्या औषधाची बाटली सापडली होती व तिच्यामध्ये अल्कोहोलची अल्पशी मात्रा होती. पृथ्वीच्या पाठीवर नशाबंदी फक्त एकदाच यशस्वी झाली आणि ती प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांच्या आदेशाने झाली. आजही मक्का आणि मदिनामध्ये कुठल्याही प्रकारचा नशा करणे शक्य नाही. 
    दारू किंवा तत्सम नशा आणणार्या पदार्थांना इस्लाममध्ये हराम घोषित करण्यात आले आहे. काही श्रद्धावान मुस्लिम आजही अल्कोहोल युक्त औषधी घेत नाहीत. नशा निषिद्धतेची जन्मजात देणगी लाभलेल्या मुस्लिम समाजातही अलिकडे नशा करणार्या लोकांची संख्या हळूहळू वाढत आहे. शरई जीवनशैलीकडे दुर्लक्ष करून चंगळवादी जीवनशैलीकडे आकर्षित होत असल्यामुळेच ही वाढ होत आहे. चंगळवादी जीवनशैलीच्या मुलभूत रचनेतच ’नशा’ सामिल आहे म्हणून मुस्लिम व मुस्लिमेत्तर तरूण नशेच्या आहारी मोठ्या प्रमाणात जात आहेत.
    भारतीय मुस्लिमांमध्ये तुलनेने नशा करणार्यांची संख्या कमी आहे. अनेक अशा मुस्लिमांना मी वैयक्तिकरित्या ओळखतो ज्यांनी आपले दारू विक्रीचे परवाने स्वेच्छेने सरकारला परत करून तौबा केलेली आहे. एकीकडे श्रद्धावान मुस्लिम हे कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता नशेपासून स्वयंस्फूर्तीने दूर राहतात तर दुसरीकडे राज्यसरकारे नागरिकांना यापासून लांब ठेवण्यास फारशी उत्सुक नसतात. दरवर्षी उत्पादन शुल्क विभागाला दारू विक्रीचे टार्गेट वाढवून दिले जाते. विशेष म्हणजे फारसे प्रयत्न न करता हे   -(उर्वरित लेख पान 2 वर)
टार्गेट पूर्ण केले जाते. 1 एप्रिल 2016 रोजी नितीशकुमार यांनी बिहार राज्यामध्ये दारूबंदीची घोषणा केली. महाराष्ट्राच्याही वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून दारूबंदी लागू आहे. गुजरातमध्ये तर अनेक दशकांपासून दारूबंदी लागू आहे. मात्र वर नमूद प्रत्येक ठिकाणी तितक्याच मुबलक प्रमाणात दारू मिळते, जितकी की ती दारूबंदी नसलेल्या ठिकाणी मिळते. उलट दारू बंदी लागू असलेल्या ठिकाणी सुरक्षा कारणांमुळे दारू घरपोच आणून दिली जाते.
    मागे मुंबईच्या मालाड मालवनीमध्ये विषारी दारू पिल्याने झालेल्या मृत्यूकांडानंतर दारूबंदीची मागणी केली गेली तेव्हा सरकारची बाजू मांडतांना तत्कालीन उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले होते की, ”अल्कोहोल निर्मितीपासून मिळणार्या 18 कोटीच्या महसूलावर पाणी सोडणे सरकारला शक्य नाही.” म्हणजे हजारो लोकांचा बळी घेणार्या, लाखो लोकांच्या जीवनावर वाईट परिणाम करणार्या, शेकडो कुटुंबांना देशोधडीला लावणार्या दारूला फक्त यामुळे तिलांजली देता येत नाही की, त्यामुळे राज्याला 18 हजार कोटींचा महसूल मिळतो. तरी सुद्धा आपण महाराष्ट्र हा पुरोगामी, कल्याणकारी राज्य असल्याचा अभिमान बाळगतो. ही किती मोठी स्वयंफसवणूक आहे, याचा निर्णय वाचकांनी स्वतः करावा.
    फक्त एका राज्यात 18 हजार कोटींचा महसूल मिळतो तर देशातील एकूण 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेशात किती महसूल मिळत असेल याचा सहज अंदाज करता येईल व यामुळे देशातील नागरिकांच्या आरोग्याला किती नुकसान होत असेल याचाही अंदाज करता येईल.
    जगात सर्वाधिक अल्कोहोल निर्मिती व त्याचा वापर भारतात केला जातो, असे एका सर्वेक्षणातून पुढे आलेले आहे. केरळ देशातील पुढारलेल्या राज्यांपैकी एक राज्य. 2015 च्या आकडेवारीनुसार या राज्यात सरासरी 8 लिटर प्रमाणे सर्वाधिक दारूचे सेवन केले जाते. महाराष्ट्रात तर अन्नधान्याचा तुटवडा इतका आहे की, मेळघाट व पालघरमध्ये शेकडो मुले अन्नाअभावी दरवर्षी मरतात तरी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने 2009 साली मका, ज्वारी व बाजरी सारख्या जीवनावश्यक जिन्नसांपासून दारू निर्मितीची परवानगी दिलेली आहे. आता राज्यात उत्पादित होणार्या 45 पैकी 23 धान्यांपासून दारू निर्मिती करणार्या उद्योगांना सरकारी मंजूरी मिळालेली आहे. यातील बहुतेक उद्योग बड्या राजकारण्यांचेच आहेत, हे ही ओघाने आले.
    2015 साली माजलगाव जिल्हा बीड येथे बंदोबस्तात असतांना माझ्या एका शिवसैनिक मित्राने सांगितले होते की, माजलगाव येथे दरवर्षी गणपती उत्सवात किमान 500 तरूण नव्याने दारू पिण्यास सुरूवात करतात. भारतात किमान 21 टक्के पुरूष नियमित दारू पितात, अशी माहिती विकीपिडीयावर उपलब्ध आहे. डॉ.अभय बंग यांच्या म्हणण्यानुसार 40 टक्के पुरूष दारू पितात. महाराष्ट्र शासनाने एक क्रांतीकारी निर्णय घेत 2016 साली मद्यपिंचा कोटा दोन बाटल्यापासून 16 बाटल्यापर्यंत वाढविलेला आहे. शिवाय, 100 गावात 10 अधिकृत दारूची दुकाने असावीत, या नियमाचेे उल्लंघन करत उरलेल्या 90 गावात याच दुकानातून उघडपणे अवैध पुरवठा केला जातो व त्याकडे उत्पादन शुल्क विभाग व पोलीस फारश्या गांभीर्याने पाहत नाहीत.
    2016 मध्येच बेंगलूरच्या राष्ट्रीय मेंदू व मानस संस्थेंने अभ्यासाअंती असे घोषित केले होते की, भारतातील सर्व राज्यांचे दारूचे एकत्रित वार्षिक उत्पादन 216 अब्ज रूपये तर दारूमुळे उत्पन्न झालेले नुकसान 244 अब्ज रूपये एवढे होते. एका अंदाजाप्रमाणे रस्त्यावरील निम्म्यापेक्षा जास्त अपघात दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे होतात. शिवाय, निम्म्यापेक्षा जास्त फौजदारी गुन्हे, मग ते चोरीचे असो, खुनाचे असोत की बलात्काराचे, साधारणपणे नशेमध्येच केले जातात.
    महाराष्ट्र सरकारचे दोन जनहितार्थ घेतलेले निर्णय म्हणजे एक मुबलक दारू पुरवठा व दूसरा डान्सबार. हे आगामी काळातील युवा पिढीपैकी अनेकांना गारद करण्यासाठी पुरेसे आहेत. राज्यात उत्पादन शुल्क विभाग व दारूबंदी विभाग दोन्ही अस्तित्वात आहेत. म्हणजे एकाच राज्यात एक विभाग दारूविक्री व सेवनांचे परवाने देतो व दूसरा विभाग दारू पिऊ नका असे सांगतो. यापेक्षा मोठा विनोद तो कोणता.
    समान नागरी कायदा देशात लागू करावा म्हणून हिरहिरीने ओरडणारे लोक, घटनेच्या चौथ्या भागातील 44 व्या अनुच्छेदाचा दाखला छातीठोकपणे देतात. मात्र ह्याच लोकांना त्याच चॅप्टरमधील 47 व्या अनुच्छेदाचा सोयीस्करपणे विसर पडतो. ज्यात म्हटले आहे की, औषधी व औद्योगिक कारण वगळता अल्कोहोलची निर्मिती राज्यांनी बंद करावी. आता वाचकांनी स्वतः निर्णय घ्यावा की, समान नागरी कायदा न केल्याने होणारे समाजाचे मोठे नुकसान आहे की दारूबंदी न केल्याने होणारे नुकसान मोठे आहे.
    बरे! ही चर्चा सर्व वैध दारूची आहे. याशिवाय, गावागावातून होणारी अवैध दारू निर्मिती व तिचे सेवन या संबंधीची कुठलीच आकडेवारी उपलब्ध नसल्याने ह्याचा हिशोबच वेगळा. त्यापासून होणारे नुकसानही आकलनापलिकडचे.
    शरद पवारांना गुटखा खाल्यामुळे तोंडाचा कर्करोग झाल्यामुळे महाराष्ट्रात गुटखा बंदी करण्यात आली. ती किती परिणामकारकपणे राबविली जाते, यासाठी जवळच्या पानपट्टीवर जावून गुटखा घेवून अनुभव घेता येतो. गुटखाबंदीमुळे अन्नभेसळ व औषध प्रशासन तसेच पोलीस अधिकार्यांचा फायदा झालेला आहे, जनतेचा नाही. एरव्ही एमआरपीवर मिळणार्या गुटख्याच्या पुड्या आता बंदीमुळे वाढीव दरांमध्ये घ्याव्या लागतात.
    याशिवाय, एनडीपीएस अॅक्ट ज्याला मादक पदार्थ विरोधी कायदा म्हटले जाते, या कायद्याअंतर्गत येणार्या पदार्थांची दैनिक उलाढाल आपल्या देशात अब्जावधी रूपयांची आहे. यात एमडी, कोकेन, हेरॉईन, गांजा, एलएसडी, म्याऊं, मारफाईन इत्यादी महाघातक पदार्थांचा समावेश होतो. हा नशा, ”अॅव्हान्स्ड्” नशा समजला जातो. या पदार्थांची विक्री अभिजात वर्गात केली जाते. मात्र मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमधील महाविद्यालय आणि विद्यालयांपर्यंत या पदार्थांनी पाय पसरलेले आहेत. नियमितपणे होणार्या रेव्ह पार्ट्या, पब्समध्ये होणार्या उच्चभ्रू लोकांतील पार्ट्या ह्या ड्रग्सशिवाय होऊच शकत नाहीत. त्यांच्या लेखी दारू पिणे हे प्रतिगामीपणाचे लक्षण होऊ पाहत आहे.
    दारू असो का इतर अंमलीपदार्थ त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्याचे पुण्यकर्म चित्रपटांनी केलेले आहे, यात वाद नाही. रील लाईफमध्येच नव्हे तर रिअल लाईफमध्ये सुद्धा या पदार्थांचे सेवन करून अनेक चित्रपट तार्यांनी आपल्या समाजासमोर मोठा आदर्श ठेवलेला आहे. दारूबंदी कायद्याखाली जरी कडक शिक्षेची तरतूद नसली तरी एनडीपीएस कायद्याखाली अतिशय कठोर शिक्षेची तरतूद आहे. या पदार्थांचा शोध घेण्यासाठी आणि यांच्या विक्रीचे जाळे मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र पोलीस विभागामध्ये एटीएसप्रमाणेच वेगळा विभाग स्थापन केलेला आहे. या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशिष्ट अशी पद्धत ठरवून देण्यात आलेली आहे. एवढेच नव्हे तर अशा खटल्यांची सुनावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील सत्र न्यायालयात विशेष न्यायाधिशांच्या नेमणुका सुद्धा करण्यात आलेल्या आहेत.
    म्हणजे विशेष कायदे, विशेष पोलीस आणि विशेष न्यायालये असतांनासुद्धा दिवसेंदिवस नशा करणार्यांचे प्रमाण वाढतच आहे, हे जागतिक सत्य आहे. हे असे का घडत आहे? तर त्याचे उत्तर उर्दू कविंनी मागेच देऊन ठेवलेले आहे.
1.    लुत्फ-ए-मय तुझसे क्या कहूं नादां
    हाय कंबख्त तू ने कभी पी ही नहीं
2. तुम क्या जानो शराब कैसे पी जाती है
   खोलने से पहले बोतल हिलाई जाती है
फिर आवाज लगाई जाती है, आ जाओ टूटे दिलवालो
यहां दर्द-ए-दिल की दवा पिलाई जाती है
    साधारणपणे समाजामध्ये एक समज प्रचलित आहे की, दुःख विसरण्यासाठी लोक नशा करतात, पण हे खरे नाही. पोलीस अधिकारी म्हणून मी नशा करणार्या अनेक लोकांना जवळून पाहिलेले आहे. त्यावरून एक कताअ मीच लिहिलेला आहे. तो खालीलप्रमाणे
पहले पीये थे गम में, कल था खुशी का मौसम, फिर आज घटा छाई है, हमने हर रंग में पीने की कसम खाई है
    वाढत्या नशेची नक्की कारणमिमांसा जरी करता येत नसली तरी समाजात सोशल ड्रिंकिंगला जी प्रतिष्ठा प्राप्त झालेली आहे हेच नशेचे प्रमुख कारण आहे. मित्रांच्या संगती आणि आग्रहामुळेच बरेच लोक पहिल्यांदा मद्याचा पेला तोंडाला लावतात.
    इस्लाममध्ये नशाबंदी संबंधीचे आदेश
    1. ” हे (लोक) तुम्हाला दारू आणि जुगाराविषयी विचारतात. त्यांना सांगा की दोन्हीमध्ये मोठा अपराध आहे. जरी त्यामध्ये लोकांसाठी काही लाभ आहे परंतु, त्यांचा अपराध (नुकसान) त्यांच्या लाभापेक्षा अधिक मोठा आहे.”(सुरे बकरा आयत नं. 219)
    2. ” सैतानाची तर अशी इच्छाच आहे की, दारू व जुगारामध्ये तुमच्यात शत्रुत्व व कपट निर्माण करावे आणि तुम्हाला अल्लाहचे स्मरण व नमाजपासून रोखावे. मग काय तुम्ही या गोष्टींपासून अलिप्त रहाल?” (सुरह अल्मायदा आयत नं.91).
    3. ”खजुराच्या झाडापासून व द्राक्ष्यांच्या वेलीपासून आम्ही एक पदार्थ तुम्हाला देतो. ज्यापासून तुम्ही मादक पदार्थही बनविता आणि शुद्ध अन्नदेखील. निश्चितच त्यांच्यात एक संकेत आहे बुद्धीचा उपयोग करणार्यांसाठी” (सुरह अल्नहल आयत नं. 67)
    कुरआनमधील वरील आदेशांचे अवलोकन केल्यानंतर आपण हे पाहू की प्रेषित सल्ल. यांनी या संबंधी काय आदेश दिलेले आहेत.
    1. प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी फरमाविले की, ” प्रलयाच्या चिन्हांपैकी एक चिन्ह हे असेल की, दीनी (इस्लामिक) ज्ञान काढून घेतलं जाईल आणि उघडपणे दारू सेवन केली जाईल तसेच व्याभिचार केला जाईल” (सही बुखारी ह.क्र. 80).
    2. जेव्हा सुरह बकरा मध्ये व्याजाला निषिद्ध करणार्या आयतींचा साक्षात्कार प्रेषित सल्ल. यांना झाला तेव्हा त्यांनी मस्जिदीमध्ये प्रवेश केला आणि त्या आयातीचे पठन लोकांसमोर केले. त्यानंतर फरमाविले की, ” दारूचा व्यापारही हराम आहे” (सही बुखारी हदीस क्र. 459).
    3. अब्दे कैस या कबिल्याचे एक शिष्टमंडळ प्रेषित सल्ल. यांना भेटायला आले होते व त्यांनी प्रेषित सल्ल. यांना काही उपदेश करण्याची विनंती केली. तेव्हा प्रेषित सल्ल. यांनी सांगितले की, ” मी तुम्हाला चार गोष्टी करण्याचा आणि चार गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवण्याचा आदेश देतो. 1. एक अल्लाहवर श्रद्धा ठेवा. 2. अल्लाहशिवाय दूसरा कोणीही पूजनीय नाही याची साक्ष द्या 3. मला अल्लाहचा प्रेषित माना. 4. नमाज कायम करा, जकात अदा करा आणि युद्धात मिळालेल्या वस्तूंचा पाचवा हिस्सा बैतुलमाल (सार्वजनिक कल्याण निधी) मध्ये जमा करा. आणि 1. तुनबडी 2. खंतुम 3. खसार आणि 4. नखीर च्या वापरापासून दूर रहा. (लक्षात घ्या या चारही वस्तू त्या काळी दारू तयार करण्यासाठी वापरात आणल्या जात होत्या) (बुखारी हदीस नं.523).
    जगातील कुठल्याही व्यवस्थेमध्ये नशाबंदी संबंधी एवढी कडक भूमिका घेण्यात आलेली नाही. जेवढी इस्लामी व्यवस्थेमध्ये घेण्यात आलेली आहे. दुसर्या व्यवस्थांमध्ये नशेचे उलट समर्थन करण्यात आलेले असून, त्याला प्रोत्साहित करण्याची भूमिका घेण्यात आलेली आहे. इस्लाम सर्व मानवतेच्या कल्याणासाठी अवतरित झालेला असल्यामुळे ही भूमिका त्याच्या मूळ हेतूशी सुसंगत अशीच आहे. किमान मुस्लिमांनी तरी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी सूर्यप्रकाश हवा, पाण्याची जेवढी गरज आहे तेवढीच इस्लामी आदेशांच्या पालनाची गरज आहे. ज्याअर्थी इस्लामने नशा हराम केलेला आहे त्याअर्थी कुठलाही किंतू मनात न बाळगता प्रत्येक मुस्लिमाने नशेपासून स्वतः तर लांब रहावेच शिवाय, प्रत्येक देशबांधवाला नशेपासून दूर राहण्यासंबंधी शक्य तेवढे प्रयत्न करावेत. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, प्रत्येक भारतीयाला नशेपासून दूर राहण्याची सद्बुद्धी मिळो. (आमीन.)


- एम.आय.शेख
9764000737

महिलांवरील लैंगिक अत्याचार हा मुद्दा सध्या देशभर नव्हे तर जगभरात सर्वत्र गाजत आहे. मुद्दा आहे ‘हॅसटॅग मी टू’ नामक गाजत असलेली मोहीम. मानवनिर्मितीत नैसर्गिकरित्या  विरुद्धलिंगी आकर्षण असते हे कुणालाही नाकारता येत नाही. मात्र असे होत असताना भावनेच्या आहारी न जाण्याइतपत मानवाने स्वत:वर नियंत्रण ठेवणे हेही तितकेच महत्त्वाचे  असते. त्यासाठी मनुष्याला निसर्गाने नीतीमत्तेची देणगी देऊन ठेवली आहे. ज्या ज्या वेळी मानवी मनातून नैतिकतेचा ऱ्हास होतो त्या वेळी निश्चितच काही अनर्थ घडणे अनिवार्य ठरते.
विविध क्षेत्रांतील सेलेब्रिटी, पत्रकार, खेळाडू, साहित्यिक, इतकेच काय थेट केंद्रीय मंत्र्यांवर (एमजे) त्यांच्यासोबत काम केलेल्या महिलांद्वारे सध्या होत असलेले आरोप पाहात नक्कीच  त्यांच्यावर अन्याय झाला असावा आणि असे व्हायला नको होते हेही तितकेच समर्थनीय आहे. मात्र, हे करत असताना सहानुभूतीची जागा आंधळ्या अनुनयाची नसावी असेही वाटते.  अशा कथित आरोपांनंतर जर का प्रकरण कोर्टात गेले तर तिथे पुराव्याअभावी आरोपीची सुटका ही निश्चित असते. कारण त्यात तर्कबुद्धीला वाव नसतो. अशा वेळी आरोपांची राळ उडून  जमिनीवर आल्यावर, प्रसिद्धीचा झोत निघून गेल्यावर संबंधित पुरूषाने अब्रुनुकसानीचा दावा केल्यास त्या स्त्रीची स्थिती कशी होईल? जर का प्रसिद्धीसाठी एखाद्यावर अन्याय केल्याचा  आरोप केला तर त्याचा परिणाम विपरीतच होईल. एखाद्या आरोपी पुरुषाने संबंधित महिलेने केलेले आरोप मान्य केले तर तो नैतिकदृष्ट्या दोषीच ठरणार आहे. त्यामुळे असे पुरुष  कालांतराने केलेले आरोप अमान्यच करतील. पाश्चिमात्यांचे अनुकरणामुळे सध्याच्या अधिक खुल्या आणि व्यक्तिगत, व्यावसायिक नातेसंबंधांबाबत अधिक गुंतागुंतीमुळे नैतिकतेचा  ऱ्हास झाला आहे. आधुनिकतेच्या ओघात अनेकांना आपल्या संस्कृतीचा विसर पडलेला आहे. सोशल मीडिया लिंग-भानाच्या, भेदाच्या, विकृतीच्या व टिप्पणीच्या नियंत्रणापलीकडे गेला  आहे. संपूर्ण जगावर फॅसिजमने आपले फास आवळायला सुरुवात केली आहे. जर्मनीत, इटलीत किंवा कुठेही फॅसिजम कसा बोकाळला त्या वेळी तिथल्या लोकशाहीचा पाडाव करण्यासाठी 
ज्या तऱ्हेने जनतेच्या विचाराना वंâट्रोल केले गेले नेमक्या त्याच प्रकारच्या ठिणग्या सध्या ‘मी टू’च्या वादळातून बाहेर पडताना दिसतात. म्हणजेच लोकशाही मार्गाने प्रश्न सुटणार  नसतील तर तो सोशल मीडियाचा वापर करून लोकांच्या मनावर बिंबवण्यात यश संपादन करणे, लोकशाही असतानाही अशा मोहिमेद्वारे सामाजिक दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न  दिसतो.
समाज माध्यमांवर ‘मी टू’सारख्या पाश्चिमात्य मोहिमेचे अनुसरण करून हे मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत. त्यासाठी महिलाविरोधी अत्याचार रोखण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्यांची अंमलबजावणी योग्य रितीने होणे गरजेचे आहे. निसर्गाने घालून दिलेल्या मर्यादा न ओलांडता विविध क्षेत्रात अग्रगण्यस्थानी काम करणाऱ्या महिला आजही जागतिक पातळीवर  आपणास आढळून येतात. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या २०१६च्या आकडेवारीनुसार ३५४ कलमान्वये जे लैंगिक सतवणुकीचे खटले चालवले जातात. त्यातील जवळपास १०टक्के  केससमध्ये काही तथ्य नसल्याचे म्हणजेच खोट्या केसस असल्याचे न्यायालयाने ठरवले. जेव्हा पुरावे द्यायला लागतील, हे माहिती असूनही जिथे १०टक्के खोट्या केस टाकल्या जातात तिथे समाज माध्यमांवर असे काही बंधन नसल्याने तर विचारायलाच नको. अनेकदा लैंगिक अत्याचाराला बळी न पडण्यासाठी महिलांनी स्वत:वर नैतिक बंधने लावून घेणे हेच योग्य  ठरते. समर्थ पुरुषांच्या बेबंद वागणुकीला वेळीच आळा घातला असता तर सध्या होत असलेल्या नकारात्मक (तात्पुरत्या) ‘वाहवे’ला पाश्चिमात्य स्त्रियांनी सुरू केलेल्या ‘मी टू’च्या  आगीला बळी पडावे लागले नसते. मुळात पुरुषांच्या हाती अशी सत्ता का एकवटते? आणि अशा पुरुषांपुढे महिला नमते का घेतात? जर महिलांना आपल्या खांद्यावर परंपरागत कृतिहीन बिचारेपण वाहायचे असेल आणि पुरुषांना परंपरागत सत्तेचे, पुरुषी, उच्चवर्णीय, उच्चपदाचे फायदे स्त्रियांच्या शोषणाच्या स्वरूपात उठवायचे असतील, तर परंपरांना नैतिकतेच्या  शस्त्राद्वारे शह द्यायला हवा. ही चळवळ, सुमारे वर्षभर जगभरात सुरू आहे आणि देशोदेशी तिला जसा उदंड प्रतिसाद मिळाला आहे तसाच काही ठिकाणी तीव्र विरोधही नोंदवला  गेला आहे.
परस्त्री व परपुरुष एकत्रित वावरण्यामुळे लैंगिक अत्याचाराला आळा बसणे कठीण झाले आहे. परस्पर आदर व स्त्रीजातीचा सन्मान न करता मैत्री, त्यानंतर होणाऱ्या चुका आणि प्रसंगी  निर्माण होऊ शकणाऱ्या आकर्षणाला नियंत्रणात ठेवण्यासाठीच इस्लाम धर्माने परपुरुषांपासून दूर राहण्याचा आदेश महिलांना दिलेला आहे. याला अनेकजण पुरुषप्रधान व्यवस्था अथवा  पुरुषसत्ता म्हणतात. मात्र नीतीमत्तेच्या चौकटीत राहून सर्व क्षेत्रांमध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा जागतिक पटलावर उमटविता येतो. स्पर्धात्मक पद्धती, महत्त्वाकांक्षा, यशाचा अतिरेकी  पाठपुरावा त्याला जोडून भांडवलशाहीच्या हातातील बाहुले बनलेल्या मानसिकतेतूनच ‘मी टू’सारख्या चळवळी उदयास येतात. पूर्वीसारखी नैतिकतेचा धाक असणारी विचारसरणी सध्या  राहिलेली नाही. अशी विचारधारा असती तर शोषणाच्या शक्यता कमीदेखील झाल्या असत्या. ‘इंडिया यू टू’ पाश्चिमात्यांच्या षङ्यंत्राला बळी पडतो आहेस.

-शाहजहान मगदुम
( मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget