Halloween Costume ideas 2015
Latest Post

ज्या काळी जगातील श्रेष्ठ तत्त्वज्ञान ‘स्त्रीमध्ये आत्मा असतो की नाही?’सारख्या गप्पा मारण्यात व्यस्त होते त्या काळात प्रेषित मुहम्मद (स.) यांनी स्त्रीला सर्वच क्षेत्रांत समान (एकसारखे नव्हे) अधिकार देऊन टाकले. प्रसिद्ध माक्र्सवादी भारतीय विचारवंत एम. एन. रॉय आपल्या ‘इस्लामचे ऐतिहासिक योगदान’ या पुस्तकात स्त्रीला माणूस म्हणून दर्जा देणारा धर्म ‘इस्लाम’ असल्याचा उल्लेख करून प्रेषितांच्या कार्याचा गौरव करतात. अरब समाजाच्या नसानसात भिनलेल्या, जन्मलेल्या मुलीला जिवंत पुरायच्या प्रथेला केवळ १३ वर्षांच्या कालखंडात प्रेषितांनी अशा प्रकारे हद्दपार करून दाखविले की मागील १४५० वर्षांच्या इतिहासात एकाही मुलीला केवळ मुलगी असल्यामुळे मारण्यात आलेले नाही. सच्चर समितीच्या रिपोर्टनुसार भारतीय मुस्लिम समाजात मुलींचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आहे.
जगात महिलांसाठी इस्लाम एक क्रांतिकारक संदेश ठरला आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रख्यात जर्मन महिला प्राध्यापक  Annemarie Schimmel  म्हणतात की, तुलनात्मक दृष्टीने पाहिले असता असे दिसते की इस्लामने महिलांना दिलेले अधिकार इतरांचा मानाने कित्येक पटीने पुरोगामी आहेत. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आईला हा दर्जा दिला की धर्मातील सर्वोच्च संकल्पना असलेला स्वर्ग आईच्या पायाखाली आणून ठेवला आणि ‘जन्नत माँ के कदमो के निचे’ असल्याची शिकवण दिली. पत्नीला हा दर्जा दिला की ‘तुमच्यापैकी सर्वोत्तम मुस्लिम तो आहे जो आपल्या पत्नीसाठी सर्वोत्तम पती आहे.’ मुलीला हे स्थान दिले की ‘ज्याला एक, दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुली असतील आणि तो त्यांचे पालनपोषण न्यायोचित पद्धतीने करेल, तो स्वर्गात माझा शेजारी असेल.’ अशी शिकवण प्रेषितांनी दिली.
संकलन- आमीन चौहान
यवतमाळ, मो. ९४२३४०९६०६

केंद्र शासनाकडून दर आठवड्याला ‘एम्पलॉयमेंट न्यूज’ हे नियतकालिक प्रसिद्ध होत असते. त्यामध्ये जाहिरात वजा माहिती व बातम्या नोकरीविषयक आणि रोजगारीविषयक असतात. मुंबईतही नोकरीविषयक चार मराठी साप्ताहिके प्रसिद्ध होत असतात. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या काळात ही सर्व नियतकालिके नोकरीविषयक माहितीने गजबजली होती. त्यात केंद्र शासन, राज्य शासन, दोन्ही शासनांतर्गत निमशासकीय अस्थापना तसेच खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांबाबत भरपेट माहिती प्रसिद्ध झालेल्या आहेत. एकट्या रेल्वे प्रशासनांमध्ये तब्बल ६३ हजार नोकऱ्या या वषीa भरावयाच्या आहेत. पंतप्रधान निधीतून सात लाखाहून अधिक नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत असे म्हटले जाते. अथ्र्रमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण व वृत्तपत्रांत येणाऱ्या जाहिराती वाचल्या तर आपल्या देशात नोकऱ्याच नोकऱ्या आहेत असे वाटायला लागते. परंतु आपल्या देशात नोकऱ्यांची उपलब्धता इमारतीचे जीने चढण्यासारख्या मंद गतीची आहे, तर बेकारांची संख्या लिफ्टच्या गतीने उंची गाठते. कारण मागील पाच वर्षांत देशात रोजगारक्षम उमेदवारांची टक्केवारी ३३ टक्क्यांवरून ४५ टक्क्यांवर पोहचली आहे असे ‘इंडिया स्कील रिपोर्ट’ने म्हटले आहे. म्हणून नोकऱ्यांसाठी रांग लावण्यापेक्षा स्वयंरोजगार शोधण्यातच खरे हित आहे.
- ज्ञानेश्वर भि. गावडे, फोर्ट, मुंबई.

-शाहजहान मगदुम
सीरियातील संघर्षाला जागतिक आयाम प्राप्त झाला असून, नागरिकांच्या स्थलांतरामुळे संपूर्ण युरोपभर सोयी-सुविधा व सुरक्षाविषयक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या स्थलांतराची तुलना दुसऱ्या महायुद्धात झालेल्या स्थलांतराशीच होऊ शकेल. एखाद्या देशातील जनता एकाच घराण्याच्या ४० वर्षांच्या जुलमी राजवटीखाली सतत पिचली जात असेल, तर तिच्या मनात त्या राजवटीबद्दल किती चीड असेल, याची कल्पनाच केलेली बरी! सीरिया, लेबॅनॉन, जॉर्डन, इस्रायल व तुर्वâस्तान या देशांच्या सीमा एकमेकींना स्पर्श करतात. गेली दीड हजार वर्षे सीरियावर कुणाचे ना कुणाचे आक्रमण होत आलेले आहे. प्रथम इजिप्त, नंतर हिब्रू, नंतर आसीरियन, मग चाल्डीन्स व पर्शिया असे लोक एका मागोमाग एक सीरियावर तुटून पडले. यानंतर सीरिया रोमन साम्राज्याचा हिस्सा झाले व नंतर ऑटोमन साम्राज्यात ते खालसा केले गेले. पहिल्या महायुद्धानंतर ऑटोमन साम्राज्याचे तुकडे झाले व फ्रान्सकडे सीरियाचा ताबा आला. सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांच्याविरोधात ७ वर्षांपूर्वी शांततेच्या मार्गाने सुरू झालेल्या लढ्याचे रूपांतर आता पूर्णत: गृहयुद्धात झाले आहे. आपले वडील हाफेज यांच्याकडून सत्ता मिळवलेले राष्ट्राध्यक्ष बशर-अल-असाद यांचा दबाव या विरोधात आवाज उठवला होता. २०११मध्ये अरब क्रांतीतून प्रेरणा घेऊन लोकशाहीसाठी सीरियातल्या दक्षिणेकडील डेरा या शहरात निदर्शनांना सुरूवात झाली. मात्र, हे आंदोलन अत्यंत वाईट पद्धतीने चिरडल्याने राष्ट्राध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीचे आंदोलन संपूर्ण देशभर पसरले. यातून इथे हिंसाचाराचा आगडोंब उसळला आणि सुरूवात झाली गृहयुद्धाला. या गृहयुद्धात इराण, रशिया, सौदी अरेबिया आणि अमेरिका यांसारख्या देशांनी हस्तक्षेपास सुरूवात केली. यातील काहींनी सीरियन सरकारला आणि काहींनी विरोधकांना दिलेल्या आर्थिक, राजकीय आणि लष्करी पाठबळामुळे सीरियन गृहयुद्ध अधिकचे तीव्र झाले. या गृहयुद्धामुळे देशात शिया आणि सुन्नी मुस्लिमांमध्येही संघर्ष उफाळून आला. यातून मोठ्या प्रमाणात जीवितहानीला सुरूवात झाली. या दरम्यान, कथित इस्लामिक स्टेट, ज्यांच्या अधिपत्याखाली उत्तर आणि पूर्व सीरियाचा भाग येत होता. कथित इस्लामिक स्टेटविरोधात रशिया आणि अमेरिका आदी देशांनीही आघाडी उघडली. सीरियातल्या शिया धार्मिक स्थळांचा बचाव करण्यासाठी इराण, लेबनॉन, इराक, अफगाणिस्तान आणि येमेन या देशांतल्या शिया बंडखोरांनी सीरियन सैन्याच्या बाजूने या युद्धांत प्रवेश केला. सीरियातला आपला रस कायम ठेवण्यासाठी रशियाला असाद यांना वाचवणे गरजेचे होते. गेल्या ५ वर्षांत सीरियामध्ये जवळपास अडीच लाख लोकांचा मृत्यू झाल्याचे संयुक्त राष्ट्रांनी स्पष्ट केले आहे. मात्र, संयुक्त राष्ट्रांनी ऑगस्ट २०१५ पासून आकडेवारी अद्यावत करणे थांबवले आहे. फेब्रुवारी २०१६ मध्ये द सीरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राईट्स या युकेमधल्या संस्थेने हा आकडा ४ लाख ७० हजार असल्याचे सांगितले आहे. तसेच, महिला आणि मुलांसह जवळपास ५० लाख जणांनी सीरिया सोडून स्थलांतर केल्याचे संयुक्त राष्ट्रांचे म्हणणे आहे. सीरियाच्या शेजारील लेबनॉन, जॉर्डन आणि तुर्वâस्तान या देशांमध्ये स्थलांतरीतांचा ओघ वाढला आहे. १० टक्के सीरियन स्थलांतरितांनी युरोपात आश्रय मिळवला आहे. तसेच, ६३ लाख सीरियन नागरिकांना सीरियाच्या दुसऱ्या भागात आश्रय शोधला आहे. २०१७मध्ये सीरियातल्या १ कोटी ३० लाख नागरिकांना मानवी दृष्टिकोनातून मदत करण्यासाठी २२० अब्ज रुपयांची गरज लागेल असे संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केले होते. सीरियातले जवळपास ८५ टक्के नागरिक गरीब आहेत. इथल्या १ कोटी २८ लाख नागरिकांना आरोग्याच्या सेवांची नितांत गरज आहे. तर, ७० लाखांना अन्नाची चणचण भासत असून इथे अन्नाचाही तुटवडा जाणवत आहे. अनेकांना आपल्या उत्पन्नातली पाव रक्कम पाण्यावर खर्च करावी लागते. तर, १७.५ लाख मुले शाळेबाहेर आहेत. तर, ४९ लाख लोक सीरियातल्या दुर्गम भागात राहत आहेत. सीरियात आतापर्यंत सुमारे १००० नागरिकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये १५०हून अधिक लहान मुलांचा समावेश असल्याचे म्हटले जाते. सीरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राईट्स या संस्थेच्या माहितीनुसार, सरकारविरोधी गटांच्या ताब्यात १५ टक्के सीरियाचा भाग आहे. सीरियाच्या उत्तर-पश्चिम भागातल्या इडलिब परगण्यात आणि अलेप्पोच्या पश्चिम भागात अजूनही ५० हजार सरकारविरोधी गटाचे लोक कार्यरत असल्याचे अमेरिकेचे म्हणणे आहे. गेल्या २ वर्षांत बंडखोर गटांचे मोठे नुकसान झाले असले तरी मध्य आणि उत्तर सीरियात आणि इथल्या राक्का शहरांत त्यांचे वर्चस्व अद्यापही कायम आहे. सीरियातील संघर्ष निर्णायक टप्प्याच्या दिशेने जात असतानाच, इराण-इस्रायलमधील हा तणाव उफाळून वर आला आहे. या सात वर्षांमध्ये बदलत गेलेली परिस्थिती पाहता, इराणकडून प्रभाव वाढविण्यासाठी प्रयत्न होणार आणि त्यातून इराण-इस्रायल आमनेसामने येणार, हे उघड आहे. त्यामुळे, सीरियाच्या सीमेवर नव्याने निर्माण होणारा हा संघर्ष अटळ दिसत आहे.

-वकार अहमद अलीम, पुणे
हाय अबला नारी तेरी कैसी यह कहानी।
आँचल में तो है दुध, पर आँखों में है पानी।।
आठ मार्च या महिला दिनानिमित्त महिलांचा आविष्कार सर्वच प्रसारमाध्यमांतून घडविला जातो. महिलांच्या प्रश्नांचा, समस्यांचा वेध घेतला जातो. समाज, संस्कृतीची पुरुष आणि महिला हे दोन चाके आहेत. पण समाजनिर्मितीची सुरूवातच मुळी महिलेपासून होते. कारण प्रकृतीने स्त्रीला निर्मितीक्षम बनविले आहे. म्हणूनच ‘स्त्री’ विश्वाचा केंद्रबिंदू आहे. स्त्री, कुटुंब, समाज, देश आणि विश्व अशी समाजनिर्मितीची प्रक्रिया आहे. तरीही जगतजननी सर्वत्र उपेक्षित राहिल्याचे कटू पण वास्तव नाकारता येत नाही. अशिक्षितांपासून उच्च विद्याविभूषित, अप्रगत देशापासून अतिप्रगत देशापर्यंत स्त्रीची दुर्दशा पाहावयास मिळत आहे. याला प्रामुख्याने जबाबदार पुरुषांची मानसिकता आहे. स्त्री-स्वातंत्र्याचा नारा देऊन पाश्चात्य विद्वानांनी स्त्रीचा पुरुषांची उपभोगण्याची वस्तू म्हणूनच प्रसार व प्रचार केला. पाश्चात्यांच्या प्रत्येक कृतचीचे आंधळेपणाने अनुकरण करण्याचा परिणाम समस्त जगात होत आहे.
विसाव्या शतकाच्या मध्यावर ‘सिमॉन द बुब्हाँ’ यांच्या ‘द सेकंड सेक्स’ या ग्रंथाने संपूर्ण जगात खळबळ माजविली. ‘‘स्त्री ही जन्माला येत नाही तर ती घडविली जाते.’’ हा सिद्धान्त लेखकाने माडला. खरेच याच्यात विद्वानांनी स्त्रीला प्रभावी मार्केटिंगचे साधन बनविले. प्रभावी जाहिरता करून गडगंज नफा मिळविणे हाच त्यामागचा एकमेव हेतू होता. काडीपेटापासून ते आगगाडी, प्रत्येक ठिकाणी जाहिरातीसाठी स्त्रीची अर्धनग्न, अत्यंत कामुक, हिडीस प्रदर्शन करीत स्त्री ही माणूस आहे हे विसरण्यास भाग पाडले. केवळ पैशासाठी. ‘अमेरिकेला शकिं आली तर जगाला सर्दी व्हावी’ ही त्यांची अपेक्षा. भारतासारख्या अनेक विकासशील देशांच्या वार्षिक अर्थसंकल्पापेक्षा जास्त उलाढाल करणाऱ्या पाश्चात्य बहुराष्ट्रीय कंपन्या आले उत्पादन विकण्यासाठी स्त्रीदेह प्रदर्शनाचा बाजार मांडला.
स्त्री-स्वातंत्र्य- पाश्चात्य विद्वानांकडून स्त्री-स्वातंत्र्य व समानतेच्या कल्पनेच्या स्वरूपात सिद्धान्त उभे करण्यात आले. स्त्री ही कोणत्याही क्षेत्रात पुरुषांपेक्षा विंâचितही कमी नाही. स्त्री-पुरुष प्रत्येक बाबतीत समान आहेत. स्त्री ही हर प्रकारे स्वतंत्र आणि स्वावलंबी आहे. ही कल्पनाच मुळात स्त्री-हृदयास भुरळ पाडणारी होती. तिने झपाट्याने ही कल्पना हृदयास कवटाळली. आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व मनोरंजन क्षेत्रात परपुरुषांबरोबर सामील होत गेली. जीवन कल्पनेच्या दर्शनीय सौंदर्यावर स्त्री मोहित झाली. परंतु... त्याच्या आत दडलेल्या अंधकारमय धोक्यापासून अज्ञानीच राहिली. एकीकडे पुरुषांच्या अत्याचारांपासून तिला मुक्तीचे स्वप्न दाखविण्यात आले तर दुसरीकडे तिची शक्ती, कार्यक्षमता, स्वभाव व मानसिकतेची अजिबात गय केली गेली नाही. ‘मिस वर्ल्ड’, ‘मिस युनिव्हर्स’च्या गोंडस नावाखाली शरीराचे ओंगळ प्रदर्शन, लज्जासुलभ अवयवांचे जाहीररित्या मोजमाप सुरू झाले. पाश्चात्य जगातील अत्यंत कडक थंडीपासून बचावासाठी समस्त पुरुष, थ्री-पीस सूट, बूट, एका हातात व्हिस्कीचा प्याला, दुसऱ्या हातात सिगारेट; पण याच जीवघेण्या थंडीमध्ये स्त्रीला मात्र अल्पवस्त्रामध्ये पेश करून, वासनांध पुरुषाने आपली चंगळवादाची तृष्णा भागवण्यास सुरूवात केली. इतिहास साक्ष आहे, जेव्हा जेव्हा स्त्रीने आपले घर सोडून चारचौघात आपल्या सौंदर्याचे प्रदर्शन केले, तेव्हा लैंगिक स्वाराचाराने उग्र रूप धारण केले. जी क्लिष्ठता चार भिंतींच्या आत असहनीय असते, ती मार्केट, बाजारात व सार्वजनिक ठिकाणी उफाळून आली. अतिशय पवित्र नातेसुद्धा या अग्नीत होरपळून निघाले. कला आणि संस्कृतीच्या नावाने लैंगिक व कामुक भावना व्यक्त होऊ लागल्या आणि स्त्री ही पुरुषाच्या हातातील बाहुली बनली. या साऱ्या उचापतींचा फक्त एकच उद्देश की पुरुषांची लैंगिक तृष्णा भागविणे! पूर्ण समाज, संस्कृती वासनेच्या तालावर नाचू लागली. लैंगिक भावनेच्या या व्रूâर साम्राज्याने ग्रीस, रोम, इजिप्त व इतर अनेक प्राचीन संस्कृती नष्ट केल्या.
जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्री-पुरुषांच्या स्वैर व स्वतंत्र देवाणघेवाणीमुळे लैंगिक स्वाराचाराची मानसिकता बळावली आहे. या स्वैराचाराने सार्वजनिक रूप धारण केले आहे. मग याच्या दुष्प्रभावाने एका निर्लज्ज संस्कृतीने जन्म घेतला, जिच्या विषारी प्रभावाने नैतिकतेची पुâलबाग जळून भस्म झाली. आज लाज, शरम आणि नैतिकता टाहो फोडत राहिली आहे.
महिलांवरील लैंगिक अत्याचार- ३० नोव्हेंबर २०१७ रोजी भारताचे गृहमंत्री राजनाथ सहिं यांनी राष्ट्रीय गुन्हेगारी अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालानुसार, देशात ८४,७४६ इतके लैंगिक गुन्हे नोंदविण्यात आले. (नोंद नसलेल्या गुन्ह्यांची कल्पनाच करू शकत नाही.) या गुन्ह्यांमध्ये पुरोगामी महाराष्ट्राने अव्वल क्रमांक पटकाविला आहे. ११,३९६ गुन्हे महाराष्ट्रात, पाठोपाठ उत्तर प्रदेश ११,३३५ तर ८,७१७ गुन्ह्यांसह मध्य प्रदेश. सन २०१५ मध्ये महिलांवरील बलात्कारासंबंधित गुन्हे ३४,६५१ होते तर २०१६ मध्ये ३८,९४७, गुन्ह्यांमध्ये १२.४ टक्के वाढ. ४,८८२ गुन्ह्यांसह मध्य प्रदेश अव्वल क्रमांकावर, ४,८१६ गुन्ह्यांसह उत्तर प्रदेश द्वितीय क्रमांकावर तर महाराष्ट्र ४,१८९ गुन्ह्यांसह तृतीय क्रमांकावर. या तीन्ही राज्यांत २०१५ पेक्षा २०१६ मध्ये अनुक्रमे १२.५, १२.४ आणि १०.७ टक्के गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. विशेष म्हणजे ही तीन राज्ये संस्कृतीरक्षक भाजप शासनाची आहेत. देशात महिलांविरूद्ध अत्याचारांमध्ये ५२.२ टक्के वाढ झाली आहे. कारण स्त्री-पुरुषांचे स्वैराचार!
कौटुंबिक व्यवस्था- भारतात स्त्री आणि पुरुष यांच्या विवाहाद्वारे दोन भिन्नलिंगी व्यक्ती एकत्र येऊन नैसर्गिकरित्या कामेच्छा पूर्ण करीत नवीन पिढीला जन्म घालीत असतात. यामुळे स्त्रीला धार्मिक, सामाजिक व न्यायिक अधिकार प्राप्त होतो. पण स्त्रीकडून, तिच्या पालकांकडून हुंडा घेण्याचा सामाजिक कलंक समाजमनामध्ये पसरला आहे. पैशाच्या लोभापैकी अनेक घरांतील स्वयंपाकघर हे स्त्री-दहनाचा कट्टा ठरला आहे. नवरा दारूडा, नपुंसक वा कुठलेही अर्थार्जन करीत नसेल तरीही अन्यायग्रस्त्र स्त्री अशा नवऱ्यापासून सहजासहजी घटस्फोट घेऊन स्वतंत्ररित्या मनपसंत दुसरा घरोबा करू शकत नाही. कारण विवाह हा धार्मिक संस्कार आहे. तो मोडता येऊ शकत नाही. न्यायालयात घटस्फोटाचा अर्ज दिल्यास दोघांनाही वेगवेगळे राहून अनेक वर्षे व्यतीत करावी लागतात. विवाहित स्त्री आणि पुरुषांना कायदेशीर दुसरे लग्न करण्याची मनाई न्यायालयाकडून होते. पण... अनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासंबंधी कायद्याकडून कोणताही प्रतिबंध नाही. त्यामुळे समाजात अनैतिकता बळावत जाते. पण यात स्वच्छंदी परित्यक्ता म्हणून स्त्रीचाच बळी जातो.
‘‘माती जेव्हा अंकुरते, इवल्या सोनुल्या बीजांनी!
तेव्हा मातीचीही माता होते!!
माती जेव्हा बरबटते, कर्मकांडांच्या वेलांटीने!
तेव्हा मातेचीही माती होते!!’’
विशाल संस्कृतीची निर्मिती करणारी माता आणि माती एकाच नाण्याच्या दोन बाजू. वर्तमानकाळात स्त्रीवर असा अत्याचार होत आहे. मध्ययुगीन काळात स्त्रियांचे जीवन म्हणजे केवळ वासनांध पुरुषांच्या हातातील खेळणे इतकेच. अशा चिंताजनक अवस्थेत आजपासून १४५० वर्षांपूर्वी इस्लामचे अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी ईशग्रंथ कुरआनद्वारे आणि स्वत:च्या उच्चतम आदर्श आचरणाने महिलांच्या अंधकारमय जीवनामध्ये सुख, माधान, सन्मानाचा प्रकाश पैâलाविला, तो एक प्रकारे प्रकाशरूपी जीवनमार्ग होता.
इस्लाम स्थिर परिवारास समाजाच्या अस्तित्वासाठी आवश्यक समजतो. परिवाराचे स्थैर्य म्हणजेच समाजाचे स्थैर्य आणि परिवाराचे विघटन म्हणजेच समाजाचे विघटन असे समीकरण इस्लामने मांडले आहे. इस्लाम स्त्रीचे मूलभूत अधिकारही प्रदान करतो आणि तिच्या विकासाची जबाबदारीही स्वीकारतो. इस्लामने पुरुषाप्रमाणेच स्त्रीलादेखील हे संपूर्ण आर्थिक, सामाजिक व राजकीय अधिकार प्रदान केले आहेत. मात्र तिला काही जबाबदाऱ्यांपासून अलिप्त ठेवण्यात आले आहे की ज्या तिच्या स्वभाव आणि शारीरिक स्वरूपाशी विसंगत आहेत.
आर्थिक जबाबदारी- इस्लामने स्त्रियांवर कोणतीही आइर्थक जबाबदारी लादलेली नाही. पण तिला मर्यादेच्या आत राहून अर्थार्जनाचा अधिकार देण्यात आला आहे. लग्नापर्यंत मुलीच्या पालनपोषणाची जबाबदारी तिच्या पित्याची आहे. लग्ननानंतरची जबाबदारी पूर्णत: तिच्या पतीची आहे. या बाबतीत प्रेषित मुहम्मद (स,.) यांनी फरमाविले आहे, ‘‘ज्याने दोन विंâवा जास्त मुलींचे संगोपन योग्य रीतीने केले, त्यांना शिक्षण दिले, योग्य वेळी, योग्य स्थळी विवाह करून दिले आणि लग्नानंतरसुद्धा सद्व्यवहार केला तर त्याच्यासाठी निश्चितच स्वर्ग आहे.’’ (हदीस- अबू दाऊद)
विवाहाचा अधिकार– इस्लामने विराहाच्या बाबतीत मुलीच्या पालकास महत्त्व अवश्य दिले, पण हेही स्पष्ट केले की मुलीचा विवाह तिच्या परवानगीनेच व्हावा.
महेरचा अधिकार- इस्लामने पुरुषांना आदेश दिला की ज्या स्त्रीशी विराह कराल तिला महेर अवस्य देण्यात यावा. ‘‘स्त्रियांचा महेर आनंदाने कर्तव्य समजून अदा करा.’’ (दिव्य कुरआन, सूरह निसा) ‘‘महेर पत्नीची स्व-संपत्ती असून केवळ तिचाच त्यावर अधिकार आहे, तिच्या पालकाचा त्यावर कोणताच अधिकार नाही.’’ (कुरआन, २:६९)
शील व अब्रू सुरक्षेचा अधिकार- ‘‘जे लोक मर्यादाशील स्त्रियांवर आळ घेत असतील (व्यभिचाराचा आरोप), मग चार (प्रत्यक्षदर्शी) साक्षीदार घेऊन येत नसतील तर त्या (पुरुषाला) ५० फटके मारा व त्याची साक्ष (यापुढे) कधीही स्वीकारू नका.’’ (कुरआन, सूरह नूर-४,५)
वारसा हक्क- वारसा हक्कामध्ये स्त्रीचा वाटा आहे. आईवडिलांच्या संपत्तीमध्ये मुलगी म्हणून वारसा वाटा आहे. पतीच्या संपत्तीमध्ये पत्नी म्हणून, मुलाच्या संपत्तीत आई म्हणून, भावाच्या संपत्तीत बहीण म्हणून वाटा आहे. म्हणजे स्त्री एक पण रूपे चार. कन्या, पत्नी, आई व बहीण. इस्लामने एकाच स्त्रीला वारसाहक्कामध्ये चार प्रकारे संपत्तीचा हिस्सा दिला आहे. शिवाय लग्नामध्ये पतीकडून महेरची रक्कमही स्त्रीलाच मिळते. स्त्रीला आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पडण्याची गरज नाही. त्यामुळे अर्थार्जनासाठी अन्य पुरुषांच्या एकत्रित व्यवहारामुळे निर्माण होणआरे वाईट परिणाम भोगण्याची वेळसुद्धा येत नाही.
बहुपत्नित्व- इस्लाममध्ये बहुपत्नित्वाची परवानगी आहे. पण सक्तीने करण्यासंबंधीचा आदेश नाही. केवळ विशिष्ट परिस्थितीतच ही परवानगी आहे.
तलाक- इस्लामने स्त्री आणि पुरुष दोघांनाही तलाकचा अधिकार दिला आहे. पती आणि पत्नींमध्ये अतिशय क्लिष्ठ व गुंतागुंतीच्या कलहामध्ये योग्य समाधान म्हणजे तलाक होय. पती, पत्नीच्या स्ववबावामध्ये अनुकूलता नसणे, दुर्लक्ष न करण्यासारखी आर्थिक व सामाजिक तफावत त्यांच्यात असेल, शारीरिक जवळीक असतानाही मानसिक व वैचारिक दुरावा असेल. कधी कधी दोघांपैकी एकाचे दुर्वर्तन उघड झाले, अशा बिकट अवस्थेत एक दुसऱ्याचे जीवन नरकासमान करण्यापेक्षा कायदेशीर मार्गाने विभक्त होऊन नवीन आयुष्य आपल्या मर्जीप्रमाणे जगण्यासाठीच इस्लामने तलाकची परवानगी दिली आहे. एकमेकांचे पटत नसतानाही एकत्रित राहण्यास जबरदस्ती करणे हे सारासार विवेकाच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. तलाकसाठीही दिव्य कुरआन, प्रेषित मुहम्मद (स.) यांनी अत्यंत कडक कायदा, बंधने घातली आहेत. प्रसारमाध्यमांत ज्या पद्धतीने इस्लामी तलाकचे चित्रण रंगविले जाते ते वस्तुस्थितीच्या अत्यंत विपरीत आहे, हे निर्विवाद सत्य.
भारतामध्ये प्रत्येक २० मिनिटात एक बलात्कार घडतो. अमेरिकेत प्रत्येक ७ मिनिटाला एक बलात्कार. हा क्राइम रेट सर्वोच्च असून मानवतेला घातक आहे. पण सऊदीअरबचा क्राइम रेट जगातील सर्वांत कमी आहे.कारण तिथे इस्लामी कडक कायद्याची अंमलबजावणी होते. तसेच समाजमनावर दिव्य कुरआन व अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांचे आदर्श विचार, आणि वर्तणूक याचा फार मोठा प्रभाव आहे. जगात इस्लामी तत्त्वानुसार आचरण सुरू झाले तर महिलांचे अत्याचार थांबतील. एक आदर्श कुटुंब व्यवस्था निर्माण होईल. प्रेषित मुहम्मद (स.) यांनी असा न्यायपूर्ण समाज निर्माण करून दाखविला आहे. इतिहासातून बोध घेऊन भविष्याचा वेध घेणे वर्तमानात जगलो तर मानवता जीवंत राहील. ईश्वर समस्त मानवांना सद्बुद्धी देवो, हीच प्रार्थना!

मुंब्रा-ठाणे (नाजीम खान)
महिलांसाठी सरकारतर्फे विनामूल्य काही सुविधा उपलब्ध असतात त्यांचा महिलांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ‘गल्र्स इस्लामिक ऑर्गनाइजेशन ऑफ इंडिया’ व जमाअत ए इस्लामी हिंद स्थानिक महिला विभागातर्फे ‘महिला दिना’निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या चेतना दीक्षित (संचालक, बाल विकास महिला मंडळ, ठाणे) यांनी आपल्या भाषणात केले.
त्यांनी विशेषकरून मुलींच्या शिक्षणावर विस्तृत चर्चा करताना सांगितले की आम्हाला महिला डॉक्टर तर हव्यात पण आम्ही आमच्या मुलींना शिकवू इच्छित नाही! हे आमचे दुर्दैव आहे.
कार्यक्रमाची सुरूवात आलिया रूमाना (सदस्य, जी.आय.ओ.) यांच्या ़कुरआन पठणाने झाली. जमाआत ए इस्लामी हिंद महिला विभागातर्फे तय्यबा मलिक यांनी ‘इस्लाममध्ये महिलांचे स्थान’ या विषयावर आपले मत व्यक्त केले. जमाअतच्या स्थानिक महिला विभागप्रमुख मदीना अन्सारी यांनी ‘समाजात रुजलेली हुंडा प्रथा’ या विषयावर आपले विचार प्रकट केले.
सदर कार्यक्रमात १५० ते २०० महिला आणि मुली सहभागी झाल्या होत्या.
या वेळी कुरआनच्या काही अनुवादित प्रती मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आल्या.

- सरफराज अ. रजाक शेख
एड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर 
8624050403
आधुनिक विचारवंतात डॉ. इक्बाल यांचे स्थान वरचे आहे. सुरवातीला इक्बालांच्या लेखणी आणि वाणीतून प्रकटलेल्या सृजनशील, परिवर्तक विचारांना मुस्लीम समाजातून मोठा विरोध झाला. नंतर मात्र भारतीय उपखंडातल्या मुस्लीमांच्या सांस्कृतीक मुल्यांचे ते प्रतिनिधी ठरले. इस्लामी चिंतनांच्या परंपरेवर दाटलेले मळभ त्यांनी झटकून टाकले. अनेक अस्पर्श विषयांना त्यांनी हात घातला. काहींची नव्याने व्याख्या केली. नवमुल्यांना ते मोठ्या धाडसाने भिडले. इक्बालांच्या नावावर संख्येने मोठी ग्रंथावली नाही. जावेदनामा, आसारे खुदी, बांगे दिरा,  बाले जिब्राईल, काही लेख आणि उर्दु काव्य अशी सहज उच्चारता येतील इतकीच त्यांची ग्रंथसंपदा. पण मागील शतकभरात जगाच्या पातळीवर इक्बालांच्या साहीत्यावर जितकं लिखाण झालं, तितकी दखल शेक्सपिअर, मार्क्स नंतर अभावानेच कुणाची घेतली गेली असेल. इक्बाल म्हणावे तर इस्लामनिष्ठ होते. आणि अनुभवावे तर स्वतंत्र विचारधारा मांडणारे लिबरल देखील होते. इक्बाल धर्मापलिकडे जाणारे आणि धर्मावर भाष्य करणारे. इक्बालांनी दांते हाताळला. मार्क्सलाही इक्बालांनी हाताळलं. हेगेल, एंजेल्स, वर्डस्वर्थ सार्‍यांनीच इक्बालांच्या काव्यातून हजेरी लावली. व्हाल्टेअर सारखा राज्यक्रांती घडवून आणणारा क्रांतीकारक विचारवंत इक्बालांनी नेहमीच आपल्या प्रतिभेने मोहवित आला आहे. लेनिन वर इक्बालांनी रचलेले काव्य असो वा एंगल्स वर केलेली टिका इक्बालांच्या साहीत्यात मानवकल्याणाची भूमिका नेहमी केंद्रस्थानी राहीली आहे.  त्यामुळेच इक्बालांना कामगारहित केंद्रस्थानी मानून अर्थशास्त्राची रचना करणारा मार्क्स भावला. त्यामुळेच इक्बालांनी आपल्या काव्यात अनेक ठिकाणी मार्क्सचा गौरव केला. इक्बाल ज्या प्रकर्षाने मार्क्स मांडत होते. त्याच तडफेने ते इस्लामी जीवनमूल्यांची पुन:व्याख्या करत होते. इस्लामला फक्त इश्वरनिष्ठ मानून इक्बालांनी अल्लाहची भक्ती आराधली नाही. तर इस्लामला त्यांनी दास कापिलटलच्या तुलनेत हाताळलं. दास कापिटल मध्ये मार्क्सने सांगितलेल्या भौतीकवादाची इस्लामी प्रेरणा त्यांनी शोधून काढली. त्यांच्या विचारांनी मार्क्सशी हात मिळवणी केली म्हणून उलेमांनी त्यांना काफीरही ठरवलं. पण ते डगमगले नाहीत. त्यांनी आपला शिकवा (गर्‍हाणे) अल्लाहच्या दरबारात मांडला. ते लढत राहीले. व्यक्त होत राहीले. त्यांनी  अनेक नवविचारांना जन्म दिला. चिंतनाच्या नव्या दिशा दाखवल्या. इक्बाल गेले त्याला आता शतकाहून आधिक काळ झाला आहे. इक्बालांना ज्या वर्गाने विरोध केला. ते आज इक्बालांना घेउन मिरवतायत. इक्बालवर जितक संशोधन अंतरराष्ट्रीय विद्यापीठातून झालं तितकचं मदरश्यातूनही होतयं. एकेकाळी ज्या मदरशांनी इक्बालांवर बहीष्कार घातला, आता तेच इक्बाल मांडतायत. काळाच्या उपचाराची ही जालीम धन्वंतरी आहे.
विसाव्या शतकाच्या पुर्वार्धात इंग्रजी सत्तेचा सुर्य मध्यान्ही तळपत होता. भारतीयांवर परकीय सत्ता अधिकारात होती. माणसं लुटली जात होती. नागवली जात होती. शोषली जात होती. भारतीय समाज संक्रमणावस्थेत होता. अशा काळात इक्बाल आपल्या काव्याचे खंङ्ग घेउन अवतरले. युरोपात मार्क्स ज्या पध्दतीने भांडवलदाराविरोधात उभा राहीला. त्याच पध्दतीने इक्बाल भारतीय उपखंडात वसाहतवादाविरोधात उभे ठाकले. आपल्या शायरीने त्यांनी स्वातंत्र्याच्या प्रेरणा उत्फुल्लीत केल्या. काव्यातून चिंतन आणि चेतनेचे दर्शन घडवत इक्बाल नववविचार मांडत होते. इक्बालांचं काव्य आणि त्यांच चिंतन चतुरस्त्र आहे. त्यामध्ये प्रेमाध्यात्म आहे. रहस्यवाद आहे. जगण्याची जिगिविषा आहे. निसर्गजाणिवा आहेत. गुढता ही तर त्यांच्या काव्याचा आत्मा. मानवी जीवनाच्या नानाविध पारदर्शक, अपारदर्शक संदर्भमुल्यांचा परिचय इक्बालांनी आपल्या काव्यातून नेहमीच करुन दिला. जगणं उदात्त व्हावं. ते आनंदानं बहरावं यासाठी इक्बालांचं चिंतन. सर्जनशीलता हा त्यांच्या काव्याचा स्वभावधर्म. त्यामुळेच उर्दु काव्याची पृथगात्मता म्हणजे इक्बाल, अशी ओळखच उर्दु काव्याला मिळाली.
इक्बालांच्या काव्यातले राष्ट्रगौरव, टागोरांच्या पलिकडे जाणारी त्यांची भूमिका मात्र उपेक्षित राहीली. आजच्या भारतात दुर्दैवाने इक्बालांची ओळख त्यांनी लिहलेल्या ‘सारे जहां से अच्छा’ या गीतापलिकडे नाही. कुणी इक्बालांचा अभ्यास केला  असेलच तर ते इक्बालांच्या भारतीय निष्ठेवर संशय घेतात. त्यांना पाकीस्तान निर्मितीचा गुन्हेगार देखील मानतात. त्यामुळेच इक्बालांनी लिहलेल्या सारे जहां से अच्छा या गीताला राष्ट्रगानाऐवजी राष्ट्रगीताचा दर्जा मिळू शकला नाही. इक्बालांच्या तुलनेत टागोरांनी ब्रिटीश राज्यकर्ता राजा पंचम जॉर्ज याच्या भारतात स्वागतासाठी लिहिलेल्या गीताला राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली. टागौरांनी ज्या ब्रिटीश राजवटीविरुध्द आपल्याला लढायचे होते त्याच्या राजालाच भारतातील जनाचा आणि भारतीय गणाचा अधिनायक आणि भाग्यविधाता ठरवले. पंजाब पासून गुजरात आणि सिंध पर्यंतची वर्णने करुन त्यांनी राजाचे स्वागत केले. राजीव दिक्षित या स्वदेशी प्रचारकाच्या भाषेतच बोलायचे झाले तर “दुर्दैवाने गुलामीचा गौरव करणारे हे गीत आज आपण आपले राष्ट्रगीत म्हणून गातोय.” टागोरांच्या तुलनेत इक्बालांनी साऱ्या विश्वात भारताच्या सौंदर्याची पृथगात्मता आपल्या काव्यातून स्पष्ट केली. इक्बालांनी ब्रिटीश राजवटीला आपल्या देशावरील संकट मानले. इक्बाल या संकटांची जाणिव करुन देताना भारतीयांना उद्देशून आपल्या काव्यात म्हणतात,
“ वतन की फिक्र कर ऐ नादां मुसीबत आनेवाली है
तेरी बरबादीयों के मश्वरे  हैं आसमान पर
न समझोगे तो मिट जाओगे ऐ हिंदोस्ता वालों
तुम्हारी दास्तां तक न रहेगी दास्तानों में”
पण दुर्दैवाने इक्बालांच्या अंतकरणातील भारताविषयीचा हा दर्द त्यांना जाउन कित्येक दशके लोटली तरी आपण समजून घेउ शकलो नाही. त्यांना पाकीस्तान निर्मितीचा गुन्हेगार ठरवून आपण मोकळे झालो. इतिहासाचा अर्थ लावण्याची संघनिष्ठ उजवी परंपरा आपण या प्रकरणात ग्राह्य मानली. जर ‘सारे जहां से अच्छा’ हे राष्ट्रगीत लिहिणाऱ्या इक्बालांच्या राष्ट्रनिष्ठेला आपण आधुनिक मोजमाप लावणार असू तर त्याच मोजपट्टीने आपल्याला रविंद्रनाथ टागोर आणि बंकिमचंद्र यांचीही राष्ट्रनिष्ठा तपासायला घेणे गरजेचे आहे. पाकीस्तान निर्मितीचा गुन्हेगार इक्बालांना ठरवणार्‍यांनी संदर्भाच्या चौकटीत राष्ट्रनिष्ठेचे न्यायदान केले तर फाळणी किंवा द्वीराष्ट्र सिध्दांतांचे पहिले गुन्हेगार इक्बालांऐवजी रविंद्रनाथ टागोर हेच ठरतात. माझ्या विधानाने अनेकांने आश्चर्य वाटत असले तरी ते खरे आहे. कोणाला पटत नाही म्हणून इतिहास नाकारता येणार नाही. बंगालमध्ये ज्यावेळेस काँग्रेस आणि इतर तत्सम पक्षांनी मुस्लीमांना विधिमंडळात प्रतिनिधित्व देण्याची भूमिका मांडली त्यावेळी बंगालातल्या भद्र मंडळींनी म्हणजे उच्चवर्गीयांनी एक बैठक घेतली. त्या बैठकीतील वृत्तांत आज टागोर पेपर्स या नावाने बंगालच्या अभिलेखागारात सुरक्षित आहेत. 1920 च्या दशकात भद्र मंडळींनी बोलावलेल्या बैठकीत टागोरांनी प्रस्तुत केलेल्या ठरावात स्पष्ट पणे नमूद केले आहे की, “ भारतात  मुस्लीमांचे अस्तीत्व मान्य केले तर त्यांना कौन्सीलात प्रतिनिधित्व देखील आपल्याला द्यावे लागणार आहे. जर मुसलमानांना या देशातून काढून त्यांना याच देशातील एका भौगौलिक प्रदेशात त्यांचे राज्य निर्माण करुन दिले तर आम्हा भद्र लोकांचा धर्म यवनांच्या पातकाने भ्रष्ट होणार नाही.” अशा पध्दतीने  भारतामध्ये सर्वप्रथम हिंदु आणि मुस्लीम हे दोन राष्ट्र आहेत हा सिध्दांत टागोरांनी मांडला. इक्बालांनी नव्हे. पण सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या हव्यासापोटी भारताच्या अखंडतेला सुरुंग लावणाऱ्या विद्वानाला मात्र आपण राष्ट्रगीतकार म्हणून मान्यता देउन बसलोय. आणि भारताच्या कल्याणासाठी जो विद्वान आपल्या चिंतनाच्या जगात अस्वस्थ होता त्याला मात्र आपण पाकीस्तान निर्मितीचा गुन्हेगार ठरवून मोकळे झालोय.
इक्बाल आणि पाकीस्तान निर्मितीच्या संदर्भावर आधुनिक काळात अनेकांनी संशोधन केले आहे. प्रसिध्द इतिहासकार, फारसीचे अभ्यासक आणि निजाम आर्कीयॉलाजी मध्ये अधिकारी राहिलेले सेतू माधव पगडी म्हणतात, “ काहिंच्या मते ही देशाच्या विभाजनाची नांदी होती. पण इक्बालच्या आयुष्याच्या शेवटच्या काळातील त्याच्या उद्गारावरुन विभाजनाचा पुरस्कार करीपर्यंत त्याने मजल मारली होती, हे दिसत नाही. भारतीय संघराज्यात मुस्लीम बहुसंख्यक असलेल्या प्रांताना स्वायतत्ता असावी असा त्याचा विचार असावा. अर्थात त्याच्या मृत्युनंतर द्विराष्ट्रवाद आणि विभाजन याला पार्श्वभूमी म्हणून इक्बालचे तत्वज्ञान चांगलेच उपयोगी पडले आणि राजकारणी नेत्यांनी त्याचा पुरेपूर लाभ घेतला हि वस्तूस्थिती आहे.”  पगडींप्रमाणे सुरेश चंद्र नाडकर्णी यांनी देखील इक्बाल यांना फाळणीचा गुन्हेगार मानण्यास नकार दिला आहे. सुरेशचंद्र नाडकर्णी यांनी एक लेख लिहला होता. त्यात ते म्हणतात, फाळणीचे खापर डॉ. इकबालांच्या डोक्यावर फुटले. हा फार मोठा अन्याय आहे. मृत्युपुर्वी देशाची फाळणी हा भयानक प्रकार आहे, हिंदू - मुसलमान दोन्ही जमाती भरडल्या जातील आणि आतोनात रक्तपात होईल, काहिही करा पण फाळणी होउ देउ नका. असे स्वच्छ मत त्यांनी नमूद करुन ठेवले आहे. त्यांचे भाकीत तंतोतंत खरे ठरले.
(लेखक इतिहासतज्ञ व पत्रकार आहेत.)

औरंगाबाद (सालार शेख) -  
24,25,26 फेब्रुवारीला लिंबेजळगाव जिल्हा औरंगाबाद येथे तब्लीगी जमाअतचा आलमी इज्तेमा संपन्न झाला. या इज्तेमाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. देश, विदेशातील लाखोंच्या संख्येने आलेल्या मुस्लिम बांधवांचे शिस्तबद्ध वावरणे पाहणार्‍यांसाठी आश्चर्यकारक होते. गेल्या सहा महिन्यांपासून या इज्तेमाची तयारी करण्यात येत होती. आलेल्यांना जेवण, पाणी, कमी पडणार नाही याची दक्षता संयोजकांनी घेतलेली होती. सर्वांसाठी पुरेल एवढे पाणी व अंघोळी तसेच मलनिस्सारणाची आश्चर्यजनक शिस्तबद्ध व्यवस्था करण्यात आलेली होती. प्रत्येक जिल्ह्याला कामाची वाटणी करून दिलेली होती. प्रत्येक जिल्ह्यातून स्वयंसेवक अनेक महिने या ठिकाणी तळ ठोकून होते. दोन हजार एकर परिसरात 21 विहिरी होत्या. त्या सर्वांचे पाणी उपसून 8 मोठी शेततळी उभारण्यात आली होती. पाणी शुद्धीकरणाचीही व्यवस्था करण्यात आलेली होती. विजेची व्यवस्थाही अफलातून होती. नांदेड येथील वास्तूविशारदाने ड्रॉईंग तयार करून दिले होते. मुख्य मंडप 1 कोटी 5 लाख चौरस फुटाचा होता. इज्तेमाच्या यशस्वीतेसाठी दुआ करण्यात काही लोक 24 तास मग्न होते. 17 लोक मुख्य मंडपात एहतेकाफमध्ये बसलेले होते. अनेकांनी रोजे ठेवलेले होते. विदेशी साथींच्या सेवेसाठी वातानुकूलित तंबू लावण्यात आलेले होते. विशेष म्हणजे एवढ्या लोकांच्या वाहनासाठी पार्किंग व्यवस्था अतिशय सुलभ अशी करण्यात आलेली होती. स्थानिक लोकांनी चहा, नाष्टा, जेवण याची भरपूर काळजी घेतली होती. एकंदरित हा इज्तेमा म्हणजे डोळे दिपवणारा व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना होता.

पंढरपूर ट्रस्टचे पदाधिकारी आले
सोलापूर येथील पंढरपूर ट्रस्टच्या पदाधिकार्यांनी तीन दिवसांपूर्वीच इज्तेमास्थळी हजेरी लावली. दरवर्षी पंढरपुरात लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होतात. इज्तेमाप्रमाणे आम्हालाही सोयी-सुविधा देता येऊ शकतील का, याचा आढावा त्यांनी घेतला. संपूर्ण इज्तेमा स्थळ फिरून त्यांनी पाहणी केल्याचे संयोजकांनी सांगितले.

इस्लामचे तत्व आचरणात आणण्याचे आवाहन
औरंगाबाद येथे तीन दिवस चाललेल्या इज्तेमामध्ये अनेक उलेमांनी संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, इस्लामची जीवनव्यवस्था समस्त मानवजातीसाठी कल्याणकारी आहे. मुस्लिमांनी आपल्या आचरणातून इस्लामी जीवनपद्धतीची उपयोगिता, स्वच्छ आणि सरळ जीवन जगण्याची पद्धत, तनावरहित आयुष्य, नितीमान जीवन या जीवनमुल्यांचा नमुना देशबांधवांना दाखवून द्यावा. 
तब्लीगी जमाअतचे प्रमुख मौलाना साद म्हणाले, निकाह हे मागील काही वर्षापासून खर्चिक करण्यात येत आहेत. लाखो रूपयांची उधळपट्टी होत आहे. अल्लाह आणि प्रेषित सल्ल. यांना हे मान्य नाही. निकाह अत्यंत सोप्या पद्धतीने करावा. स्वर्ग प्राप्तीसाठी पैगंबर मुहम्मद सल्ल. यांनी दिलेली शिकवण आचरणात आणण्याचा सल्ला मौलाना शमीम अहेमद यांनी दिला. रविवारी जोहरच्या नमाजनंतर लाखो लोकांना मार्गदर्शन करतांना आपल्या बयानमधून कुरआन आणि हदीस संबंधी विविध उदाहरणे देवून प्रत्येक मुस्लिमाने  इस्लामी जीवनाचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले. संपूर्ण सृष्टीचा पालनहार एकमेव अल्लाह असून, त्याच्या नजरेत आयुष्य अनमोल आहे. समस्त मानवजातीचे कल्याण व्हावे म्हणून अल्लाहने वेळोवेळी जगाच्या वेगवेगळ्या भागात पैगंबर पाठविले. आता कुठलेही पैगंबर येणार नाहीत. शेवटचे पैगंबर मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांच्या शिकवणी स्वत: अमलात आणून ते जगापुढे मांडण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget