Halloween Costume ideas 2015
Latest Post

(३३) हे पैगंबर (स.)! आम्हाला माहीत आहे की ज्या गोष्टी हे लोक रचत आहेत त्यापासून तुम्हाला दु:ख होते, परंतु हे लोक तुम्हाला खोटे लेखत नाहीत तर हे अत्याचारी खरे पाहता  अल्लाहच्या संकेतवचनांचा इन्कार करीत आहेत.२१
(३४) तुमच्यापूर्वीदेखील अनेक पैगंबरांना खोटे लेखले गेले, परंतु या खोटे लेखण्यावर आणि त्यांना दिल्या गेलेल्या यातनांवर त्यांनी संयम दाखविला येथपर्यंत की आमची मदत त्यांना  पोहोचली. अल्लाहच्या गोष्टींना बदलण्याची शक्ती कोणातच नाही.२२ आणि पूर्वीच्या पैगंबरांशी जो काही व्यवहार झाला त्याविषयी बातम्या तुम्हापर्यंत आल्याच आहेत.
(३५) तथापि जर या लोकांची उपेक्षा तुम्हाला सहन होत नसेल तर मग तुमच्यात जर काही सामर्थ्य असेल तर जमिनीतील एखादा भुयारी मार्ग शोधा किंवा आकाशाला शिडी लावा  आणि त्यांच्यापाशी एखादे संकेतचिन्ह आणण्याचा प्रयत्न करा.२३ जर अल्लाहने इच्छिले असते तर या सर्वांना सन्मार्गावर जमा केले असते, म्हणून अज्ञानी बनू नका.२४



२१) वस्तुस्थिती ही आहे की जोपर्यंत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अल्लाहच्या आयतींना ऐकविण्यास प्रारंभ केलेला नव्हता तोपर्यंत समाजातील सर्वजण त्यांना अमीन (अमानतदार)  आणि सादिक (सत्यवान) मानत होते आणि त्यांच्या सत्यतेवर पूर्ण विश्वास ठेवून होते. लोकांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना त्या वेळी खोटे लेखले जेव्हा त्यांनी अल्लाहकडून अवतरित  संदेश लोकांना सांगण्यास सुरुवात केली. परंतु या दुसऱ्या टप्प्यातसुद्धा एकही माणुस त्यांना व्यक्तिश: खोटे लेखण्याचे धाडस करू शकत नव्हता. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या कट्टर  विरोधकांनीसुद्धा त्या काळी त्यांच्यावर हा आरोप केला नव्हता की जीवनात कधीही कुठल्याही बाबतीत ते खोटे बोलले असावेत. त्यांनी पैगंबर मुहम्मद (स.) यांना केवळ पैगंबरत्वामुळेच  नाकारले होते. पैगंबर मुहम्मद (स.) यांचा सर्वात मोठा शत्रू अबू जहल होता. माननीय अली (रजि.) यांचे कथन आहे की एकदा त्याने स्वत: पैगंबर (स.) यांच्याशी बोलतांना सांगितले,  ``आम्ही आपणास खोटारडा तर मुळीच म्हणत नाही परंतु जे काही आपण सांगत आहात त्याला खोटे ठरवितो.'' बदरच्या युद्धाप्रसंगी अखनस बिन शुरैक याने एकांतात अबू जहलला  विचारले होते की, येथे माझ्या आणि तुमच्याशिवाय तिसरा कोणी नाही. खरे सांगा मुहम्मद (स.) यांना तुम्ही खरे समजता की खोटे? त्याने उत्तर दिले, ``खुदा शपथ! मुहम्मद एक  सच्चा मनुष्य आहे. आयुष्यभर कधी खोटे बोलला नाही. परंतु जेव्हा झेंड्याचा अधिकार, पाणी पाजणे, काबागृहाची देखभाल आणि पैगंबरत्व हे सर्व बनीकुसई यांच्याचकडे गेले तर सांगा  बाकी कुरैश लोकांजवळ काय राहिले?'' याचमुळे येथे अल्लाह आपल्या पैगंबराचे समाधान करत आहे की तुम्हाला नव्हे आम्हाला खोटे लेखले जात आहे. आणि जेव्हा आम्ही धैर्याने  आणि सहनशीलतेने यास सहन करत आहोत आणि सवलतीवर सवलती देत आहोत. तर तुम्ही बेचैन का होत आहात?
२२) म्हणजे अल्लाहने सत्य-असत्याच्या संघर्षासाठी जो कायदा बनविला आहे त्याला बदलून टाकणे कोणाच्या शक्ती-सामर्थ्याची गोष्ट नाही. सत्यवादींसाठी अनिवार्य आहे की ते  दीर्घकाळापर्यंत आजमाविले जातील. आपला संयम, सत्यनिष्ठा, त्याग, समर्पण आणि आपल्या ईमानची दृढता आणि अल्लाहवरील आपल्या एकनिष्ठेची परीक्षा द्यावी लागेल. कष्ट   आणि संकटातून पार होऊन आपल्यात ते गुण पल्लवित करावेत जे याच कठीण स्थितीत वृद्धिगंत होऊ शकतात. प्रारंभी विशुद्ध आणि उत्कृष्ट आचरण आणि चारित्र्यशीलतेच्या  हत्याराने अज्ञानतेवर विजय प्राप्त् करून दाखवावे लागेल. अशाप्रकारे जेव्हा ते सिद्ध करतील की ते उत्कृष्ट गुणधारी आहेत तेव्हा अल्लाहची मदत ठीक वेळी त्यांना पोहचू लागेल.  वेळेपूर्वी ती कोणाच्या आणल्याने येऊ शकत नाही.
२३) पैगंबर मुहम्मद (स.) जेव्हा पाहतात की एवढा प्रदीर्घकाळ समजावून सांगूनही हे लोक सत्य मार्गावर येत नाहीत. तेव्हा त्यांच्या मनात ही इच्छा निर्माण होत असे की अल्लाहकडून  एखादा चमत्कार झाला तर किती बरे होईल. जेणेकरून त्यांच्यातील विरोध नष्ट होऊन ते सर्व सत्यमार्गी बनतील. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या याच इच्छेचे उत्तर या आयतीमध्ये  देण्यात आले आहे. अर्थ हा आहे की असंयमी वृत्तीने काम करू नका. ज्या पद्धतीने आणि ज्या क्रमाने या कार्याला आम्ही चालवित आहोत त्यावरच संयमाने चालत राहा. चमत्काराने  काम करून घ्यावयाचे असते तर काय आम्ही स्वत: हे काम केले नसते? परंतु आम्हाला माहीत आहे की ज्या वैचारिक आणि नैतिक क्रांतीसाठी आणि कल्याणकारी सभ्यता निर्माण  कार्यासाठी तुम्हाला आम्ही नियुक्त केले आहे; त्यास सफलतेच्या सीमेपर्यंत पोहचविण्याचा रास्तमार्ग हा नव्हे. तरीपण लोकांची वर्तमान वुंâठित वृत्ती आणि नकारात्मक कठोरता पाहून  तुम्ही अधीर होता. तेव्हा तुम्हाला वाटू लागते की या कठोरतम स्थितीला बदलण्यासाठी एखाद्या चमत्काराची नितांत गरज आहे. तेव्हा तुम्ही स्वत: जोर लावा आणि शक्य असल्यास  जमिनीत घुसून किंवा आकाशात चढून एखादा असा चमत्कार करा की तुम्हाला अनिश्चित स्थितीला निश्चित स्थितीत परिवर्तीत करण्यास पर्याप्त् वाटेल. परंतु तुम्ही आमच्यापासून ही  अपेक्षा ठेऊ नका की आम्ही तुमची ही इच्छा पूर्ण करू. कारण आमच्या शाश्वत योजनेत यासाठी अजिबात वाव नाही.
२४) केवळ हाच एकमात्र उद्देश असता की समस्त मानवजात काहीही करून सत्यमार्गी बनून जावी, तर पैगंबर पाठविण्याची आणि ईशग्रंथ अवतरणाचा प्रश्नच उद्भवला नसता. तसेच  श्रद्धावंत आणि अश्रद्धावंतामध्ये संघर्ष करविणे आणि सत्य संदेश युगे युगे आंदोलनाच्या मार्गातून जाण्याची आवश्यकताच मात्र राहिली नसती ! हे कार्य तर अल्लाहच्या एकाच  सृजनात्मक संकेताद्वारा पूर्ण झाले असते. परंतु अल्लाह या कार्याला अशा पद्धतीने करू इच्छित नाही. त्याची योजना तर अशीच आहे की सत्याला पुराव्यासह लोकांसमोर आणले जावे.  यांच्यापैकी जे लोक सत्य चिंतनाने काम करून सत्याला पूर्ण जाणून घेतील, त्यांनी स्वेच्छेने त्यावर श्रद्धा धारण करावी आणि आपले चारित्र्य त्यानुसार घडवून असत्यवादींच्या  मुकाबल्यात आपली नैतिक श्रेष्ठता सिद्ध करावी. मानव समूहांपैकी भल्या माणसांना आपल्या सशक्त तर्कांनी आपल्या महान लक्षप्राप्त्ीसाठी जीवनाच्या आपल्या उच्च् जीवन  सिद्धान्ताद्वारा तसेच आपल्या पवित्र आचरणाने आपल्याकडे आकर्षित करावे आणि असत्याविरुद्ध निरंतर संघर्ष करून स्वाभाविक विकासाच्या मार्गाने सत्य प्रस्थापित करण्याच्या  ध्येयाप्रत पोहचावे. अल्लाह या कार्यात त्यांचे मार्गदर्शन करील आणि स्वत:ला ज्या टप्प्यावर अल्लाहची मदत प्राप्त करण्यायोग्य बनवतील, ती मदतही त्यांना देत जाईल. परंतु कुणाची  अशी इच्छा असेल की या स्वाभाविक मार्गाला सोडून अल्लाहने केवळ आपल्या सामर्थ्यांने दूषित विचारांना नष्ट करावे आणि लोकांत उत्कृष्ट विचांराना फैलावावेत, तसेच दूषित सभ्यतेला नष्ट करून कल्याणकारी सभ्यता निर्माण करावी, तर हे कस्रfपही घडणार नाही. कारण हे अल्लाहच्या त्या योजनेविरुद्ध आहे ज्याच्यासाठी त्याने मनुष्याला जगात एक  उत्तरदायी सजीवाच्या रूपात निर्माण केले आहे. मनुष्याला उपभोगाचे अधिकार दिले आहेत. आज्ञापालन करणे अथवा न करण्यासाठी स्वातंत्र्य दिले आहे. परीक्षेसाठी सवलत दिली आहे  व त्याच्या कार्यप्रणालीनुसार पुरस्कार किंवा शिक्षा देण्यासाठी निर्णयाचा एक दिवस निश्चित केला आहे.

माध्यमक्रांतीचे शतक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकविसाव्या शतकात यूट्यूब, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, सिनेमा इत्यादींमध्ये मुस्लिमांनावर खोटे आरोप  करण्यात येऊन त्यांची प्रतिमा खलनायकाची बनविण्यात आली आहे. केंद्रात सत्ताबदलानंतर तर या सर्व प्रकारांना चांगलाच जोर आल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी झी न्यूजचे  तथाकथित अँकर सुधीर तिहारीने जिहादचे इतके प्रकार सांगितले होते की तेवढे इस्लामिक धर्मगुरूलादेखील माहीत नाहीत. तथाकथित बुद्धिवादी मुस्लिमांना वाटते की आपण अशा  माध्यमांवर बहिष्कार टाकू. ती आपल्या समाजातील कुणीही पाहू किंवा बघू नयेत. त्यांनी निश्चिंत राहावे की तुम्ही अशी चॅनल न पाहिल्याने किंवा अशी वृत्तपत्रे न वाचल्याने  मुस्लिमांविरूद्ध माहितीयुद्धात सहभागी असलेल्या मीडिया घराण्यांवर कसलाही फरक पडत नाही. या मीडिया घराण्यांद्वारे निर्माण करण्यात आलेले काल्पनिक कार्यक्रम मुस्लिमांना  दाखविण्याकरिता नसतातच मुळी. ते फक्त त्याच वर्गासाठी असतात जो मुस्लिमांबाबत सॉफ्ट कॉर्नर बाळगतात. त्यामुळे त्यांचा ब्रेनवॉश माहितीयुद्धाद्वारे दुष्प्रचार पसरवून केला जात  आहे. देशभर फिरून मुस्लिमांविरूद्ध दुष्प्रचार पसरविणे, इतिहासाचे विकृतीकरण करणारे व्याख्याने आयोजित करून इस्लामोफोबियाला चालना देणे जेणेकरून लोकांच्या मनात द्वेष  निर्माण व्हावा, इत्यादी कार्यासाठी तथाकथित बुद्धिवाद्यांची जणू नियुक्तीच करण्यात आली आहे. याचे परिणाम काय होतात हे सांगण्याची गरज नाही. माहितीयुद्धातील शत्र बदलले आहे.  आता लढाई वॅâमेरा, माइक, की-बोर्डाने लढली जात आहे. याद्वारे असे योद्धे तयार होतात जे शत्र हाती घेतात, दंगली घडवितात, लिंचिंग करतात आणि जेथे जेथे मुस्लिमांची दुर्बलता  दिसून येते त्या ठिकाणी हिंस्र जनावरासारखे तुटून पडतात. सामान्य लोक बुद्धीचा वापर फारच कमी करतात. त्यामुळे ते बौद्धिक दहशतवाद्यांच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या वक्तव्यांना  सत्य समजून त्यांची बौद्धिक दहशतवाद्यांना हवी असलेली धारणा बनते. या देशात जो वर्ग मुस्लिमांविषयी द्वेष बाळगतो त्याला इस्रायल अमेरिका प्रिय वाटू लागतात. कारण या दोन्ही  देशांची नीतीधोरणे मुस्लिम व इस्लामविरूद्ध आहेत. नुकतेच हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या न्यूज चॅनलने पॅलेस्टाईन विरूद्धदेखील प्रोपगंडा सुरू केला होता. कारण त्यामुळे मुस्लिम समाज  नाराज झाला तरी त्यांचा द्वेष करणारा वर्ग निश्चित खूश होईल. हा द्वेष फक्त काही दिवसांपूर्वी निर्माण झालेला नाही. याचा रिमोट इस्रायलकडे असण्याची दाट शक्यता असून तेथूनच  हा दुष्प्रचार नियंत्रित होत असावा. इस्रायलबाबतचा भारताचा दृष्टिकोन लपून राहिलेला नाही. म. गांधीपासून ते इंदिरा गांधींपर्यंत आपल्या राष्ट्रीय नेत्यांनी इस्रायलला कधीही राष्ट्र  म्हणून मान्यता दिलेली नव्हती. उलट पॅलेस्टाईनबरोबर उभे राहिले. त्यानंतरच्या काळात भारतात इस्रायलने पाय रोवले आणि त्याचबरोबर मुस्लिमांच्या विरोधात द्वेषातदेखील वाढ होत गेली. हे सर्व माहितीतंत्राद्वारे घडविले जात आहे. हेच माहितीयुद्ध या देशातील मुस्लिमांसाठी त्रासदायक ठरत आहे. याकडे मुस्लिम समाजाच्या राजकीय आणि सामाजिक नेतृत्वाला लक्ष  द्यायला सवड नाही. ते फक्त उर्दू वृत्तपत्रांपर्यंतच वक्तव्ये छापून त्यांत आपला फोटो पाहून खूश होतात. माहितीयुद्धाचा सामना करण्यासाठी मुस्लिमांनी त्याच शस्त्रांचा वापर करायला  हवा ज्यांद्वारे त्यांच्याविरूद्ध द्वेष पसविला जात आहे. अशा प्रकारच्या माध्यमक्रांतीमुळे संपूर्ण समाज प्रभावित आणि संकुचित बनत चालला आहे. त्यामुळे माध्यमे कुटुंबाची, समाजाची  आणि पर्यायाने राष्ट्राची डोकेदुखी ठरत आहेत. माध्यमांची स्वैर हाताळणी आणि त्याचा विघातक, आत्मकेंद्री वापर जवळच्या काळात खूप मोठी जागतिक समस्या बनेल यात शंका  नाही. माध्यमांच्या आहारी जाणारा समाज स्वकेंद्री बनत आहे. मुस्लिमांबाबत बातम्या देताना केला जाणारा पक्षपात त्यांच्या मनांत अन्यायाची भावना निर्माण करतो. त्यामुळे मुस्लिम  समाजाची प्रतिमा डागाळण्यास प्रसारमाध्यमांचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. असा आरोप प्रेस कौन्सिलचे माजी अध्यक्ष मरकडेय काटजू यांनी केला आहे. देशात जातीयवादाला  खतपाणी घालण्यास प्रसारमाध्यमांची बेजबाबदार वृत्तीच कारणीभूत आहे, माध्यमांनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवावे आणि नैतिकतेने वागावे आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर  जातीयता पसरविण्यासाठी करू नका. राष्ट्रीय हितसंबंधांना बाधा येईल अशी वृत्तांकने करण्यापूर्वी हजारदा विचार करावा, असा सल्लाही काटजूंनी माध्यमांना दिला आहे. विशिष्ट  समाजाबाबत द्वेष पसरविण्यासाठी डिजिटल यंत्रणा अर्थात इंटरनेटचा वापर होत आहे. धर्म, राजकारण, खोट्या बातम्या, धर्मद्वेषी व वर्णद्वेषी मजकूर, एखाद्या समाजाबद्दल गैरसमज  तयार करुन सोशल मीडियातून पसरवला जात आहे. हे सर्व देशात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात तबलीग जमातच्या मुख्यालयात अडकून  पडलेल्या मुस्लिम अनुयायांच्या अनुषंगाने मीडियारूपी सांप्रदायिक व्हायरसद्वारे सुरू असलेल्या माध्यमयुद्धाची प्रचिती येते. प्रसारमाध्यमांमध्ये मानवतावादाच्या नावाने जी बौद्धिक  विकृती फैलावली आहे, तिची चिकित्सा करणे आवश्यक आहे. जर हे थांबले नाही तर आगामी काळात गृहयुद्धाशिवाय दुसरा उपाय राहणार नाही. जगातील अनेक देशांत अशी गृहयुद्धे झाली आहेत.

-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४

लातूर (प्रतिनिधी)
कोरोनामुळे देश लॉकडाऊन करण्याची परिस्थिती ओढावली. त्यामुळे पूर्ण देशात कामगार, मजूर, शोषितांचे हाल सुरू आहेत. ज्यांचे हातावर पोट आहे, अश्यांना जगण्याची भ्रांत आहे. दिवसेंदिवस लॉकडाऊनची स्थिती कडक होत असल्याने सामान्य नागरिकांची घरप्रपंच चालविण्याची चिंता वाढत आहे. सरकारने उपाययोजनांची घोषणा केली असली तरी अद्यापही त्याची पूर्णतः अंमलबजावणी होत असल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे माणुसकीची जाण ठेवत राज्यभरातील विविध सामाजिक, धार्मिक, संस्था, संघटना, जमात तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी  गरीबांना अन्नधान्य, जेवणाचे डबे वाटपाला सुरूवात केली आहे. त्यामुळे कोरोनाच्या महाभयंकर महामारीतही माणुसकी जीवंत असल्याचे दिसून येत आहे.
    लातुरात जमाअते इस्लामी हिंद लातूरने जवळपास 350 अधिक लोकांना घरपोच राशन किट वाटप केले असून हे काम अजून सुरूच आहे. या किटमध्ये तूर दाळ, मसूर दाळ, साखर, पोहा, मिर्ची, जिरा, हळद, चहापत्ती, तेल पाकिट, मीठ आदींचा समावेश होता. सर्फराज मणियार यांनी जवळपास 200 राशन किट वाटप केले. वसुंधरा प्रतिष्ठानने दररोज 50 पेक्षा अधिक गरजवंतांना डबे नेऊन दिले. तसेच माय फाऊंडेशन, मुस्तफा सय्यद मित्रमंडळ, आम्ही लातूरकरकडूनही जेवण, भाजीपाला, कीट गरजवंतांना देण्यात आले. ज्या भागात खरेच गरजवंत आहेत त्या भागातील नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत अन्नधान्य पोहोचते केले. दररोज खिचडी शिजवून गरवंतांना देण्यात आली. विविध सामाजिक संघटनांच्या या समाजोपयोगी कार्याचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.

नागपूर (डॉ. रशिद) - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केेलेल्या लॉकडाऊनमुळे गरीबांची चांगलीच होरपळ होत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या दैनंदिन रोजीरोटीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. तसेच त्यांच्या आरोग्यावरही लक्ष देणे गरजेचे आहे. गरजूंच्या सेवेसाठी मेडिकल सर्व्हीस सोसायटी ऑफ इंडिया व जमाअते इस्लामी हिंद नागपूरच्या वतीने 25 मार्चपासून जीवनावश्यक सामुग्री व मास्क देऊन जनजागृती करण्यात येत आहे.
    एमएसएसचे अध्यक्ष डॉ. नईम नियाजी म्हणाले, आम्ही 25 मार्चपासून गरीब परिवारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करीत आहोत. यामध्ये एका परिवाराला 1 महिना पुरेल एवढे अन्नसामुग्री देण्यात येत आहे. याबाबत शहरात फिरण्यासाठी आवश्यक असलेला परवानाही पोलीस विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे गरीब नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस प्रशासनाचेही सहकार्य लाभत आहे. डॉ. नियाजी म्हणाले, गिट्टीखदान, सदर, मानकापूर आणि पाच पावली पोलीस स्टेशनच्या महिला आणि पुरूष कर्मचार्‍यांना 150 हँडग्लोस व मास्कचे वितरणही करण्यात आले. कोरोनामुळे केलेल्या लॉकडाऊनची झळ सर्वांनाच बसत आहे. परंतु, अशा बिकट परिस्थितीत एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे. जे गरजवंत आहेत, ज्यांचे हातावर पोट आहे, अशांना मदत करणे हे धनवंतांचे आद्य कर्तव्य आहे. प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी सांगितले आहे की, जो व्यक्ती दुसर्‍यावर दया करत नाही त्याच्यावर अल्लाह सुद्धा दया करत नाही. त्यामुळे या विषाणूजन्य आजाराच्या काळात परिस्थितीशी झगडणार्‍यांना मदतीचा हात देणे हीच खरी समाजसेवा आणि ईश्‍वरसेवाही आहे. मागील काही दिवसांपासून आमच्या संघटनेने छपारा, सिवनी जाणार्‍या मजुरांना भोजन सामुग्री सहीत किटची व्यवस्था करून दिली. हे मजूर इंदौर चौकाच्या इंदौरबारा खोली येथे थांबे आहेत. आंबेडकर हॉस्पिटल जवळ जडी बुटी विकणारा परिवार सुद्धा हलाकीच्या परिस्थितीशी तोंड देत आहे. नागपूर उत्तरक्षेत्राच्या झोपडपट्टीत अनेक परिवारांना एक महिन्याचं राशन कीट देण्यात आले. नागपूर शहरातील जाफर नगर, टेका भागातही राशनचं वितरण सुरू आहे. या कामी डॉ. जुबैर शेख, डॉ. शगुफ्ता शेख, डॉ. सरफराज अहमद, डॉ. रियाज आमीर, शफिक अहमद काजी, फैसल मलिक, अब्दुल सईद, मोइन खान, शाहरूख अंसारी, अकील अहमद, मोईन सिद्दीकी परिश्रम घेत आहेत.

दिल्लीच्या निजामुद्दीन भागामध्ये असलेल्या तब्लीगी जमाअतच्या मर्कज (केंद्रा) मध्ये अकडून पडलेले काही लोक कारोनाबाधित असल्याच्या बातम्या 30 आणि 31 मार्च रोजी मीडियामध्ये झळकू लागल्या. त्यामुळे देशात एकच गहजब उडाला. मीडियाने असे वार्तांकन केले जणू कोरोना व्हायरस मुसलमान असून, देशात कोरोना फैलावण्यामध्ये त्याची आणि मर्कजची युती होती. या संदर्भात एकांगी वार्तांकन करण्यात आले. या सर्व घडामोडींमध्ये केरळाचे राज्यपाल आरीफ मुहम्मद खान आणि कॅनडियन नागरिक तारीक फतेह यांनी तबलिगी जमाअतवर भरपूर तोंडसुख घेतले. अशा परिस्थितीत सत्य काय आहे? हे वाचकांसमोर मांडणे आवश्यक असल्याने हा लेखन प्रपंच.
    दिल्लीच्या जवळच असलेल्या नोएडामध्ये ’सीज फायर इंडस्ट्री’ नावाची एक कंपनी आहे. या कंपनीमध्ये 17 मार्च रोजी ब्रिटनहून एक ऑडिटर आला होता जो की कोरोनाग्रस्त होता आणि त्याच्यामुळे या कंपनीतील 24 कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली. मुळात नोएडामध्ये कोरोना फैलावलाच या कंपनीमुळे, जिला की नंतर सील करण्यात आले.(उर्वरित पान 2 वर)
मात्र नोएडामध्ये कोरोना फैलावण्यासाठी कोणीही या कंपनीला दोषी ठरवत नाही. त्याविरूद्ध मोहीमही उघडली जात नाही. मात्र त्याचवेळेस मर्कजलाच दोषी ठरविण्यामध्ये दिल्लीचे उपराज्यपाल, मुख्यमंत्री केजरीवाल पासून ते मीडियापर्यंत सर्वांचे एकमत असल्याचे दिसून आले.
    या संदर्भात थोडेशे तथ्य धुंडाळले तर खालीलप्रमाणे स्थिती उत्पन्न होते.
1) 13 मार्च रोजी देशाच्या स्वास्थ मंत्रालयाकडून सल्ला देण्यात आला की, कोरोनाची भीती बाळगण्याचे कारण नाही.
2)  13 ते 15 मार्चच्या दरम्यान मर्कजमध्ये 1500 लोक उपस्थित होते जी की सामान्य गोष्ट आहे. कारण मर्कज हे तबलिगी जमाअतचे अंतरराष्ट्रीय मुख्यालय आहे. या जमाअतचे काम जवळ-जवळ 150 देशांमध्ये चालते. या देशातून जमाअती जेव्हा भारतात येेतात तेव्हा मर्कजमध्येच त्यांची नोंद होते. हे जे लोक येतात ते सर्व आपापल्या देशाच्या पासपोर्ट व भारताच्या विजावर येतात. शिवाय देशाच्या प्रत्येक राज्यातून या ठिकाणी लोकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे त्या ठिकाणी 1500 किंवा 2000 लोक एकाच वेळेस उपस्थित होते. ही काही नवलाची गोष्ट नव्हती. बरे ! त्या तारखेत देशात फक्त तबलिगी मर्कजच असे होते की जेथे गर्दी होती, अशीही गोष्ट नाही. सत्य खालीलप्रमाणे आहे -
3)13 मार्च पर्यंत अंतरराष्ट्रीय विमान सेवा चालू होती व या तारखेपर्यंत अनेक विदेशी भारतात आलेले होते. 13 तारखेला केंद्र सरकारने विजा बंद करण्याची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे मर्कजमध्ये विदेशी लोक ’लपून’ बसले होते. हा मीडियाचा शाब्दिक व्याभिचार होता.
4) 14 मार्चला देशात अनेक ठिकाणी गोमुत्र पार्ट्या झाल्या.
5) 19 मार्च रोजी दिल्लीमधील सर्व शाळा बंद करण्यात आल्या. याचाच अर्थ 18 मार्च पर्यंत लाखो विद्यार्थी दिल्लीच्या वेगवेगळ्या शाळांमध्ये एकत्र येत होते.
6) 16 मार्चपर्यंत सिद्धीविनायक मंदीर सुरू होते.
7) 16 मार्च पर्यंतच उज्जैन येथील महाकालेश्‍वर मंदीरही सुरू होते.
8) 17 मार्च पर्यंत शिर्डीचे साईबाबा मंदीर सुरू होते.
9) 17 मार्च पर्यंत शनी शिंगणापूर मंदीरही सुरू होते.
10) 18 मार्चपर्यंत वैष्णोदेवी मंदीर सुरू होते.
11) 20 मार्च पर्यंत काशी विश्‍वनाथ मंदीर सुरू होते.
12) 19 मार्च रोजी पंतप्रधानांनी पहिल्यांदा, ”सोशल डिस्टंसिंग’चे आवाहन केले.
13) 22 मार्च रोजी जनता कर्फ्युमध्ये संध्याकाळी 5 वाजता हजारो लोक थाळी आणि चमचे वाजवत समुहासमुहाने रस्त्यावर उतरून जल्लोष करीत होते.
14) 23 मार्चपर्यंत संसदेचे सत्र सुरू होते. ज्यामध्ये दुष्यंतसिंह सामील होते जे की, कोरोनाग्रस्त कनिका कपूरच्या पार्टीमध्ये सामील होऊन संसदेत आले होते.
15) 23 मार्चलाच मध्यप्रदेशमध्ये शिवरासिंह चौहान यांचा शपथविधी झाला. या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सामिल होे आणि एकमेकांना आलिंगन देऊन आनंद व्यक्त करत होते.
16) 24 मार्च रोजी संध्याकाळी 8 वाजता कुठलीही पूर्वसूचना न देता 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. आणि येथूनच सर्व परिस्थिती बदलली.
17) तरीसुद्धा 25 मार्च रोजी लॉकडाऊनची परवा न करता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत जाऊन राम मूर्तींची पूजा करून त्यांना मंदिरात हलविले. या प्रसंगीही बरेच लोक त्यांच्या अवतीभोवती गोळा झाले होते.
18) अचानक लॉकडाऊन झाल्यामुळे विमान, बस, रेल्वेसह खाजगी वाहतूक बंद पडल्याने ज्याप्रमाणे असहाय्य लोक दिल्ली आणि देशाच्या उर्वरित भागातून आपापल्या घराकडे पायी निघाले. तसे तरी मर्कजमध्ये राहणार्‍यांनी केले नाही. सरकारने ’जेथे आहात तेथेच रहा’ असे आवाहन केले होते त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन हे लोक मर्कजमध्येच राहिले. त्यांनी कुठलाही कायदा भंग केला नाही. उलट सरकारचे आदेश शब्दशः पाळले. तरी परंतु, त्यांनाच दोषी ठरविण्यात आले.
19) मर्कजमध्ये जे विदेशी येतात त्यांची अगोदर ओळख पटविली जाते आणि एक भींत आड असलेल्या पोलीस स्टेशन निजामुद्दीन मध्ये त्यांच्या आगमनाची कायदेशीर सूचना दिली जाते. हा गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला प्रघात आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी जे विदेशी आले होते ते विमानाने आले होते. त्यांना जर कोरोनाचा संसर्गत होता तर याचा दूसरा अर्थ असा की विमानतळावर त्यांची योग्य वैद्यकीय तपासणी झालेली नाही. याला कोण जबाबदार होते याबद्दल कोणीच काहीच बोलत नाही. सगळे गप्प आहेत. मुळात तज्ज्ञांचं असं मत आहे की भारतात कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या कमी यासाठी वाटते की, जगाच्या इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात कोरोना वायरसची तपासणी कमी होते. प्रत्येक 10 लाख लोकांमध्ये फक्त 18 लोकांच्या तपासण्या झाल्याचे एका पाहणीमध्ये आढळून आले आहे.
    अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे जी असहाय्यता पायी गावाकडे जाणार्‍या लोकांची होती तीच असहाय्यता मर्कजमध्ये अडकलेल्या लोकांची हाती. ते काही तेथे पार्टी करत नव्हते. एवढे असूनही मर्कज हे स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात होते आणि मर्कजमधील लोकाना बाहेर काढण्यासाठी प्रशासनाची परवानगी मागून बसेस उपलब्ध करून देण्याची विनंती करीत होते. मर्कज आणि प्रशसनाध्ये झालेला पत्रव्यवहार हा सार्वजनिक व्यासपीठावर उपलब्ध आहे. एवढे सर्व सत्य वाचकांसमोर ठेऊन मी वाचकांच्याच सद्सद्विवेकबुद्धीला आवाहन करतो की त्यांनीच ठरवावा की चूक कोणाची आहे.
    आता तर ह्यात एफआयआर दाखल झालेला असून, निर्णय कोर्टात होईल. मीडियामधील काही लोक वेड्यासारखे वागत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सरकारने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करणे हेच खरे राष्ट्रीय कर्तव्य आहे.

- एम.आय.शेख

देशाची कसोटी : माणुसकी जीवंत ठेवावी

corona
तुम्ही एकाच आई-वडिलांपासून जन्म घेतलेली सगळी लेकंर. जगात कुठेही वावरा तुमचे प्रश्‍न एक, तुम्हाला जडलेल्या आजारांवरील सर्वांना लागू होणारा औषधीही एकच़़़ असचं कोरोना विषाणूने काहीशी परिस्थिती जगातील मानवजातीला दाखवून दिली़ जगातील जवळपास 199 पेक्षा अधिक देशाला कोरोना विषाणूजन्य आजारानं वेढलं आहे़ आत्तापर्यंत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येबाबत माहिती देणार्‍या वडोर्मीटर संकेतस्थळानुसार, जगातील 199 देशांमधील 7 लाख 23 हजार 124 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनाचे एक लाख 48 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. रविवारी, स्पेनमध्ये एका दिवसात 821 जणांचा मृत्यू झाला. तर 6875 नवे रुग्ण आढळले आहेत. इटलीतही परिस्थिती चिंताजनक असून 756 जणांचा एका दिवसात मृत्यू झाला असून आतापर्यंत 10 हजार 779 जणांचा मृत्यू झाला आहे. जगभरात बुधवारपर्यंत 8 लाख 41 हजार 285 जणांना कोरोना बाधा झाली पैकी 41403 जणांना मृत्यू झाला. उपचाराअंती 176097 बरे झाले. भारतात 1900 जणांना कोरोनाची लागण झाली असून, 58 रूग्णांचा मृत्यू झाला तर उपचाराअंती 102 घरी परतले.
    चीन, अमेरिका, युरोपसह अन्य विकसित देशात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातलेले आहे़ उच्च कोटीच्या आरोग्य सुविधा असूनही कोरोनासमोर हे देश हतबल झाल्याचे दिसत आहे़ त्यामानाने भारतात उशीरा का होईना पण कडक अंमलबजावणी आणि योग्य जनजागृती होत असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठी मदत झाली आहे़ त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारचं याबाबत कौतूक झालं पाहिजे़ मात्र लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक घडी विस्कटून गेली असून, जनमाणस हतबल झाल्याचे दिसून येत आहे़     -
कामगार वर्ग तर पुरता हतबल झाला आहे़ राज्यभरात लाखोंची संख्या कामगारांची आहे़ त्यामध्ये ज्याचे हातावट पोट आहे त्यांची संख्याही लक्षणीय आहे़ राज्यात परराज्यातील आलेल्या कामगारांची तर दयनीय अवस्था आहे़ लॉकडाऊन वाढण्याच्या भीतीने त्यांनी आपल्या मूळ गावाकडे पलायन करणे सुरू केले आहे़ सर्व वाहने बंद असली तरी अत्यावश्यक सुविधा देणार्‍या वाहनांमधून दाटीवाटीने ते प्रवास करीत आहेत़ तसेच शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करीत ते गावाकडे जात आहेत़ ही अवस्था बघवत नाही़ खरं तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना जिथे आहे तिथे राहण्याची विनंती केली असून, पंतप्रधानांनीही 3 महिने घर मालकांनी भाडेकरूंकडून भाडे घेऊ नये असे विनंती केली आहे़  मात्र तेवढी दयावृत्ती अजून आपल्याकडे आलेली नसल्याने काही ठिकाणी भाडेकरू व्यवसाय, नोकरी बंद असल्याने चिंतातूर झाले आहेत़ देशातील खाजगी नोकरवर्गाचाही जीवात जीव दिसून येत नाही़ एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखत आहोत, याचे समाधान होत आहे मात्र नोकरीवर याचे दीर्घकालीन परिणाम होऊन मोठी हानी होण्याची भीती निर्माण झाली आहे़ लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय बसले आहेत़ कंपन्या बंद झाल्या आहेत़ त्यामुळे पुढील महिन्यांत अनेकांना पगार मिळेल का नाही याची भीती आहे़ यावर सरसकट काही तरी उपाययोजना होणे अपेक्षित आहे़ मात्र ते होईल, असे सध्यातरी वाटत नाही़ गरीबाना तीन महिन्यांचे राशन देण्याचा आवाहन करण्यात आले असले तरी वितरणाची व्यवस्था अपुरी असल्याचे चित्र आहे़  काही जणांकडे राशन कार्ड आहे मात्र राशन दुकानात त्याची नोंद नाही, ऑनलाईन जोडणी झालेली नाही़ अनेकजण तर कधी राशन दुकानाकडे फिरकलेही नाही़ यामुळे सर्व गरजूंपर्यंत राशन पोहचेल का नाही, याची चिंता वाटते़
    पोलीस आणि डॉक्टर्सचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे़ मात्र त्यांना कित्येक असुविधांचा सामना करावा लागत आहे़ त्यामुळे खाजगी दवाखान्यांनी आपली ओपीडी बंद ठेवली आहे़ कोरोनाचा धसका स्वत: डॉक्टर्सनीही घेतला आहे़ जिथे असुविधा आहेत तेथील डॉक्टर्सनी हॉस्पिटल बंद करणे पसंद केले आहे़ जगभरातून कोरोनामुळे डॉक्टर्सच्या मृत्यूंच्या येणार्‍या बातम्यांनी खाजगी डॉक्टर्स हादरले आहेत़ एकंदर काय तर कोरोनाची ही भीषणता कुठे जाऊन थांबेल, ही बाब सध्यातरी अनिश्‍चित दिसत आहे़  अशात माणुसकीचं नातं जपणं फार गरजेचं आहे़
    भारतात एकत्रित कुटुंबात राहण्याची परंपरा जुनीच आहे़ त्यामुळे सर्व लोक कधीनाही तेवढे घरात जमले आहेत़ ते एकमेकांचे जमत नसले तरी जमवून घेत आहेत़ आपुलकीची भावना निर्माण झाली आहे़ मात्र सोशल डिस्टन्सचं अंतर पाळणं कठीण जात आहे़ एकत्रित कुटुंबातील एखादाही व्यक्ती शिंकला, खोकलला की संशयाच्या नजरेने त्याच्याकडे पाहिले जात आहे़ शासनानं एक बरं केलं की कोरोनाबाधिताची नावे जाहीर केली नाहीत़ अन्यथा त्या परिवाराशी लोकांनी संपर्कच ठेवणं बंद केलं असतं़ पुणे, मुंबई असो की परदेशातून आलेले नागरिक प्रत्येकाकडे संशयाची सुयी जात आहे़ त्यामुळे त्या लोकांनी स्वत:ची तपासणी करून होम कोरंटाईन करून घेतले पाहिजे़ कुठेही बाहर फिरले नाही पाहिजे़
    धार्मिक कार्यक्रम, स्थळे सर्वच तात्पुरते बंद करण्यात आले आहे़ काहींनी स्वत:हून बंद केले आहेत तर अजूनही काही आडमुठे लोक एकत्रित जमा होत आहेत़ अशा भीषण परिस्थितीत प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे़ कोरोना संसर्गजन्य आणि गुणाकार पद्धतीने पसरणारा आजार आहे़ त्यामुळे या भयंकर महामारीला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे़ त्यासाठी आयसोलेशन शिवाय दूसरा मार्ग नाही.
    कोरोनाने जगभरातील माणसांच्या चेहर्‍यावरचं हास्य ओरबडून घेतलं आहे़ प्रत्येक व्यक्ती चिंताग्रस्त आहे़ अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडताना कुटुंबियांचा जीव भांड्यात पडत आहे़ आनंदाचं हसणं घरातील व्यक्ती विसरल्या आहेत़ सर्व जग धावत असताना कोरोनाने जगाला अचानक ब्रेक लावल्यामुळे प्रत्येकाला इच्छा नसताना घरात रहावं लागत आहे़ जेव्हा इच्छा नसताना कुठलीही गोष्ट केली जाते तेव्हा तेथे विनाकारण वाद उद्भवतात़ तीच परिस्थिती आज मोठ्या प्रमाणावर उद्भवत आहेत़  अशा भीषण परिस्थिती माणुसकीचं, प्रेमाचं, एकात्मतेचं आणि वात्सल्याच दर्शन घडणे गरजेचे आहे़ आज मोठ्या प्रमाणात देशात सामाजिक संस्था, संघटना गरीबांपर्यंत अन्नधान्य व जेवण पोहोचते करत आहेत.  ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. अशांची संख्या कमी आहे मात्र सरकारकडून कामगार, गरीबांपर्यंत अन्नधान्य आणि जेवण पोहोचविण्यासाठी मोठी पावले उचलणे गरजेचे आहे़ येणारा काळ महाभयंकर राहणार आहे़ कामगारांच पलायन वाढलं आहे़ जगण्या-मरण्याची भीतीने मानसिक आजार जडण्याची शक्यता आहे़ त्यामुळे कोरोनाचा सामना घरात राहून, सोशल डिस्टन्स पाळून करणं हेच उत्तम़

- बशीर शेख  

सध्या कोरोनाविषयी इतकं जनजागरण झालंय की, त्याविषयी आता कुणी काही बोलत असेल तर लोकांना कंटाळा येऊ लागलाय. कोविड - 19 ची लागण झाली आणि आवश्यक ती काळजी घेतली गेली नाही तर रूग्ण दगाऊ शकतो. रूग्णाच्या संपर्कात आलेली सगळी मंडळी दगाऊ शकते. म्हणून हस्तांदोलन टाळा, हात धुवा, गर्दी टाळा, शक्यतोवर एकांतात राहा, आजारी असल्यास मास्क वापरा, खोकलतांना किंवा शिंकतांना तोंडावर रूमाल धरा किंवा दंडाचा कोन करून तोंड लपवत शिंका वगैरे गोष्टी माझ्या केजीत शिकणार्‍या मुलीलाही माहित झाल्या आहेत. याचा अर्थ असा नाही की, या खबरदार्‍या आणि उपाय योजना फालतू आहेत किंवा त्यावर आचरण करायचंच नाही. बिल्कुल या उपाय योजना करायलाच हव्या, त्या आवश्यक नव्हे तर अनिवार्यच ठरतात. म्हणून कोरोना रोगाचा इतिहास, उगम, त्याची लक्षणे व उपाय योजनांवर फार जास्त न बोलता, उपाय योजनांच्या नावावर जे असंतुलन पाळलं जातंय, त्यावर काही भाष्य करायचं आहे.
    कोविड-19 पेक्षा एक आणखी भयानक विषाणु झपाट्याने पसरतोय. तो विषाणु म्हणजे जातीवादाचा विषाणू. दिल्लीत लॉकडाऊनमुळे फक्त मजुरच नव्हे तर जवळपास प्रत्येक वर्गातली माणसं कुठे ना कुठे अडकलेली आहेत. कर्मचारी, शेतकरी, महिला, कलाकार व इतर सगळ्याच वर्गातले लोक यात आहेत. याला धार्मिक मंडळीही अपवाद राहिलेली नाहिये. कटारा येथे वैष्णव देवी येथे ही हजारो भाविक अडकलेले आहेत. तसेच या अचानक घोषित केलेल्या लॉकडाऊनमुळे तबलीग़ी जमाअत या लोक चळवळीचं दिल्लीच्या निज़ामुद्दीन परिसरात स्थायिक असलेलं मुख्यालय (मर्क़ज)मध्ये काही भाविक अडकले. यात अनेक विदेशी आहेत. आता इतरांसारखंच हेदेखील अडकले होते. फरक एवढाच की हे, इतर मजुरांसारखे पायी निघाले तसे निघाले नाहीत, तर पंतप्रधानांच्या आवाहनाला पूर्ण पाठिंबा देत आणि त्यांच्या निर्देशांवर पूर्णपणे अंमलबजावणी करत ते जिथे होते, तिथेच थांबलेत. याच मुद्याला काही कार्पोरेट प्रसिद्धी माध्यमं धार्मिक रंग देत आहेत. ‘मरक़ज’तर्फे अनेकवेळा सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिले जात आहे की, लॉकडाऊन होण्यापूर्वीपासूनच संघटनेतर्फे दिल्ली सरकार व केंद्र सरकारलाही अडकलेल्या लोकांना जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात यावी, अशा लिखित स्वरूपात विणवण्या केल्या जात होत्या. पण प्रशासनाने काहीही प्रतिसाद दिलेला नव्हता. पण तेलंगाना व इतर ठिकाणी काही रोगींचे निदान करत असतांना त्यांची ‘ट्रॅव्हल हिस्ट्री’ शोधली गेली असता, ती ‘मऱक़ज’पर्यंत पोहोचली आणि 2100 लोक सापडले, असा अपप्रचार सुरू झाला. वास्तविक पाहता मर्क़जच्या प्रशासनानेच स्वत:हून अडकलेल्यांपैकी अनेकांना कॉरंटाईन करण्याची विनंती केली होती. या मुद्याचं भांडवल करून काही लोक तबलीग़ी जमाअतवर थेट बंदी आणण्याचीच मागणी करत आहेत. परंतु सरकार व संघटनेच्या संपर्क तुटवड्यावरून म्हणा किंवा सरकारच्याच आळशी कारभारामुळे म्हणा काही लोक मर्क़जमध्ये अडकले होते, त्यात पूर्ण संघटनेची चूक नाही. ही संघटना फार मोठे देशसेवेचं कार्य करत असते. ते कार्य समजून घेण्यासाठी आधी ‘तबलीग़ी जमाअत’ म्हणजे नेमकं काय असते, ते आपण समजून घेऊ या -
    पाठीवर भलेमोठे बॅग, पिशव्या, गाठोडं वगैरे घेतलेले कुर्ता, पायजामा घातलेले लांब-लांब दाढी, टोपीवाल्यांचा जत्था रस्त्याने जात असतांना तुम्ही अनेक वेळा बघितला असेलच. हे जत्थे म्हणजे काही मोजक्या यशस्वी मुस्लिम चळवळीपैकी एक ती चळवळ आहे. तबलिगी जमात- सन 1927 मध्ये हरयाणाच्या मेवात शहरात मौलाना इलियास कांधीलवी यांनी याची स्थापना केली. विशेष म्हणजे ही संघटना किंवा सांप्रदाय नसून फक्त एक चळवळ आहे. याचं केंद्र दिल्ली येथे निजामुद्दीन परिसरात मुख्यालयात आहे. मौलाना साद हे सध्या याचे सुप्रीमो आहेत. भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ व इतर दक्षिण आशियाई देश यांचे प्रमुख कार्यक्षेत्र आहेत. भारतीय उपमहाद्विपात इतरांच्या अंधानुकरणातून काही कर्मकांडे मुस्लिम समाजात घुसल्याने अनेक रूढी परंपरांच्या आहारी इथला समाज गेला होता. त्यात सुधारणा करून खरा इस्लाम लोकांना समजाऊन सांगणे, नमाज पढण्याची पद्धत शिकवणे, तसेच दारूबंदी, व्यसनमुक्ती, व्याभीचारमूक्ती व इतर वाईट सवयींच्या निर्मुलनाकरिताही यात प्रशिक्षण दिले जाते. यांचे कुठेही स्थानिक कार्यालय नसते.  गावा-गावात जत्थे (जमात) बनवून मशिदीत काही दिवस मुक्काम करतात, तिथल्या स्थानिक लोकांचं प्रबोधन करतात आणि तिथल्या काही स्थानिक लोकांना सामील करून तो जत्था पुढे जातो. तीन दिवस, दहा दिवस, 40 दिवस किंवा 4 महिने असे वेगवेगळे कालावधीचे प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार या जत्थ्यात योगदान देत असतो. ज्याचा कालावधी पूर्ण झाला तो घरी निघून जात असतो आणि नवीन जुळलेल्या ’साथी’चा कालावधी सुरू होत असतो.अशाप्रकारे हे जत्थे एकाचवेळी जगभरात भ्रमण करत असतात. लोकं बदलत असतात पण जत्था (जमात) तीच राहते. काही जमात एकमेकांत सामिल केल्या जातात तर काही जमाती मोठ्या झाल्या की त्याचे दोन तीन गटांत विभागणी करून त्यांना वेगवेगळ्या दिशेने पाठविले जाते. याचे नियोजन करण्यासाठी कुठेतरी वर्षातून, महिन्यातून ’जोड’ हा कार्यक्रम ठेवला जातो. जत्थाचा एक स्थानिक ’अमीर (प्रमुख)’ निवडला जातो. जागोजागी रोज मशिदीत दिवसातून एकदा ’मशवरा (सल्लामसल्लत)’ होत असतो. मुस्लिम वस्तीत प्रत्येक नमाज नंतर गस्त घातली जाते. घरोघरी जाऊन प्रबोधन केले जाते, नमाजसाठी आमंत्रित केलं जाते तसेच जमातसोबत दुसर्‍या गावी निघण्याकरिता आग्रह केला जातो. अशाप्रकारे ही जमात म्हणजे धार्मिक प्रौढ शिक्षणासाठी एक चालती बोलती शाळा (मदरसा) आहे. आता मौलाना कलीम सिद्दीकी यांच्या नेतृत्वाखाली काही ठिकाणी या चळवळीच्या कक्षा रूंदावल्या आहेत. आता ते एक गस्त मुस्लिम वस्तीत तर एक गस्त मुस्लिमेतर वस्तीत घालत असतात.
    या जमाअतचे लोकं दर्गाहवर जाणे, तिथं नवस वगैरे फेडणे वगैरे गोष्टींना मानत नाही. ही एक गैरराजकीय चळवळ आहे. इतर लौकिक बाबतीत कोणतीही चर्चा किंवा वक्तव्य करत नाहीत. फक्त धार्मिक आणि त्यातल्या त्यात नमाज पढण्यावरच ही जमात जास्त भर देते. यांच्या इज्तेमा (जाहिर अधिवेशन) मध्ये वक्त्याचे नाव दिलेले नसते तर फक्त ’बयाण (भाषण)’ आणि त्याची वेळ दिलेली असते. लग्नकार्यात उधळपट्टी नको, आई वडिलांची सेवा, पती-पत्नीचे अधिकार, लेकरांचे संगोपन, हलाल कमाईचे महत्व, प्रबोधनाची गरज, त्यासाठी त्यागाचे महत्व, नमाजचे महत्व यासारखे त्यांच्या भाषणाचे विषय असतात. मात्र अमीरचा आदेश, वेळेचं नियोजन वगैरे यांची शिस्त वाखाणण्याजोगी आहे. इज्तेमाच्या शेवटी स्वतःसाठी, समाजासाठी, देशासाठी आणि संपूर्ण जगासाठी एक-एक, दोन- दोन तास दुवा मागितली जाते. सर्वसाधारणपणे देवबंद, नदवा, अक्कलकुवा वगैरे मदरस्यातील उलेमा(विचारवंत), मौलवी हे यांचे मार्गदर्शक असतात. जमातमध्ये सोबत प्रवासात असतांना हे एकमेकांशी ज्याप्रमाणे सौजन्याने वागतात, ते कौतुकास्पद आहे.
    जमात बांधनीसाठी सोशल मीडियाचा वापर, व्हिडिओ, फोटोजचा वापर वगैरे आधुनिक बदलही आता यात होत आहेत, ही सकारात्मक परिवर्तनाची नांदी आहे. पण या संघटनेकडे स्वत:चा असा प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया नाहीये. किमान स्वत:ची मीडिया सेल तरी आता या संघटनेने सुरू करायला हवी. कारण दिवसभर कार्पोरेट  मीडिया आपली बदनामी करत असतांना ताबडतोब त्या-त्या चॅनेलवरच त्या त्या आरोपांचं खंडण करणारे प्रवक्ते आता या संघटनेने तयार करण्याची गरज आहे, जे हिंदी, इंग्रजी व प्रादेशिक भाषांत आरोपांचे खंडण करू शकतील. त्याचं प्रशिक्षणही ‘मऱक़ज’मध्ये देण्याची व्यवस्था त्यांनी करावी. कारण तबलीगी जमाअतने अनेक खबरदार्‍या घेऊनही एकीकडे त्यांना हा कार्पोरेट मीडिया बदनाम करत सुटला आहे तर दुसरीकडे अनेक लोकांनी अतिशय बेपर्वाईने वर्तणुक केल्यानंतरही त्याला फार जास्त प्रसिद्धी देत नाहीये.
    याचंच एक ताजं उदाहरण म्हणजे नुकतंच कानिका कपूर या अभिनेत्रीला कोरोना विषाणुची लागण झाल्याचं सिद्ध झालंय. लंडनहून आल्यानंतर तीने दिलेल्या पार्टीत चार मोठ्या राजकीय नेत्यांसह जवळपास शंभरावर लोक होते अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यापेक्षा मोठी खळबळजनक बातमी म्हणजे त्या पार्टीत उपस्थित राहणारे खासदार दुष्यंतसिंह हे दुसर्‍या दिवशी लोकसभेत हजर होते म्हणे. म्हणजे खरं म्हणजे आता लोकसभेतील सर्व खासदार व अधिकारी तसेच कर्मचार्‍यांना अन् प्रेस गॅलरीत बसलेल्यांनाही कोरोन्टाईन (अलगीकरण कक्षात ठेवणे) करायला हवे.
    या अशा घटना होऊ नये म्हणूनच बरखास्त झालेले कमलनाथ यांचे मध्यप्रदेश सरकारची ही मागणी रास्त होती की, विधानसभेचे अधिवेशन गुंडाळण्यात यावे. याबाबतीत महाराष्ट्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह वाटतो. मुख्यमंत्री उदय ठाकरे यांनी म्हटलं होतं की, “जनप्रतिनीधींना आपापल्या ठिकाणी जाऊन सर्व खबरदारीच्या उपाय योजना व्यवस्थित अंमलात येत आहेत की, नाही ते पाहण्याकरिता तसेच विधानसभेत गर्दी होऊन तो रोग पैैलाऊ नये म्हणूनही अधिवेशन आटोपते घेतले जात आहे.” ही खबरदारी लोकसभा व राज्यसभा सत्राच्यावेळी का नाही घेतली गेली? कानिका कपूर प्रकरणामुळे सरकार करत असलेल्या उपाय योजनांचे अक्षरश: वाभाडे निघाले आहेत. परदेशातून येणार्‍या सर्व प्रवाशांचे स्क्रीनींग प्रत्येक विमानतळावर सर्वात पहिले करणारा जगात एकमेव देश भारत असल्याचा टेंभा भाजपाप्रवक्ता संबित पात्रा यांनी मिरवला होता, तो दावाही ‘जुमला’ ठरला आहे ! या सरकारवर आता जनतेने विश्‍वास ठेवायचा तरी कसा? म्हणूनच एन.पी.आर. व एन.आर.सी.ला विरोध करणार्‍या आंदोलकांना जेंव्हा सरकार आश्‍वस्त करते की ‘किसीकी नागरिकता छिनी नही जायेगी, कोई डाऊटफूल नही घोषित होगा, कोई डिटेन्शन सेंटर में नही जायेगा’ असे सांगून आश्‍वस्त करण्याचा प्रयत्न करते, तेंव्हा आंदोलक त्यांना म्हणतात की, “लिहून द्या.” कारण पंधरा लाख असो, नोटबंदी असो की, जीएसटी असो, या सरकारने दिलेल्या एकाही वचनांपैकी एकही पूर्ण केलेले नाहीये. ‘मुझे सिर्फ पचास दिन दो’ यासारखंच ‘मुझे आप कुछ वक्त दो’ असं करोनाबाबतीतलंही प्रधानमंत्र्याचं वक्तव्य वाटते. या सगळ्या धुमाकुळात मूळ मूद्दा हा आहे की, कोरोनाचा पहिला बळी डिसेंबर 2019 मध्येच गेलेला होता (म्हणूनच या व्हायरसच्या नावापुढे 19 लावले जाते की, कोविड - 19). म्हणजे जवळपास चार महिन्यापूर्वीपासूनच जगाला याचा धोका कळाला होता. मग जगभरातील देशांनी जानेवारीपासून विमानतळांवर स्क्रीनींग सुरू का केलं? केरळमध्ये सुरूवातीला फक्त तीनच रूग्ण सापडले असता केंद्र सरकारने चीनहून 114 भारतीय रोग्यांना आयात का केलं? आजही अनेक भारतीय अनेक देशांत अडकून आहेत, त्यांना आता का आणत नाहीये सरकार? जीथं भारतीय अडकले आहेत ते संपन्न देश असून तिथे त्या भारतीयांवर इथल्यापेक्षा चांगले उपचार होऊ शकतात (ते संपन्न आहेत म्हणूनच ते इथून तिथं पैसा कमावण्याकरिता गेले आहेत).
    या सर्व घटनांवरून एखाद्याच्या मनात पाल चुकचुकू शकते की, जगभरातील देशांतील जनविरोधी धोरणं राबवणार्‍या सरकारांना हा रोग एक वरदान तर ठरला नाही ना? कोरोनाच्या आडोशात जगभरातली सरकारं अनेक जनविरोधी निर्णय तर घेत नाहीयेत ना? अमेरिका-तालीबान करार, इराणी लष्करप्रमुखाची अमेरिकेने केलेली हत्त्या असो की अश्‍लीलतेला सुरूवात करणार्‍या सौदी सरकारविरोधात तेथील जनतेत उफाळून येणारा असंतोष असो की चीन सरकारच्या नाकात दम करणारे हाँगकाँग आंदोलन असो की जागतिक मंदीने जगभरातील देशांतील सरकारांसमोर उभं ठाकलेलं आव्हान नाहीतर आपल्य देशात आणीबाणीतल्या जेपी आंदोलनानंतर सर्वात मोठे क्रांतीकारी आंदोलन असलेले एन.पी.आर. व एन.आर.सी.विरोधी शाहीन बागचे महिला आंदोलन असो, या सर्वांपासून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी प्रस्थापितांना या विषाणुच्या स्वरूपात एक आयतेच कोलीत सापडलेले तर नाही ना? असे प्रश्‍न सर्वसामान्यांच्या मनात येणे साहजिकच आहे. सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या एका विदेशी बसमध्ये एक युवक हा चेहर्‍यावरील मास्क काढून आपल्या तोंडात बोटं टाकून त्यातली लाळ मुद्दामून बसच्या खांब्यावर चिपकवतांना दिसतोय. त्यामुळे हा काही स्वार्थी भांडवलधार्जिन्या अतिरेक्यांंचा निवडक देशांवरील जैविक हल्ला तर नाही ना, अशी शंका येण्यास वाव आहे. सगळीकडे कोरोनाचीच घुसळण सुरू आहे. केंद्र सरकारच्या आवाहनानंतर सर्वच धर्मातील जनतेने एक मुखाने उत्स्फूर्तपणे बंद पाळला, पण त्या बंदमुळेही शाहीन बाग आंदोलनात एक महिला का होईना पण ठाण मांडून बसलेलीच होती. ही बातमीही मीडियाने ब्लॅक आऊट केली अन् घरात लेकरं कसे खेळत आहेत वगैरे उथळ विषयावर रंगवून-रंगवून बातम्या देत होते.
    काहीही असो, पण हे संपूर्ण मानवतेवर आलेलं संकट आहे. यासाठी प्रत्येक वर्गाच्या, प्रत्येक जाती धर्माच्या माणसानं काळजी घेणं आवश्यक आहे. गावात चोर्‍या होत असतांना त्या कशा थांबवाव्यात यावर चर्चा करण्याऐवजी जास्त चोर कोणत्या धर्माचे, कोणत्या जातीचे अशा धाटणीची किळसावणी चर्चा होते, हे आपल्या देशाचं दुर्दैव आहे. या अशा मानसिकतेमुळे अनेक सकारात्मक कार्य करणार्‍या चळवळींच्या कार्यात बाधा येऊ शकते. आज सर्व धर्माला मानणार्‍या धार्मिक संघटनाही समाज सेवा करत आहेत. जसं जमाअत ए इस्लामी हिंद, स्टुडन्ट्स इस्लामिक ऑर्गनायेजशन्स ऑफ इंडिया (एस.आय.ओ.) व इतर अनेक संघटना रूग्ण, डॉक्टर व तेथील इतर स्टाफसाठी जेवण व आवश्यक सामुग्रीचा पुरवठा करत आहेत. घरोघरी जाऊन अन्नाच्या किट्सचे वाटप करत आहेत. तबलीग़ी जमाअतदेखील त्यांच्याविरूद्ध अपप्रचार होत असतांनाही प्रतिउत्तरादाखलही कुणाविषयीही अपशब्द बोलत नाहीये. अशा प्रेमसंदेशाची तबलीग़ (प्रचार) करणार्‍या चळवळीला बदनाम करून विनाकारण त्रास (तकलीफ) कुणीही देऊ नये.

- नौशाद उस्मान
औरंगाबाद

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget