Halloween Costume ideas 2015
Latest Post

पुरोहितगीरी फक्त एकाच समाजात आहे, असं नाही, तर जे लोकं स्वतःला पुरोहितगीरीचा विरोधक म्हणून मिरवतात, ते स्वतः देखील या पुरोहितवादाला, भटशाहीला बळी पडलेले असतात, पण ते कटू सत्त्य स्वीकारण्याइतका विवेक त्यांच्याकडे नसतो.
पुरोहितवादाच्या किंवा पुजारीवादाच्या मूळाशी मुर्तीपुजा हेच कारण आहे. कारण मुर्ती आली की, मुर्तीपुजा आली. मुर्तीपुजा आली की पुजारी आला. पुजारी आला की पुजारीवाद आला, पुरोहितवाद आला, ब्राह्मणवाद आला. म्हणून पुरोहितवादाचं समूळ उच्चाटन करायचं असेल तर आपल्याला सर्वप्रथम आपल्याच महामानवाचं दैवतीकरण थांबवावं लागेल. त्यासाठी त्यांच्या मुर्तीची, फोटोची, पुतळ्यांची पुजा बंद करावी लागेल आणि त्यांचे विचार, त्यांचे चरित्र वाचून त्यांच्या मार्गावर चाल
    मुर्तीसमोर दीप प्रज्वलन करणे, फोटोला हार घालणे, महापुरूषांच्या समाधीवर फुलं टाकणे, चादर टाकणे, त्याच्यासमोर अगरबत्ती लावणे, संतांच्या कबरींसमोर नतमस्तक होणे वगैरे सोपस्कारांना पुजा समजत नाही. तो फक्त आदर करण्याचा, मान देण्याचा संकेत असल्याचा, प्रेरणा घेण्याच् मार्ग असल्याच् युक्तीवाद करतात. असाच युक्तीवाद पुरोहितवादीही करत असतात की, ते त्या मुर्तीची पुजा करत नसून ती मुर्ती ज्याची आहे त्या महामानवाचा आदर करत आहेत, त्याद्वारे ते सात्विकतेचा, ईश्‍वरी तत्वांचाच आदर करत आहेत.
    हे थोड्या वेळासाठी खरं जरी मानलं तरीही, हा युक्तीवाद करणार्यांनी छातीवर हात ठेऊन म्हणावं की, खरंच सर्वसामान्य लोकं फक्त प्रेरणा अन् आदर म्हणूनच हे सोपस्कार करतात की पुज्य भाव मनात ठेऊन हे सगळं करत असतात? अन् याला जबाबदार कोण? याला जबाबदार तेच तथाकथित बुद्धीजीवी विचारवंत लोकं आहेत, जे आदर व प्रेरणेच्या नावाखाली या नवपुरोहितवादाला आपल्या कृतीतून चालना देत असतात. म्हणून कबरपुजा असो की पुतळापुजा, ती थांबल्याविवाय पुरोहितवाद संपुष्टात येणारच नाही.
    यासाठीच प्रेषित मुहम्मद सलअम् यांनी जगाचा निरोप घेतांना अल्लाहशी दुवा केली होती की, हे अल्लाह, माझ्यानंतर माझ्या कबरीचा देव होऊ देऊ नकोस ... म्हणजे दैवतीकरण होऊ देऊ नको. आज मदिना येथे प्रेषितांच्या कबरीवर कुणी फुलं किंवा चादर टाकत नाही. कुणी अगरबत्ती, मेणबत्ती लावत नाही, कुणी नतमस्तक (सडदा) होत नाही. किती पुरोगामी विचार होते प्रेषितांचे! त्यांनी कुणाला आपलं चित्र काढू दिलं नाही. कारण चित्र आलं की, मुर्ती येते, मुर्ती आली की मग मुर्तीपुजा अन् पुढे पुजा करणारा पुरोहित अन् पुरोहितवाद येतो. अशाप्रकारे प्रेषितांनी पुरोहितवादाचं मूळच कापून टाकलं.
    भारतीय मुस्लिम समाजात काही तुरळक ठिकाणी काही इस्लामबाह्य गोष्टी नंतर घुसल्या आहेत, हे मान्य. त्यांचं समर्थन केलंच जाऊ शकत नाही. परंतु याचे कारण म्हणजे ढोवळ्यासोबत पोवळा बांधला, वाण नाही आला, पण गुण नाही आला. परंतु सुज्ञ मुस्लिम विचारवंत, बुद्धीजीवी त्या अपप्रवृत्तींचा फक्त विरोधच करत नाही, तर त्याविरूद्ध जनजागरणदेखील करत असतात. त्यासाठी उलेमांच्या अनेक चळवळी उभ्या राहिल्या आहेत. म्हणूनच आज त्या गोष्टी फार जास्त दिसत नाहित.
    परंतु आश्‍चर्य याचे वाटते की, स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणारे इतर काही सामाजिक कार्यकर्तेदेखील फोटोपुजा, पुतळापुजेचं समर्थन करत असतात. हा नवपुरोहितवाद आहे. मी हे सगळं पोटतिडकिने मांडतोय. कुणाच्या भावना दुखविण्याचा किंवा इतरांना कमी लेखण्याचा यात काडीमात्रही उद्देश नाही. कृपया गैरसमज करून घेऊ नका. विचार स्वातंत्र्य मान्य करणारे खरे बुद्धीप्रामाण्यवादी मला समजून घेतील या अपेक्षेने सांगतोय की, जोपर्यंत व्यक्तीवादाला प्रोत्साहन देणारा हा पुतळावाद, फोटोवाद संपत नाही, तोपर्यंत पुरोहितवादाविरूद्ध कित्तीही व्याख्याने द्या, पुरोहितवाद तसाच अढळ उभा राहिन एखाद्या लोखंडी पुतळ्यासारखा!
ण्याची गरज आहे, तसेच त्यांच्या विचारांचा प्रचार करण्याची गरज आहे. हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. डॉ. आ. ह. साळूंखे यांचं वाक्य आठवते की, महापुरूषांना डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घ्या.

- नौशाद उस्मान, 
औरंगाबाद

नोटबंदीचे दहशतवादांचे कंबरडे मोडल्याचे ठणकाहून सांगणार्‍यांचे आजही कौतूकच वाटत असेल तर... आणि सातत्याने कोणत्याही घटनेचे धार्मिक, धु्रवीकरणासाठीचा वापर होत असेल तर... तर प्रश्‍न विचारावे लागतील़ अन्यथा निवडणुकीच्या या काळात प्रत्येक गावगल्ली वस्ती खेडी शहर नगरं ही द्वेषाची मजबूत केंद्र होतील़


प्रचंड उद्वीग्न, उदासीने अतिरेकी हल्ल्याचा निषेध करतो आधीच़ केवळ संतापच नव्हे तर काहीही न बोलता, लिहिता दु:खात मुक्तपणे सहभागी होणे हे भारतीय म्हणून माझ्या हाती उरतं़ ट्रायच्या वाढीव केबलबिलाच्या तरतुदीमुळे सामान्यांच्या घरचा टी़व्ही़ बंद पडला़ मला तर बरेच वाटले़ किमान भंपक मालिका, उधाणलेल्या जाहिराती, चौथ्या स्तंभाची टेम्पररी चाटूगिरी आणि व्यक्तीनिष्ठा, अंधश्रद्धा प्रवृत्तींचे उदात्तीकरण, सिनेमांतून कायमची सुट्टी किंवा सुटकाच झाली़ जीओनं इथंही प्रवेश केला़ जसं दूरदर्शन संपलं तस इतर चॅनेल्स कंपन्याही संपतील़ बीएसएनएलची तर बोंबच बोंब़ मोबाईल मीडियातील फालतूगिरीचा विट येऊ लागलाय. अनैतिक गप्पांचे विचारवंतही अड्डे नकोसे वाटताहेत़
    एकंदरीत काय तर वॉटसअ‍ॅपच्या ग्रुप्समधून प्रेमाच्या महतीचा इमोजीस्माईली सुगंध दरवळत असताना़़़ प्रेम़स्वातंत्र्य, नीति यांचा सप्ताह सुरू असताना, मोबाईलला ही आम्ही मोदीमोडवर ठेवला अर्थात एरोप्लेन मोड.
 मग कामगार मित्रांशी गप्पा, आजारी-मरणासन्न नातेवाईकांच्या भेटी, बोर्डाच्या परीक्षेचे अभ्यासू विद्यार्थ्यांशी मार्गदर्शन, गावातील बाजारपेठ या ना त्या कारणे निवांत भटकंतीच धरली़
 जुम्मा उजाडला
    छोट्याशा गल्लीतून सुरमई डोळ्यांनी भावासोबत दुवारी नमाज पढली़ सामुहिकपणे शुचिर्भूत नमाजी मंडळी रस्त्यावर जमून, नेटाने तितक्याच त्वेषाने पुलवामधील भ्याड हल्ल्याचा निषेध करू लागले़  माझ्या गल्लीतल्या मुलांनी भलामोठा पाकिस्तान मुर्दाबादचा बोर्ड लावला़ प्रत्येक चौकात निषेध उरकून जवानांच्या शहिदांच्या दु:खात कमी तिथून बाजूला झालो़ या घडीला प्रचंड असंतोष मनात भडकतोय आक्रोशाची नुसती कल्पनाही करवत नाही़ पण मित्राहारी मीडिया बातम्या पाहिल्या फोन वायफाय सुरू केला़ श्रद्धांजलीच्या असंख्य भावपूर्ण मेसेजिस मधून डोळ्यातला टिपूस थेंब सावरला़ रात्र झाली तशी बातम्यांचे अँकर युद्धासाठीचा ज्वर भरताना दिसले पाहिलेे़ सोशल मीडियातून पुन्हा भावनिक ओळीसकट युद्धतज्ञ बसण्याचा दावा सामान्याकडून होऊ लागला़ या दु:खद घटनेचं राजकारण करून मीडियाबाईट देणारे सगळेच क्रूर वाटताना़़़ या सगळ्यांतून एक अदृश्य धागा ठळक गडद करण्याचा प्रयत्नही करणारी शक्ती डोकं वर काढून होती़ अशा कठीण काळातही अविवेकी, धर्मांध भावनिक आवाहनांतून पुन्हा दोन समूह सेपरेशनचा डाव पक्का मांडला गेला़
     नजीब-रोहीत-आसिफा-अगदी सच्चर कमिशन किंवा जगण्याच्या प्रश्‍नावर एकत्र न येणार्‍या सगळ्याच मुस्लिम समुहाने पुढाकार घेऊन निषेध रॅली मोर्चा केला. त्या भावनेचा सम्मान आणि आदरच़़ पण यातला अंतर्गत भितीचा किंवा उगाच ‘गिल्ट’ वगैरे ‘फिल’ करण्याचा शेखचिल्ली मानस मात्र त्रासदायक. विवेकी नागरिकत्वाचा जागर असंतुलीत होणारा हा संशयकल्लोळ. सत्ताधिशांनी प्रचाराच्या सभा न थांबवता आपला हेकेखोरपणा आधीच सिद्ध केलाय. भक्तांनी या घटनेचा हिंदू-मुस्लिम असा वाद तेवत ठेवण्यात विद्वेषी तेल ओतलेलेच आहे़ बावळट सहिष्णूधारी देशभक्ती सिद्धतेसाठी आघाडीवर आहेत़ सामान्य खूळी जनता युद्धाची विचार पसरवत आहे़ मीडियाचा टीआरपी वाढतोय कवींचा वीररस भरून ओसंडतोय. विश्‍लेषणाचे वैचारिक वाद वाढताहेत़ शहीद सैनिकांचा मातम सुरूय. कुठे दहन सुरूय, कुठे दफन सुरूय. सैनिकांच्या आई-बहिणीस विधवेला, सांत्वनाचा एक शब्द नाही देऊ शकत आपण़़
     सैन्य पोटावर चालत़ कर्ता पुरूष मुलगा-बाप नवरा गेला की संपलच संगऴ  अर्धसैनिकबल म्हणून पूर्णबलाची मान्यता कधी मिळणार किंवा वन रँक पेन्शनच काय झालं? असलं काही आपण नाहीच विचारणार. मनोजातीवारीचा रंगारंग कार्यक्रम पहाणार प्रचाराचे मनुवादी दौरे पाहणारं
    आम्ही 40 के बदले 400 वाटणारं फेसबुकवर स्वत: जेम्स बॉन्ड म्हणून प्रोजेक्शन करणार्‍यांचे सुपूत्र पाकिस्तानी बिझनेसमनचे पार्टनर असतील तर सुरक्षा़ राष्ट्रनिती, युद्धनिती, कुटनिती आणि आंतरराष्ट्रीय बाता टिव्हीवर झळकत असतील तर. सर्व विरोधी पक्षांची निषेध बैठक असताना सत्ताधिश असंवेदशनशील होऊन प्रचार दौर्‍यात रममाण असतील तर... नोटबंदीचे दहशतवादांचे कंबरडे मोडल्याचे ठणकाहून सांगणार्‍यांचे आजही कौतूकच वाटत असेल तर... आणि सातत्याने कोणत्याही घटनेचे धार्मिक, धु्रवीकरणासाठीचा वापर होत असेल तर... तर प्रश्‍न विचारावे लागतील़ अन्यथा निवडणुकीच्या या काळात प्रत्येक गावगल्ली वस्ती खेडी शहर नगरं ही द्वेषाची मजबूत केंद्र होतील़
 युद्ध होईल, होऊ दे़  पण असल्या युद्धात इथला सामान्य भारतीय मुस्लिम हा शहीद झालेल्या नासिर अहमदच असेल़ सध्याच युद्ध हे भांडवलशाही विरूद्ध बेरोजगारीचं आहे़ धार्मिक कट्टरतावाद्यांच्या विरोधात मानवतेचं आहे़ भारतीयांचे युद्ध इथल्या वित्तीय हुकूमशहांच्या विरोधात आहे़ यात माझे उपरेपण मला मान्य नाही़
 उनका जो फर्ज है वो नफरत की सियासत करें
 मेरा पैगाम मोहब्बत है, सच है, बस तुम तक पहूंचे़

- साहिल शेख
कुरूंदवाड

शिवरायांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. सर्वांवर अपार प्रेम केले. सर्वांशीच न्याय केला. त्यांचे राज्य हे कल्याणकारीराज्य होते आणि जेव्हा राजा नि:पक्षपातीपणे आणि सर्वांच्या कल्याणासाठी राज्य चालवतो तेव्हाच स्वराज्याचे रुपांतर सुराज्यात होत असते, हे शिवरायांच्या उदाहरणावरून सिद्ध होते.


इतिहासात तसे पुष्कळ राजे होऊन गेले पण छत्रपती शिवरायांसारखे स्थान व सन्मान कोणालाही मिळाला नाही. शिवजयंती मोठ्या प्रमाणात आणि ज्या उत्साह आणि उमेदीने साजरी केली जाते, तसे इतर कुणाही राजाच्या बाबतीत घडत नाही, असे का व्हावे? इतर राजांपेक्षा या शिवरायांमध्ये असे काय वेगळेपण होते की ज्यामुळे असे घडत आले आहे? हे वेगळेपण समजून घेतले, तर शिवचरित्राचा नीट उलगडा होईल.
    पहिली गोष्ट म्हणजे शिवराय अगोदर तयार केलेल्या गादीवर वारसाहक्काने बसलेले नव्हते. त्यांनी छोट्या जहागिरीतून मोठे राज्य निर्माण केले. इतरांनी स्थापलेल्या राज्यावर बसणे आणि स्वकर्तृत्वावर राज्य निर्माण करणे यात पुष्कळ फरक आहे.
तथापि राज्य स्थापन करणारे शिवाजी महाराज हे काही एकमेव नव्हते, इतरांना शिवाजी माहाजांसारखे जनसामान्यांत स्थान मिळाले नाही. त्यांच्या राज्याचे वेगळेपण कोणते, तर त्यांचे राज्य सर्वसामान्य रयतेला आपले वाटत होते. शिवरायांचे कार्य हे आपलेच कार्य आहे, असे त्या रयतेला वाटत होते. त्यांची अनेक उदाहरणे इतिहासात ठळकपणे नोंदवण्यात आली आहेत. पन्हाळगडचा वेढा, आगर्‍याहून सुटका असे अनेक प्रसंग याची ग्वाही देतात. अनेकांनी त्यासाठी हसत हसत मरण पत्करले.
आगर्‍याहू सुटकेच्या वेळी आपण पकडले जाणार, मारले जाणार याची मदारी मेहतरला अन हिरोजी फर्जंदला जाण होती. पण मृत्यूला कवटाळून आत्महुती द्यायला ते दोघे का तयार झाले? शिवरायांनी आरंभलेले कार्य मोलाचे आहे ते पूर्ण व्हायला हवे. आपण मेलो तरी चालेल हीच त्यांच्या मनात भावना होती. सर्व सहकार्‍यांत, सर्व सैनिकात आणि सर्व रयतेत ही भावना शिवाजी महाराज तयार करू शकले यात त्यांचे वेगळेपण सामावलेले आहे. असमान्य पराक्रम होतात ते असामान्य कार्याच्या सिद्धीसाठी केलेल्या लढ्यातच होतात. लोभाने जे लढतात अन मरतात त्यांची नोंद ठेवावी, असे इतिहासाला वाटत नाही.
    त्याकाळी सर्व सामान्य जनता राजा कोण आहे यासंबंधी फारशी काळजी करत नसे. कोणीही राजा आला किंवा गेला, कोणाचेही राज्य आले तरी सामान्य रयतेच्या जीवनात फरक पडत नव्हता. शिवाजी महाराजांचे राज्य आले आणि एकदम बदल झाला. राजा आणि रयत यांचा संबंध आला. राजा रयतेला दिसू लागला, भेटू लागला, त्यांची विचारपूस करू लागला, त्यांचा छळ होऊ नये म्हणून दक्ष राहू लागला, त्यांना मदत व्हावी म्हणून राज्य चालवू लागला. शिवराय जहागिरदार-देशमुख, वतनदार, पाटील, कुलकर्णी यांच्या बेलगाम व्यवहाराला लगाम घालू लागले. वतनदार हे मालक नाही, तर रयतेचे नोकर आहेत असे ते रयतेला सांगू लागले व त्याप्रमाणे अनुभव येऊ लागला. रयतेने केलेल्या तक्रारींची चौकशी होऊन मुजोर वतनदारांना जरब बसेल, अशा कठोर शिक्षांची अंमलबजावणी होऊ लागली. उद्ध्वस्त झालेली गावे शिवरायांनी कौल नामे घेऊन वसवली. नव्याने जमिन कसायला घेणार्‍यांना बी-बियांणे देऊन आणि औतफाट्यास मदत करून शेती कसायला प्राधान्य दिले. नवीन लागवडीस आणलेल्या जमिनींना महसूल सुद्धा कमी ठेवला. मन मानेल तसा महसूल वसूल करण्याचा शिरस्ता मोडून काढला. जमिनी मोजून घेतल्या. मोजलेल्या जमिनींचा महसूल निश्‍चित केला. ठरलेला महसूलच वसूल करण्याचा दंडक घालून दिला व आमलात आणला.
    दुष्काळात महसूल माफ केला. पिकलेच नाही तर शेतकरी देणार कुठून हे समजून घेऊन शिवराय वागले. उलट दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत केली. वतनदारांची व जमिनदारांची अत्यांचारांची व्यवस्था महाराजांनी पार मोडून काढली. रयतेला गुलाम करणार्‍यांना देशमुख, देशपांडे वगैरे ग्रामीण अधिकार्‍यांचे वाडे व कोट पाडून महाराजांनी जमिनदोस्त केले व इतर रयतेसारखी साधी घरे बांधून रहावे असा हुकूम सोडला. त्यामुळे त्यांचा वतनदारीवर दाब बसून रयतेची त्यांच्या कचाट्यातून सुटका झाली. जनता सुखी आणि स्वतंत्र झाली.
    शिवचरीत्रांतील काही बाबी अगदी निर्विवाद आहे. स्त्रीयांच्या अब्रू संबंधींचा छत्रपती शिवाजी महाराजांचा दृष्टीकोन ही अशीच एक इतरांपेक्षा वेगळी ठरवणारी बाब आहे. शिवाजी महाराजांच्या काही सरंजामदारांच्या काळात स्त्रीयांच्या अब्रूला, विशेषत: गोरगरीबांच्या महिलांच्या अब्रूला किंमत नव्हती. त्या राजे रजवाडे व राजपूत तर सोडाच पण सरदार, वतनदार, जमीनदार, देशमुख, पाटील त्यांना हव्या त्यावेळी उपभोगण्याच्या वस्तू होत्या. दिवसा ढवळ्या त्यांची अब्रू लुटली जात होती. आणि त्याविरूद्ध कोणाकडेही दाद मागता येत नव्हती. ज्यांच्याकडे दाद मागायची तेच अब्रू लुटत होते. अशा काळात शिवरायांचा दृष्टिकोन मुलत:च वेगळा होता. या संदर्भात रांझ्याच्या पाटलाची गोष्ट प्रसिद्ध आहे. त्याने केलेल्या अत्याचाराची बाब शिवरायांच्या कानावर आली. पाटलांच्या मुसक्या बांधून पुण्याला आणले गेले आणि हात पाय तोडण्याची शिक्षा झाली. नुसती झाली नाही तर आमलात आली. त्यामुळे रयतेच्या मनातील शिवरायांबद्दल आदर व दरारा वाढला. महाराजांसमोर कल्याणच्या सुभेदाराची मुस्लिम सून दरबारात हजर केल्यानंतर तिच्या बरोबर गैर व्यवहार न करता तिची चोळी-बांगडी करून पाठवणी करण्याची कथाही प्रसिद्ध आहे. या घटनेतून शिवरायांची चरित्र संपन्नता स्पष्ट होते.
    लढाईत किंवा लुट करताना मुसलमान किंवा हिंदू कोणत्याही धर्माच्या स्त्रीया हाती आल्या तर त्यांना तोशीस लागता कामा नये व त्रास होता कामा नये अशी सक्त आज्ञा महाराजांनी दिली होती. सावीत्रीबाई देसाईवर बलात्कार करणार्‍या आपल्या विजयी सेनापती सकुजी गायकवाडचे डोळे महाराजांनी काढून त्यास जन्मभर तुरुंगात डांबले होते.
    रयतेचा गोरगरीब जनतेला, लेकी-सुनांच्या अन्यायसंबंधी शिवाजी महाराजांच्या दृष्टीकोन जसा त्या काळातील इतरांपेक्षा वेगळा होता तसाच रयतेचा संपत्ती संबंधीचा दृष्टीकोनही खूप वेगळा होता. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये अशी सक्त आज्ञा महाराजांनी दिली होती. रयतेच्या कष्टाची ही अपूर्व कणव शिवरायांना रयतेची अपार निष्ठा देऊन गेली.
    रयतेला हे सारेच नवे होते, कुठे घडत नव्हते असे होते. शिवरायांचे राज्य हे खर्‍या अर्थाने धर्मनिरपेक्ष व सर्व समावेशक आणि कल्याणकारी राज्य होते. 2 नोव्हेंबर 1669 च्या एका पत्रात राजांनी दिलेली आज्ञा उल्लेखनीय आहे. श्रीमंत महाराज राजे यांनी ‘ज्यांचा जो धर्म त्याचा त्यांनी करावा यात कोणी बखेडा करू नये’, असे फरमावले आहे. मुस्लिम धर्माविरूद्ध स्वत:ची मते लोकमान्य करण्यासाठी जे कोणीही शिवाजी महाराजांचा वापर करत असतील तर त्यांना वरील ऐतिहासिक बाबींचा जाब द्यावा लागेल. आपल्या धर्माइतकाच इतरांचा धर्मही श्रेष्ठ व उच्च आहे आणि उपासना पद्धती जरी वेगळ्या असल्या तरी त्यांचा उद्देश एकच आहे हे महत्त्वाचे तत्त्व शिवरायांनी मानले. इस्लाम धर्माबद्दल महाराजांना विशेष आदर असल्याचे दिसून येते. सम्राट औरंगजेबला लिहिलेल्या एका पत्रात महाराज म्हणतात, कुरआन धर्म ग्रंथ हे प्रत्यक्ष ईश्‍वराची वाणी आहे. ती आसमानी किताब आहे व त्यात ईश्‍वराला जगाचा ईश्‍वर म्हटले आहे फक्त मुसलमानाचा ईश्‍वर असे म्हटलेले नाही. हिंदू व मुसलमान जाती ईश्‍वरापाशी एक रंग आहे म्हणून जाती धर्माच्या आधारे कोणावर जुलुम करणे भगवंतांशी वैरत्व करणे होय.
    शिवाजी महाराजांची सहिष्णूता अनेक रीतीने इतिहासात नमूद आहे. खाफीखान या मुस्लिम इतिहासकाराने नोंदवलेला उतारा हा खूप बोलका आहे. “शिवरायांनी सैनिकांकरीता असा सक्त नियम केला होता की सैनिक ज्या-ज्या ठिकाणी लूट करण्यास जातील तेथे त्यांनी मशिदीस, कुरआन ग्रंथास अथवा कोणत्याही स्त्रीस त्रास देता कामा नये. जर एखादा कुरआनचा ग्रंथ हाती आला तर त्याबद्दल पुज्य भाव दाखवून ते आपल्या मुसलमान नोकरांच्या स्वाधीन करीत असत. शिवरायांची सुरक्षा केलेल्या दोन्ही वेळच्या लुटीचे तपशिल वार वर्णन उपलब्ध आहेत पण एक तरी मशिद पाडल्याचे उदाहरण इतिहासात नमूद नाही. शिवरायांचे सरदार व सैन्य हे फक्त हिंदू धर्माचे नव्हते त्यात मुस्लिमांचाही मोठी भरणा होता, हे या यावरून स्पष्ट व्हावे. ते रयतेचे काळजी करणारे राज्य स्थापायला निघाले होते महणून मुस्लिम सुद्धा त्यांच्या या कार्यात सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी छोट्या मोठ्या अनेक लढाया कराव्या लागल्या. त्यांच्या राज्याचे मोठ शत्रू असलेले राज्यकर्ते मुस्लिम धर्मीय होते. त्यामुळे त्यांच्याविरूद्ध तर लढावे लागलेच परंतु त्यांना मराठ्यांविरूद्ध अनेक लढाया लढाव्या लागल्या. इतिहासात या लढायांच्या सविस्तर नोंदी आहेत. शिवरायांचे वडील शहाजी राजे हे आदील शहाचे विश्‍वासू मनसबदार. आदिलशहाकडूनच शहाजी महाराजांना पुणे परगणाची जहागीरदारी मिळाली. शिवाजी महाराज अनेकांना गुरू मानत होते. त्यात याकुतबाबा या मुस्लिम अवलियाचाही समावेश आहे.
    शिवाजी महाराजांचे अनेक मुस्लिम सरदार व वतनदार होते आणि ते मोठ-मोठ्या हुद्यावर व जबाबदारीच्या जागेवर होते. त्यांच्या खास अंगरक्षकात 11 मुसलमान होते. यातच मदारी मेहतर या अत्यंत विश्‍वासू साथीदाराचा समावेश होता. त्याने आपल्या प्राणाची पर्वा न करता शिवरायांना आगर्‍यातून सुटकेसाठी साथ दिली. काजी हैदर वकील तर आरमार प्रमुख सिद्धी हीलाल सारखे बानेदार लोक त्यांच्याकडे होते. शिवरायांच्या स्वराज्य उभारणीच्या कार्यात बहुसंख्ये साथीदार हे उच्च वर्गीय नव्हते तसेच ते जमीनदार वतनदारही नव्हते ज्या मावळ्यांच्या अव्ह्याभीचारी निष्ठेवर आणि असिम त्यागावर शिवराय अतुलनीय पराक्रम करू शकले. ते खालच्या म्हणून समजल्या गेलेल्या जातीचे व गोरगरीब शेतकरी होतेे.
ज्या थोर पुरुषांच्या प्रतिमा आणि प्रतिके सामान्य जनांना आदरांच्या, श्रद्धेच्या अन् निष्ठेच्या वाटतात त्याच प्रतिमा काही टगे उचलतात आणि त्या विकृत करतात आणि त्याचा गाभाच गारद करून टाकतात. नेमके हेच शिवरायांबद्दल काही प्रमाणात झाल्याचा अनुभव येत आहे. म्हणून आजच्या रयतेने शिवरायांचा खरा इतिहास शोधला पाहिजे. त्याचा योग्य अर्थ लावला पाहिजे. त्याच्या इतिहासात, विचारात कार्याच्या प्रेरणेत आजही उपयुक्त अशे बरेच काही आहे. म्हणून आम्हाला शिवरायांना प्रतिमेच्या बाहेर काढून त्यांच्या विचारांच्या आचरणाची समृद्धी मिळो हीच प्रार्थना.

- अर्शद शेख
9422222332

नवी दिल्ली
 जमाते इस्लामीचे हिंदचे अध्यक्ष मौलाना सय्यद जलालुद्दीन उमरी यांनी पुलवामा येथे सीआरपीएफच्या काफिल्यावर नुकत्याच झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. जमाते इस्लामी हिंदच्या मीडिया विभागाने जारी केलेल्या पत्रकात मौलाना म्हणतात की, ”असे हल्ले काही लोकांच्या मृत्यूला आणि राष्ट्रीय नुकसानाला कारणीभूत ठरतील मात्र त्यामुळे कुठलाही प्रश्‍न निकाली निघणार नाही. हा हल्ला अतिशय वेदनादायक असून, 44 जवानांच्या हौतात्म्याला विसरता येणार नाही. या घटनेमुळे व्यथित होऊन सामाजिक सौहार्द बिघडविण्यापेक्षा शांती आणि सुरक्षा कशी पुनर्स्थापित करता येईल त्यासाठी बोलणी करणे हाच एकमेव मार्ग आहे. या मार्गानेच काश्मीरी जनतेच्या दुःखांचा शेवट होईल आणि याच मार्गाने काश्मीर घाटीमध्ये शांतता आणि स्थैर्य येऊ शकेल. मी केंद्र सरकारने या घटनेच्या कारणांसंदर्भात जी चौकशी सुरू केलेली आहे, त्याचे स्वागत करतो. सरकारच्या या प्रयत्नामुळे या घटनेमागील सत्य उघडकीस येईल आणि आपण या घटनेमागील खरा उद्देश शोधू शकू. चौकशीअंती हे लक्षात येईल की, काश्मीरमधील वातावरण बिघडविण्यासाठी तर ही घटना घडविण्यात आली नाही का? किंवा भारत- पाकिस्तानातील संबंध खराब करण्यासाठी तर ही घटना घडवून आणली नाही ना? किंवा हे एक असे मोठे षडयंत्र तर नाही ज्यामुळे देशातील शांतता आणि सहअस्तित्वाला निवडणुकांपूर्वी नुकसान पोहोचावे. मी अगदी व्यथित मनाने आपल्या संवेदना शहीद जवानांप्रती व्यक्त करतो आणि जखमी जवानांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो.”

कर चले हम फिदा जानोतन साथियों
अब तुम्हारे हवाले वतन साथियों

    आपल्या देशात राजकारण आणि राजकीय नेते यांच्या एवढे महत्व कुणालाच मिळत नाही. त्यांची सेवा हीच खरी देशसेवा मानली जाते. त्यामुळे साहजीकच बाकी क्षेत्रांतील सेवा आपोआपच दुय्यमस्थानी फेकल्या जातात. वास्तविक पाहता रोज जेवतांना ज्यांचे आभार मानावयास हवे ते शेतकरी व रोज झोपतांना ज्यांचे आभार मानावयास हवे ते सैनिक यांच्या सेवेला जे अनन्यसाधारण महत्व मिळावयास हवे तेवढे महत्व त्यांना मिळत नाही. हे आपल्या व्यवस्थेचे वास्तव आहे. उठता बसता नेत्यांना हेलीकॉप्टर सेवा उपलब्ध असते ती सैनिकांना नसते. 14 फेब्रुवारीला सीआरपीएफच्या काफिल्याला ती जर का मिळाली असती तर आदिल अहेमद डारला कॅन्वायजवळ येण्याअगोदरच उडवता आले असते व 42 पेक्षा जास्त सैनिकांचे मौल्यवान प्राण वाचले असते.

    न्यूज रूम की वॉर रूम

    एनडीटीव्ही आणि बोटावर मोजता येण्यासारख्या काही वाहिन्या वगळता बाकी वाहिण्यांनी पुलवामामध्ये झालेल्या या दुर्देवी घटनेचा आपला टीआरपी वाढवण्यासाठी पुरेपूर (दुर) उपयोग करून घेतला. जनआक्रोशाच्या नावाखाली उन्माद वाढविण्याचे काम या वाहिन्यांनी करण्यात  कोणतीही कसर बाकी ठेवली नाही. जेव्हा ’वन रँक वन पेन्शन’ किंवा ईतर सुविंधासाठी सेवानिवृत्त सैनिक रस्त्यावर येतात तेंव्हा या वाहिन्या उदासीन असतात. असे उड्या मारून त्यांचे वृत्तांकन करण्यात येत नाही. कारण त्यांना त्या प्रदर्शनामध्ये टीआरपी दिसत नाही. म्हणून 14 फेब्रुवारीला राष्ट्रीय संकट समयी देखील या वाहिन्यांनी आपले व्यावसायिक हित जोपासण्याचे पाप केले. शहिदांच्या टाळूवरील लोणी खान्यासारखा हा प्रकार आहे. प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांनी अत्यंत संयत भूमिका घेतलेली असतांना देखील वातानुकुलित स्टुडियोमध्ये हे अँकर ज्याप्रमाणे उड्या मारून-मारून घसा कोरडा पडेपर्यंत ओरडत होते, ते पहाता त्यांनी न्यूज रूमचे वॉर रूम करून टाकले होते हे चाणाक्ष्य लोकांच्या लक्षात आलेलेच असेल.

सरकारांचा दुटप्पीपणा

    ज्या वाचकांचे लक्ष आंतरराष्ट्रीय घडामोडींवर असेल त्यांच्या लक्षात असेलच की ज्या जैशच्या नावाने आज भाजपा ओरडत आहे त्याच्याच म्होरक्या, अझर मसूदला यांनीच त्यांच्या सत्तेच्या काळात खास विमानाने अफगानिस्तानात नेऊन सोडले होते.
    वाचकांना याचेही आश्‍चर्य वाटेल की सीआरपीएफला सुविधा देण्याच्या बाबतीत कोणतेच सरकार गंभीरपणे वागले नाही. स्वातंत्र्यानंतर लगेचच म्हणजेच 1949 साली सीआरपीएफचे गठण करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत या संस्थेच्या जवानांना कर्तव्यावर असतांना मृत्यू आल्यास, ’शहीद’चा दर्जा देण्याचे साधे सौजन्यही कुठल्या सरकारने दाखविलेले नाही. त्यांना फक्त शहीद म्हटले जाते, परंतू आर्मीतील सैनिकांप्रमाणे कर्तव्यावर जीवन अर्पण करून सुद्धा त्यांना शहीदांना जो सन्मान मिळतो तो मिळत नाही आणि आर्मितील शहिदांच्या कुटुंबियांना ज्या सवलती मिळतात त्यापासून सीआरपीएफ शहीद जवानांचे कुटुंब वंचित राहतात. उलट सर्व निमलष्करी दलाचे निवृत्ती वेतन 1 जानेवारी 2004 पासून बंद करण्यात आलेले आहे. हे वास्तवही वाचकांनी लक्षात घ्यावे.
    सीआरपीएफला अत्यंत कठीण परिस्थितीत काम करावे लागते. देशभरात नक्षलविरोधी कारवाया ह्या सीआरपीएफच्याच बळावर चालतात. त्यामुळे त्यांचे कार्य सेनेपेक्षा तिळमात्र ही कमी जोखीमीचे नाही, तरी पण सीआरपीएफला सरकारांनी आर्मी सारख्या सुविधा पुरविलेल्या नाहीत.

समाज माध्यमांची भूमिका

    पुलवामा हल्ल्याच्या घटनेनंतर सोशल मीडियाचा यावेळेसही अत्यंत बेजबाबदारपणे उपयोग करण्यात आला. जवानांचे छिन्न-विछीन्न अवशेष वेगाने वायरल करण्यात आले. जातीय तणाव निर्माण होईल अशा पोस्ट लाखोंच्या संख्येने फिरविल्या गेल्या. त्यात पाकिस्तान विरूद्ध केली गेलेली टिका एकावेळी समजून घेता येईल परंतू, भारतीय मुस्लिमांवरसुद्धा जहरी टिका केली गेली. ही टिका हे माहित असतांनाही केली गेली की शहीद जवानांमध्ये मुस्लिम जवानसुद्धा होते. याचे दुःख वाटते.

पाकिस्तानबद्दल मुस्लिमांची भूमिका

    खरे पाहता भारतीय मुस्लिमांच्या आजच्या विपन्न अवस्थेच्या कारणांपैकी एक मोठे कारण म्हणजे देशाची फाळणी हे होय. ती झाली नसती तर मुस्लिमांना दंडित केले गेले नसते. कश्मीरमध्ये जी स्थिती आज आहे ती उद्भवली नसती. केवळ धर्म साधर्म्य आहे म्हणून जे हिंदू बंधू हे समजतात की भारतीय मुस्लिम हे पाक समर्थक असावेत तर ती त्यांची मोठी चूक आहे. मुस्लिमांच्यामध्ये ही राष्ट्रवादाची भावना एवढी प्रबळ आहे की ते केवळ राष्ट्रीयत्वावरून एकमेकाचा दुस्वासच नव्हे तर एकमेकांविरूद्ध युद्ध करतात. सध्या यमनवर सऊदी अरबने केलेला हल्ला याचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
    राष्ट्रवादाची भावना खच्चून भरली नसती तर दोनच महिन्यापूर्वी सऊदी अरबमध्ये आश्रयासाठी गेलेल्या दुर्दैवी रोहिंग्या मुस्लिम कुटुंबांना व सिरियाच्या विस्थापितांना त्यांनी धुडकाऊन लावले नसते? सीरीयाच्या विस्थापितांना युरोपमधील अनेक ख्रिश्‍चन देशांनी आश्रय दिला मात्र संयुक्त अरब मिरात आणि सऊदी अरबने एका कुटुंबालादेखील आश्रय दिला नाही. यावरून मुस्लिमांमध्ये राष्ट्रीय अस्मिता किती खोलवर रूजलेली आहे, याचा सुज्ञांना अंदाज यावा.
    इस्लामी एकोप्याची भावना असती तर 56 मुस्लिम देशात युरोपीयन युनियनसारखा विजा फ्री झोन निर्माण झाला असता, युरोसारखे एक चलन व नाटो सारखे एक लष्कर तयार झाले असते. ही भावना तुर्कीचे आटोमन साम्राज्य जेव्हा अस्तित्वात होते तेव्हा होती. आता तिचा लवलेषही नाही.
    भारत आणि भारताचा अविभाज्य भाग असलेल्या काश्मीरच्या मुस्लिमांनासुद्धा हे चांगल्या प्रकारे माहित आहे की त्यांचे भविष्य अंतर राष्ट्रीय मदतीवर अवलंबून असणार्‍या पाकिस्तान मध्ये नव्हे तर संपन्न भारतात सुरक्षित आहे. आज जगाच्या पाठीवर अस्तित्वात असणार्‍या सर्व देशांच्या सीमा निश्‍चित झालेल्या आहेत. त्यामुळे ’किती ही पाकमध्ये निघून जा’ असे आधून-मधून संतापाने हिंदूत्ववादी जरी म्हणत असतील तरी त्यांना आणि मुस्लिमांना दोघांनाही माहित आहे की 20 कोटी भारतीय मुस्लिमांना या 56 मुस्लिम देशापैकी एकही देश स्वीकारणार नाही व आम्ही जाणार पण नाही.
    ज्यांना युद्धज्वराने पछाडलेले आहे व अशा भ्रमात राहत आहेत की भारताने पाकिस्तानवर आक्रमण केले तर भारतीय मुस्लिमांना वाईट वाटेल, तर हा भ्रम त्यांनी मनातन काढून टाकावा. सुदैवाने असे करण्यात आपला देश यशस्वी झाला तर त्याचा सर्वाधिक लाभ आम्हा भारतीय मुस्लिमांनाच मिळेल. त्यामुळे निदान एवढे तरी होईल की, न केलेल्या फाळणीच्या जबाबदारीच्या गुन्ह्यातून आमची सुटका होईल व आमच्याशी भेदभाव करण्यासाठी कुठले कारण शिल्लक राहणार नाही.
त्रुटी
    मागच्या काही वर्षात झालेल्या मोठ्या आतंकवादी हल्ल्यांपैकी हा एक मोठा आतंकवादी हल्ला आहे. मुंबई, पठाणकोट, उरी प्रमाणे हा हल्ला यशस्वी होण्यामागेही आपले इंटेलिजन्स फेल्युलर आहे, यात शंका नाही.  त्याची कारणे खालीलप्रमाणे -
    आदिल अहमद डार या 21 वर्षीय तरूणाकडे  लष्करी गुणवत्तेचे आरडीएक्स मोठ्या मोठ्या प्रमाणात जमा होते व त्याचा तो साठा सुद्धा करतो. याची पूर्वसूचना आपल्या इंटेलिजन्सना मिहाली नाही ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. कारण 350 किलो असो का 60 किलो असो आरडीएक्स गोळा करणे एका आदिलचे काम नाही, यामागे अनेक लोकांचा सहभाग आहे, यात वाद नाही. असे असतांना आपल्या इंटेलिजन्स एजन्सीजना याचा थांगपत्ता लागू नये, याचा असा अर्थ आहे की, आपल्या इंटेलिजन्स सेवेमधील लोकांचा जनतेशी संपर्क एक तर तुटलेला आहे किंवा दोहोत प्रचंड ट्रस्ट डेफिसिट आहे. किंचाळणार्‍यांनी किंचाळणे झाल्यानंतर व त्यांचा उद्वेग कमी झाल्यानंतर शांतपणे  या बाबीवरही विचार करावा.
    हा दोष पुलवामा अटॅकच्या वेळेसच नव्हे तर 12 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट, 26/11 चा हल्ला,  पठाणकोट व उरीमध्ये झालेल्या हल्ल्याच्या वेळेसही निदर्शनास आलेला आहे. परंतू, त्या हल्ल्यांना जबाबदार धरून कुठल्याही गुप्तचर संस्थेच्या अधिकार्‍यांवर कार्यवाही झालेली ऐकीवात नाही. म्हणून त्या घटनांमधून आपल्या गुप्तचर संस्थांनी काही धडा घेतला नाही ही बाब सिद्ध होते. गुप्तचर संस्थांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी व त्यांच्यातील समन्वय साधणारी व्यवस्था अधिक दृढ करण्यासाठी किमान यापुढे तरी केंद्र आणि राज्य सरकारांनी गंभीर पणे विचार करावा.
    मागील झालेल्या आतंकवादी हल्ल्यामध्ये आणि पुलवामा मध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये एक मोठा गुणात्मक फरक हा सुद्धा आहे की मागील सर्व हल्ले हे पाकिस्तानमधून आलेल्या आतंकवाद्यांनी केले होते. मात्र आदिल हा काश्मीरमधील काकपुर्‍यातला राहणारा स्थानिक तरूण आहे, ह्याची नोंद सर्वांनाच घ्यावी लागेल.

    इस्लाम आणि फिदायीन हल्ले

    इस्लामी आदेशांची सर्वात जास्त अवहेलना फिदायीन हल्लेखोरांनी केलेली आहे. कुरआनमध्ये स्पष्ट शब्दात म्हटलेले आहे की, ”जर कोणी एखाद्याचा नाहक बळी घेतला तर त्याने सर्व मानवजातीचा बळी घेतला. जर एखाद्याने एखाद्याचा जीव वाचवला तर जणू त्याने सार्‍या लोकांचा जीव वाचवला.” (संदर्भ ः सुरे मायदा आयत नं. 32). एवढा स्पष्ट आदेश असतांनासुद्धा अनेक देशांमध्ये मुस्लिम आतंकवाद्यांनी फिदायीन हल्ले करून अनेक निरपराध लोकांचे जीव घेतलेले आहेत. निरपराध लोकांची हत्येशिवाय आत्महत्या हे सुद्धा हराम कृत्य असल्याचे वारंवार हदिसच्या माध्यमातून प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणीतून स्पष्ट झालेले आहे. असे असतांना आदिल अहमद डार या तरूणाने स्वतः आत्महत्या करत 44 पेक्षा जास्त निरपराध सैनिकांचा बळी घेतलेला आहे. कुरआन आणि हदीसच्या अवहेलनचे यापेक्षा दूसरे मोठे उदाहरण काय असू शकेल? त्याच्या या कृत्याला त्याचे वैयक्तिक कृत्य समजण्यात यावे. त्याने जिहादचा जो दावा केलेला आहे तो इस्लामच्या शिकवणीच्या कसोटीवर टिकणारा नाही. जिहाद या संकल्पनेचा त्याने दुरूपयोग केलेला आहे, हे या ठिकाणी स्पष्ट करणे माझ्या दृष्टीने आवश्यक आहे.
    डार याच्या या डरपोक हल्ल्याचा भारतीय मुस्लिम जनमानसावर सुद्धा जबरदस्त परिणाम झाला असून, भारताच्या जवळ-जवळ प्रत्येक शहरामध्ये हल्ल्याच्या दूसर्‍या दिवशी म्हणजे 15 फेब्रुवारीला शुक्रवारच्या नमाजमध्ये शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. जखमी सैनिकांच्या आरोग्यासाठी व शहीदांच्या वारसांच्या कल्याणासाठी दुआ करण्यात आली. अनेक ठिकाणी नमाजनंतर मार्च काढून मुस्लिमांनी यथाशक्ती या घटनेचा निषेध नोंदविला.
    शेवटी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, केवळ लष्करी कारवाईने काश्मीरसारखा गुंतागुंतीचा प्रश्‍न सोडविता येणे शक्य नाही, हे लक्षात आल्यानेच वाजपेयींसारख्या गुणी पंतप्रधानांनी त्यांच्या काळात ’काश्मीरियत-इन्सानियत’ची योग्य नीति अवलंबविली होती. मात्र सध्याच्या सरकारने नकळत त्या नितीला बगल देऊन इस्राईल पॅटर्नने काश्मीरचा प्रश्‍न केवळ लष्कराच्या बळावर सोडविता येईल, असा विचार करून हाताळला. परिणामी काश्मीरचा प्रश्‍न अधिकच चिघळला. 14 फेब्रुवारीला त्याचा कडेलोट झाला. 
    वास्तविक पाहता अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर केंद्रात पूर्ण बहुमताचे  सरकार केंद्रात आले होते. भाजपने काश्मीरमध्ये पीडीपी बरोबर सत्ता स्थापन केल्यावर हा प्रश्‍न सुटेल अशी आशा सुद्धा निर्माण झाली होती. पण आपसात झालेल्या काडीमोडमुळे तीही धुळीस मिळाली. अशाप्रकारे बहुमताचे सरकार असतांना सुद्धा काश्मीरप्रश्‍न कायमचा सोडवून श्रेय घेण्याची नामी संधी भाजपा सरकारने हुकवली. दोन महिन्यांनी येणार्‍या नवीन सरकारने तरी हा प्रश्‍न सोडविण्यासाठी लष्करी उपायांसोबत राजकीय उपायही करावेत, अशी अपेक्षा ठेऊन शहीद जवानांना आदरांजली वाहतो व जखमींना लवकर आरोग्य लाभो ही प्रार्थना करतो. जय हिंद !

-  एम. आय. शेख

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील लेथपुरा-अवंतीपुरा भागात १४ फेब्रुवारी २०१९ रोजी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात  चाळीसहून अधिक जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट निर्माण झाली. देशभरातून नव्हे तर जगभरातून या हल्ल्याचा निषेध केला गेला. समाजात शांतता  प्रस्थापित करण्यात माध्यमाची महत्त्वाची भूमिका असते, याचा अनेकांना विसर पडल्याचे दिसून आले. माध्यमे आणि नेते लोकभावनेच्या आहारी जाऊन वास्तवतेकडे दुर्लक्ष करताना  आढळून आले. भारताचे जागतिक अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. देशाची अर्थव्यवस्था २.५ हजार अब्ज डॉलरच्या पुढे आहे. नव्याने उदयाला येणारी महासत्ता म्हणून  जगभारताकडे पाहत आहेत. सीमेवर युद्धजन्य परिस्थिती राहिली तर देशाला मूलभूत प्रश्न बाजूला सारून सैन्यदल आणि क्षेपणाध्Eाावर जास्त खर्च करावा लागेल. दहशतवादी,  नक्षलवादी हल्ल्यानंतर कोणी काय बोलायचे हे सगळे ठरलेले असते. ठरलेली विधाने माध्यमांतून केली जातात. आजवर या विषयावर माध्यमांत खूप चर्चा झाल्या, अनेक अग्रलेख छापून आले. अनेक सरकारे आली, अनेक गेली. पण जवानांचे सीमेवर सांडणारे रक्त कोणी थांबवू शकले नाही. या रक्तांच्या पाटाला देशभक्ती आणि राष्ट्रवादाचा मुलामा चढवला की  झाले! एकदा ‘जय जवान, जय किसान’ घोषणा दिल्या की, सीमेवर जवानांनी आणि शेतात शेतकऱ्यांनी मरत राहायचे.
२०१३पासून जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. तीन वर्षे भाजप आणि पीडीपी सत्तेत सहभागी होते. गेल्या वर्षी भाजपने मेहबुबा  मुफ्ती यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेत सरकार पाडले. अतिशय नाट्यपूर्ण घटना घडल्या आणि राष्ट्रपती राजवट लागू केली. जम्मू-काश्मीरची पूर्ण सूत्रे केंद्र सरकारकडे आहेत.  जम्मू-काश्मीरमध्ये २०१३ सालापासून २०१७पर्यंत वेगवेगळ्या १२६४ घटना घडल्या आहेत. यापैकी २०१६ मध्ये ३२२ घटना घडल्या. सर्वाधिक ३४२ घटना २०१७ मध्ये घडल्या. या काळातील हल्ल्यात ३०१ जवान शहीद झाले. २०१६ मध्ये ८२ जवान शहीद झाले, तर २०१७मध्ये ८० जवान शहीद झाले. यामध्ये ११५ निरपराध काश्मिरी नागरिक मारले गेले. १२६४  हल्ल्यांत ६४८ दहशतवादी मारले. सर्वाधिक २१३ दहशतवादी २०१७ साली मारले. (संदर्भ ‘द वायर’) निसर्गाच्या कुशीत वसलेले काश्मीर आत्ता रक्ताळले आहे. पांढरा बर्पâ लाल दिसू  लागला आहे. पुलवामा हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबातील सदस्यांचे अश्रू सुकले नव्हते, तोच सत्ताधारी नेतेमंडळींना आपल्या आगामी निवडणुकीतील मतदानाची काळजी वाटू लागली.  त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपापल्या कार्यक्रमांना उपस्थिती दर्शविली. दु:खाची नौटंकी करणाऱ्या या (अभि) नेत्यांची नैतिक पातळी किती खालावलेली आहे याचेच हे दर्शन  होते. कुणी उद्घाटनाचा सोहळा साजरा करतो तर कुणी युती कशी अबाधित राहील यासाठी बैठका घेतो. कुणाची प्रचारसभा थांबली नाही. सैनिकाच्या शवपेटीबरोबर एका नेत्याने तर  चक्क सेल्फी काढल्याची बातमी आहे. आज सामान्य काश्मिरी रोज कणाकणाने मरण अनुभवतो, त्याची मरणाविषयीची भीती संपलेली आहे. तरीही त्याची पहिली इच्छा भारत-पाक युद्ध  होऊ नये, हीच आहे. एका बाजूला निवडणुकांचा माहोल नजरेपुढे ठेवून युद्धाच्या भाषेचा आवाज बुलंद होत चालला आहे. जम्मूमधून काश्मिरींच्या गाड्या जाळल्याच्या घटना पुढे येत  आहेत. लदाख, लेह यांना वेगळा दर्जा देऊन काश्मिरींमध्ये पूâट पाडण्याचे डाव खेळले जात असल्याची तीव्र भावना काश्मिरींमध्ये आहे. तसेच राजकीय हस्तक्षेप पाहता, आणखी २०- ३० वर्षे काश्मीर समस्या धगधगत राहणार का, या शंकेने अनेकांची झोप उडाली आहे. स्वातंत्र्यापासूनच काश्मीरच्या भूमीवर अघोषित युद्ध लढले जात आहे. पुलवामा घटनेनंतर युद्धाची  भाषा अधिकच जोर धरू लागली आहे. परंतु युद्ध हा कोणत्याही समस्येवर उपाय ठरत नाही. फुटीरवादी काश्मिरीने ५० जवान मारले. युद्ध झालेच तर ५० हजार काश्मिरी मरतील, द्वेषाची ही आग शस्त्रास्त्रांनी कधीही विझणारी नाही. मानवतेला काळिमा फासणारा हा गुन्हा दहशतवाद्यांकडून व त्यांचा वापर करून घेणाऱ्यांकडून प्रथमच घडलेला नाही. आपल्या  अस्तित्वासाठी, दहशत कायम राहण्यासाठी, आपल्या अर्थकारणासाठी तसेच राजकीय उद्दिष्टांसाठी दहशतवादी व त्यांचे आश्रयदाते ठराविक काळाने असली नापाक कृत्ये करत असतात.  त्याला ‘काश्मीर आणि धर्मयुद्ध’ असला बेगडी मुलामा देण्याचा प्रयत्नही त्यांच्याकडून अनेकदा झाला आहे. मात्र, हा त्यांचा एक बुरखा आहे. त्यामागे लपवलेला व्रुâर, भेसूर आणि विकृत  चेहरा कधीच उघडा पडला आहे, याची त्यांना कल्पना अद्याप आलेली नाही. दहशतवादविरोधी लढाईत जसे जवान मृत्युमुखी पडत आहेत तसाच सामान्य काश्मिरींचा मुख्यत्वे बळी जात  राहाणार आहे. त्यामुळेच युद्धाची भाषा न थांबणाऱ्या संहाराकडे निर्देश करणारी ठरते. दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणाऱ्या शक्तींचा बिमोड करून आज देशात सौहार्दाचे वातावरण  निर्माण करण्याची खरी गरज आहे.

-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget