Halloween Costume ideas 2015
Latest Post

एम.आर.शेख,  9764000737

    आजकाल बीबीसी वर  #me too नावाने एक लैंगितेसंबंधी मोहिम सुरू आहे. त्यात जागतिक पातळीवरील नावाजलेल्या स्त्री-पुरूषांनी आपला सहभाग नोंदविलेला आहे. प्रख्यात हॉलीवुड अभिनेत्री अँजेलिना ज्युली पासून ते मोनिका लेवेन्स्की पर्यंतच्या महिलांनी यात आपला सहभाग नोंदविलेला आहे. यात अनेक पुरूषांनी सुद्धा आपल्या जीवनात महिलांवर आपण कसे लैंगिक अत्याचार केले? याची पश्‍चातापदग्ध स्विकारोक्ती केलेली आहे. अनेक विख्यात स्त्रीयांनी आपल्यावर कोणत्या परिस्थितीत व कसे लैंगिक अत्याचार झाले याचे वर्णन केलेले आहे.
शिवाय अतीलैंगिक सक्रीयतेमुळे लोक कसे आजारी पडत आहेत व त्यांच्या इलाजासाठी कशी नव नवीन रूग्णालये व नव नवीन उपचार पद्धती उपयोगात आणल्या जात आहेत यासंबंधी ही एक विस्तृत रिपोर्ताज नुकताच प्रकाशित केलेला आहे. त्यात एरीजोना येथील ’सेक्स अ‍ॅडिक्शन रिहॅबिलीटेशन सेंटर’ मध्ये प्रख्यात हॉलीवुड अभिनेता मायकल डग्लस, आंतरराष्ट्रीय किर्तीचा गोल्फ खेळाडू टायगर वुड्स आणि हॉलीवुडचे प्रख्यात दिग्दर्शक हार्वी वाईन्सटाईन सारख्या सेलेब्रिटीजनी कसे उपचार घेतलेले आहेत? याचीही माहिती देण्यात आलेली आहे. या पार्श्‍वभूमीवर कथित पुढारलेल्या युरोपीयन समाजाची अशी लैंगिक दुरवस्था का झाली? या विषयी चर्चा अप्रस्तुत होणार नाही.

पार्श्‍वभूमी
    ज्या समाजात वेगवेगळ्या मार्गाने अवतीभोवती 24ु7 कामुक वातावरण जाणून बुजून निर्माण केले जाते त्या समाजात लैंगिक संबंधाचा अतिरेक आपोआपच होतो. यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काही नाही. लैंगिक संबंधामध्ये जो अवर्णनीय आनंद अल्लाहने ठेवलेला आहे तो जोडप्यांना मुलांना जन्माला घालतांना व नंतर संगोपन करतांना ज्या यातना सहन कराव्या लागतात त्या सुसह्य व्हाव्यात म्हणून ठेवलेला आहे. मात्र मुक्त लैंगिक संबंधामुळे प्रजोत्पादनाच्या या इश्‍वरीय तरतुदीलाच हरताळ फासला जातो व लैंगिक संबंधाचे रूपांतर मनोरंजनामध्ये केले जाते. त्यामुळे समाजामध्ये  हा लैंगिक अतिरेक होतो. अशा समाजात राहणार्‍या महिला ह्या सातत्याने पुरूषांच्या वासनेच्या बळी पडतात. महिलांच्या लक्षातच येत नाही की ’महिला स्वातंत्र्याच्या’ नावाखाली चतुर पुरूष त्यांना पारंपारिक नैतिकतेच्या चौकटीतून बाहेर काढून त्यांचा स्वतःच्या लैंगिक मनोरंजनासाठी वापर करून घेऊ इच्छितात. हे सत्य फार कमी महिलांच्या लक्षात येते. उदाहरणार्थ एका सुज्ञ महिलेचे हे वाक्य मी आपल्या समोर ठेवीत आहे. ”फ्री सेक्स असल में स्त्रीमुक्ती नहीं है. वास्तव में ये सेक्स के भूखे, शातीर पुरूषोंद्वारा हमारे लिए बिछाया गया एक जाल है. हमें लगता है की वे हमें मुक्त होने के लिए प्रोत्साहित कर रहे हैं. वास्तव में वे हमें शोषण के लिए तयार कर रहे होते हैं.” - अनुजा चौहान, इंग्रजी लेखिका (संदर्भ ः आऊटलूक - फेब्रुवारी 2011) 
    मुक्त लैंगिक वातावरण असलेल्या समाजामध्ये साधारणपणे महिलांना अनेक पुरूष आपापल्या कुव्वतीप्रमाणे वश करण्याचा प्रयत्न करत असतात. पुरूषांच्या ससतच्या ससेमिर्‍यामुळे बहुतेक महिला त्रस्त होऊन जातात. या ससेमिर्‍यापासून फक्त त्याच महिला सुरक्षित राहू शकतात ज्या शरियतच्या चौकटीत राहून जीवन जगत असतात. कुठलाही अतिरेक हा विकृतीत रूपांतरीत होण्यासाठी जास्त काळ लागत नाही. म्हणून लवकरच प्रत्येक मुक्त समाजातील मोठा वर्ग लैंगिक विकृत्तीमध्ये गुरफटून जातो. त्याचे वाईट परिणाम मग सगळ्यांनाच भोगावे लागतात. एक तर अशा संबंधामुळे मोठ्या प्रमाणात कुटूंब व्यवस्था उध्वस्त होऊन जाते किंवा पती-पत्नीमध्ये कायम अविश्‍वासाची भावना घर करून राहते.

लैंगिक शक्तीची ताकद
    लैंगिक शक्ती ही बंद जलायशासारखी असते. अशा महाप्रचंड जलाशयाचा वापर जर कालवे करून नियंत्रित पद्धतीने केला गेला तर हजारो हेक्टर शेती सुजलाम व सुफलाम होते. मात्र तोच जलाशय दुर्देवाने फुटला, म्हणजे अनियंत्रित झाला तर हजारो हेक्टर शेती नुसती उध्वस्तच होत नाही तर  गावचे गाव वाहून जातात. लैंगिक संबंधानाही जर विवाहरूपी कालव्यांद्वारे नियंत्रितपणे वाट मोकळी करून दिली तर आदर्श समाज तयार होतो वे जर ते अनियंत्रित जलाशयासारखे मुक्त झाले तर समाजाचा मोठा भाग उध्वस्त होऊन जातो.
    बहुतेक पुढारलेल्या देशात याच सामाजिक उध्वस्ततेची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याचे एक उदाहरण असे की अफगानिस्तान, इराकच्या युद्धात जायबंदी होऊन मायदेशी परतलेल्या बहुतेक अमेरिकन सैनिकांच्या बायकांनी त्यांची सुश्रुशा करण्यास नकार देऊन स्वतःचे जीवन जगण्याचा पर्याय निवडला. त्यामुळे अनेक सैनिकांनी भरपूर पेन्शन व उपचाराच्या सरकारी सोयी उपलब्ध असतांनासुद्धा मानसीक आधार गमावल्यामुळे आत्महत्या केल्याचे विदारक चित्र दिसत आहे. लैंगिकता ही एकदा का अनियंत्रित झाली की माणसांना मुके पशु देखील कमी पडतात. अशा समाजात लैंगिकतेचा बाजार मांडला जातो. वेश्‍वाव्यवसायासारख्या स्त्रीत्वाचा अपमान करणार्‍या व्यावसायाचे बेशर्मपणे पॉर्न उद्योगात रूपांतर केले जाते.
    अल्लाह रब्बुल इज्जतने स्त्री- पुरूषांमध्ये चुंबकीय आकर्षण ठेवलेले आहे. त्यात त्याला जर का उद्योग /व्यवसायाचे स्वरूप दिले गेले तर कुटुंबाचा आधार असलेल्या महिलांचीच सर्वार्थाने हानी होते. महिलांची हानी म्हणजे कुटुंबाची हानी. कारण पुरूष कितीही कर्तृत्वान असला तरी कुटुंबाच्या पाठिचा कणा ही महिलाच असते. पितृसत्ताक कुटुंब व्यवस्थेला बदलून टाकण्याचे अनेक प्रयोग, अनेक देशात, अनेक वेळा झालेले आहेत. अशा प्रयोगातही अंतिम नुकसान हे महिलांचेच झालेले आहे. एनसीआरबी (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो)च्या आकडेवारीनुसार सन 2014-15 साली आपल्या देशात महिलांच्या विरूद्ध लैंगिक अत्याचारांच्या 34 हजार 651 घटना घडल्या.  
    यावरून आपला देश कोणत्या दिशेने जात आहे याची सहज कल्पना येते. जगात महिला विरोधी अपराध त्यांच्या लैंगिक उपयोगितेच्या कारणामुळेच होत असतात. भारत ही यास अपवाद नाही.
    पाश्‍चिमात्य (अ)सभ्यतेच्या नादी लागून आपल्या देशानेही स्त्री स्वातंत्र्याच्या चुकीच्या व्याख्येला मान्यता दिल्याने आज समाज नासत चाललेला आहे. विद्यापीठे शिक्षणाचे नव्हे तर शिक्षणाच्या नावाखाली लैंगिक संबंधाची संधी उपलब्ध करून देण्याची केंद्रे झालेली आहेत. जेएनयूमध्ये रोज उपयोग करून फेकून दिलेल्या कंडोमची संख्या 3000 आहे. या संंबंधी प्रशासनाने प्रा. बुद्धसींह यांच्या नेतृत्वाखाली मुलींच्या वसतिगृहावर 10 ऑक्टोबर 2017 ला पहाटे 5 वाजता अचानक छापेमारी केल्यावर हे सत्य उघडकिस आलेले आहे. यासंबंधीचे सविस्तर वृत्त लोकसत्ताच्या 11 आक्टोबरच्या पान क्रमांक 11 वर प्रकाशित झालेले आहे. आक्टोबरच्या दूसर्‍या आठवड्यात कोलकत्याहून अशीच एक बातमी आलेली आहे. ज्यात म्हटलेले आहे की, तेथील एका महाविद्यालयात मुलींच्या हॉस्टेलच्या निर्मितीचे काम सुरू असल्याने मुलींना तात्पुरत्या स्वरूपात मुलांच्या वसतिगृहात स्थलांतरीत करण्यात आले होते. मागच्या महिन्यात मुलींच्या वसतिगृहाचे काम संपले व त्यांना त्यांच्या वसतिगृहात स्थलांतरीत होण्याचा आदेश दिला असता मुलींनी मुलींच्या वसतिगृहात जाण्यास नकार दिला. प्रशासन आणि मुलींच्या मध्ये झालेल्या वादानंतर 14 मुलींवर कारवाई करून महाविद्यालयामधून काढून टाकण्यात आले. जशी शितावरून भाताची परीक्षा होते तशी या दोन घटनांवरून आपला विद्यार्थी वर्ग कुठल्या दिशेने जात आहे व भविष्यात हे लोक काय दिवे लावणार आहेत? याची परीक्षा होते. देशातील अन्य विद्यापीठांची परिस्थिती यापेक्षा वेगळी असण्याचे कारण नाही. बनारस हिंदू विद्यापीठासारख्या संघ शिस्तीच्या विद्यापीठामध्ये अलिकडेच झालेल्या एका विद्यार्थीनीच्या विनयभंगानंतर झालेल्या आंदोलनावरून सुज्ञांना अंदाज आलेलाच असेल की अन्य विद्यापीठांची काय अवस्था आहे?

लैंगिक भावनांचे नियंत्रण आणि इस्लाम
    लैंगिकतेसंबंधी इस्लामी व्यवस्थेचा दृष्टीकोण जगातील इतर सर्व व्यवस्थांच्या दृष्टीकोणापेक्षा वेगळा आहे. इस्लाममध्ये मुक्त लैंगिक संबंध तर सोडा विवाहपूर्व प्रेम करण्यालासुद्धा मान्य नाही. इतर व्यवस्थांमध्ये असे संबंध प्रस्थापित करण्याला मनाई नाही. उलट दोन प्रौढ व्यक्तीमधील परस्पर संमतीने प्रस्थापित झालेल्या संबंधांना मग ते विवाहबाह्य का असेनात आपल्या देशाच्या न्याय संस्थेला मान्य आहेत. लिव्ह इन रिलेशनशिप नावाच्या गोंडस शिर्षकाखाली अनैतिक संबंधांना जागतिक स्तरावर प्रोत्साहित करण्यात येते. विवाहबाह्य संबंध आपल्या देशात फौजदारी अपराध नाही. उलट आपल्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिपला मान्यता दिलेली आहे. या उलट इस्लाममध्ये अशा संबंधांना सर्वाधिक कठोर शिक्षा प्रस्तावित केलेली आहे. असे संबंध स्थापित करणारे अविवाहित असतील तर 100 फटके व विवाहित असतील तर दगडाने ठेचून मारण्याच्या शिक्षेची तरतूद शरियतने केलेली आहे. शरियतने खुनासारख्या गुन्ह्याला कंपाऊंडेबल (तडजोड करण्याजोगा) गुन्हा म्हटलेले आहे. मात्र विवाहबाह्य संबंधांना कंपाऊंडेबल केलेले नाही. कारण इस्लामच्या नजरेमध्ये अनैतिक संबंध हे हत्येपेक्षाही जास्त गंभीर अपराध आहे.  
    सकृतदर्शनी ही शिक्षा अतिशय कठोर वाटते. मात्र जरा गांभीर्याने विचार केला तर ही शिक्षा किती आवश्यक आहे, याचा सुज्ञास अंदाज येतो. कारण समाज नासविणार्‍या कृत्यास तेवढीच कठोर शिक्षा असल्याखेरीज हे प्रकार थांबणार नाहीत.
    इस्लाम एवढी कठोर शिक्षा अचानक देत नाही त्यापूर्वी अशी शिक्षा लोकांना होणार नाही याची पुरेशी खबरदारी घेतो. ही शिक्षा अंतिम उपाय आहे. यापूर्वी अनैतिक संबंधापासून समाजाचे रक्षण व्हावे यासाठी इस्लामने एक परीपूर्ण आचारसंहिता दिलेली आहे. पर्दा, सहशिक्षेला प्रतिबंध आणि महेरमच्या माध्यमातून इस्लामने स्त्री पुरूष संबंधांमध्ये संतुलन साधलेले आहे. दिवसातून पाच वेळा अदा केली जाणारी नमाज त्यांना अश्‍लीलतेविरूद्ध लढण्यासाठी आवश्यक तेवढे बळ देते. वर्षातून एकदा येणारा रमजान रोजाच्या माध्यमातून मुस्लिमांचे अध्यात्मिक प्रशिक्षण करण्यासाठी पुरेसा असल्याचे अनुभवातून सिद्ध झालेले आहे. शिवाय, पुरूषाची चंचल लैंगिक प्रवृत्ती लक्षात घेवून त्यांना एकापेक्षा जास्त विवाह करण्याची सशस्त्र परवानगी दिलेली आहे. एवढ्या सार्‍या खबरदार्‍या घेवूनसुद्धा जे स्त्री-पुरूष शेण खातील त्यांच्यासाठी मग दगडाने ठेचून मारण्यासारख्या कडक शिक्षेची तरतूद केलेली आहे.
    परम दयाळू अल्लाहने कुणालाच ही शिक्षा भोगण्याची पाळी येवू नये यासाठी सर्वती उपाययोजना अगोदरच घोषित करून ठेवलेली आहे. लोकांची मानसिक तयारी व्हावी यासाठी कुरआनमध्ये म्हटलेले आहे, ”व्याभिचाराच्या जवळसुद्धा जावू नका. यात शंका नाही तो अश्‍लील आणि वाईट मार्ग आहे.”   शिवाय, प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी अनेकवेळा आपल्या अनुयायांना या कृत्यापासून दूर राहण्याची सूचना दिलेली आहे. इस्लामची मान्यता आहे की, सर्वांच्या घरात आई, बहिण, मुली, सुना असतात. तुम्ही जर दुसर्‍याच्या घरात वाकून पहाल तर तुमचेही घर सुरक्षित राहणार नाही. इमाम अबु हनीफा रहे. यांचे म्हणणे तर इतपत आहे की, व्याभीचार एक कर्ज आहे तुम्ही जर तो घेतले तर तुमच्या महिलांकडून ते वसूल केले जाईल, यात शंका नाही. शेवटी एवढेच म्हणून थांबतो की, व्याभीचार ही एकच  कृती जर सार्वजनिक झाली तर ती कुठल्याही महान सभ्यतेला नष्ट करण्यासाठी पुरेशी आहे. म्हणून आपले, आपल्या कुटुंबाचे आणि आपल्या समाजाचे रक्षण करावयाचे असल्यास मुक्त लैंगिक संबंधाना उत्तेजना देणार्‍या सर्व गोष्टींवर आपण जाणून बुजून व्यक्तीगत बहिष्कार टाकला पाहिजे. कारण सरकार तर त्याच्यावर प्रतिबंध टाकणार नाही. अल्लाहकडे प्रार्थना करूया की, ” ऐ अल्लाह! आमच्यावर कृपा कर, आम्हाला या वाईट कृत्यापासून परावृत्त राहण्याची शक्ती प्रदान कर” (आमीन.)

मुंबई (नाझिम खान)-
जमाअत-ए-इस्लामी हिंद मुंबई मेट्रो शाखेतर्फे वांद्रे येथील जकेरिया नगर येथे मोफत रोगनिदान शिबीर घेण्यात आले. हृदयरोगासाठी  आवश्यक असलेली चाचणी ८-९ इ.सी.जी., मधूमेहासाठी रक्तशर्करा चाचणीसह सर्व रोग निदान शिबिराचा १७० रुग्णांनी फायदा  घेतला.
के. जी. सोमय्या हॉस्पीटल रिसर्च सेंटरचे तज्ज्ञ डॉक्टर प्रियांका मोदी, एम.डी. यांच्या नेतृत्वाखाली पाच तज्ज्ञ डॉक्टर व  इतर साहाय्यक डॉक्टरांचे बहुमूल्य सहकार्य या शिबिरास लाभले. या शिबिरात हृदयरोग, मधूमेह, गुडघादुखी, महिलांच्या विविध  आरोग्य समस्या, डोळ्यांची तपासणी आदी करण्यात आली. डॉ. तलहा, डॉ. नयना, डॉ. निवेदिना, डॉ. तनवी टुटेजा यांच्यासह जनरल  सर्जन डॉ. मधुरकर यांनी अत्यंत आस्थेवाईकपणे रुग्णांची तपासणी करून योग्य ती औषध उपाययोजना केली. किचकट व्याधीग्रस्तांना, पुढील आवश्यक चाचण्यांसाठी अत्यंत माफक दरात सोमय्या हॉस्पीटलमध्ये व्यवस्था करण्यात आली.
जमाअत-ए-इस्लामी हिंद मुंबई मेट्रोचे सचिव हुमायूँ शेख आणि जमाअतच्या वैद्यकीय साहाय्य विभागाचे प्रमुख नईम शेख याच्या  मार्गदर्शनाखाली जमाअतच्या सदस्यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. वांद्रे येथील समाजसेवक नासिरभाई, अय्यूबभाई व जुबेरभाई यांच्या  अथक परिश्रमामुळे हे शिबीर यशस्वी झाले. शिबिराला स्त्री-पुरुषांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सर्वधर्मीय, जातीय अशा गरीब  रुग्णांसाठी मोफत शिबिराचे आयोजन केल्याबद्दल रुग्णांकडून जमाअतला धन्यवाद, दुआ देण्यात आली.

दिनांक ८ सप्टेंबर रोजी मराठी वृत्तपत्रांमध्ये शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरातून आलेली एक बातमी वाचून मन खिन्न  झाले. लाखो लोकांचा अवमान करणारी व माणुसकीला कलंक लावणारी ही बातमी अशी- पुण्यातील उच्च पदवीधर महिला व हवामान  खात्याच्या माजी संचारिका डॉ. मेधा खोले यांनी आपल्या घरात काम करणाऱ्या एक गरीब महिला निर्मलाबाई हिच्या विरोधात  पोलीस ठाण्यात फिर्याद केली आणि तिच्याविरूद्ध फसवणूक, हल्ला करणे आणि धमकावणे आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला गेला. आता प्रश्न असा की या गरीब महिलेचा गुन्हा तरी काय? तर ही महिला मराठा जातीची आहे. म्हणजेच डॉ. खोलेंनुसार शूद्र  आहे आणि डॉ. खोले ब्राह्मण. एका शूद्राने ब्राह्मणाच्या घरात प्रवेश करून पाप केले आणि सोवळ्याचा नियम मोडला म्हणून या  उच्चशिक्षित महिलेने गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना भाग पाडले.
एकविसाव्या शतकात या मानसिकतेला काय म्हणावे? पण हे  सत्य आहे की आज पण हिंदीभाषिक प्रदेशात व राजस्थानमध्ये लाखो लोकांना अशीच अवमानकारक वागणू दिली जाते आणि त्यांना  ती सहन करावी लागते. कधी कधी माध्यमांना असे वाटते की ही पण एक बातमी आहे म्हणून ते प्रकाशित करतात. गुजरातमध्ये  उनीची घटना त्याचे ताजे उदाहरण आहे.
आता आपण थोडा विचार करावा की शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा भारतात लोकशाही नव्हती. राजेशाही पद्धतीने देशाचा कारभार चाललेला होता. राजाला प्रत्येक पाऊल उचलण्यापूर्वी ज्योतिषाचा म्हणजेच ब्राह्मणाचा सल्ला घ्यावा  लागत असे. म्हणजे राजाच्या प्रत्येक निर्णयाला ब्राह्मणाची परवानगी आवश्यक होती. अशा काळात शूद्रांची काय अवस्था होती याचा  अंदाज लावणे कठीण नाही. त्यांना बाजारात येण्याचा अधिकार नव्हता, त्यांना विहिरीतून पाणी नेण्याचा अधिकार नव्हता, त्यांना  घोड्यावर बसण्याचा, सार्वजनिक ठिकाणी येण्याचा, सकाळी घराबाहेर पडण्याचा अधिकारसुद्धा नव्हता. एका माणसाचा जन्म शूद्र  जातीत झाला तर त्याला काय सहन करावे लागत असे हे आपण संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र वाचून अंदाज लावू शकतो. कधी कधी तर वाचताना अश्रू अनावर होतात!
आता अशा या अमानवी समाजव्यवस्थेमध्ये कुरआन हा संदेश घेऊन आला, ‘‘हे मानवा, आपल्या पालनकर्त्याचे भय बाळग, ज्याने तुला एकाच जीवापासून निर्माण केले व त्यातून त्याचे जोडपे निर्माण केले आणि त्या दोघांपासून असंख्य पुरुष आणि स्त्रिया जगभर  पसरविले.’’ (कुरआन)
अशा या अमानवी जातीव्यवस्थेवर आधारित समाजामध्ये प्रेषित मुहम्मद (स.) यांचा हा संदेश पाहा, ‘‘कोणत्याही अरबाला एखाद्या  अरब नसलेल्या व्यक्तीवर, कोणत्याही प्रकारचे श्रेष्ठत्व नाही. गोऱ्याला काळ्यावर, काळ्याला गोऱ्यावर श्रेष्ठत्व नाही. तुम्ही सर्व  आदम (अ.) म्हणजे एकाच बापाची संतती आहात व आदम यांचा जन्म मातीपासून झाला.’’ (हदीस)
इस्लाम धर्माचा मानवतेवर आधारित हा संदेश ज्याने सर्व भेदभाव मुळापासून कापून टाकले. इस्लामप्रमाणे मानवाला हा अधिकार  मानव म्हणून प्राप्त आहे की जेणेकरून त्याच्या त्वचेचा रंग अथवा त्याचे जन्मस्थळ, त्याला जन्म देणारा वंश व जातीच्या आधारे  भेदभाव केला जाऊ नये. त्याला अन्य लोकांच्या तुलनेत नीच ठरविले जाऊ नये आणि त्याचे अधिकार इतरांपेक्षा कमी केले जाऊ नयेत. भारतातील जातीव्यवस्थेवर आधारित समाजामध्ये जेव्हा हा संदेश आला असेल तेव्हा लोकांनी किती स्वखुशीने त्याचा स्वीकार  केला. असेल! याचा अंदाज लावणे कठीण नाही. त्यांचे हिरावून घेतलेले मानवाधिकार बहाल करणारा हा संदेश होता. लाखो लोकांसाठी  जीवनदान ठरला, लाखो लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारला, यात मुळीच शंका नाही. कारण इस्लामची मानवता, समानतेवर आधारित  शिकवणीमुळे प्रत्येक मानवाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार दिला. कुरआनने सांगितले की प्रत्येक मानव ही अल्लाहची सर्वांत उत्तम कृती. कोणी श्रेष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही. या संदेशाने लोकांमध्ये जगण्याची उमेद निर्माण केली आणि त्यांचा  आत्मविश्वास वाढला. यामुळेच जगभर इस्लामचा प्रसार झाला.
असे म्हटले जाते की भारतात इस्लामचा प्रसार तलवारीचा धाक दाखवून झाला. ज्या लाखो लोकांना जनावरांपेक्षा वाईट जीवन  जगण्यास भाग पाडले गेले होते त्यांना त्यांनी तलवारीचा धाक दाखविण्याची गरज होती की त्यात मानव म्हणून जगण्याचा अधिकार  बहाल करण्याची गरज होती. पण हा प्रचार याचसाठी की जर सांगण्यात आले की लोकांनी जातीव्यवस्थेला कंटाळून इस्लाम कबूल  केला तर लोक शोध घेतील की आमच्या पूर्वजांवर जुलूम करणारे कोण? आणि आमचा गुन्हा काय होता की आम्हाला हे सहन  करावे लागले? म्हणून इस्लाम तलवारीच्या साह्याने पसरविण्यात आला असे जाणूनबुजून रंगविण्यात येते.
जातीव्यवस्थेच्या विरोधात मुस्लिमांनी कसा लढा दिला आणि दलितांना कशा प्रकारे साथ दिली याचे दाखले पुढीलप्रमाणे आहेत.  महान समाजसेवक व लेखक साने गुरूजी यांनी आपले पुस्तक ‘मंदिर प्रवेशाची भाषणे व इतर’ मध्ये पृ. क्र. २७ वर ‘हरीजनास  मशिदीत आधार’ या शीर्षकाखाली लिहिले आहे, ‘‘पूर्वी खानदेशातील जळगाव शहरात काही हरीजन (दलित) एकदा मला म्हणाले, ‘‘गुरुजी आम्ही रात्री कुठे झोपलो माहीत आहे? आम्हाला राहायला खोली मिळत नाही. शेवटी मुस्लिम बंधुंच्या मशिदीत आम्ही  झोपलो. तेथे जागा मिळते दीड रुपया महिना मशिदीला आम्ही भाडे देतो.’’ त्यांचे शब्द ऐकून मला वाईट वाटले. आमच्यातील  काहींना मुस्लिमांचा राग येतो, परंतु आमच्या अस्पृश्य बंधुंस तेच आधार देतात. त्यांच्याच हॉटेलात त्यांना जेवण मिळते. त्यांची मशीद कृतार्थ झाली. तेथे तरी देवाची लेकरं देवाजवळ झोपली.’’
याच पुस्तकात साने गुरूजी आपला अनुभव सांगतात, ‘‘अमळनेरला माझ्या मित्रांनी हरीजन विद्यार्थ्यांचे लहानसे छात्रालय चालविले आहे. परंतु कित्येक वर्षे नीट जागा मिळेना. काही महिन्यांपूर्वी एका बोहरी व्यापाऱ्याने एका मुस्लिम बंधूने इमारत दिली. तुम्हा  आम्हास लाज वाटावी. कोट्यवधी हरीजनांस तुमच्याविषयी का प्रेम वाटावे?’’ आता विचार करा की ज्या लोकांना बाजारात येण्याचा,  विहिरीतून पाणी भरण्याचा अधिकार नव्हता त्यांच्यासाठी मशिदीत राहण्यास जागा देणारे हे मुस्लिम बांधव! कारण इस्लामनुसार सर्व  मानवजात समान म्हणून द्वेष करण्याचे कारणच नव्हते. हे सगळे आमचे बांधव, ही मानसिकता इस्लामने घडविली आणि  जातीव्यवस्थेविरूद्ध लढा दिला आणि दलितांना आधार दिला. आता ज्या लोकांनी इस्लाम धर्माचा स्वीकार केला त्यांना पण समान  अधिकार बहाल केले. त्याचे एक उदाहरण पानिपत हरियाणामध्ये मौलाना अब्दुल्लाह गजनवी राहत असत. त्यांच्या कुरआन, हदीस प्रवचनाला एक नवमुस्लिम दलित बांधव फार आवडीने येत असे. त्या काळात मशिदीत नळ नव्हते. एक विहीर होती. त्या  विहिरीतून सगळे लोक पाणी घेऊन वुजू करीत असत. मौलानांना जाणवले की नवमुस्लिम दलित बांधवाने विहिरीतून पाणी घेणे  काही लोकांना चांगले वाटले नाही. एक दिवस ते विहिरीजवळ आलगे. त्या नवमुस्लिम बांधवास विहिरीतून पाणी काढण्यास  सांगितले. त्याने बादलीभर पाणी काढले. मौलानांनी सांगितले, ‘पोटभरून पाणी प्या.’ तो पाणी प्यायला. त्याचे उरलेले पाणी मौलाना  स्वत: प्यायले. नंतर त्या बादलीतील पाणी उरलेले पाणी विहिरीत टाकले. मग सर्व लोकांनी वुजू केली आणि पाणी प्यायले. अशा  प्रकारे केवळ तोंडी उपदेश व समानतेवर प्रवचन न करता जे दोन पाच लोकांची मानसिकता खराब होती, तीदेखील बदलून टाकली. (संदर्भ : कुछ यादें कुछ बातें, मो. मुस्लिम)
सांगण्याचे तात्पर्य हेच की भारतीय जातीय  व्यवस्था संपविण्यात इस्लामचा सिंहाचा वाटा आहे. पण ते इस्लाम तलवारीच्या जोरावर  पसरला, हे रंगवून लोकांच्या मनात द्वेषाची भावना निर्माण केली जाते, ही खेदाची बाब होय

शोधनमधील ‘अल्लाहची सर्वश्रेष्ठ निर्मिती - मानव’ या लेखात (११-१७ ऑगस्ट २०१७) सय्यद सालार पटेल यांनी लिहिले आहे,  ‘‘कुरआनमध्ये म्हटले आहे की, ‘मी मातीपासून एक मानव बनविणार आहे. मग त्याला पूर्णपणे बनविन आणि त्यात माझा आत्मा फुंकीन. तेव्हा तुम्ही त्याच्यासमोर नतमस्तक व्हा.’’ (कुरआन ३८:७१-७२) याचा अर्थ मनुष्यात जो आत्मा फुंकला गेला आहे तो खरे  तर ईश्वरी गुणाचे एक प्रतिबिंब किंवा छाया आहे. जीवन, ज्ञान, सामर्थ्य, निश्चय, अधिकार आणि इतर सर्व वैशिष्ट्ये मनुष्यात सापडतात. त्यांचा सर्वांचा मिळून आत्मा बनतो. मनुष्यरूपी आत्म्याचा सन्मान व्हावा.’’ (शोधन,११-९- २०१७)
वास्तविक अल्लाहने ‘स्वत:चा’ आत्मा आदममध्ये फुंकला नाही तर ‘स्वनिर्मित’ आत्मा फुंकला. कुरआनचे भाषांतर ‘अहसनुल  कुरआन’मध्ये आहे की, याचा अर्थ तो आत्मा ज्याचा स्वामी मी (अल्लाह) आहे, माझ्याशिवाय त्यावर कुणी अधिकार बाळगीत नाही.  नि:संशय अल्लाहचे दैवी गुणधर्म (अस्मा व सिफात) विश्वातील कोणतीही सजीव-निर्जीव वस्तू धारण करू शकत नाही. कारण  अल्लाहच्या दैवत्वात कुणी भागीदार नाही, जे कुणी याभागीदारीचा दावा करतात ते ‘मुश्रिक’ आहेत आणि या भागीदारीला ‘शिर्क’  म्हणतात, जो घोर अपराध आहे, ज्याला अल्लाह कधीच माफ करीत नाही. काही सूफी मताचे लोक अल्लाहच्या दैवी गुणधर्मांना  मनुष्यात असण्याचा प्रसार करतात, त्याला ते छाया, सया, प्रतिबिंब आदी विशेषणे लावून आपल्या खोट्या श्रद्धेचा प्रचार करतात. त्याला ते ‘वहदतुल वजूद’ (प्रत्येक गोष्टीत / वस्तूत ईश्वराचा अंश असणे) आणि ‘हुलूल’ (माणसाने ईश्वरामध्ये प्रवेश होणे)  म्हणतात. हा अकीदा (श्रद्धा) इस्लामच्या मूलभूत श्रद्धेविरूद्ध आहे. हा अकीदा खऱ्या ‘अहले सुन्नत वल जमात’चा अजिबात नाही.  कुरआनच्या आयतींचा अन्वयार्थ व भ्रष्टीकरण झालेले स्पष्टीकरण होय. जर अल्लाह एखाद्या जीवंत वा मृत वस्तूत प्रवेश करीत  असेल किंवा मनुष्याचे अल्लाहत प्रवेश होणे असेल तर तौहीदचा अर्थ काय? तौहीद म्हणजे एकेश्वरवाद. अल्लाहच एकमेव ईश्वर  आहे, त्याचा कोणी भागीदार नाही. याचा अर्थ काय? सूफी याचे सप्रमाण उत्तर देत नाहीत, तर आमच्यावर शरियत बांधिल नसून  आम्ही आमच्या स्वत:च्या इबादतीच्या पद्धती शोधून काढल्या आहेत, ज्याद्वारे (तरीकात) प्राप्त करीत असतो. वास्तविक महान  अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) यांनी आणलेली शरियत संपूर्ण जीवनात व मानवजातीकरिताच आहे. सूफी त्यातून अलीफ कसे? मानवजातीला सरळमार्ग केवळ आणि केवळ शरियतच देऊ शकते आणि त्याद्वारेच मानवाचा मोक्ष (जन्नत) आहे. हे सत्य कोणी  नाकारू शकत नाही.
लेखक पुढे लिहितात की, ‘‘जीवन, ज्ञान, सामथ्र्य, निश्चय, अधिकार आणि इतर सर्व वैशिष्ट्ये मनुष्यात सापडतात. त्यांचा सर्वांचा  मिळून आत्मा बनतो. मनुष्यरूपी अल्लाहचा सन्मान व्हावा.’’ पवित्र कुरआन व हदीस ग्रंथात असे एखादे सप्रमाण वचन आले आहे  का, ज्यात आत्म्याची व्याख्या वर दिल्याप्रमाणे असावी? जर नसेल तर ती एक मानवी कल्पना व मानवनिर्मित अंदाजच म्हणावा लागेल. आत्मा व मनुष्य या दोन विभक्त गोष्टी आहेत. लेखकाने ‘मनुष्यरूपी आत्मा’ ही संज्ञा वापरली आहे. ती आक्षेपार्ह वाटते.  कारण मनुष्य आत्म्याचे रूप घेत नाही ना आत्मा मनुष्याचे रूप घेतो. मनुष्य मरण पावल्यावर केवळ शरीर उरते. आत्मा मात्र  वेगळा होतो. आत्म्याविषयी पवित्र कुरआनमध्ये आणि हदीसमध्ये जे काही वर्णन आले आहे तेवढीच माहिती शरियतनुसार अधिकृत  आहे. यहुद्यांनी जेव्हा एकदा आत्म्याविषयी प्रेषित मुहम्मद (स.) यांच्याकडे विचारणा केली तेव्हा ‘बनी इस्राईल’ या सूरहमध्ये आयत  अवतरली. (हदीस सही बुखारी) ‘‘आणि हे लोक तुम्हाला आत्म्यासंबंधी प्रश्न विचारतात, तुम्ही उत्तर द्या की आत्मा माझ्या पालनकर्त्याच्या हुकूमाने आहे आणि तुम्हाला जे ज्ञान देण्यात आले आहे ते अत्यल्प आहे. (कुरआन १७:८५) पवित्र कुरआनचे भाष्यकार मुहम्मद जूनागढी यांनी ‘अहसानूल बयान’मध्ये या आयतीचे वर्णन करताना लिहिले आहे की, या आयतीचा अर्थ हा आहे की तुमचे ज्ञान अल्लाहच्या ज्ञानाच्या तुलनेत फारच अल्प आहे आणि हा आत्मा ज्याच्या बाबतीत तुम्ही विचारत आहात त्याचे ज्ञान  तर अल्लाहने प्रेषितांसमवेत कुणालाच दिले नाही. बस्स! इतके समजा की, हा माझ्या पालनकत्र्याचा हुकूम आहे आणि माझ्या पालनकर्त्याच्या महानतेपैकी आहे, ज्याचे सत्य केवळ तोच जाणतो.
- निसार मोमीन, पुणे.

नांदेड महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला भव्य यश मिळत असतानाच केंद्रीय निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशातील  विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा केली. अनेकांनी भाजपची सोय पाहून निवडणूक आयोग गुजरातच्या निवडणूक  वेळापत्रकाची घोषणा करणार का असा सवाल उपस्थित केला आहे. ज्या हाताच्या बोटावर मोजता येतील अशा राज्यांत काँग्रेसची  सत्ता आहे त्यापैकी हिमाचल हे एक राज्य. तेंव्हा तेथील सत्ता कायम राखणे काँग्रेसला आपले आव्हान आगामी काळात कायम  राखण्यासाठी नितांत गरजेचे आहे.
नांदेड महानगरपालिका निवडणूक आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणूक यांची तुलना करणे  गैर असले तरीही काँग्रेसला त्या निवडणुकीच्या निकालातून काही तात्पर्य अवश्य काढता येईल आणि भाजपलादेखील काही धडा घेता  येईल. नांदेड निवडणुकीत भाजपने काँग्रेसमध्ये फोडाफोड केली आणि निवडणुकीच्या तोंडावर काही काँग्रेस नगरसेवक भाजपमध्ये  आले एवढेच नाही तर त्यांना भाजपने उमेदवारीही दिली. परंतु ते सर्व पराभूत झाले. गुजरातमधून झालेल्या राज्यसभा निवडणुकीत  देखील काँग्रेसमधून आयात उमेदवाराला भाजपने उमेदवारी दिली होती आणि तो पराभूत झाला होता. तेंव्हा भाजपने कितीही फोड़फोड करण्याचा प्रयत्न केला तरीही त्याचे नुकसान काँग्रेसला होईलच असे नाही हे काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांनी लक्षात  घ्यावयास हवे. नांदेडमध्ये मतदारांना केवळ व्यक्तिकेंद्रित विखारी प्रचार भावत नाही; किंबहुना त्याने प्रतिपक्षाविषयी सहानुभूती निर्माण व्हायचा  संभव असतो. एके काळी मोदी यांच्यावर अशीच चौफेर टीका होई आणि त्यामुळे मोदी यांना सहानुभूती मिळाली होती हे नाकारता  येणार नाही. तेच आता काँग्रेसच्या बाबतीत घडत असेल तर भाजपला तक्रारीस जागा नाही. अशा वेळी मतदार अन्य सर्व कळीच्या  मुद्द्यांना कमी महत्व देतात हाही नांदेड निवडणुकीचा अन्वयार्थ आहे. भाजपला सध्या अनेक आघाड्यांवर बचावात्मक पवित्रा घ्यावा  लागला आहे. त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे भाजपमध्ये एकीकडे काहीसे नकारात्मक वातावरण आहे; तर दुसरीकडे काहीही झाले  तरी आपणच जिंकणार अशा फाजील आत्मविश्वासातून आलेला गाफीलपणा आहे. अशा दोन टोकाच्या परिस्थितीतून भाजपला मार्ग काढावा लागणार आहे. गुजरात, नांदेड अशा मालिकेत हिमाचल काँग्रेसला हात देणारे ठरले तर काँग्रेससाठी ती मोठी आश्वासक  घटना ठरेलच; परंतु मोदी- शहा यांच्या ‘जादूच्या समाप्तीची सुरुवात झाली हे अधोरेखित होऊ लागेल. पुढच्या वर्षी होणाऱ्या काही  विधानसभा निवडणुका आणि नंतर वर्षभरात होणारी लोकसभा निवडणूक यासाठी सज्ज होण्यासाठी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसाठी आता प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. प्रत्येक विजय काँग्रेसला आत्मविश्वास मिळवून देईल तर प्रत्येक पराभव  मोदी-शहा यांच्या नेतृत्वाला पक्षातून वाढते आव्हान निर्माण करेल हाच नांदेडचा संदेश आहे. खरे पाहता नांदेडच्या निकालांमध्ये एक  मोठा संदेश दडलेला आहे. हा संदेश लोकशाहीसाठी नांदेडच्या मुस्लिमांनी दिलेला आहे. नांदेडमनपामध्ये एकूण ८१ जागा आहेत. सन  २०१२ मध्ये पार पडलेल्या मनपा निवडणुकीत काँग्रेसला ४१, शिवसेनेला १४ तर असदुद्दीन ओवैसी यांच्या एआयएमआयएम ला ११  जागा मिळाल्या होत्या आणि एनसीपीला १० व भाजपला फक्त २ जागा मिळाल्या होत्या. हे निकाल पाहून शिवसेनेने तर राज्यातील  मुस्लिमांवर सांप्रदायिक व मुस्लिमधार्जिणे होण्याचा आरोप केला होता. मात्र आता १३ ऑक्टोबर रोजी जाहीर झालेल्या नांदेड मनपा  निवडणुकीत एआयएमआयएमच्या पदरात एकही जागा पडली नाही, हादेखील एक मोठा संदेशच म्हणावा लागेल. सन २०१२ मध्ये १२ जागा जिंकल्या म्हणून मु्स्लिम समाजावर मुस्लिमधार्जिणे असल्याचा पुरावा मिळाला होता, मात्र यावेळी मुस्लिमांनी लोकशाहीला अनुसरून दिलेला संदेश हा महत्त्वाचा ठरतो. यावेळी ८१ पैकी काँग्रेसला ७३, भाजपला सहा, शिवसेनेला एक जागा मिळाली आहे  आणि एका जागेवर अपक्ष निवडून आला आहे. राष्ट्रवादी व एआयएमआयएम ला शून्यावर समाधान मानावे लागले. भारतीय मुस्लिम समाज आपल्या लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी फक्त मुस्लिम उमेदवाराकडे पाहात नाही, हेच यावरून स्पष्ट होते.  लोकशाहीच्या अनुषंगाने भारतीय मुस्लिम समाज हिंदूंपेक्षा अधिक प्रगतीशील व देशप्रेमी आहे. कारण बहुसंख्य हिंदू लोकप्रतिनिधी  निवडतना जातीपातीपासून ते सवर्णअवर्णापर्यंत विचारात गुरफटलेले असल्याचे दिसतात. नांदेड शहराच्या लोकसंख्येपैकी २९ टक्के  मुस्लिम समाज आहे. मनपातील जवळपास ४२ जागांवर त्यांच्या प्रभाव जाणवतो. म्हणूनच नांदेडच्या निकालांनी मुस्लिमांबाबत  असलेला गैरसमज दूर करून संपूर्ण देशाला आपली विचारसरणी बदलण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे.
-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@gmail.com)

माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा दुराचाऱ्याची स्तुती केली जाते तेव्हा अल्लाह रागावतो आणि त्यामुळे सिंहासन हलू लागते.’’ (हदीस : मिश्कात)
स्पष्टीकरण : असे यासाठी की जो मनुष्य अल्लाहच्या आदेशांचा आदर करीत नाही आणि त्याच्या आदेशांना उघडपणे नाकारतो तेव्हा  तो अब्रू व प्रतिष्ठेस पात्र राहात नाही. त्याच्याकडे घृणेनेच पाहिले जावे हाच त्याचा अधिकार आहे. आता जर मुस्लिम समाजात  त्याला प्रतिष्ठा प्राप्त असेल तर याचा अर्थ हा आहे की लोकांमध्ये आपल्या ‘दीन’ (जीवनधर्म), अल्लाह व पैगंबरांवर प्रेम बाकी  राहिलेले नाही अथवा असेल तर फारच क्षुल्लक प्रमाणात आहे. अशा स्थितीत अल्लाहला राग येणारच, हे उघड आहे. त्याची कृपा  त्या जनसमुदायावर कशी होऊ शकेल.
माननीय अबू बकरा (रजि.) यांच्या कथनानुसार, ते म्हणतात, एका मनुष्याने दुसऱ्या मनुष्याची पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या  उपस्थितीत स्तुती केली, तेव्हा पैगंबर म्हणाले, ‘‘तू आपल्या बंधुची मान कापली याचा मला खेद वाटतो. (हे वाक्य पैगंबरांनी तीन  वेळा म्हटले.) तुमच्यापैकी जो मनुष्या एखाद्याची स्तुती करीत असेल आणि असे करणे आवश्यक असेल तर अशाप्रकारे म्हणावे,  ‘मला अमुक मनुष्याच्या बाबतीत असे वाटते आणि अल्लाहला हे माहीत आहे.’ या अटीवर की वास्तवात त्याला तसे वाटत असावे  की तो मनुष्य अशाप्रकारचा आहे आणि एखाद्या मनुष्याची स्तुती अल्लाहच्या तुलनेत करू नका.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)
स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या सभेत एक मनुष्याचा संयम व त्याच्या चांगल्या स्थितीची स्तुती करण्यात आली होती.  अशा परिस्थितीत मनुष्य धोक्यात पडण्याची भीती होती, त्यामुळे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मनाई केली आणि म्हटले, ‘‘तू  आपल्या बंधुचा गळा कापला.’’ मग पैगंबरांनी उपदेश दिला की जर एखाद्या मनुष्याच्या बाबतीत काही सांगणे भागच असेल तर  अशाप्रकारे म्हणा, ‘‘मी अमुक मनुष्याला सदाचारी समजतो’’ आणि असे म्हणू नका की अमुक मनुष्य अल्लाहचा मित्र (वली) आहे  अथवा अमुक व्यक्ती निश्चितच स्वर्गात जाणार आहे. अशाप्रकारचे वक्तव्य करण्याचा कोणा अल्लाहच्या दासाला अधिकार नाही,  कारण हे सांगणे कठीण आहे की ज्याला तो स्वर्गवासी म्हणत आहे तो अल्लाहच्या दृष्टीतदेखील स्वर्गवासी आहे किंवा नाही? पर्यंत  मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत तो ‘ईमान’च्या परीक्षास्थळात आहे. कधी मनुष्याचे मन बदलेल आणि तो सरळमार्ग सोडून दुसरीकडे  जाईल हे सांगता येत नाही. म्हणून एखाद्या जिवंत सदाचारी मनुष्याच्या बाबतीत खात्रीपूर्वक एखादा दृढ निर्णय घेतला जाऊ नये आणि मृत्यूनंतरदेखील एखाद्याच्या बाबतीत ‘‘तो स्वर्गवासी आहे’’ असे म्हणू नये.
इस्लामी धर्मपंडितांच्या मते जर एखाद्या मनुष्याने बंडखोरी करण्याचे भय नसेल आणि सद्यस्थिती पाहता त्याच्यादेखत त्याचे ज्ञान  व संयम वगैरेची स्तुती केली जाऊ शकते. परंतु असहाय व्यक्तीने यापासून अलिप्त राहिले पाहिजे, कारण बंडखोरी करणे अथवा न  करण्याबाबतचा निर्णय अल्लाहच करू शकतो. कोणाच्या अंतर्गत स्थितीबाबत सर्वसाधारणपणे बरोबर अंदाज येऊ शकत नाही.
खोटी साक्ष
माननीय खरीम बिन फातिक (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सकाळच्या नमाजचे नेतृत्व केले आणि जेव्हा  लोकांकडे वळले तेव्हा बसून राहण्याऐवजी पैगंबर सरळ उभे राहिले आणि तीन वेळा म्हणाले, ‘‘खोटी साक्ष देणे आणि अनेकेश्वरत्व  अवलंबिणे दोन्ही सारखेच पाप आहे.’’ मग पैगंबरांनी पुढीलप्रमाणे उच्चार केला, ‘‘फज्तनिबुर्रिजसा आखीर तक.’’ (तुम्ही अपवित्रता म्हणजे मूर्तींपासून दूर राहा आणि खोटे बोलण्यापासून दूर राहा आणि अल्लाहकडे लक्ष वेंâद्रित करा, अनेकेश्वरत्व सोडून  एकेश्वरत्वाचा अवलंब करा.) (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ‘सूरह हज’ची ज्या आयतीचे पठण केले त्यात ‘कौल़ज़्जूर’ हा शब्द आला आहे, त्याचा अर्थ  आहे खोटे म्हणणे आणि खोटे बोलणे प्रत्येक ठिकाणी वाईट आहे, मग ते न्यायालयात न्यायाधीशासमोर बोललेले असो की एखाद्या  दुसऱ्या ठिकाणी.
पाहा, खोटी साक्ष किती मोठे पाप आहे, परंतु मुस्लिमांच्या दृष्टीत हे पाप आता पाप राहिले नसून ती एकप्रकारची ‘कला’ बनली  आहे. आम्ही न्यायालयात आपल्या ‘ईमान’च्या दबावाखाली खरी साक्ष देण्याचे धाडस करतो, म्हणून आम्ही त्यांच्यादरम्यान मूर्ख  समजले जात आहोत.

(२३३) ज्या पित्यांची इच्छा असेल की त्यांच्या मुलांनी स्तनपान-काल पूर्ण होईपर्यंत दूध प्यावे तर मातांनी - आपल्या मुलांना पूर्ण  दोन वर्षे स्तनपान करावे.२५७ अशा अवस्थेत मुलाच्या पित्याने परिचित पद्धतीनुसार त्यांना जेवण-खाण व कपडे-लत्ते दिले पाहिजेत.  परंतु कोणावरही त्याच्या ऐपतीपेक्षा जास्त भार टाकला जाऊ नये. आईला या कारणास्तव त्रास दिले जाऊ नये की मूल तिचे आहे,
  आणि पित्यालासुद्धा या कारणास्तव त्रास दिला जाऊ नये की मूल त्याचे आहे - दूध पाजणाऱ्या स्त्रीचा हा हक्क जसा मुलाच्या त्यावर  आहे, तसाच त्याच्या वारसांवरदेखील आहे.२५८ परंतु जर उभयपक्ष परस्पर राजी-खुषी आणि सल्ला-मसलतीने दूध सोडवू इच्छित  असतील तर असे करण्यास काही हरकत नाही. तुमचा विचार जर आपल्या मुलाला एखाद्या परक्या स्त्रीकडून दूध पाजावयाचा असेल  तर यातसुद्धा काही हरकत नाही परंतु केवळ या अटीवर की त्याचा जो काही मोबदला ठरवाल, तो परिचित पद्धतीनुसार अदा करा. अल्लाहचे भय बाळगा आणि समजून असा की जे काही तुम्ही करता ते सर्व अल्लाहच्या दृष्टीत आहे.
(२३४) तुमच्यापैकी जे लोक  मरण पावतील, जर त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नीं जिवंत असतील तर त्यांनी चार महिने दहा दिवस स्वत:ला रोखून ठेवावे,२५९  नंतर जेव्हा त्यांची इद्दत पूर्ण होईल तेव्हा त्यांना अधिकार आहे की, त्यांनी स्वत:संबंधी भल्या पद्धतीनुसार इच्छा असेल तसे करावे.  तुमच्यावर त्याची काहीही जबाबदारी नाही. अल्लाह तुम्हा सर्वांच्या आचरणाची खबर राखणारा आहे.
(२३५) इद्दतच्या काळात तुम्ही  हवे तर त्या विधवा स्त्रियांशी मागणीची इच्छा संकेताने व्यक्त करा, हवे तर मनांत लपवून ठेवा, दोन्ही स्वरूपात काही हरकत नाही.  अल्लाह जाणतो की त्यांचा विचार तुमच्या मनात येणारच. परंतु पाहा, गुप्त करार-मदार करू नका. जर काही बोलणी करावयाची  असेल तर प्रचलित पद्धतीनुसार करा आणि विवाहबद्ध होण्याचा निर्णय तोपर्यंत घेऊ नका जोपर्यंत इद्दत पूर्ण होत नाही. चांगल्या प्रकारे समजून घ्या की अल्लाह तुमची मनोदशादेखील जाणतो. म्हणून त्याचे भय बाळगा व हेदेखील जाणून असा की अल्लाह  सहनशील आहे (लहानसहान गोष्टींना) तो माफ करतो.
(२३६) तुम्हावर काही गुन्हा नाही की तुमच्या पत्नींना तुम्ही तलाक द्यावा  या वेळेपूर्वी की त्यांना स्पर्श करण्याची घटका येईल अथवा महर ठरविला असेल. अशा स्थितीत त्यांना काही ना काही अवश्य दिले  पाहिजे.२६० सुखवस्तु व्यक्तीने आपल्या ऐपतीप्रमाणे व गरीबाने आपल्या कुवतीप्रमाणे परिचित पद्धतीनुसार द्यावे. हा हक्क आहे  सदाचारी लोकांवर.

257) हा त्या स्थितीसाठी आदेश आहे जेव्‌हा पती-पत्नी एक दुसऱ्यापासून विलग झालेले आहेत मग तलाकद्वारा किंवा खुलअद्वारा  किंवा फिस्क और तफरीकद्वारा आणि निकाह तोडण्याने आणि तिच्या जवळ दूध पिणारा बाळ असेल.
258) म्हणजे बाप मरून गेला तर त्याच्या जागी जो मुलाचा पालक असेल त्याला हा हक्क द्यावा लागेल.
259) पतीच्या मृत्यूची ही इद्दत त्या स्त्रियांसाठी ही आहे ज्यांच्याशी त्यांच्या पतींनी शारीरिक संबंध स्थापित केले नसतील. परंतु  गर्भवती महिला या अटीतून मुक्त आहेत. तिच्यासाठी पतीच्या मृत्यूची इद्दत मूल जन्मापर्यंत आहे. मग मूल पतीनिधनानंतरच किंवा  काही महिन्यानंतर जन्माला यावे. "आपणा स्वत:स रोखून धरावे'' म्हणजे फक्त असे नाही की या मुदतीत निकाह करू नये तर याचा  अर्थ स्वत:ला साज शृंगारापासून अलिप्त ठेवावे. हदीसमध्ये स्पï आदेश आहेत की इद्दतच्या काळात रंगीत कपडे व दागिणे घालणे,  मेंहदी, सुरमा व अत्तर लावणे तसेच केश रचना करण्यापासून व केश रंगविण्यापासून अलिप्त राहिले पाहिजे. यात मतभेद आहेत  की काय या काळात ती घराबाहेर पडू शकते की नाही? उमर, उस्मान, इब्‌ने उमर, जैद बिन साबित, इब्‌ने मसऊद, उम्मे सलमा,  सईद बिन मुसय्यिब (रजि.) तसेच इब्राहीम, नखई, मुहम्मद बिन सीरीन आणि चारी इमाम (रह.) यांचे हे मत आहे की इद्दत  काळात तीला त्याच घरात राहणे आवश्यक आहे जिथे तिचा पती मृत्यू पावला असेल. दिवसा आवश्यक कामासाठी ती बाहेर जाऊ  शकते परंतु निवास त्याच घरात असेल. विपरीत माननीय माता आएशा, इब्‌ने अब्‌बास, अली, जाबीर बिन अब्‌दुल्‌लाह (रजि.) अता,  ताअस, हसन बसरी, उमर बिन अब्‌दुल अजीज (रह.) यांचे मत आहे की ती आपल्‌या इद्दतीचा काळ कुठेही पूर्ण करू शकते आणि  त्या काळात प्रवाससुद्धा करू शकते.
260) याप्रकारे नाते-संबंध जोडल्‌यानंतर तोडून देण्यात तीला काहीना काही नुकसान झेलावेच लागते. म्हणून अल्लाहने आदेश दिला  की शक्यतो त्याची पूर्तता करावी.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget