Halloween Costume ideas 2015
Latest Post

माननीय अबू अय्यूब अंसारी (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘मनुष्यासाठी वैध नाही की त्याने आपल्या बंधुशी तीन रात्रींपेक्षा अधिक काळापर्यंत संबंध तोडून टाकले असावेत. दोघे रस्त्यात एकमेकांना भेटले असता तोंड फिरवितो आणि प्रथम सलाम करणारा त्या दोघांमध्ये उत्तम आहे.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
अशी शक्यता आहे की दोन मुस्लिम व्यक्ती एखादवेळी एखाद्या गोष्टीवर एकमेकांवर नाराज व्हावेत आणि बोलणे बंद करावे, परंती तीन दिवसांपेक्षा अधिक त्यांनी या स्थितीत राहायला नको. सर्वसाधारणपणे असेच घडते की दोन मनुष्यांदरम्यान जर वितुष्टी निर्माण झाली आणि त्या दोघांना अल्लाहचे भय असेल तर दोन-तीन दिवसांनंतर त्यांच्यात एकमेकांना भेटण्याची आतुरता निर्माण होऊ लागते आणि शेवटी त्यांच्यापैकी एकजण प्रथम सलाम करून ती शैतानी वितुष्टी संपुष्टात आणतो. म्हणून सलाम करण्यात तत्परता दाखविणाऱ्याची उत्कृष्टता या हदीसमध्येदेखील सांगितली गेली आहे आणि याव्यतिरिक्त दुसऱ्या हदीसींमध्येदेखील.

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘स्वत:ला वाईट शंकेपासून अलिप्त ठेवा; कारण वाईट शंकेसह सांगितलेली गोष्ट सर्वाधिक खोटी असते. दुसऱ्यांच्या बाबतीत माहिती प्राप्त करत फिरू नका, टेहळणी करू नका, आपसांत दलाली करू नका, दुसऱ्यांशी शत्रुत्व बाळगू नका, एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न करू नका आणि अल्लाहचे भक्त व्हा, आपसांत भाऊ-भाऊ बनून जीवन व्यतीत करा.’’ (हदीस : बुखारी, मुस्लिम)

स्पष्टीकरण
या हदीसमधील काही शब्दांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. (१) ‘तहस्सुस’ या शब्दाचा अर्थ आहे– ‘कान देऊन ऐकणे’ आणि ‘टक  लावून पाहणे’. पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे की एखाद्याचे बोलणे ऐकण्यासाठी लपून-छपून उभे राहणे आणि मग त्याच्या वक्तव्याचा त्याच्याच विरोधात वापर करणे आणि त्याला लोकांच्या दृष्टीत तुच्छ सिद्ध करणे ईमान व इस्लामच्या विरूद्ध आहे. (२) ‘तजस्सुस’ या शब्दाचा अर्थ आहे– एखाद्याचे दोष शोधण्याचा प्रयत्न करणे’ की केव्हा त्याच्याकडून चूक घडते आणि केव्हा त्याची एखादी दुर्बलता त्याला माहीत पडते जेणेकरून लगेचच त्याची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी त्या दुर्बलतेचा इकडेतिकडे पैâलाव करत फिरणे. (३) ‘तनाजुश’ या शब्दाचा अर्थ आहे– जो खरेदी-विक्रीशी संबंधित आहे  म्हणजेच ‘दलाली’. दलाल आणि व्यापाऱ्यादरम्यान ही गोष्टनिश्चित होते की दलाल चढ्या दराने बोली लावेल आणि त्याची इच्छा तो माल खरेदी करण्याची नसते तर फक्त ग्राहकांना फसविण्यासाठी तो असे करीत असतो. (४) ‘तदाबुर’ या शब्दाचा अर्थ आहे– ‘आपसांत शत्रुत्व बाळगणे’ किंवा ‘संबंध तोडणे’.

माननीय इब्ने उमर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) प्रवचन मंचावर विराजमान झाले आणि अतिशय मोठ्या आवाजात म्हणू लागले, ‘‘हे त्या लोकांनो! ज्यांनी फक्त आपल्या वाचेने इस्लामचा स्वीकार केला आहे आणि ईमान तुमच्या हृदयात उतरलेले नाही, तुम्ही मुस्लिमांना त्रास देऊ नका आणि त्यांना लज्जित करू नका आणि त्यांच्या दोषांच्या मागे पडू नका. जे लोक आपल्या मुस्लिम बंधुंच्या दोषांच्या मागे पडतात, अल्लाह त्यांच्या दोषांच्या मागे पडेल आणि ज्या मनुष्याच्या दोषांच्या मागे अल्लाह पडतो त्याला अपमानित करतो, जर तो आपल्या घरात असेल. (हदीस : तिर्मिजी)

स्पष्टीकरण
धर्मद्रोही सच्चा व पवित्र मुस्लिमांना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास देतात आणि अज्ञानकाळात घडलेल्या त्यांच्या घराण्याच्या लज्जास्पद दोषांना त्या लोकांसमोर सांगतात, त्याच लोकांना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी या हदीसमध्ये तंबी दिली आहे. काही दुसऱ्या हदीसींमध्ये कथन करण्यात आले आहे की हे भाषण देताना पैगंबरांचा आवाज इतका वाढला होता की आसपासच्या घरांपर्यंत हा आवाज पोहोचला आणि महिलांनीदेखील ऐकला.

(९३) आणि त्या माणसापेक्षा मोठा अत्याचारी इतर कोण असेल जो अल्लाहवर खोटे कुभांड रचतो अथवा सांगतो की माझ्याकडे दिव्य प्रकटन आले आहे. खरे पाहता त्यांच्यावर कसलेही दिव्य प्रकटन अवतरले गेले नाही. अथवा जो अल्लाहच्या अवतरित केलेल्या ग्रंथाच्या विरोधात सांगत असेल की मीदेखील असा ग्रंथ अवतरवून दाखवीन? कदाचित! तुम्ही अत्याचाऱ्यांना अशा दशेत पाहिले असते जेव्हा ते मृत्यूच्या घरघरीत गटांगळ्या घेत असतील आणि दूत हात पुढे करून करून सांगत असतील, ‘‘आणा, काढा आपले प्राण, आज तुम्हाला त्या गोष्टींपायी अपमानजनक यातना दिली जाईल, ज्या तुम्ही अल्लाहवर दोषारोप करून हकनाक बरळत होता आणि त्याच्या संकेत-वचनांविरूद्ध उद्धटपणा करीत होता.’’
(९४) (आणि अल्लाह फर्मावील) ‘‘तर पाहा आता तुम्ही तसेच एकटे आमचे समोर हजर झालात जशा प्रकारे आम्ही तुम्हाला पहिल्यांदा एकाकी जन्माला घातले होते. जे काही आम्ही तुम्हाला जगांत दिले होते ते सर्व तुम्ही पाठीमागे सोडून आला आहात आणि आता आम्हाला तुमच्या-समवेत तुमची शिफारस करणारेदेखील दिसत नाहीत, ज्यांच्याबद्दल तुम्ही समजत होता की तुमचे कार्य सिद्धीस नेण्यात त्यांचाही काही वाटा आहे. तुमचे आपापसातील सर्व संबंध तुटले आणि ते सर्व तुमच्यापासून अलिप्त झालेले आहेत ज्यांचा तुम्ही अहंकार बाळगत होता!’’
(९५) दाणे आणि बीज काढणारा अल्लाह आहे.६२ तोच सजीवाला निर्जीवातून काढतो आणि तोच निर्जीवाला सजीवातून बाहेर काढणारा आहे.६३ ही सर्व कामे करणारा तर अल्लाहच आहे, मग तुम्ही कोठे भरकटले जात आहात?
(९६) रात्रीचे आवरण फाडून तोच प्रात:काळ करतो, त्यानेच रात्रीला विश्रांतीची वेळ बनविली आहे. त्यानेच चंद्र व सूर्याच्या उदय आणि अस्ताचे प्रमाण ठरविले आहे. हे सर्व त्याच प्रचंड सामथ्र्य व ज्ञान असणाऱ्याचे निश्चित केलेले अंदाज आहेत.
(९७) आणि तोच आहे ज्याने तुमच्यासाठी ताऱ्यांना वाळवंट व समुद्रातील अंधकारात मार्ग शोधण्याचे साधन बनविले. पाहा, आम्ही संकेत उघड करून सांगितले आहेत त्या लोकांसाठी की ज्यांना ज्ञान आहे.६४
(९८) आणि तोच आहे ज्याने एका जिवापासून तुम्हाला निर्माण केले६५ मग प्रत्येकासाठी एक विश्रामस्थान आहे आणि एक ती सुपूर्द केली जाण्याची जागा. हे संकेत आम्ही स्पष्ट केले आहेत, त्या लोकांसाठी जे बोध घेतात.६६
(९९) आणि तोच आहे ज्याने आकाशातून पाण्याचा वर्षाव केला मग त्याद्वारे सर्व प्रकारच्या वनस्पती उगविल्या. मग त्याद्वारे हिरवीगार शेते व झाडे उगविली, मग त्याच्यापासून थरावर थर असलेले दाणे काढले आणि खजुराच्या फुलोऱ्यांतून फळांचे घोसच्या घोस उत्पन्न केले जे ओझ्यापायी झुकले जात आहेत आणि द्राक्षे, जैतून (ऑलिव्ह) व डाळिंबाच्या बागा, ज्यांची फळे एक दुसऱ्याशी साम्य तर ठेवतात तरीसुद्धा त्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. या झाडांना जेव्हा फळे येतात तेव्हा फळे येण्याची व मग ती पिकण्याची प्रक्रिया जरा विचारपूर्वक पाहा, या गोष्टीत संकेत आहेत त्या लोकांसाठी जे श्रद्धा ठेवतात.
१००) यावरही लोकांनी ‘जिन्न’ना (अदृश्य निर्मितींना) अल्लाहचे भागीदार ठरविले.६७ वास्तविक पाहता तो त्यांचा निर्माता आहे. आणि न समजता उमजता त्याच्यासाठी पुत्र व कन्या ठरविल्या,६८ खरे पाहता तो पवित्र व उच्चतर आहे, त्या गोष्टीपासून ज्या हे लोक बोलतात.


६२)    म्हणजे भूगर्भातून बीजाला फाडून त्यातून झाडाचा अंकूर काढणारा.
६३)    निर्जीवापासून सजीवाला काढणे म्हणजे निर्जीवापासून सजीव प्राण्यांना निर्माण करणे. सजीवापासून निर्जीवाला काढण्याचा अर्थ आहे सजीव शरीरातून निर्जीव पदार्थाला काढणे.
६४)    म्हणजे या सत्याचे पुरावे की अल्लाह एकमेव आहे, दुसरा कोणीच ईशत्वाचे गुण ठेवत नाही की ईशत्वाच्या अधिकारातही भागीदार नाही. तसेच ईशत्वाच्या हक्कांपैकी एकही हक्काचा अधिकार नाही. परंतु त्या निशाण्या पाहून वास्तविकतेपर्यंत पोहोचणे अज्ञानी लोकांच्या आवाक्याबाहेरील गोष्ट आहे. त्या मौलिकतेचा लाभ त्याच लोकांना प्राप्त् होऊ शकतो जे वैज्ञानिक दृष्टीने सृष्टीतील पुराव्यांचे अवलोकन करतात.
६५)    म्हणजे मानवी वंशाची सुरुवात एकाच जीवापासून (व्यक्ती) केली आहे.
६६)    म्हणजे मानवजातीचा जन्म आणि त्यात स्त्री पुरुषाचे फरक व प्रजनन प्रक्रियाद्वारे त्याची वृद्धी, तसेच आईच्या गर्भाशयात गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंतच्या जीवनयात्रेतील विविध टप्प्यांवर नजर टाकली तर त्यात असंख्य स्पष्ट निशाण्या माणसाच्या समोर येतात. त्या निशाण्यांद्वारे तो वर नमूद केलेले तथ्य सहज जाणून घेऊ शकतो. परंतु या निशाण्यांपासून बोध तेच लोक घेऊ शकतात जे चिंतन मनन करतात. जनावरांसारखे जीवन व्यतीत करणारे जे आपल्या मनोकामनांना पूर्ण करण्यातच धन्यता मानतात, असे लोक या निशाण्यांपासून काहीच बोध घेऊ शकत नाहीत.
६७)    म्हणजे अनुमानाने आणि भ्रमाने हा निष्कर्ष काढला की सृष्टीव्यवस्थेत आणि मनुष्याचे भाग्य बनविणे आणि बिघडविणे यासाठी अल्लाहसमवेत दुसऱ्या अदृश्य शक्तीसुद्धा सामील आहेत. कोणी पर्जन्यदेवता आहे, तर कोणी जन्म घालणारा देव तर कोणी पालनपोषण करणारा देव आहे. कोणी धनाची देवता आहे तर कोणी आरोग्यदेवता आहे. अशाप्रकारच्या अंधश्रद्धा जगाच्या सर्व अनेकेश्वरवादी लोकसमुदायांत आत्मा, शैतान, राक्षस, देवी-देवता इ. विषयी आढळतात.
६८)    अरबचे अज्ञानी लोक फरिश्त्यांना (देवदूतांना) अल्लाहच्या मुली म्हणत होते. अशाप्रकारे जगातील अनेकेश्वरवादी लोकांनी अल्लाहची भ्रामक वंशावळ निर्माण केली. नंतर देवीदेवतांची एक पूर्ण वंशावळ आपल्या मनानेच तयार करून टाकली.

औरंगाबाद (प्रतिनिधी)
जमाअत ए इस्लामी हिंद तर्फे देशभरात दरवर्षी रमज़ान व ईदनंतर समाजात जातीय सलोखा कायम राखण्याकरिता ईद मिलन कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यात सर्व धर्म, जात व सांप्रदायाचे लोकं एकत्रित येऊन शिरखुम्र्याचा आस्वाद घेतात, सोबतच वैचारिक मेजवाणीही असते. परंतु यंदा कोरोना, लॉकडाऊनमुळे ते शक्य नव्हतं. म्हणून जमाअत ए इस्लामी हिंद, महाराष्ट्र प्रदेशच्या संदेश विभागातर्फे रविवार 14 जून रोजी सायंकाळी 6 ते 7 दरम्यान https://www.Youtube. com/JIHMaharashtra/ तसेच https://www.facebook.com/JIHMaharashtra/ या जमाअतच्या फेसबूक पेजवर ऑनलाइन ईदमिलन कार्यक्रम लाइव्ह वसा वढलस. या लाइव्ह ईद मिलन कार्यक्रमात प्रसिद्ध सप्तखंजेरीवादक किर्तनकार माननीय सत्यपालजी महाराज, शिख समाजातील विचारवंत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय सुरजीतसिंहजी खुंगर, मेत्ता सामग्गीचे संस्थापक व आंतरराष्ट्रीय बौद्ध प्रशिक्षक माननीय भिक्खु अभय पूत्रजी आणि इस्लाम अभ्यासक तसेच जमाअतच्या महाराष्ट्र प्रदेश संदेश विभाग समितीचे सदस्य प्रा. वाजेद अली खान यांनी त्यात आपले ऑनलाईन विचार मांडले आहेत. सर्वांचा अल्लाह एक आणि फक्त एकच असून त्याचेच सगळे बंदे असल्याची सर्व शिख गुरूंची शिकवण असल्याची यावेळी माहिती सुरजितसिंहजी यांनी दिली आहे. कोरोना संकटात अनेक ठिकाणी मुसलमानाचे अंतिम संस्कार हिंदूंनी तर हिंदूंचे अंत्य संस्कार मुसलमानांनी केले आहे. अशाप्रकारे मिळून मिसळून बंदुभावानंच सर्वांनी राहावं, असाच या ईद मिलनाचा संदेश आहे, असे विचार यावेळी सत्यपाल महाराजांनी मांडले. तसेच दुसर्यांचं दु:ख समजून घेणारीच व्यक्ती मोठी असल्याचं प्रतिपादन भिक्खु अभयपुत्रजींनी मांडले.
    अध्यक्षीय समारोप करतांना रमज़ानचा संबंध कुरआनाशी असून ही सृष्टी निर्मीती आहे आणि त्याच्या एकमेव निर्मात्याला ओळखणं महत्वाचं आहे, त्याने पाठविलेले सर्व प्रेषित, त्या प्रेषितांद्वारे समस्त मानवजातीकरिता पाठवलेले मार्गदर्शन स्वीकारणे लौकिक व पारलौकिक जीवनात कसे आवश्यक आहे, ते सविस्तरपणे प्रा. वाजेद अली खान यांनी यावेळी विषद केले.
‘देहसे दूरी’ असली तरीही दुरावा मात्र राहू नये, वैचारिक मंथन होऊन गैरसमजुती दूर व्हाव्यात आणि सामाजिक सद्भाव कायम राहावा, या उदात्त हेतूने मराठी भाषेत लाईव्ह होणार्‍या या ऑनलाईन  कार्यक्रमाला नेटकर्‍यांनी तसेच सर्वच स्तरातील नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि अजुनही फेसबूक पेज व यु ट्युबवर सदर कार्यक्रमाच्या व्हिडिओवरील हिट्स दिवसेंदिवस वाढतच आहेत. बातमी लिहेपर्यंत ही संख्या 3139 झालेली आहे. लॉकडाऊनमध्ये ‘मेडिकल डिस्टन्स’ ठेवत असतांनाही सामाजिक प्रबोधनाचं कार्य मात्र पूर्ववत चालू राहू शकते आणि धर्मस्थळ बंद असले तरी विविध धर्मांचे धर्मगुरू वैचारिकदृष्ट्या ऑनलाईन एकत्र येऊ शकतात हेच या कार्यक्रमावरून सिद्ध झालं आहे. जमाअतच्या संदेश विभागाचे यासाठी सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. सुत्रसंचालन पत्रकार नौशाद उस्मान यांनी केले. साजीद शेख, अनवर खान तसेच खुर्रम सय्यद यांनी तांत्रिक सहकार्य केले.

आम्ही राजनाथ सिहांचे फार फार आभारी आहोत. गेले कित्येक दिवस घरात बसून टीव्हीवरच्या त्याच त्या करोनाच्या बातम्या, त्याच त्या रटाळ मालिका पाहून नुसता वैताग आला होता. नाही म्हणायला अधूनमधून कधी टाळ्या वाजव, थाळ्या वाजव तर कधी दिवे लाव असे काही विरंगुळ्याचे क्षण आमच्या परमप्रिय नमोजींंमुळे वाट्याला आले. अधूनमधून बांद्रे निवासी हिंदू हृदयसम्राट क्र. दोन उधोजीराजे दूरदर्शनच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवरून दर्शन देत होते, धीर देत होते म्हणून बरे, नाहीतर सगळेच कसे कंटाळवाणे होऊन बसले होते. या कंटाळ्यातून बाहेर पडण्यासाठी एखादी सर्कस पाहून यावी असे कधीपासून मनात येत होते, पण आपली ही ' मन की बात' सांगणार तरी कोणाला आणि ती ऐकणार तरी कोण? आपली 'मन की बात' बळजबरीने कोणालाही ऐकविण्यासाठी आपण काय - - -? जाऊ द्या. फार तपास केला. सगळ्या ई- पेपरमधल्या जाहिराती पाहिल्या, गुगल करून पाहिले, मित्रांना विचारून पाहिले, पण कुठेच काही कळेना. आता कोणाला विचारावे, कुठे तपास करावा काहीच सुचेना. आता आपली सर्कस पाहण्याची इच्छा पूर्ण होण्याआधीच आपल्याला करोना ग्रासतो की काय या भावनेने मन अंधारून आले. हळूहळू आपले मानसिक संतुलन बिघडते की काय अशी भीती वाटू लागली. असे झाले तर  या
मनोविकृतीशी 'सामना' करण्यासाठी एखादया वर्तमानपत्राचे संपादक बनून, अग्रलेखातून गरळ ओकून ' कॅथरसिस' करून घ्यावे की काय असे विचारही मनात येऊ लागले ; आणि अचानक राजनाथ सिंह आमच्या मदतीला धावून आले. त्यांच्या श्रीमुखातुनच आम्हाला कळले की महाराष्ट्रात सरकार नाही तर सर्कस सुरू आहे! याला म्हणतात, ‘काखेत कळसा आणि गावाला वळसा!' म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून चक्क आपल्या मुंबापुरीतच सर्कस सुरू आहे आणि त्याचा आम्हाला पत्ताच लागू नये? आम्हालाच काय पण कुठल्याही वर्तमानपत्राला, कुठल्याही वाहिनीला याचा पत्ता लागू नये? ही बातमी कोणीच छापू नये, कोणीच दाखवू नये? सत्तेच्या खुर्चीने एखाद्याचा स्वाभिमान गिळंकृत करावा तशी महाराष्ट्रातली शोध पत्रकारिता ‘पाकीट संस्कृती'ने गिळंकृत केली की काय? सरकारच्या जागी चक्क सर्कस चालवली जातेय? म्हणजे ‘वरून कीर्तन आतून तमाशा!'? नक्कीच ही गोष्ट राज्यपाल महोदयांनी दिल्लीला कळविली असावी, नाहीतर राजनाथ सिहांना ही गोष्ट कशी कळली?आता खुद्द राजनाथ सिहांनीच सांगितल्यामुळे विश्वास तर ठेवावाच लागणार होता, पण कोणातरी जाणकाराकडून खात्री करून घ्यावी आणि नंतरच सर्कस पाहण्यास जावे असे वाटत होते म्हणून मग एखादा ‘जाणता' शोधत असतांनाच दस्तुरखुद्द बारामतीकर साहेबांनीच घोषणा केली की, ‘आमच्या सर्कशीत सर्व प्रकारचे प्राणी आहेत, फक्त विदूषकाची कमतरता आहे.'! झाले! महाराष्ट्रात सर्कस सुरू आहे हे पक्के झाले! आमच्या मनातला साहेबांबद्दलचा आदर दुणावला. आतापर्यंत आम्ही समजत होतो की साहेबांनी महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आणून सरकार बनविले. दगडाला शेंदूर फासला! आता साहेबांनीच सांगितल्यावर कळले की साहेबांनी तीन अभयारण्यातले प्राणी एकत्र करून महाराष्ट्रात सर्कस सुरू केली आहे. शिवाय हेही कळले की या सर्कशीत सर्व प्रकारचे प्राणी आहेत, पण विदूषकाची मात्र कमतरता आहे. आता
विदूषकाशिवाय सर्कस म्हणजे बिन दुधाचा, बिन साखरेचा चहाच की! बेचव! त्यातही म्हणे वाघोबांनाच ‘रिंगमास्टर' बनवल्यामुळे आणि या ‘रिंगमास्टर'चा ‘रिंगमास्टर' बाहेरून याला नाचवतो हे माहीत असल्यामुळे सर्कशीतले काही प्राणी त्याला अजिबात जुमानत नाहीत.
सर्कशीच्या इतिहासात पहिल्यांदाच काही
गाढवांचाही सर्कशीत समावेश करण्यात आला आहे. एकंदरीत बारामतीकर साहेबांनी सुरू केलेली ही सर्कस पाहण्यात आम्हाला काही रस नाही. त्यापेक्षा युट्युबवर ‘काळू बाळूचा तमाशा' पाहिलेला काय वाईट? आता ही सर्कस
चालविण्यात बारामतीकर साहेबांना किती दिवस रस राहतो ते पहावयाचे!
जाता जाता - या सर्कशीतल्या काही प्राण्यांचा एक गट नाराज असून, आमच्या खेळांना सर्कशीत दुय्यम स्थान दिले जाते असे त्यांचे म्हणणे असून ते सर्कसमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत असे कळते. असे झाल्यास, बारामतीकर साहेबांची इच्छा असो की नसो, सर्कस गुंडाळली जाणार हे नक्की!

-मुकुंद परदेशी, मुक्त लेखक
भ्रमणध्वनी क्र. ७८७५०७७७२८

भारत रणनीतिक व मुत्सद्दी स्वातंत्र्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदाय, विशेषत: शेजारी राष्ट्रांमध्ये इतका दुरावलेला आणि जखडलेला पूर्वी कधीच नव्हता जितका मोदीजींच्या कार्यकाळात आपणास दिसून येतो. हीच परिस्थिती नेपाळबाबतही बनली आहे. तोदेखील भारताकडे डोळे वठारून पाहू लागला आहे. नेपाळने संसदेत ठराव संमत करून भारताच्या प्रादेशिक अखंडतेला उघडपणे आव्हान दिले आहे. भारत-चीन सीमेवर अशीच परिस्थिती दोन वर्षांपूर्वी डोकलाम पठारावरही उद्भवली होती. भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमारेषा ज्या ठिकाणी परस्परांना खेटतात त्या ठिकाणी असलेल्या डोकलाम पठारावर चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) हक्क सांगितला होता. लडाख क्षेत्रात भारत आणि चीन या दोन्ही देशांचे सैन्य परस्परांसमोर उभे ठाकले आहे. सीमेवरील तणावावर सरकारने आजच्या सर्वपक्षीय बैठकीची घोषणा करून आपले मौन सोडले. सुमारे १२,००० चिनी सैन्य सुमारे ६० किमी अंतरावर भारतात घुसले आहेत. सरकार हे नाकारत नसल्याने लोकांना त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल. या अशांत परिस्थिती दरम्यान, दिल्ली आणि मेरठ दरम्यान साडेतीन किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्याचे वंâत्राट चीनला देणे हा चीनबाबत संघ परिवारच्या मोठ्या संभ्रमाचा जिवंत पुरावा आहे. एकीकडे स्वदेशी जागरण व्यासपीठाने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची घोषणाबाजी केली आणि दुसरीकडे चीनी कंपनी शांघाय बोगदा अभियांत्रिकी महामंडळाला १२,०१६ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले. निविदा सादर केलेल्या सात जणांपैकी चार भारतीय कंपन्या असल्याने या कामांमध्ये भारतीय कंपन्या कुशल नसल्याचेही स्पष्ट होते. चिनी बोगदा कॉर्पोरेशन आणि अंबानीच्या एल अँड टी मधील फरक फक्त २० दशलक्ष होता. या व्यतिरिक्त टाटा प्रोजेक्ट्स आणि अफकॉनही स्पर्धेत होते. भारत सरकारकडील अधिकृत आकडेवारीनुसार २०१५ आणि २०१९ या दरम्यान पँगाँग सरोवर परिसरात चिनी सैन्याकडून असंख्य वेळा भारतीय हद्दीत घुसखोरीचे प्रकार घडले. अंदाजे १००० वेळा तरी चिनी सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून या भागात घुसल्याचे स्पष्ट झाले आहे. याच ठिकाणी चीनने सर्वाधिक वेळा घुसखोरी केली आहे. २०११ व नंतर २०१३ मध्ये त्यांनी जरा जास्त वेळ तळ ठोकून येथील ‘जैसे थे’ परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. सप्टेंबर, २०१४ मध्ये पीएलएच्या शेकडो जवानांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडत चुमार खो-यापर्यंत घुसखोरी केली. २०१५ मध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीक चीनच्या बाजून बांधण्यात येत असलेल्या टेहळणी बुरुजावर भारताने आक्षेप घेतला आणि त्यावरून दोन्ही सैन्यांमध्ये तणाव निर्माण झाला. लडाखमध्ये सध्या निर्माण झालेला तणाव आणि आधीचे तणाव यांच्यात बरेचसे साधम्र्य आहे, जे शांततेने सोडविण्यात उभय बाजूंना यश आले. २०१९ मध्ये चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडून तब्बल ६६० वेळा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे उल्लंघन झाले. २०१८ आणि समकालीन नोंदींच्या तुलनेत हे प्रमाण ५० टक्क्यांनी जास्त आहे. (प्रत्यक्ष नियंत्रणे रेषेचे हवाई उल्लंघनाचे प्रमाणही वाढले आहे. २०१७ मध्ये हे प्रमाण ४७ होते ते आता २०१९ मध्ये १०८ झाले आहे.) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरचा सर्वात मोठा तणाव उभय देशांमध्ये समदोरोंग चु येथे १९८७ मध्ये निर्माण झाला होता. चीनने दक्षिण चीन समुद्र परिसरात मलेशिया आणि व्हिएतनाम यांच्याशी भांडण उकरून काढले, तैवानला धमकावले, हाँगकाँगची स्वायत्तता रद्दबातल ठरवली, जपानच्या मच्छिमार बोटींचा पाठलाग केला, अमेरिकेशी वाद घातला आणि आता प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताला धमकावत आहे. भारतीय बाजारपेठेत चीनच्या गुंतवणुकीला लगाम घालण्याच्या भारताच्या हालचाली, भारतात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होण्याला चीनच कारणीभूत ठरविण्यात यावे यासाठी केला जात असलेला आग्रह, अमेरिकेशी भारताची वाढत चाललेली सलगी आणि ऑगस्ट, २०१९ मध्ये भारत सरकारने काढून घेतलेला काश्मीरचा राज्यदर्जा इत्यादी बाबींमुळे चीनचा तीळपापड झाला असावा असा काही तज्ज्ञांचा होरा आहे. आखाती देशांशीही भारताचे दीर्घकालीन संबंध आहेत. गुजरात दंगलींत नरेंद्र मोदींची भूमिका माहीत असूनही सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात झाले आणि सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. दिल्लीतील दंगली आणि पोलिसांच्या एकतर्फी कारवाया तसेच तेथील हिंदुत्ववादी लोकांनी फेसबूक आणि ट्यूटरवर अशी विधाने टाकली जेणेकरून तेथील सरकारांनी भारत सरकारवर नाराजी व्यक्त केली. एका वर्षापूर्वीचे संबंध आता सौहार्दपूर्ण राहिलेले नाहीत. सरकारने अजूनही आपला सांप्रस्रfयक अजेंडा बदलण्याची गरज आहे अन्यथा आपल्या देशाची आंतरराष्ट्रीय समुदायात नाचक्की होण्याची शक्यता आहे. ज्याचे आर्थिक, राजकीय आणि सामरिक मूल्य अतिशय महत्त्वाचे आहे. संघाला सत्तेचे व्यसन आणि त्यांचा अहंकार देशाला फारचत्रासदायक ठरू शकतो. चीनसारख्या राष्ट्रांच्या अरेरावीला भीक न घालता भारताला आपले परराष्ट्र धोरण सौहार्दपूर्ण करण्याची हीच वेळ आहे.

-शाहजहान मगदुम
मो.:८९७६५३३४०४

Hang
प्रत्येक व्यक्ती स्वतःवर आणि समस्त निसर्गावर विचारमंथन करीत नाही तोपर्यंत त्याला सत्यमार्ग सापडणे कठीण आहे. या मंथनातून त्याला का जगावे, कोणासाठी  जगावे की अनंत अडचणीतून मुक्त होण्यासाठी आत्महत्या करावी की करू नये, या प्रश्नाची उत्तरे मिळतात. ईश्वर प्रत्येकाला झेपेल एवढेच ओझे त्याच्यावर लादतो. कोणावरही अधिकचे ओझे टाकत नाही. तसेच मनुष्य स्वतःच्या चुकांमुळे अडचणीत येतो. मात्र तो याची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतो. त्याला सतत असे वाटते की, परिस्थिती त्याच्या नियंत्रणात आहे, पण प्रत्यक्षात परिस्थितीवर नियंत्रण अल्लाहचे असते. त्यामुळे परिस्थिती कधीही बदलू शकते. म्हणून परिस्थिती अनुकूल असो का प्रतिकूल असो अल्लाहवर विश्वास ठेऊन जीवन जगल्यास आत्महत्येपर्यंत जाण्याची गरजच भासत नाही.
खरे तर प्रत्येक मनुष्य हा खलीफा आहे. त्याला अश्रफुल मख्लुकात म्हटले जाते. म्हणजेच सर्वश्रेष्ठ जीव. मात्र तो स्वतःला ओळखण्यात गफलत करतो. तो ईशमार्गाचा अवलंब आपल्या जीवनात करण्याला प्राधान्य देत नाही. ईश्वराच्या मार्गदर्शनाला त्याच्या नियमांना आणि त्याच्या निर्मितीचा योग्य फायदा घेत नाही. तो थोडयाश्या सुखासाठी मोठे गुन्हे करून बसतो. आपल्या चुका सुधारून सत्मार्गाचा अवलंब करण्याकडे डोळेझाक करतो. जो व्यक्ती सत्याचा मार्ग अवलंबवितो तो सत्यात मग्न होतो. त्याचा प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोण हा सकारात्मक असतो. वाईट मार्गात जरी त्याला भरपूर फायदा मिळत असला तरी त्याला तो स्वैच्छेने तिलांजली देतो आणि समाधानी राहतो. अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीतही तो आपले पाय डगमगू देत नाही. त्या व्यक्तीला निश्चित सत्यमार्ग सापडतो तो ईश्वराच्या सांगितलेल्या मार्गावर चालण्यास प्रवृत्त होतो आणि ऐहिक आणि पारलौकिक जीवनातही यशस्वी ठरतो. मात्र एखाद्याला त्याच्या सद्सद्विवेकबुद्धीने वारंवार सत्याचा मार्ग लक्षात आणून देखील तो व्यक्ती जर थोड्याशा लाभासाठी, थोड्याशा सुखासाठी असत्य मार्ग स्वीकारत असेल तर त्याला त्यामध्ये गुरफटविले जाते. तो इतका त्या असत्य मार्गात तल्लीन होऊन जातो की, त्याला आपला गुन्हा, गुन्हा दिसत नाही तर ते त्याच्या जगण्याचे अंग बनते. आणि त्याला हा मार्ग आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलायला भाग पाडते. त्याला हे करताना जराही मागच्या पुढच्या जबाबदारीचे भान राहत नाही. मात्र असे नाही की प्रत्येक आत्महत्या करणारा व्यक्ती स्वतःच्या चुकामुळेच आत्महत्या करतो कधी-कधी दुसऱ्याकडून होणाऱ्या विनाकारण त्रासाला कंटाळूनही आत्महत्या करतो. मात्र अशा व्यक्तींना धैर्याने काम करायला हवे.
खरे तर मनुष्याने स्वतःच्या अस्तित्वावर विचारमंथन करायला सुरूवात केली तर तो निश्चितच स्वतःमध्ये अमुलाग्र बदल करून ईश्वरीय मार्गाचा अवलंब करू शकतो. मनुष्याची निर्मिती, निर्मितीनंतर त्याला जे नातलग, समाज आणि निसर्गाचे सानिध्य मिळते ते त्याच्या इच्छेनुसार कमी आणि ईश्वरीय इच्छेनुसार जास्त असते. ईश्वराने त्याला काय हवे यापेक्षा त्याच्या फायद्याचे काय आहे हे देऊन टाकलेले असते किंबहुना त्याच्यासमोर ठेवलेले असते. त्याला जन्म देऊन सोडलेले नसते तर त्याला मार्गदर्शन मिळावे म्हणून ईश्वर, पैगंबर, संत, महात्म्यांचे मार्गदर्शन त्याच्यासमोर असते. फक्त त्याला स्वतःच्या पोटाची खळगी भरण्याएवढे परिश्रम करावे लागते. या परिश्रमात त्याला सत्याच्या कसोटीवर उतरावे लागते. त्याला काही अधिकार बहाल केलेले असतात. या बहाल केलेल्या अधिकारात जर तो सत्मार्गाने चालला तर त्याच्या नशीबात जे काही लिहिले आहे ते त्याला मिळते, एवढे मात्र नक्की. मात्र जर तो मनुष्य त्याला दिलेल्या अधिकाराचा मनमानी पद्धतीने वापर करत गेला तर त्याचा सगळा दोष त्याच्यावर येतो. त्यामुळे प्रत्येकजण जे जीवन जगत असतो त्यासाठी तो स्वतःच जबाबदार असतो. कारण प्रत्येकाला विशेषाधिकारासोबत ईश्वरीय मार्गदर्शन आत्मसात करण्याचा अधिकार आहे.
जन्म आणि मार्ग...
कितीही मोठा व्यक्ती या एखाद्या श्रीमंत कुटुंबात जन्मास आला आणि कितीही गरीब व्यक्ती एखाद्या गरीब घरात जन्मास आला तरी त्या दोघांची जी निर्मितीची प्रक्रिया आहे ती सारखीच आहे. त्या दोघांच्या निर्मितीमध्ये ईश्वरीय आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून काहीच फरक नसतो. त्यांच्या सवयी वेगळ्या असतात, त्यांची पसंद ना पसंद वेगळी असते. मात्र त्या दोघांच्या वाढीसाठी मुलभूत जीवनावश्क वस्तू ह्या सारख्याच असतात. क्वचितच अपवादात्मक फरक असतो. मात्र त्या दोघांची जसजशी वाढ होते. त्यांच्या मेंदूवर कोरले जाणारे जे विचार असतात आणि तो जो समाज बघतो त्यातून त्याची पुढील जडणघडण ठरते. मात्र दोघांना समाजात वाईट आणि चांगल्या दोन्ही गोष्टी पहावयास मिळतात. त्यासाठीच ईश्वराने प्रत्येकाला एक विवेक दिलेला आहे की तो चांगल्या आणि वाईटातील फरक त्याचा मनाला दाखवून देतो. यामधील जो सत्य मार्गाचा अवलंब करतो भविष्यात तोच नावारूपाला येतो आणि आपली एक ओळख निर्माण करतो. त्याच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टीकोण बदलतो. सत्यमार्गावर चालताना कधी-कधी अतीवाईट गोष्टींचा सामनाही करावा लागतो. मात्र यावेळी जो धैर्याने त्या गोष्टींचा सामना करतो तोच यशस्वी ठरतो. जो व्यक्ती सत्य मार्गावर चालतो तो कधीच एकटा नसतो तर त्यासोबत ईश्वराची कृपा असते. त्यामुळे तो कितीही मोठे संकट आले तरी लिलया त्यामधून बाहेर पडतो. असत्याच्या मार्गावर कित्येक लोकांना मोठे होताना आपण पाहतो. ते गुन्हे करतात, लोकांना त्रास देतात तरी त्यांचे नुकसान होत नसल्याचे आपणाला दिसून येते. मात्र त्या लोकांचे अनंतकालीन नुकसान होत राहते. त्यांच्या हातून ज्या लोकांवर अत्याचार होतो त्या पीडितांना ऐहिक जीवनात न्याय नाही मिळाला तरी ईश्वराच्या दरबारात त्यांना निश्चित न्याय मिळणार आहे आणि त्या गुन्हेगाराला शिक्षा होणार आहे, यासाठीच तर आखिरत (मरणोप्परांत जीवन) आहे.

- बशीर शेख (उपसंपादक)

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget