Halloween Costume ideas 2015
Latest Post

औरंगाबाद (सलीम खान यांजकडून)
मराठी भाषेत इस्लामी साहित्यनिर्मितीच्या कार्यात जमाअत-ए-इस्लामी हिंदने मोलाची भूमिका पार पाडली आहे, असे प्रतिपादन जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष तौफीक अस्लम खान यांनी केले. येथील नेहरू भवनमध्ये रविवार, दिनांक ०३ डिसेंबर २०१७ रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
   
    कार्यक्रमाच्या सुरूवातीला कुरआन पठण करीत असताना प्रा वाजिदअली खान म्हणाले की इस्लामच्या संदेशाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार करूनच आपापसातील भेदभाव, दुरावा आणि आपापसातील गैरसमजुती दूर केल्या जाऊ शकतात. मुस्लिम समुदायासाठी हे कार्य काही नवीन नाही. कितीतरी प्रेषित आणि महापुरूषांनी या कार्यात स्वत:ला झोकून दिल्याची उदाहरणे आम्ही पाहू शकतो.
सदर मोहिमेचा अर्थ आणि पाश्र्वभूमी समजावून सांगताना जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्र सल्लागार समितीचे सदस्य इलियास खान फलाही म्हणाले की आज आम्ही शांती, प्रगती आणि मुक्ती या संकल्पनांचा संबंध केवळ काही मर्यादित भौतिक सुखापुरताच समजून घेतला आहे. परिणामस्वरूप एवढी भौतिक प्रगती करूनदेखील आज मानवता बेचैन आहे. कसल्याही प्रकारची जगात शांतता दिसून येत नाही. सर्वत्र अराजकता पसरलेली आहे. जोपर्यंत मनुष्याला शांती, प्रगती आणि मुक्ती या संकल्पनांची खरी ओळख होणार नाही तोपर्यंत मानवतेच्या समस्यांचे निराकरण शक्य नाही. मानवतेची ही गरज लक्षात घेऊनच जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रच्या वतीने ‘शांती, प्रगती आणि मुक्तीसाठी इस्लाम’ ही मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असल्याचे इलियास फलाही म्हणाले. ते पुढे म्हणाले की मुळात इस्लामचा अर्थच कल्याण, शांती, अनुकंपा आणि मुक्ती असा होतो. जे काही आदेश इस्लाम धर्माने दिले आहेत त्यात मानवाचे कल्याणच अंतर्भूत असून सर्व प्रकारच्या जोखडातून आणि कर्मकांडातून त्याला मुक्त करणे हाच इस्लामचा उद्देश आहे. खान पुढे म्हणाले की या जगातील जीवन मनूष्यासाठी परीक्षागृह आहे. या जीवनातील भल्यावाईट गोष्टींबद्दल त्याला पारलौकिक जीवनात जाब द्यावा लागणार आहे. मनुष्याची कर्मे जर उत्तम असतील तर त्याचा निर्माता ईश्वर प्रसन्न होईल आणि त्याच्या प्रसन्नतेतच खरी मुक्ती आहे. सदर मोहिमेची रूपरेषा स्पष्ट करताना दावत विभागाचे सचिव शेख इम्तियाज म्हणाले की इस्लामच्या शांततेविषयीच्या दृष्टिकोनाशी लोकांना अवगत करणे हाच या मोहिमेचा उद्देश आहे. ते म्हणाले की शांततेचा अर्थ मानसिक आणि आत्मिक शांतता आहे. ते पुढे म्हणाले की या मोहिमेअंतर्गत पत्रकार परिषदा, चर्चासत्रे, पिंरसवाद, कारागृहांमध्ये आणि वसतिगृहांमधे, शैक्षणिक संस्थांमध्ये, वस्त्यांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. तसेच मोठ्या प्रमाणावर साहित्य वितरणदेखील करण्यात येईल. सर्वच जातिधर्मातील धर्मगुरूंच्या भेटी घेऊन त्यांचेही या मोहिमेत योगदान घेतले जाईल.
    यानंतर फॉलोअप या विषयावर मार्गदर्शन करताना दावत विभागाचे सदस्य अब्दुल वाजेद कादरी म्हणाले की कुठल्याही कार्याचे यश हे त्याच्या उत्कृष्ट नियोजनावर अवलंबून असते. त्यानंतर सल्लागार समितीचे सदस्य सय्यद ज़मीर कादरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित चर्चासत्रात वाजेदअली खान, डॉ. इम्रान अहमद खान, सय्यद शफीक हाश्मी, अब्दुल मूजीब, प्रा. मुहंमद नवीद विजापुरी, डॉ. सय्यद साजिद, मुमताज खान, फहिमुन्निसा बाजी इत्यादींनी भाग घेतला.
    या प्रसंगी औरंगाबाद, जालना, बीड आणि अहमदनगर विभागातील मोठ्या प्रमाणावर महिला व पुरूष कार्यकर्ते, स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया (एस आय ओ), युथ विंग, मूव्हमेंट फॉर पीस अँड जस्टिस (एम पी जे) च्या युवक कार्यकर्त्यांसोबतच गर्ल्स इस्लामिक ऑर्गनायझेशन (जी आय ओ) च्या तरूणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शेवटी तौफीक अस्लम खान यांच्या दुआ (प्रार्थने) ने कार्यक्रमाची सांगता झाली.
जमाअते इस्लामी हिंद च्या वतीने येत्या १२ ते २१ जानेवारी २०१८ दरम्यान ‘शांती, प्रगती आणि मुक्ती’साठी इस्लाम’ मोहीम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सदर मोहिमेची रूपरेषा समजून घेण्याच्या उद्देशाने येथील नेहरू भवनमध्ये आयोजित ‘मोहीम समीक्षा शिबिरा’त अध्यक्षीय भाषण करीत असताना तौफीक अस्लम खान म्हणाले की, इस्लाम धर्माच्या शिकवणीबाबत इतर धर्मियांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरसमज शिल्लक राहू नये तसेच त्यांनादेखील इस्लाम धर्माच्या शिकवणीला जवळून जाणून घेता यावे या उद्देशाने आज मोठ्या प्रमाणावर इस्लामी साहित्याचे मराठी भाषेत भाषांतर केले गेले आहे. या कार्यामध्ये जमाअत-ए-इस्लामी हिंदने मोलाची भूमिका पार पाडली आहे. या पुढेही जमाअतच्या वतीने मुबलक साहित्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे खान म्हणाले.

माननीय अबू बकर सिद्दीक (रजि.) यांनी ‘सूरह निसा’च्या ज्या आयतचा संदर्भ दिला आहे त्यापूर्वी अल्लाहने सांगितले आहे, ‘‘तुमच्यापूर्वी बनीइस्राईलना आम्ही आपली ठेव सोपविली होती, परंतु त्यांनी त्यात अफरातफर व बेईमानी केल्यामुळे अल्लाहचा कोप त्यांच्यावर कोसळला. जनसमुदायाच्या नेतृत्वाचा अधिकार त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आला आणि त्या काळात अनेकेश्वरत्वाचा अवलंब करणाऱ्यांची गुलामी त्यांच्या वाट्याला आली. आता तुम्हाला त्यांची जागा दिली जात आहे. तुम्हाला तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आणि मोठी शासनव्यवस्था देण्यात आली आहे. खबरदार! बनीइस्राईलसारखी अफरातफर आणि बेईमानी करू नका. आम्ही ज्यांना तौरात दिला होता त्यांना उपदेश केला होता की अवज्ञा करू नका, दिलेले वचन पाळा, ग्रंथाशी अप्रामाणिकपणा करू नका, परंतु त्यांनी कृतघ्नता, बेईमानी व बंडखोरीचा मार्ग अवलंबिला त्यामुळे त्यांना वाईट परिणाम भोगावे लागले, आणि आता तुम्हाला (हे मुहम्मदचा जनसमुदाय) तुम्हाला उपदेश करीत आहोत की ईशपरायणतेच्या मार्गाचा अवलंब करा, वचनभंग करू नका, कुरआनचा मार्ग सोडून आमच्या कोपाला आमंत्रण देऊ नका.’’ आणि त्यानंतर असा उपदेश देण्यात आला की ‘‘हे ईमानधारकांनो! न्याय व निवाड्याच्या या ईशव्यवस्थेचे कोणत्याही परिस्थितीत रक्षण करा.’’
    हाच विषय शब्दांच्या थोड्याफार फरकासह ‘सूरह माइदा’ मध्येदेखील पुन्हा एकदा सांगितला गेला आहे. ‘सूरह माइदा’ अंतिम आदेशात्मक सूरह आहे. यात कायदा पूर्ण करण्यात आला आहे. यानंतर कोणताही आदेशात्मक सूरह अवतरित झाला नाही. हा सूरह अरफातमध्ये अवतरित झाला. याचे वर्णन असे आहे की जणू सरतेशेवटी जनसमुदायाकडून या मैदानात वचन घेतला जात आहे की ‘‘पाहा, ईशदेणगी पूर्ण करण्यात आली आहे. एक मोठी शासनव्यवस्था तुमच्या सुपूर्द करण्यात आली आहे. आता तुमचे कर्तव्य आहे की आम्हाला दिलेल्या वचनावर दृढ राहा अन्यथा लक्षात ठेवा, बनीइस्राईलचा इतिहास तुमच्या समोर आहे. त्यांनी वचनभंग केले तेव्हा कसे अपमानित व बदनाम झाले.’’
    ही आहे धर्मव्यवस्था आणि तिचा आदर, किमंत व महत्त्वावर दु:ख वाटते की मुस्लिम जनसमुदायाने ही व्यवस्था हातची जाऊ दिली आणि वाईट या गोष्टीचे वाटते की हा जनसमुदाय गाढ झोपेत आहे–
‘‘वाए नाकामी मता-ए-कारवाँ जाता रहा, कारवाँ के दिल से एहसास-ए-जियाँ जाता रहा.’’
जमाअत बनविणे
    माननीय अबू सईद खुदरी (रजि.) यांच्या कथनानुसार,
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जर तीन मनुष्य प्रवासाला निघाले तर त्यांनी आपल्यापैकी एकाला ‘अमीर’ (नेता) बनवावे.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : इस्लामी धर्मगुरू इब्ने तैमिया (रह.) म्हणतात की प्रवासादरम्यान लोकांवर जमाअत (गट, समुदाय, संघटना) बनविणे अनिवार्य करण्यात आले आहे त्यामुळे ही गोष्ट आणखीनच आवश्यक आहे की ईमानधारकांनी एक ‘जमाअत’ बनवावी, कारण त्यांची जमाअती व्यवस्था बिघडली आहे. मुस्लिमांनांसाठी एकट्याने जीवन व्यतीत करणे निषिद्ध आहे.
    माननीय अब्दुल्लाह बिन अमर बिन अल-आस (रजि.) यांच्या कथनानुसार,
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जंगलात राहणारे तीन माणसांनी एकेकटे राहणे अवैध आहे. त्यांनी आपल्यापैकी एकाला आपला ‘अमीर’ (नेता) बनवावा.’’ (हदीस : मुन्तका)
    माननीय मुआज बिन जबल (रजि.) यांच्या कथनानुसार,
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘ज्याप्रमाणे शेळ्या-मेंढ्यांचा शत्रू कोल्हा आहे आणि आपल्या कळपातून वेगळी होणाऱ्या शेळ्यांची तो सहजतेने शिकार करतो, त्याचप्रमाणे शैतान मानवाचा कोल्हा आहे. जर लोक जमाअत बनवून राहिले नाहीत तर तो त्यांना एकेकाला गाठून त्यांची सहजतेने शिकार करतो.’’ (हदीस : मुस्नद अहमद, मिश्कात)
स्पष्टीकरण : ‘‘हे लोकहो! एकएकटे राहू नका, तुमच्यासाठी आवश्यक आहे की जमाअत व सामान्य मुस्लिमांसह वास्तव्य करा.’’
    ‘‘जमाअतसह राहा’’ हा त्यावेळचा आदेश आहे जेव्हा मुस्लिमांची ‘अल-जमाअत’ अस्तित्वात असेल आणि अस्तित्वात नसेल तर काय? हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि त्याचे सरळ व साधे उत्तर म्हणजे जमाअत बनवा जेणेकरून ‘अल-जमाअत’ अस्तित्वात यावी.

(२५५) असा कोण आहे जो त्याच्या पुढे त्याच्या परवानगीशिवाय शिफारस करू शकेल?२८१ जे काही दासांच्या समक्ष आहे, त्यालाही तो जाणतो आणि जे काही त्यांच्यापासून अदृश्य आहे त्यालाही तो जाणतो आणि त्याच्या माहितीपैकी कोणतीही गोष्ट त्यांच्या बुद्धिकक्षेत येऊ शकत नाही.
281) येथे अनेकेश्वरावादींच्‌या त्या विचारांचे खंडन करण्यात आले आहे जे बुजुर्ग मनुष्यांविषयी, ईशदूतांविषयी किंवा दुसऱ्या शक्तीविषयी गुमान राखतात की अल्लाहच्‌या जवळ यांचे खूप वजन आहे. ते अडून बसले तर अल्लाहकडून मान्य करूनच घेतात. तसेच जे काम इच्छितात त्याला अल्लाहकडून करूनच घेतात. त्यांना सांगितले जाते की जोर लावणे तर दूरचे एखादा पैगंबर किंवा जवळचा ईशदूतसुद्धा आकाशांच्या व जमिनीच्या या बादशाहाच्या दरबारात विना परवानगी तोंड उघडण्याचे साहस करू शकत नाही.

एम.आर.शेख - 9764000737
इस्लामचे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांची सगळ्यात चांगली स्तुती शेख सादी रहे. यांनी केलेली आहे. ते म्हणतात,“बाद अज ख़ुदा बुजूर्ग तू ही ़िकस्सा मुख्तसर” दूसरे विख्यात शायर डॉ. अल्लामा इक्बाल यांनी म्हटलेले आहे, “वो दाना-ए-सुबल, खत्म-ए-रसूल, मौला-ए-कुल, जिसने गुबार-ए-राह को बख्शा, फरोग-ए- वादी-ए-सिना, निगाह-ए-इश्क - व - मस्ती में वही अव्वल वही आखिर, वही कुरआँ वही फुरकाँ, वही यासीन वही ताहा. यांच्याशिवाय, तकल्लूफ बदायुनी म्हणतात, “रूख-ए-मुस्तफा है वो आयीना, के अब ऐसा दूसरा आयीना, हमारे चश्म-ए-खयाल में न दुकान-ए-आयीना साज में.
प्रेषितांच्या स्तुतीमध्ये कोट्यावधी शेर व साहित्य निर्माण झालेले आहे. म्हणून वरील तीन शेर नमूद करून थांबतो. अन्यथा हा लेख शेर शायरीनेच भरून जाईल. ही तर झाली मुस्लिमांची गोष्ट. असे गृहित धरूया की प्रेषितांवरील नैसर्गिक प्रेमामुळे मुस्लिमांनी त्यांच्या स्तुतीमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती केली. मात्र आता चर्चा अशा एका पुस्तकाची ज्याचे नाव  ‘द हंड्रेड’ असे आहे. या पुस्तकाचे लेखक एक अमेरिकन ख्रिश्‍चन व्यक्ती आहेत. ज्यांचे नाव इंग्रजी साहित्य क्षेत्रात आदराने घेतले जाते.  त्यांनी आपल्या द हंड्रेड या पुस्तकात जगातील अशा 100 महान व्यक्तींना सूचीबद्ध केलेले आहे, ज्यांनी जगावर आपल्या कार्याने कायमचा प्रभाव सोडलेला आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे, स्वतः ख्रिश्‍चन असून त्यांनी येशू ख्रिश्ताचे नाव या पुस्तकात क्रमांक एकवर न ठेवता इस्लामचे प्रेषित मुहम्मद मुस्तफा सल्ल. यांचे नाव क्रमांक एकवर ठेवले आहे. जेव्हा याबाबत त्यांना विचारणा केली गेली तर त्यांनी उत्तर दिले की , '' He, Muhammad (PBU) was the only man in history, who was suprimly successful in the religious and the secular levals.’’

प्रेषितांच्या जीवनाच्या वेगवेगळ्या पैलूसंबंधी एक अतिशय मार्मिक टिप्पणी सुलेमान नदवी यांनी केलेली आहे. जी देण्याचा मोह सुटत नाही. ते म्हणतात, ”अगर आप मालदार हैं तो मक्के के ताजीर (व्यापारी) और बहेरीन के खजीनेदारों की तकलीद (अनुसरण) करो. अगर आप गरीब हैं तो शोएब अबि तालीब के कैदी और मदीने के मेहमानों के हालात को देखो. अगर आप बादशाह हों तो सुलताने अरब (प्रेषित सल्ल.) के हालात को पढो. अगर आप रियाया (प्रजा) हों तो कुरैश के महेकुम (दबलेले) को एक  नजर देखो, अगर आप फातेह (विजयी) हों तो जंगे बदर और जंगे हुनैन के फातेह सिपह सालारों पर नजर डालो. अगर तुम शिकस्तखुर्दा (पराजित) हों तो जंगे ओहद से इब्रत (शिकवण) हासिल करो. अगर तुम उस्ताज (शिक्षक) हो तो सुफ्फा के मुअल्लीम (शिक्षक) कुद्स को देखो. अगर आप शागीर्द (विद्यार्थी) हों तो रूहूल आमीन (सल्ल.) के सामने बैठनेवालों पर नजर जमाओ. अगर आप वाईज (वक्ता) या नासेह (उपदेश करणारे) हों तो मस्जिद -ए- नबवी सल्ल. के मिम्बर पर खडे होेनेवाले (आप सल्ल.) की बातें सूनो. अगर तनहाई (एकांत) और बेकसी (असहाय्य) के आलम (परिस्थिती) में हक (सत्य) की मुनादी (घोषणा) का कर्तव्य पूरा करना चाहते हों तो मक्का के दौर के नबी सल्ल. की जिंदगी का नमुना तुम्हारे सामने है. अगर तुम हक (अल्लाह) की मदद के बाद अपने दुश्मन को पराजित कर चुके हों, तो फतेह मक्का का नजारा करो. अगर अपने कारोबार को दुरूस्त करना चाहते हों तो, बनी नजीर, खैबर और फद्कवालों के कारोबार को देखो, अगर, तुम यतीम हो तो हजरत आमना को न भूलो, अगर बच्चे हो तो हलीमा सादिया के लाडले (आप सल्ल.) को देखो. अगर युवक हों तो मक्के के एक चरवाहे (आप सल्ल.) की सीरत (जीवन वृत्तांत) पढो. अगर आप सफरी कारोबार (ट्रॅव्हलिंग जॉब) करनेवाले हों तो बसरा के मीर-ए-कारवां की मिसालें ढूंढों, अगर मुनसिफ (न्यायाधिश)हों तो आप सल्ल. के दिए उस फैसले का अभ्यास करो जिसमें आप सल्ल. ने हजरे अस्वद को काबे में नस्ब करके किस खूबी से खून खराबे को रोका था. या फिर मदिना की कच्ची मस्जिद में बैठकर न्याय करनेवाले काजी (आप सल्ल.) को देखो जो सबके साथ बराबर का इन्साफ करता था. अगर तुम शौहर (पती) हो तो आप सल्ल. की अज्दवाजी (वैवाहिक) जिंदगी को देखो. अगर साहेबे औलाद (बालबच्चोंवाले) हों तो हसन और हुसैन रजि. के नाना ने यानी आप सल्ल. ने किस तरह अपने नवासों के साथ पल बिताए उनको पढो.
गर्ज तुम कोई भी और जिस हालत में भी हो, तुम्हारे मार्गदर्शन के लिए, तुम्हारी कायमयाब के लिए, तुम्हारी अज्मत (इज्जत) के लिए, तुम्हारी सुधारणा के लिए ,तुम्हारे जिंदगी के अंधकार को दूर करने के लिए, आप सल्ल. की तालीमात और  आपकी जिंदगी के हालत का चिराग आपकी रहेनुमाई के लिए मौजूद है. ”
मागच्याच आठवड्यात मुस्लिम युवकांनी देशात विशेषतः महाराष्ट्रात ज्या पद्धतीने प्रेषित जयंती साजरी केली त्यामुळे अनेक गंभीर प्रश्‍न गंभीर प्रवृत्तीच्या लोकांमध्ये निर्माण झाल्याशिवाय राहत नाहीत. मग प्रेषितांच्या सन्मानार्थ जुलूस काढणे असो, नातीया मुशायरे आयोजित करणे असो की हिरवे रंग तोंडाला फासून गळ्यात हिरवे गमजे घालून मिरविणे असो. हे सर्व प्रकार न करता युवकांनी जर का प्रेषितांच्या शिकवणीवर लक्ष दिले असते आणि त्यांच्या चरित्राचा अभ्यास करून त्यांनी दिलेले आदेश शिरसावंद्य माणून आचरण केले असते तर आज त्यांना अशा स्तरहीन पद्धतीने जयंती साजरी करण्याची वेळ आली नसती व मुस्लिम समाज कुठच्या कुठे गेला असता.
श्रेष्ठ व्यक्तींचे गुणगान करणे त्यांनी दिलेल्या शिकवणीवर आचरण करण्यापेक्षा अतिशय सोपे असते. इतर युवकांप्रमाणे मुस्लिम युवकांनीही हा सोपा मार्ग गेल्या काही वर्षांपासून अनुसरलेला आहे. यानिमित्त अशा कोणत्या महत्वाच्या शिकवणी आहेत, ज्यांच्याकडे युवकांनी पाठ फिरवलेली आहे, याचा संक्षिप्त आढावा या लेखात घेणे अप्रस्तुत होणार नाही.
सर्वात मोठी गफलत म्हणजे मुस्लिम समाज विशेषतः मुस्लिम तरूणांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष करून प्रेषितांच्या पहिल्याच शिकवणीचा अनादर केलेला आहे. आठवण करा तो दिवस! ज्या दिवशी गार-ए-हिरामधून जिब्राईल अलै. यांच्याकडून पहिला धडा ’इकरा (वाच) अल्लाहच्या नावाने’  घेवून प्रेषित घरी आले व त्यांनी आयुष्यभर शिक्षणाला महत्व दिले. शिक्षणासाठी पाहिजे तर चीन पर्यंत जा असा धाडसी संदेश दिला. अरबांसारख्या रानटी लोकांना त्यांनी सुशिक्षितच नव्हे तर सुसंस्कृतसुद्धा केले. इतके की अवघ्या 30 वर्षात जगाच्या एक तृतीयांश भागावर त्या लोकांचे शासन निर्माण झाले. जे स्वतः जाहील (अशिक्षित) होते. ते जगाचे इमाम झाले. त्यांनी त्या काळातील भौतिक शिक्षण, सैनिकी शिक्षण तसेच अध्यात्मिक शिक्षण घेवून स्वतःची प्रगती केली. आज भारतीय मुस्लिम तरूण शिक्षणाच्या बाबतीत सर्वात शेवटच्या पायरीवर उभा आहे. याची जाणीव जयंती साजरी करणार्‍यांना खचितच नाही.
उर्दू शाळांतून दिले जाणारे स्तरहीन शिक्षण, मदरशांतून दिले जाणारे एकांगी शिक्षण तर सरकारी शाळांतून दिले जाणारे दर्जाहीन प्रादेशिक भाषांतील शिक्षण. या तिन्ही शिक्षण पद्धतींच्या चक्रव्यूव्हात मुस्लिम तरूण पुरता अडकलेला आहे. बोटावर मोजण्याइतके तरूण दर्जेदार भौतिक शिक्षण तसेच दर्जेदार अध्यात्मिक शिक्षण घेवून स्वतःचा संतुलित विकास करतांना दिसून येतात. बाकींच्या बाबतीत आनंदी आनंद आहे. अर्धवट शिक्षण घेतलेली ही तरूण पीढि, अ‍ॅन्ड्रॉईडच्या पूर्ण आधीन झालेली असून, त्यातून येणार्‍या घाणीमध्ये गळ्यापर्यंत रूतलेली आहे.
दूसरी गफलत मुस्लिमांनी ही केली की, प्रेषितांची दूसरी शिकवण म्हणजे मीडियाचा उपयोग करण्याकडे सपशेल दुर्लक्ष केले. प्रेषितांच्या जीवनातील ती घटना आठवा! जेव्हा प्रेषित सल्ल. गार-ए-हिरामधून घरी आले व त्यांच्या सुविद्य पत्नी व सर्व मुस्लिमांची आई हजरत खतीजा रजि. यांनी प्रेषितांना धीर दिला. तेव्हा प्रेषित मक्का शहराला लागून असलेल्या एका उंच टेकडीवर चढले आणि त्यांनी हाक देवून सर्व मक्कावासियांना टेकडीच्या पायथ्याशी गोळा केले व त्यांना सांगितले की, ” तुमचा माझ्यावर विश्‍वास आहे काय?” त्यावर लोक उत्तरले, ” आम्ही तुम्हाला गेल्या 40 वर्षांपासून ओळखतो, तुम्ही सादिक (खरे) व अमीन (विश्‍वासू) आहात. तुम्ही जे म्हणाल त्यावर आम्ही डोळेझाकून विश्‍वास ठेवू.” त्यावर प्रेषितांनी इस्लामची घोषणा केली. अल्लाह एक असल्याची व स्वतः त्याचे प्रेषित असल्याचे सर्वांना सांगितले.” त्यानंतर काय झाले? हा प्रश्‍न अलाहिदा. मात्र त्या काळात उपलब्ध असलेल्या सर्वोत्कृष्ट मीडियाचा वापर करून प्रेषित सल्ल. यांनी आपला संदेश लोकांपर्यंत पोहोचविला. त्या काळात कोणालाही कुठलीही घोषणा सार्वजनिकरित्या करावयाची असल्यास तो सबा नावाच्या मक्के शेजारील ठेकडीवर चढून जोरजोराने ओरडून लोकांना गोळा करून आपले म्हणणे लोकांसमोर मांडत होता. हाच त्या काळातला मीडिया होता. आज मीडियामध्ये खूप प्रगती झालेली आहे. प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये तीव्र स्पर्धा सुरू झालेली आहे. मात्र मुस्लिम या दोन्ही क्षेत्रात कुठेच नाहीत. आपल्या संवेदना उर्दूमधून व्यक्त करून कर्तव्यपूर्तीचे समाधान मांडण्यात आपण समाधानी आहोत. महाराष्ट्रात राहणार्‍या पावणे दोन कोटी मुस्लिमांच्या भावना मराठीमध्ये व्यक्त करणारे एक दैकिन आपण गेल्या 70 वर्षात उभे करू शकलो नाही. याचा परिणाम असा झालेला आहे की, मीडियाच्या क्षेत्रात आपण फार मागे पडलेले आहोत. इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपली बाजू प्रभावशालीपणे मांडण्याची पात्रता सुद्धा आपल्यामध्ये राहिलेली नाही. रोज अनेक वाहिन्यांवर आपण मुस्लिम धर्मगुरूंचा होणारा पानउतारा याची देही याची डोळा पाहतो. आश्‍चर्य म्हणजे रोज-रोजच्या अपमानाला कंटाळून देवबंद इस्लामी विद्यापीठाचे प्रमुख मौलाना मुफ्ती मुहम्मद अय्युब कास्मी नौमानी यांनी 14 एप्रिल 2017 रोजी अशी दुर्दैवी घोषणा केली की, उलेमांनी कुठल्याही वाहिनीवर जावून इस्लामची बाजू मांडू नये. वास्तविक पाहता कमी शब्दांमध्ये, कमी वेळेमध्ये आपली बाजू प्रभावशालीपणे मांडणारे वक्ते तयार करणे ही देवबंदचीच नव्हे तर सर्व मुस्लिम समाजाची जबाबदारी आहे. मात्र 20 कोटी मुस्लिमांमधून काही शेकडा लोकही असे तयार होवू शकलेले नाहीत. हा प्रेषितांच्या मीडियासंबंधीच्या शिकवणीचा उपमर्द नव्हे काय? याची कोणाला काळजी आहे काय? मुस्लिमांना स्वतःच्या गुणवत्तेवर भरोसा नाही काय?
देशात भ्रष्ट राजनीति ने उच्छाद मांडलेला आहे. आज तेच लोक सुखाने जगत आहेत जे कुठल्या न कुठल्या पद्धतीने भ्रष्टाचार करण्यास पात्र आहेत. शेतीमध्ये भ्रष्टाचार करता येत नाही, म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यांची कोणाला परवा नाही. देशात अनेक अनैतिक व्यवसाय फोफावलेले आहेत. अनुत्पादक क्षेत्रातमध्ये अब्जावधींची गुंतवणूक झालेली आहे. दर शुक्रवारी चार-दोन नवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. शेकडो मालिका तयार केल्या जात आहेत. अब्जावधी रूपयांची यातून उलाढाल होत आहे. उत्पादक क्षेत्रात मात्र कोणीही गुंतवणूक करण्यास तयार नाही. म्हणून शेती दुर्लक्षित आहे. शेतकर्‍यांची नवीन पीढि शेती करण्यापेक्षा ऑटो चालविण्यास प्राधान्य देत आहेत. महिलांवर सर्व क्षेत्रात अत्याचार वाढत आहेत. शालेय मुलांमध्ये एकमेकांचे खून करण्याइतपत धाडस विविध मालिकांच्या सौजन्याने निर्माण झालेले आहेत. कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये दाम दिल्याशिवाय काम होत नाही. अशाच लोकांचा विकास होत आहे, जे शासन स्थापण्यामध्ये किंवा शासनाला उलथून टाकण्यामध्ये काही भूमिका निभाऊ शकतात. बाकी लोकांचा विकास थांबलेला आहे. किंबहुना वेडा झालेला आहे. हे सर्व प्रकार अनैतिक लोकांच्या हातात शासनाची सुत्रे गेल्यामुळे होत आहे. अखिल भारतीय मुस्लिम समाज हे सर्व उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. आपल्या प्रिय देशाला एक स्वच्छ आणि नैतिक राजकारण देण्याची जबाबदारी मुस्लिमांची ही आहे. याचा विसर जयंती साजरी करणार्‍यांना पडलेला आहे.
देशातील मुस्लिम धर्मगुरू, बुद्धीजीवी लोक राजकारणापासून अलिप्त आहेत. प्रेषित सल्ल. यांना अभिप्रेत असलेल्या नैतिक राजकारणाचा परिचय देशाला करून देण्यामध्ये मुस्लिम समाज सपशेल अपयशी ठरलेला आहे. जे मुस्लिम लोक राजकारणात आहेत ते इतरांप्रमाणेच भ्रष्ट आणि अनैतिक आहेत. यांच्यात आणि त्यांच्यात काही फरक नाही. ज्या-ज्या क्षेत्रात मुस्लिमांना संधी मिळाली त्या-त्या क्षेत्रात त्यांनी नैतिक आचरण करून आपला ठसा उमटवायला हवे, हे त्यांचे धार्मिक आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे. अपवाद वगळता मोठ्या प्रमाणात मुस्लिम असे करण्यात अपयशी ठरलेले आहेत. मागच्याच महिन्यामध्ये ओरिसा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधिश कुद्दूसी यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये सीबीआयने अटक केलेली आहे. त्यांच्या घरातून 1 कोटी रूपये जप्त करण्यात आलेले आहेत. ही अतिशय दुर्देवी बाब आहे. तसेच मुस्लिमांमध्येही भ्रष्ट आचरण किती खोलपर्यंत रूजले आहे याचा अंदाज या घटनेवरून होतो.
इस्लामला अभिप्रेत असलेली खिलाफत व्यवस्था अवघ्या 30 वर्षात संपलेली आहे. त्यानंतर खिलाफतीच्या नावाखाली बादशाही व्यवस्थेचा अमल सुरू झाला तो आजतागायत सुरू आहे. 21 व्या शतकात अवघे जग लोकशाहीमय झाले तरी अनेक मुस्लिम देशांमध्ये अजूनही बादशाही व्यवस्थाच चालू आहे. भारतीय मुस्लिमांना संकटात टाकून इस्लामच्या नावाने तयार करण्यात आलेल्या पाकिस्तान नावाच्या राष्ट्रात सुद्धा भ्रष्टाचार इतका बोकाळला आहे की, पंतप्रधान नवाज शरीफ यांचा सहकुटूंब तुरूंगाकडे प्रवास सुरू झालेला आहे.
एकदा असे झाले की, प्रेषित सल्ल. झोपेतून जागे झाले. तेव्हा त्यांनी पाहिले की, त्यांच्या अंगरख्यावर एक मांजर निवांतपणे झोपलेली आहे. तेव्हा प्रेषितांनी कात्री मागवून आपल्या अंगरख्याचा तेवढाच भाग कापून काढला. जेणेकरून तिची झोपमोड होवू नये. ही घटना प्रेषितांच्या मुक्यााप्राण्यांच्या जीवाची त्यांना किती काळजी होती, हे दर्शविते. आज पाकिस्तानपासून इजिप्तपर्यंत मस्जिदीमध्ये नमाज अदा करणार्‍या लोकांवर आतंकवादी हल्ले होत आहेत व त्यात शेकडो लोकांचा जीव जात आहे. याच्यापेक्षा प्रेषितांच्या शिकवणीचा अपमान दूसरा कोणता असू शकेल? या लोकांना एवढे कळत नाही की, एके 47 हातात घेवून समाज बदलत नाही तर प्रेषित सल्ल. यांच्या शिकवणीने समाज बदलतो. नो डाऊट इट इज-ए-टेस्टेड फॉमुर्र्ला!
आज एकंदरित अशी परिस्थिती आहे की, अशी कुठलीच सामाजिक कुरीती नाही जी भारतीय मुस्लिमांमध्ये कमी अधिक प्रमाणात नाही. याची जाणीव आपण जयंती साजरी करणार्‍यांमध्ये निर्माण करू शकलेलो नाही, हे उलेमा व बुद्धीजीवींचे मोठे अपयश आहे.  इन्क्लाब म्हणजे क्रांती. वाईट व्यवस्थेला हटवून चांगल्या व्यवस्थेची स्थापना करणे म्हणजे क्रांती. जगात अनेक क्रांत्या झालेल्या आहेत. ज्यात फ्रेंच क्रांती, रशियन क्रांती आणि इंग्रजी शासनाविरूद्ध भारतीयांनी केलेली क्रांती यांचा विशेष करून उल्लेख केला जातो. या क्रांत्यांमधून स्वातंत्र्य, समता आणि बंधूभाव यासारखी मानवी मुल्य जगाला मिळालेली आहेत. याचा दावा सभ्य जगामध्ये केला जातो. मात्र प्रेषित सल्ल.यांनी सहाव्या शतकात केलेली इस्लामी क्रांती यापेक्षाही उच्च दर्जाची होती. ती कशी हे आपण पाहूया.
वर नमूद जगप्रसिद्ध क्रांत्यांमधून वाईट व्यवस्था जावून चांगली व्यवस्था निर्माण झाल्याचा दावा केला जातो. तो खरा की खोटा या विवादात न पडता वाचकांचे एका वेगळ्या मुद्याकडे लक्ष वेधण्याचा माझा मानस आहे. प्रत्येक क्रांतीनंतर फक्त सत्ता बदलते लोक तेच राहतात. त्यांच्या सवई त्याच राहतात. सहाव्या शतकात मात्र शासनही बदलले, लोकही बदलले, त्यांच्या सवईही बदलल्या. जगाच्या इतिहासात असे फक्त एकदाच सहाव्या शतकात झाले आहे. प्रेषितांच्या शिकवणीमुळे नुसते अरबी शासनच बदलले नाही तर अरबी समाजसुद्धा बदलला. जुन्या दारूचा शौकीन अरबी समाज असा बदलला की आज 1439 वर्षानंतरसुद्धा मक्का आणि मदिना येथे दारू मिळत नाही. जे अरब मुलींना जीवंत पुरत होते ते मुलींना आपल्या संपत्तीचा वाटा देवू लागले. ज्या अरबांचा लुटीसारखा मुख्य व्यवसाय होता ते जगातील सगळ्यात मोठी चॅरिटी करू लागले. जे अरब व्याज घेत होते ते जागतिक अर्थव्यवस्थेच्या अवकाशात व्याजमुक्त व्यवस्थेमध्ये ध्रुवतार्‍यामध्ये चमकू लागले. कुठलीही जयंती साजरी करण्याचा इस्लाममध्ये प्रघात नाही व ज्या पद्धतीने आजकाल पैगंबर जयंती साजरी होत आहे, त्या पद्धतीला तर इस्लामी पद्धत म्हणताच येणार नाही. मात्र पैगंबर जयंतीनिमित्त पैगंबर मुहम्मद सल्ल. यांच्या शिकवणीचा ओझरता उल्लेख जो मी या लेखात केलेला आहे त्यावर वाचकांनी लक्ष केंद्रीत केले व त्यानुसार आचरण केले तर आपल्या या प्रिय देशासमोर एक आदर्श समाज कसा असतो? याचे उदाहरण काही वर्षाच्या प्रयत्नानंतर आपण नक्कीच ठेवू शकू आणि तीच आपल्या प्रिय प्रेषित सल्ल. यांना खरी श्रद्धांजली असेल यात माझ्या मनात तरी शका नाही. अल्लाह आपल्या सर्वांना सद्बुद्धी देओ. (आमीन.)

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून ते ग्रामपंचायत निवडणुकीपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचाराचा धुरळा उडवीत आहेत. एनकेनप्रकारे भाजपचा विजय व्हावा व सत्ताधारी असावा असा एककलमी कार्यक्रम राबविण्यासाठी ते जणू अहोरात्र झटत आहेत, त्यासाठी ते कमालीचे गंभीर आणि चिंतातुर असल्याचे चित्र दिसत असल्याने अशी शंका सर्वसामान्य मतदारांच्या मनात उद्भवण्यास पुरेसे कारण आहे. स्वपक्षाचा प्रचार करण्यात भूतकाळातील सर्व पंतप्रधानांना त्यांनी मागे टाकले आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षाही मोदींच्या प्रचारसभा अधिक म्हणजे पाच पटींनी जास्त झाल्या आहेत. त्यामुळे ते देशाचे पंतप्रधान आहेत की भाजपचे असा प्रश्न पडला आहे. त्यांच्या या प्रचारवेडामुळे त्यांचे स्वत:चे व त्यांच्या मंत्र्यांचे दौरेदेखील सरकारी खर्चाने होत असल्याने करदात्यांच्या हजारो कोटी रुपयांचा चुराडा पण होत आहे. हे योग्य आहे काय? एक प्रकारे देशाचे पंतप्रधान देशाच्या सर्वोच्च पदाचा उपयोग स्वत:च्या पक्षाच्या भल्यासाठी करत आहेत जेव्हा की त्यांनी जनतेच्या भलाईचा विचार करावयास हवा. हे अत्यंत दुर्दैवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निवडणूक प्रचारसुद्धा हिंदूंचे लांगुलचालन करणारा आहे आणि मुस्लिमांना वाळीत टाकणारा आहे. याचे उत्तम उदाहरण उत्तर प्रदेशची निवडणू कआहे. या निवडणुकीत एकही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी देण्यात आली नव्हती. अशा प्रकारे धार्मिक ध्रूवीकरण करण्यात मोदींनी कसलीही कसर सोडली नाही. गुजरातमध्येही तसेच घडत आहे. जो पक्ष सत्तेत नसताना धार्मिक विद्वेषावर आधारित मुद्दे हातात घेऊन काँग्रेसला कोंडीत धरण्याचा प्रयत्न करायचे आणि काँग्रेसवर मुस्लिमांच्या अनुनयाचे आरोप लावायचा तो पक्ष सध्या हिंदूंचा अनुनय करून हिंदुमतपेढीवर सत्तेची पोळी भाजत आहे. हे राष्ट्रीय एकात्मतेसाठी योग्य आहे काय?
- निसार मोमीन, पुणे.

हजरत आदम (अ.) यांस सजदा न करण्याचे कारण होते ती अस्मिता! ही बाब सर्वश्रुत आहे. तेव्हा या अस्मितेमुळे किंवा त्यातून जे काही प्राप्त झाले होते ते हानिकारक, मानहानिकारक म्हणजेच सैतान. म्हणून इस्लामला अस्मिता मान्य नाही.
इस्लामची शिकवण त्याच्या अर्थानुसार म्हणजेच शांती आहे. शांती तेथेच आणि तेव्हाच लाभते जेव्हा जुलमाला थारा नसकतो. मात्र आपण याचे विपरीत अनुभरतो ते म्हणजे कुटुंब, समाज, राज्य देश इतकेच काय धर्मदेखील अशांततेतून सुटलेला दिसत नाही. अर्थात याचे कारण अस्मिता हेच होय. कुटुंबात पती-पत्नी, भाऊ-भाऊ, इत्यादींची अस्मिताच कुटुंबाला बेचिराख करते. प्रादेशिक अस्मितेमुळे देशाची प्रगती खुंटते. या अस्मितेतून नुसतीच वित्तीय हानी नाही तर मानव हानीबरोबरच नैतिकतेची हानी होत असते. गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान येथील काही हिडीस प्रकार हेच दाखवून देतात.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी घालून दिलेले उदाहरण असे की जेव्हा सामनेवाल्यांनी आपसांतील करारपत्रावर रसूलल्लाह या शब्दास विरोध केला तेव्हा मुहम्मद (स.) यांनी तो शब्द स्वत:च वगळवला. येथे त्यांनी अस्मिता दूर ठेवली. पैगंबर जे बोलत असत ते प्रथम करीत असत विंâवा नंतरही तसे करीत असत. ज्या अनेक कारणांमुळे त्यांना जगात सर्वोच्च स्थान प्राप्त झाले रोते त्यापैकी हे एक होते.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्यांच्या अखेरच्या प्रवचनात संदेश दिला होता की गोNयास काळ्यावर तसेच अरबीस अजमीवर वर्चस्व प्राप्त नाही. सर्व समान. म्हणजेच अस्मितेला कोठे थाराच नाही. आज सर्व जग समानतेसाठी तडफडत असताना इस्लामने नष्ट केलेली अस्मिता डोके वर काढणार नाही हे पाहणे गरजेचे ठरते. ते विशेषत: मुस्लिमांसाठी काळाची गरज आहे. धार्मिक अस्मितेसाठी हपापलेल्या काही लोकांनी मुस्लिमांस येनकेन प्रकारे आर्थिक, सामाजिक, राजकीय आयुधांचा वापर करून अधिक कमकुवत बनविल्याने त्यांस त्यांची अस्मिता अबाधित राखण्याची आवश्यकता आहे. इस्लाम हा एकमेव धर्म असा आहे ज्याने अस्मितेस समानतेच्या अस्त्राने नामोहरम करून ठेवले आहे.
काही लोक पैगंबर मुहम्मद (स.) जन्मदिन साजरा करतात. खरे तर मुस्लिमांना अल्लाहच्या स्मरणाबरोबर पैगंबर मुहम्मद (स.) यांचे स्मरण करत असताना वेगळा दिन स्मरणासाठी आवश्यकच नाही. तरीदेखील हा दिन साजरा करताना मुस्लिमांनी आपसांतील अनेक फिरके पेवूâन देऊन डॉ. अल्लामा इक्बाल यांनी पृच्छा केल्याप्रमाणे ‘‘क्या बिघडता अगर मुसलमान होते भी एक. समाज म्हणून एकवटले तर आज ज्या समस्यांना ते सामोरे जात आहेत त्या समस्यादेखील अल्लाह स्वत:हून दूर करेल. यासाठी असाच एक शेररूपी सल्ला ‘‘खुदाने उस कौम की हालत आजतक नहीं बदली जिसको न हो खयाल आप अपने को बदलने का’’. अवश्य विाचरात घेऊन अमलात आणल्यास पैगंबर मुहम्मद (स.) यांचा जन्मदिन साजरा केल्याचा आनंद द्विगुणीत होण्यास मदत होईल.
व्यासंगी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी त्यांच्या एका अग्रलेखात पाकिस्तान आणि नंतरचा बांगलादेश न करता एवढे म्हणेन की अल्लाह मुस्लिमांतील पंथ नष्ट करो आणि पैगंबर मुहम्मद (स.) यांनी त्यांच्या शेवटच्या प्रवचनाच्या वेळी मुस्लिमांसमोर दाखविलेली दोन बोटे यांचा मुस्लिमांनी बोध घ्यावा आणि नमाजच्या वेळी आपण एकाच साखळीत बांधलेले आहोत याची सद्बुद्धी आम्हा सर्वांनो देवो अशी दुआ आहे. कारण समाज ऐक्य हे या देशाच्या ऐक्यासाठी देखील लाख मोलाचे आहे.
- ब. अ. मोडक.

-नजीर अहमद एम. अत्तार पुणे / ९६८९१३३२९३
पैगंबर मुहम्मद (स.) यांना अल्लाहने (ईश्वराने) आपला ईशदूत अर्थात
संदेशवाहक म्हणून जगात पाठविले. जगातील मानव समाजाला सत्यधर्म, जीवन, सत्यमार्ग यांची जाणीव करून देण्यासाठी निर्माण केले. मुहम्मद (स.) हे ईश्वराचे अंतिम पैगंबर होत.
मुहम्मद (स.) यांच्या अगोदर ईश्वराने अ‍ेक पैगंबर अर्थात संदेशवाहक निर्माण केले होते. त्यांनी त्या त्या काळात सत्य जीवनमार्गाचा प्रचार, प्रसार केला होता आणि सत्यधर्माची जाणीव करून दिली होती. सत्यधर्म इस्लाम हा प्राचीन काळापासून निर्माण झाला आहे. अर्थात ईश्वराकडून अवतरित झाला आहे.
पैगंबर मुहम्मद (स.) यांचा जन्म कुरैश घराण्यात झाला. तो महिना रबिऊल अव्वल होता. मुहम्मद (स.) यांच्या जन्माअगोदर त्यांचे पिता स्वर्गवासी झाले आणि त्यांच्या जन्मानंतर अवघ्या काही महिन्यांतच त्यांच्या माता निवर्तल्या. ते अनाथ झाले. त्यांचे पालनपोषण काका आणि आजोबांनी केले. ते लहानपणी मेंढ्यांची राखण करायचे. तद्नंतर काकांबरोबर व्यापार करू लागले. व्यापारानिमित्त त्यांना निरनिराळ्या भागांत जावे लागत. त्यांनी व्यापारात प्राविण्य प्राप्त केले होते. ते एक प्रामाणिक सत्प्रवृत्तीचे होते. व्यापारानिमित्त त्यांचे अनेक व्यापाऱ्यांशी, लोकांशी संबंध प्रस्थापित झाले होते.
माननीय खदीजा (रजि.) या एक व्यापारी महिला होत्या. मुहम्मद (स.) यांचा प्रामाणिकपणा पाहून आपला व्यापार मुहम्मद (स.) यांच्या स्वाधीन केला. या व्यापारात त्यांची नेकी व इमानदारी पाहून खदीजा (रजि.) या प्रभावित झाल्या. त्या विधवा होत्या. त्यांचे त्या वेळी वय ४० वर्षे होते आणि मुहम्मद (स.) यांचे वय २५ वर्षे होते. ते दोघे विवाहबद्ध झाले.
विवाहानंतर ते व्यापार करीतच राहिले. त्यांनी व्यापाराचा त्याग केला नाही. व्यापार करीत असताना ते काही वेळा बेचैन होत असत. त्यांना मन:शांती लाभत नव्हती. त्यांना एकांतवास हवा होता. कारण मन:शांतीसाठी मनन चिंतन हवे होते. ते मार्गदर्शन मिळावे म्हणून हिरा नामक गुहेत जाऊन एकांत बसून विचारमग्न होत. ते ईश्वराची याचना व प्रार्थना करीत. मुहम्मद (स.) यांची श्रद्धा व निष्ठा पाहून अल्लाहने त्यांच्या सद्भावनांची कदर करून त्यांना प्रेषित्व अर्थात पैगंबरपद बहाल केले. यानंतर अल्लाहने आपले दूत जिब्रिल (अ.) यांच्याद्वारे संदेश पाठवून मुहम्मद (स.) यांच्यासमोर उभे केले आणि त्यांना जिब्रिल यांनी आज्ञा केली,
‘‘वाचा, आपल्या पालनकर्त्याचे नाव घेऊन मानवाला रक्तापासून निर्माण केले आहे.’’ (कुरआन)
मुहम्मद (स.) अचंबित झाले आणि भयभीत झाले. ही एक अद्भूत घटना होती. त्यांच्यात सत्यता, सत्यवचनी व प्रामाणिक गुण सामावलेले होते. म्हणून त्यांनी अल्लाहचे आभार मानून त्याचा आदेश मान्य केला. 
गुहेत घडलेली अद्भूत घटना त्यांनी आपल्या सुशील पत्नी खदीजा (रजि.) यांना कथन केली. त्यावर त्यांच्या पत्नींनी सांगितले, ‘‘आपण सत्यवचनी आहात, प्रामाणिक आहात म्हणून त्याचे हे फळ. आपण कार्य करावे. आपल्या कार्याची साह्यकरी म्हणून मी आपली अनुयायी बनू इच्छिते.’’
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी ईश्वराच्या साक्षीने सत्कार्यास सुरूवात केली.
अरबस्थानात आणि जगात त्या काळी मानवसमाजात अंधकार होता. वातावरण हिंसाचाराचे अत्याचाराचे होते. सगळे अरब जगत हिंसक वृत्तीचा बनला होता. भयभीत वातावरणात माखला होता. कुणातही ताळमेळ नव्हता. हिंसक वृत्ती वाढली होती. खूनदरोड्यांनी जग बरबटले होते.
अशा अवस्थेत मानवसमाजाला सत्य जीवनमार्गाची, सत्य जीवनपद्धतीची एकेश्वरी कल्पनेची, प्रामाणिकपणाची शिकवण देणे हे काही सोपे कार्य नव्हते. अत्यंत कष्टमय वातावरण होते व सत्यमार्गाचा आवाज उठविणे शक्य नव्हते. परंतु निर्मात्याने आपल्यावर टाकलेली जबाबदारीही झटकता येणार नाही अथवा झटवूâन चालणार नाही. या अवस्थेतही सत्कार्य करणे आवश्यक आहे.
अरबरस्थानात मूर्तिपूजा आणि अनेकेश्वरवाद बळावला होता. मानवसमाजात स्थिरता नव्हती. महिलांवरील अत्याचार वाढत चालले होते. रक्ताचे पाट वहात होते. या घडत असलेल्या घटना त्यांनी पाहिल्या. या सर्व वातावरणाचा सारासार अंदाज घेऊन पैगंबर मुहम्मद (स.) यांनी मोठ्या हिकमतीने, धाडसाने आणि न डगमगता आपले कार्य व एकेश्वरत्वाची शिकवण देण्यासाठी सज्ज झाले.
‘‘करते थे नारियों का अपमान
जीवित गाडते थे संतान
खून चुसते थे, न देते दान,
मुस्ख हो गये थे नादान’’
अशी होती अरबस्थानची स्थिती आणि बहकलेला मानवसमाज हे अनेकेश्वरवादी बनला होता.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी अशा वातावरणात अनेकेश्वरवाद, सत्य जीवनमार्ग, प्रामाणिकपणाची शिकवण, सत्यधर्माची शिकवण ईशआदेशानुसार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य निरंतर सुरू ठेवले. मानवसमाजास संदेश देऊ लागले. हे कार्य करीत असताना त्यांना अडथळे निर्माण होऊ लागले. यातना सोसाव्या लागल्या. त्यांना मारहाण होऊ लागली. मानवसमाज त्यांना जादूगार म्हणून हिणवू लागला. ्यांना ठार माहण्याचा कट शिजू लागला. तरीदेखील आपल्या सत्कार्यातून पैगंबर मुहम्मद (स.) मागे हटले नाहीत. एकीकडे विरोधक वाढत होते तर दुसरीकडे सत्कार्यात अनुयायी हळूहळू सामील होत होते.
याच दरम्यान त्यांच्या पत्नी खदीजा (रजि.) त्यांना अध्र्या वाटेवर सोडून निवर्तल्या. त्याही स्थिती ईश्वरी कामात पैगंबर लीन झाले. त्यांना ठार मारण्यासाठी विरोधकांकडून योजना आखण्यात आली. जेव्हा त्यांना कळले की आपण येथून काही काळासाठी स्थलांतर होणे आवश्यक आहे, कारण आपले ईशकार्य पूर्णत: सिद्धीस आले नाही. म्हणून आपणास हिजरत करणे भाग आहे. म्हणून मक्का शहर काही काळ सोडण्याचा पैगंबरांनी निर्णय घेतला. ते मदीना शहरी स्थलांतर झाले.
मदीनेत पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपले ईशकार्य सुरू केले. येथेही त्यांना या कार्यात अडथळे निर्माण होऊ लागले. त्यांचा छळ होऊ लागला. त्यांच्यावर हल्ले होऊ लागले. तरीही ते हार न मानता आपल्या दृढनिश्चयावर अटळ राहून सत्यमार्गावर आणि सत्यजीवनावर प्रामाणिकपणे तटस्थ राहून लढा देत राहिले. कारण त्यांची ईश्वरावर अढळ श्रद्धा होती.
येथील विरोधकांनी त्यांना उच्चपदाची लालूच, आमिषे दाखविली व ते देण्याचे प्रयत्नही झाले. परंतु ते प्रयत्न निष्फळ ठरले. पैगंबर सत्कर्मापासून मागे हटले नाहीत. ते एक सत्यमार्गी महानायक होते.
एकच ईश्वर हा सर्व मानवजातीचा निर्माता असून तोच उपास्य आहे. त्याचा कोणी भागीदार नाही आणि पवित्र कुरआन हा ईशग्रंथ आहे. ईश्वरच या ग्रंथाचा वाली आहे. त्यानेच हा ग्रंथ निर्माण केला आहे आणि इस्लाम धर्म हाही ईश्वरानेच निर्माण केला आहे. हा धर्म कोणी साधू-संत-पैगंबरांनी निमाण केलेला नाही. म्हणून या धर्माचा संस्थापक पैगंबर मुहम्मद (स.) होऊच शकत नाहीत. फक्त ईश्वराने पाठविलेल्या सत्यजीवनाचा, धर्माचा प्रचार करण्याचे कार्य पैगंबरांनी केले आणि करीत आले आणि या माध्यमातूनच मानवसमाजात सुधारणा घडवून आणण्याचे कार्य केले.
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी असाही संदेश दिला की ‘‘या जगातील मानव समाजाचे जीवन क्षणभंगूर आहे. मर्यादित आहे. म्हणून मानवसमाजाने अनेकेश्वरवादी न बनता एकेश्वरवादी बनून ईश्ववाने सांगितल्याप्रमाणे सत्यमार्गी जीवनाचा स्वीकार करून सत्यमार्गी बनावे व आपले जीवन प्रामाणिकपणे जगावे, यातच सौख्य सामाविलेले आहे.
या ठिकाणी एका सत्यघटनेचा आवर्जून उल्लेख करणे भाग आहे. ही पैगंबर मुहम्मद (स.) यांच्या अंतिम समयीची घटना आहे. त्यांनी आपले प्रिय लाडक्या कन्येस उपदेश दिला.
‘‘हे फातिमा! तू एक पैगंबराची कन्या आहे म्हणून अहंकार बाळगू नकोस अथवा अहंकारी बनू नकोस. तू सत्यमार्गी व प्रामाणिक राहा. प्रलयाच्या दिनी ईश्वरासमोर तुला उभे राहावे लागणार आहे. त्या वेळी मी तुझा साक्षीदार म्हणून मला साक्ष देता येणार नाही. फक्त तू सत्य राहा. सत्य जीवन जग.’’
नंतर हजस्थानी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्याकडे असलेली नाणी दान केली अन् सरतेशेवटी आपले ईमान शाबूत ठेवून हे जग सोडून गेले.
अशा महानायकाची म्हणजेच पैगंबर मुहम्मद (स.) यांची जयंती साजरी होत पुढील ईशवचनाचा पुनरुच्चार करावासा वाटतो,
‘‘अल्लाहशिवाय दुसरा ईश नाही आणि मुहम्मद (स.) हे अल्लाहचे पैगंबर आहेत.’’

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget